Category: ठाणे

Thane news

नववर्षाच्या स्वागतानिमित्त अंनिसचा ‘चला बनूया जबाबदार वाहन चालक’ उपक्रम

ठाणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा, घाटकोपर व रोटरी क्लब ऑफ मुंबई, घाटकोपर यांनी ‘चला बनूया जबाबदार वाहन चालक’ (Don’t Drink & Drive) असा मजकूर असणारे पत्रके घाटकोपर येथील…

ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय स्थलांतरित

ठाणे : बेलापूर येथील कोकण भवनात असलेले ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय आता खारेगाव कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे स्थलांतरीत झाले आहे. अर्जदार यांनी…

३ आठवडे चाललेल्या करंजाडे महोत्सवाची लावणी नृत्याच्या कार्यक्रमांनी सांगता

राज भंडारी पनवेल : गेली 7 वर्षे करंजाडेमधील नागरिकांसाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्यावतीने करंजाडे महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षीही जवळपास तीन आठवडे हा महोत्सव विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला. करंजाडे वासियांनी या महोत्सवाला उदंड प्रतिसाद देत आपली हजेरी नोंदविली. करंजाडे महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. तसेच मिस करंजाडे ही स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यामध्ये करंजाडे येथील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीला. मंगळवारी 31 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी सिने तारका लावणी नर्तिका राधा पाटील मुंबईकर हिच्या दिलखेचक अदांनी करंजाडे महोत्सवाची सांगता पार पडली. आपल्या दिलखेचक अदा आणि नृत्यांनी तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील अख्या महाराष्ट्राला माहित आहे. पण आता गौतमी पाटीलला टक्कर देण्यासाठी राधा पाटील मुंबईकर ही मैदानात उतरली आहे. अवघ्या 4 महिन्यापूर्वी प्रकाश झोतात आलेल्या राधा पाटील मुंबईकर हिने आपल्या नृत्याने तरुणांना वेड लावलं आहे. करंजाडे महोत्सवाच्या सांगता समारंभातील तिच्या मनमोहक आणि दिलखेचक अदांनी करंजाडे सह पनवेलमधील तरुणांना देखील वेडं केलंय. करंजाडेचे माजी सरपंच तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या महोत्सवात तरुणाईने अख्ख मैदान तुडुंब भरून गेलं होतं. कातिलोंकी कातिल आणि राधा पाटील असा सुर यावेळी तरुणांच्या तोंडी घुमताना दिसला. तब्बल 3 आठवडे चाललेल्या या महोत्सवामध्ये करंजाडे वासियांसाठी दर्जेदार मेजवानीसह विविध वस्तूंच्या खरेदीचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच बच्चे कंपनीसाठी याठिकाणी बालनगरी उभारून यामध्ये मुलांच्या हौशी मौजीचे खेळ ठेवण्यात आल्यामुळे करंजाडेसह पनवेलमधील नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला. एकूण 23 दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने नागरिकांनी आपली उवस्थिती दाखविली होती. ०००००

 ठाणे महापालिकेच्या पाणी बिलाची थकबाकी असलेल्या २६०६ नळ जोडण्या खंडित

 २३३० थकबाकीदारांना पाठवल्या नोटीसा   ठाणे : ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात २६०६ नळ जोडण्या खंडित केल्या असून ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच, ७३ पंप रुम सील करण्यात आले आहेत. तर, २३३० थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एप्रिल ते डिसेंबर या काळात ७७.९८ कोटी रुपयांची बील वसुली करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागातर्फे राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात २१.८५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत आहेत. बील न भरल्यास पाणी पुरवठा खंडित होणार पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. …तर कारवाई होणार प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच, पाणी बील वसुलीत हयगय करणारे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि मीटर रिडर यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरी, नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बील भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे. थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ही योजना ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच, ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही. 000000

 अग्निशमन दलात चालक घोटाळा

एमबीएमसीमध्ये 127 चालकांऐवजी केवळ 40 ते 50 चालक कार्यरत आहेत.   अरविंद जोशी मीरा- ईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलात (अग्निशमन दल) चालक घोटाळ्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हा अधिकारी पवन घरत यांनी केला…

सर्व प्रकरण सेट केल्यानंतर वाल्मिक कराडचे पोलिसांसमोर सरेंडर – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : ‘गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेंड वाल्मिक कराड हा सरेंडर करणार होता हे मी अगोदरच सांगितले होते. यापूर्वीच मी ट्विट केले आहे,’ सर्व प्रकरण सेट करण्यासाठी इतके दिवस घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड पुणे पोलिसांसमोर शरण आल्यानंतर केला आहे. संतोष देशमुख हे भाजपचे होते आमच्या पक्षाचे नव्हते, पण माणुसकी जिवंत राहावी यासाठी आम्ही लढतो आहोत.संतोष देशमुखांच्या कुटुंबाला सरकारी वकील देताना त्यांच्या कुटुंबाला विश्वासात घेणं आवश्यक आहे. माझी फडणवीसांना विनंती आहे की, मागच्या दोन-तीन वर्षात झालेल्या हत्यांची चौकशी करावी आणि त्यांच्याही कुटुंबियांना बोलवून घ्यावं. त्यावेळी कळेल की कोणी कोणाची जमीन बळकावली आणि कोणी कोणाची हत्या केली.” असाही घणाघात आव्हाड यांनी केला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची तुलना बिहारशी करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या जनतेला जोपर्यंत वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जनतेने शांत बसू नये असं आवाहनही यावेळी केलं. आव्हाड यांनी आणखी एका प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, एक हत्या तर भयंकर आहे त्याची माहिती माझ्याकडे आहे, पोरीला फोन लावून दिला गेला आणि फोनवरून मुलीला सांगितलं की एक तर तू गोळी मारून घे नाही तर याला गोळी मारून घ्यायला सांग. याचा संपूर्ण तपशील त्यांनी यावेळी दिला नाही. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत गंभीर आरोप करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “नैतिकदृष्ट्या मी समाजतील, राजकारणातील घडामोडी वाचत असतो, लक्षात ठेवत असतो. त्यावरुन राजकारणात आत्तापर्यंत एवढे मोठे आरोप कोणत्याही मंत्र्यावर झाले नाहीत. ०००००

 वामन म्हात्रेंची खेळी, किसन कथोरेंना धक्का

बदलापुरात भाजपचा माजी नगरसेवक शिवसेनेत बदलापूरः विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाला भाजपात प्रवेश देत आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांनी चक्क भाजपच्या माजी नगरसेवकालाच गळाला लावले असून हा किसन कथोरे यांना धक्का मानला जातो. विशेष म्हणजे आमदार कथोरे यांचे निवासस्थान याच प्रभागात येते. गेल्या काही दिवसात बदलापुरात कथोरे विरूद्ध म्हात्रे वाद टोकाला पोहोचला असून एकमेकांवर शाब्दीक हल्ले करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतो आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या किसन कथोरे यांचा पाचव्यांदा विजय झाला. मात्र त्याचवेळी बदलापुर शहरात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे किसन कथोरे यांच्यातील वाद टोकाला गेला. कथोरे यांच्या उमेदवारीला म्हात्रे यांनी निवडणुकीआधीच विरोध सुरू केला होता. त्यामुळे ऐन प्रचार रंगात येत असताना म्हात्रे यांनी प्रचारापासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यातच आमदार कथोरे यांनी वामन म्हात्रे यांचा प्रभाव असलेल्या भागातील उपशहर प्रमुख तेजस म्हस्कर यांनाच भाजपात प्रवेश दिला. त्यामुळे शिवसेनेत संताप वाढला होता. म्हात्रे यांनी याबाबतची नाराजी थेट तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली होती. तरीही शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळत कथोरे यांचाच प्रचार करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर हा वाद टोकाला पोहोचला. विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात आमदार किसन कथोरे यांनी वामन म्हात्रे यांच्यासह सर्व पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधकांना थेट आव्हान दिले होते. म्हात्रे यांनी कथोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे यांच्यात वाकयुद्ध वाढल्याचे दिसत होते. मात्र वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजीत आगरी महोत्सवात पहिल्याच दिवशी भाजपचे बदलापूर गावातील माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर मंगळवारी चतुरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. माझा प्रवेश यापूर्वीच झाला होता. आता फक्त सदिच्छा भेट घेतल्याची प्रतिक्रिया हेमंत चतुरे यांनी दिली. मी १३ वर्ष शिवसेनेचा शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होतो. मी शिवसेनेकडून निवडणुकही लढवली होती. माझी बहीण शिवसेनेची नगरसेविका होती. मध्यंतरी मी भाजपात होतो. मात्र दोन वर्षांपासून मला प्रभागात काम करताना अडचणी येत होत्या. माझी घुसमट होत होती, त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया हेमंत चतुरे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. हा प्रवेश आमदार किसन कथोरे आणि भाजपासाठी धक्का मानला जातो आहे. आमदार किसन कथोरे यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातून चतुरे नगरसेवक आहेत. त्यामुळे म्हात्रे यांनी विधानसभेतील फोडाफोडीची परतफेड केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ही तर घरवापसी शिवसेनेचा कार्यकर्ता आत शिवसेनेत आला. हा पक्षप्रवेश नाही तर घरवापसी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे. हेमंत चतुरे शिवसैनिकच होते. त्यांचा परिवार शिवसेनेशी संबंधित आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बदलापुरात शिवसेना आणखी मजबूत होईल, असेही म्हात्रे  बोलताना म्हणाले.

पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा, चिनी दोरा वापरण्यास ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध – सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे :महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, चिनी मांजा तथा सिंथेटिक-नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबविण्यात येत आहे. त्यासाठी,  प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरिक्षक, स्वच्छता निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण २५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या मांजांच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण २५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. मात्र, या तपासणीत एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, ८९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. पतंग उडवण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसेच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे. चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारिक चूरा केलेली काच, धातू किंवा अन्य तिक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातलेले आहेत. या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नसल्याने मल प्रणाली, जलनि:सारण बाधित होते. तसेच असे पदार्थ खाल्ल्याने जनावरांनाही इजा होते. तसेच, हा धागा विद्युत वाहक असल्याने वीज साहित्य आणि वीज उपकेंद्र यांच्यावरही भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे..या तपासणी दरम्यान, एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, ८९ हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यानी दिली.प्रतिबंधित सिंथेटिक, नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण, पुरवठा किंवा वापर याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर, pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदवता येईल. 0000

 पारोळामधील जिल्हापरिषद शाळेमधल्या गुणवंत विदयार्थ्यांना बक्षिसे भेट

 राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांचा स्तुत्य उपक्रम   कल्याण : नुकतीच पारोळा केंद्र समुहातील शाळांची डिसेंबर महिन्याची शिक्षण परिषद जि प उच्च प्राथमिक शाळा क्र २ पारोळा येथे गुणवत्तापुर्ण व उत्साहवर्धक वातावरणात केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शाळेतील शिक्षिकांनी शिक्षणाचे महत्व सांगणारी भव्य सुंदर व आकर्षक रांगोळी शाळेच्या प्रांगणात साकारून सर्वांचेच लक्ष आकर्षित केले. शाळेच्या विदयार्थीनींनी अगळया वेगळ्या पद्धतीने व विविध वेशभुषा परिधान करीत ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून उपस्थित सर्वांची दाद मिळविली. आपण सदैव ज्या पर्यावरणात जीवन जगतो ते स्वच्छ, सुंदर, निर्मल असले पाहिजे. तसेच विद्यार्थी दशेपासुनच बालकांच्या मनावर पर्यावरण जतन, रक्षण व संवर्धन हे ध्येय बिंबविण्याचा शाळा शिक्षकांचा प्रयत्न दिसुन आला. झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा ही नाटिका अतिशय प्रबोधन करणारी विदयार्थ्यांनी सादर करून याबाबत जागृती केली. या सर्व २५ गुणवंत विद्यार्थ्यांना जि प शाळा क्र ३ पारोळा शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी आपल्या साने गुरुजी धडपडणारा आदर्श विद्यार्थी उपक्रम अंतर्गत रायटिंग पॅड देवुन प्रोत्साहित केले. शिक्षण परिषदेत अपेक्षित विषयांवर चर्चेत सर्वच शिक्षक यांनी सहभागी होवुन आपले त्या त्या विषयानुसार अनुभव कथन करून मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्याक रविंद्र पाटील, मंगला शिवदे, किशोर पाटील, मोहन बागुल, स्वाती देवरे, शितल पाटील, मयुरी पाटील, मंगला पाटील, स्नेहल वराडे, विठोबा महाजन या शिक्षकांनी विदयार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम बसवुन शिक्षण परिषदेचे उत्कृष्टपणे आयोजन केले. 000000

येऊरच्या डोंगरात ट्रेकिंगला गेलेल्या मुलांना मधमाशांचा चावा

 दहा मुलांची सुखरूप सुटका, तिघे गंभीर जखमी   ठाणे : येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या डाेंगरामध्ये अडकलेल्या ऋषी घोसाळकर (१८) याच्यासह दहा मुलांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सोमवारी दिली. ही मुले ट्रेकिंगसाठी डोंगरात गेली होती, त्यांना मधमाशा चावल्या. त्यामुळे  भीतीमुळे तिथेच अडकल्याची माहिती या मुलांनी सुटका झाल्यानंतर पोलिसांना दिली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास येऊरच्या जंगलात गेलेली १८ वर्षे वयोगटातील मुले अडकल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, अग्निशमन दलासह  टीडीआरएफ जवानांच्या मदतीने या मुलांची सुटका करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास  ऋषी याच्यासह समर्थ मयेकर (रा.  घणसोली, नवी मुंबई),  प्रणव परब (रा. विक्रोळी, मुंबई), वरद बासा (रा. विक्रोळी, मुंबई), सोहम देशमुख (रा. वैशाली नगर, श्रीनगर, ठाणे),  कुणाल पानमंद (रा. घाटकोपर, मुंबई), तन्मय नाईक (रा.  मुलुंड, मुंबई),  रोहन गरुड ( रा. मुलुंड, मुंबई), अलोक यादव (रा. कळवा, ठाणे) आणि  आर्य यादव (रा. कांजूरमार्ग, मुंबई) या दहा मुलांची डोंगरामधून सुखरूप सुटका केली. या  मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले, तसेच मधमाशा चावून गंभीर दुखापत झालेल्या समर्थ, वरद आणि सोहम या तिघांना  एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 00000