Category: ठाणे

Thane news

दिव्यांग मुलांसाठी निवारागृह, संस्थांना विशेष योजनांचा लाभ – संजय केळकर

दिव्यांग मुलांसाठी निवारागृह, संस्थांना विशेष योजनांचा लाभ – संजय केळकर अनिल ठाणेकर मुंबई : ठाण्यासह राज्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांची तपासणी करताना अनुदान रोखण्यात येऊ नये, ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थ्यांना निवारा गृहासाठी दिव्यांग कल्याण विभागाने कार्यवाही करावी, आदी मागण्या आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केल्या. दिव्यांगांचे सक्षमीकरण आणि पुनर्वसनासंदर्भात उपस्थित प्रश्नावर चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी विविध मागण्या मांडल्या. राज्य शासनाने दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि पुनर्वसनासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, परंतु त्या संस्थांपर्यंत पोहोचत नसल्याचे केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सध्या संस्थांची तपासणी सुरू असून ती किचकट न होता सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या या संस्थांकडे सहकार्याच्या भूमिकेतून पाहण्यात यावे, तपासणी करत असताना त्यांचे अनुदान सुरूच ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली असली तरी या विभागाला स्वतंत्र प्रभारी अधिकारी देण्यात आलेला नाही. या  अधिकाऱ्याची नियुक्ती कधी करणार, असे विचारताना केळकर यांनी सोयीच्या कारभारासाठी जिल्हानिहाय कार्यालये कधी सुरू करणार असा प्रश्नही उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी प्रलंबित विषय मार्गी लावण्यात येत असल्याची माहिती दिली. एमपीएससी परीक्षा झालेल्या असून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिव्यांग कल्याण विभागाला स्वतंत्र अधिकारी देण्यात येईल, असे मंत्री  सावे यांनी सांगितले. ठाण्यातील जागृती पालक संस्था गेली २५ वर्षे दिव्यांगांसाठी काम करत असून त्यांच्याकडे असलेले विद्यार्थी १८ वर्षांहून अधिक वयाचे आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी निवारागृह उभारण्यासाठी संस्था जागेच्या शोधात आहे. दिव्यांग कल्याण विभागाने याकरिता सहकार्य करताना अशा संस्थांसाठी विशेष योजना राबवण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.

सुधारणा विधेयक `ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या’च्या खडतर आयुष्याच्या वाटेवर नवीन आशेचा किरण – नरेश म्हस्के

सुधारणा विधेयक `ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या’च्या खडतर आयुष्याच्या वाटेवर नवीन आशेचा किरण – नरेश म्हस्के अनिल ठाणेकर नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या `ट्रान्सजेंडर व्यक्ती : हक्क-संरक्षण-सुधारणा विधेयक, २०२६’ या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर संसदेत चर्चा करतांना आज शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी या  ऐतिहासिक विधेयकाचे स्वागत करत शिवसेना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्षे दूर ठेवलेल्या ट्रान्सजेंडर बांधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणं ही काळाची गरज आहे. विकास हा तेव्हाच खरा ठरतो जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचतो, असे मत खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकाचे समर्थन करताना ठामपणे मांडले. यावेळी उपमुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या ‘महाराष्ट्र ट्रान्सजेंडर धोरण 2024’चा खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उल्लेख करत, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे या समाजाला विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असल्याचं सांगितलं. ओळखपत्र, रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे त्यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. या विधेयकातील तरतुदींमुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या घरातून किंवा समाजातून हाकलून देणं, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास अडथळा निर्माण करणं किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणं हा गुन्हा ठरणार आहे. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषणाविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आल्यामुळे या समाजाला सुरक्षिततेची नवी हमी मिळणार  असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत, ‘SMILE’ योजनेअंतर्गत गरिमा गृह, राष्ट्रीय ट्रान्सजेंडर परिषद, तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या सकारात्मक निर्णयांमुळे या समाजाचा आत्मविश्वास वाढत असल्याचंही खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलं. ट्रान्सजेंडर व्यक्ती हे आपल्या समाजाचाच अविभाज्य भाग असून त्यांना तिरस्कार नव्हे तर सन्मान मिळाला पाहिजे, असं मतही खासदार नरेश म्हस्के यांनी ठामपणे मांडलं.राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांनी एकत्र येत या विधेयकाला सर्वानुमते मंजुरी द्यावी, असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी करत, प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीचा सन्मान करणारा, समावेशक आणि संवेदनशील भारत घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न अनिल ठाणेकर सांगली, स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था संचलित, बाबा नाईक महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांच्या हस्ते झाले. बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. एम. एस. देशमुख यांनी भारताच्या ७९ वर्षांच्या कृषी प्रवासाचा आढावा घेतला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला पाटील होत्या. या सत्राचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद राठोड यांनी केले. प्रथम सत्र: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय ठिगळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. जयवंत इंगळे यांनी भूषवले. या सत्राचे आभार प्रो.डॉ.के.आर.गावडे यांनी मानले.द्वितीय सत्र: पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथील डॉ. कुलविंदर सिंग यांनी १९४७ मधील कृषी स्थिती आणि आजची शाश्वतता यातील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. मनोहर कोरे होते.या परिषदेसाठी तांत्रिक सहाय्य आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रो. डॉ. अनिल काटे आणि प्रा.डॉ. संदीप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस. डी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश कांबळे यांनी मानले. या ऑनलाईन परिषदेत देशातील विविध भागांतून प्राध्यापक आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी मनसे आक्रमक

 दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी मनसे आक्रमक मुंबई : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरु करण्यासाठी आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली…

रिक्षा चालकांचा उपोषणाचा इशारा

रिक्षा चालकांचा उपोषणाचा इशारा विविध मागण्यांसाठी घेतली उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱयांची भेट कल्याण : रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी  पूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयात  शशांक राव व  विलास भालेकर साहेब यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांना टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याण वतीने  समितीचे अध्यक्ष महेंद्र मिश्रा, कृती समितीचे कार्याध्यक्ष विल्सन काळपुंड, कृती समितीचे उपाध्यक्ष मोहन पाठारे तसेच प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांना निवेदन देण्यात आले. तसेच लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. ऑटोरिक्षा चालक मालकांवर धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळच्या नोंदणी करण्यास सक्ती करण्यात येऊ नये व जे गैरकायदेशीररित्या सक्ती करत असतील अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.  धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळात रिक्षाचालक मालकांच्या नोंदणी करिता प्रवेश शुल्क व वार्षिक शुल्क रद्द करण्यात यावे व सर्व रिक्षाचालक मालकांची निःशुल्क नोंदणी या मंडळात करण्यात यावी. ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र ने कल्याणकारी मंडळासाठी मागणी केलेल्या व सुचवलेल्या कल्याणकारी योजना रिक्षाचालक मालकांकरिता या मंडळामार्फत राबविण्यात याव्यात.  महाराष्ट्र राज्य सरकारने ऑटोरिक्षांच्या परवाना वितरणावर स्थगिती आणली आहे. मात्र, इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्यावर स्थगिती आणलेली नाही. या सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करत आहोत. इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्या नोंदणीवर सरकारने तातडीने स्थगिती आणावी. अस्थित्वात असलेल्या इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्यावर ऑटोरिक्षा सारखेच नियम लावण्यात यावेत व त्यांना ठरवून दिलेल्या मार्गावरच वाहतूक करण्यासाठी कठोर कारवाही करण्यात यावी. राज्य सरकार ने नुकतीच बाईक टॅक्सी वर बंदी घातली आहे, तरीही शहरात खाजगी कंपन्यांद्वारा अवैधरित्या बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे सुरु आहे. या अवैध बाईक टॅक्सी मुळे प्रवाश्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, या अवैध बाईक टॅक्सी व ती सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाही करत त्यांच्यावर बंदी आणण्यात यावी. या सर्व मागण्या या अत्यंत रास्त मागण्या आहेत व ऑटोरिक्षा चालकांच्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत. तेव्हा यावर गांभीर्याने कारवाही कराल अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.

तेली समाजाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात

ठाणे : श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे यांच्या वतीने तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन न्यू इंग्लिश स्कूल येथील भोळे सभागृहात उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठ नागरिक सत्कार, हळदी-कुंकू…

कळसुबाई शिखरावर शालेय विद्यार्थ्यांचा झेंडा

कल्याण : शालांत परीक्षा संपल्यानंतर मुलांना सुट्ट्यांचे वेध लागतात. दहावीची परीक्षा संपल्यानंतर पिकनिक, वॉटर रिसॉर्ट, मोबाईल, कम्प्युटर गेम यापासून दूर जात  काही मुलांनी एकत्र येत महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर पार करण्याची मोहीम आखली. यासाठी गिर्यारोहक आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत लोक कल्याण पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच ही मोहीम फत्ते केली. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्या मध्ये असणारे सर्वोच्च शिखर (१६४६ मी/५४०० फूट उंच ) ज्याला महाराष्ट्र चा एव्हरेस्ट मानले जाते. मुलांनी सायंकाळी शिखराकडे कूच केल्यानंतर मध्ये अनेक अडचणी आल्या. विद्यार्थ्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. या सर्वांवर मात करत सकाळी ६ वाजता शालेय विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर केले. या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि पहिल्यांदाच केलेला कामगिरीचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.  या टीम मध्ये स्केटिंगची राष्ट्रीय खेळाडू आस्था नाइकर, तीर्था पणिकेर, दिशिता खाचणे, हर्षिल सोळंकी, धनराज सावंत, सार्थक घोडेस्वार, श्रेया प्रसाद, श्लोक बोंबाटकर, शोभित लोखंडे, सई देशमुख, अमेय सोरकाडे, यश भोर, रणबीर प्रसाद, श्रावणी बांदेकर, कृष्णा पाणीग्रही, तृषा खराडे, पार्थ दाभाडे, मनस्वी ढेंगरे, विरेन वानखेडे, अथर्व कदम, वेदिका देवळेकर, मनस्वी फुटाणे, आर्या गुरव आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांचा समावेश होता.

टँकरच्या नावाने करोडो रुपयांची झाली सरकारी उधळपट्टी तरीही पाणी टंचाई कायम !

टँकरच्या नावाने करोडो रुपयांची झाली सरकारी उधळपट्टी तरीही पाणी टंचाई कायम ! धरणांच्या तालुक्याची भयानक कैफियत अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव पाड्यांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात उन्हाळ्यात दरवर्षी टंचाईग्रस्त गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरविले जाते.यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून सरकारी टँकर सुरु केले जातात केवळ आदिवासी गाव पाड्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आजमितीस सरकारी तिजोरीतून करोडो रुपयांची टँकरच्या नावाने उधळपट्टी केलेली आहे.उन्हाळा सुरु झाला की टंचाई गाव पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा पाणी पुरवठा विभागाकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जातो त्यास शासनाची मंजूर मिळाली की टँकर सुरु करण्यासाठी निविदा मागविल्या जातात आपल्या मर्जीतल्याच टँकर लॉबीला पाणी पुरविण्याची दरवर्षी कंत्राट दिली जातात जिथे टँकर पोहचू शकत नाहीत अशा डोंगरदऱ्या खोऱ्यात पठारावर असलेल्या वाड्या वस्त्यांवर बैलगाडीतून पाणी पुरवठा केला जातो गेल्या १० वर्षांत तब्बल ६ कोटींहून अधिक खर्च हा राज्य सरकारला केवळ टंचाई गाव पााड्यांना पाणी पुरविण्यासाठी करावा लागला आहे बरेच वर्ष टँकरवर अवलंबून असणारा शहापूर तालुका दुर्दैवाने आजही टँकरमुुक्त होऊ शकलेला नाही . आजही आदिवासी महिलांची पाण्यासाठी सुरु असलेली वणवण व त्यांच्या डोक्यावर हंडा हे चित्र नजरेस पडते.टँकर उन्हाळ्यात सुरु होऊनही हे टँकर कधीच सुरळीतपणे व वेळेवर टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर पोहचले नाहीत अशी ओरड आदिवासी महिलांची असते आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती देखील तशीच बघायला मिळते आहे.अनियमित टँकर येत असल्याने टँकरची वाट पाहत बसण्यापेक्षा आदिवासी पाण्यासाठी इतरत्र भटकंती करतात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आदिवासींना बसत असल्याने  टँकर नंतरही पाण्यासाठी त्यांचे भयानक हाल सुरुच असल्याचे चित्र तालुक्यातील टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर दिसत आहे .टंचाई ग्रस्त भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याबरोबरच टंचाई आराखड्यात नवीन पाणी योजना प्रस्तावित करणे,नव्या विहीरी बांधणे,विहिरींमधील गाळ काढणे,व विहिरींचे खोलीकरण करणे ,नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहीरी,जुन्या विंधन विहीरींची दुरुस्ती करणे,हात पंप बसवणे टंचाईग्रस्त भागातील गावासाठी बोअरवेल मंजूर करणे यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो पण गेल्या कित्येक वर्षापासून हा निधी खर्च होऊनही अनेक योजनांत गैरव्यवहार झाल्याने बहुतांश योजनांचा खर्च हा अक्षरशः पाण्यात गेलेला दिसतो आहे .या गैरव्यवहार प्रकरणी स्थानिक ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांवर यापूर्वी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत या सर्व पाणी योजनांची शासनस्थरावर चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे .या सर्व पाणी योजना या कुचकामी ठरल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येथे आली आहे.जवळपास तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या गाव पाड्यावरील अनेक पाणी योजना बोगस ठरलेल्या आहेत.शहापूर तालुक्यात एकूण २०३ पाणी योजना असल्याची माहिती मिळते आहे यातील १३७ पाणी योजना या कशातरी रडतखडत सुरु आहेत तर जवळपास १७ पाणी योजना अपूर्ण अवस्थेत बंद पडून आहेत.बऱ्याच आदिवासी वस्त्यांमध्ये पाणी योजनाच नाहीत ठाणे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कित्येक वर्ष टँकरने पाणी पुरविण्याचे नियोजन करते परंतु शहापूरची ही पाणी टंचाईची अवस्था पाहता व त्यासाठीचा होणारा अवास्तव खर्च पाहता टंचाईग्रस्तांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठीच्या ठोस अशा कोणत्याच उपाययोजना पाणी पुरवठा खात्याला एवढया वर्षांत करता आलेल्या नाहीत हे टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठयासाठी झालेल्या सरकारी खर्चावरुन स्पष्ट होत आहे.या कामी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सपशेल अपयशी ठरल्याने उन्हाळ्यात फक्त पाण्यासाठी टँकरवरच गाव पाड्यांवरील लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.हे येथील जळजळीत वास्तव आहे.शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी सरकारचे कुठलेच योग्य नियोजन दिसून येत नसून केवळ नेहमीची येतो पावसाळा, या युक्ती प्रमाणे दरवर्षी फक्त टँकरने पाणी पुरवठा या गोंडस नावाखाली टँकर लॉबीला पोसण्याचे काम येथे कित्येक वर्ष प्रशासनाकडून सुरु असून ही टँकरच्या नावाने सरकारी उधळपट्टी येथे सुरु असल्याचे दिसत आहे .करोडो रुपये टँकरच्या नावाखाली खर्च होऊनही हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची उन्हातान्हात वणवण कायम असल्याचे विदारक असे चित्र धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात दिसत आहे.

निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी – महापौर डिंपल मेहता

निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी – महापौर डिंपल मेहता मिरा – भाईंदर : पर्यावरण संवर्धन ही केवळ शासन किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांनी केले. महापालिका आयोजित वसुंधरा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित या तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी महापौरांच्या हस्ते आणि आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. माझी वसुंधरा महोत्सवाच्या निमित्ताने पद्मभूषण मेजर ध्यानचंद मैदानात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी प्रदर्शनातील पर्यावरणपूरक स्टॉल्स आणि शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. या प्रदर्शनात औषधी वनस्पती, बी-बियाणे आणि विविध नर्सरी, आयुर्वेदिक उत्पादने, हस्तकला आणि हँडलूम वस्त्रे, सोलर सेल्स, सोलर बॅटरी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारखी आधुनिक तंत्रज्ञानाची सादरीकरणे करण्यात आली. या सोहळ्याला उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत, महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता पाटील, उपसभापती हेमा बेलानी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व प्रियंका राजपूत, डॉ. सचिन बांगर, कविता बोरकर, प्रणाली घोंगे, स्वप्नील सावंत, नागेश विरकर हेही उपस्थित होते.

४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

नवी मुंबई महानगरपालिका चषक ४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ नवी मुंबई : ४० वर्षावरील क्रिकेट खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व शारीरिक तंदुरुस्तीबाबत त्यांच्या मनात असलेली आरोग्य जागरुकता वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषकांतर्गत मागील १० वर्षापासून ४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धा जाहीर होऊन अलपकालावधी उपलब्ध होऊनही या स्पर्धेला मिळलेला भरघोस प्रतिसाद उत्साह वाढविणारा असल्याचे मत महानगरपालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीचे सभापती  गिरीष म्हात्रे यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयाजवळील क्रीडांगणात २३, २४ व २५ मार्च २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक ४०वर्षावरील क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. या प्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ४० वर्षावरील क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदिप पाटील, उपाध्यक्ष  नरेश गौरी, सचिव  एल डी पाटील व विकास मोकल, मनोज म्हात्रे, बळीराम पाटील, भालचंद्र दळवी, बाळकृष्ण बंदरे व इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील ३३ क्रिकेट संघ तसेच शहरी भागातील २५ क्रिकेट संघ असे एकूण ५८ क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. यावेळी पावणेगाव व ऐरोलीगाव या संघांमध्ये झालेल्या शुभारंभाच्या सामन्यात पावणेगाव संघाने विजय संपादन केला. या स्पर्धतील ग्रामीण क्रिकेट संघांसाठी स्वतंत्र विजेता व उपविजेता चषक तसेच शहरी भागातील क्रिकेट संघांसाठी स्वतंत्र विजेता व उपविजेता चषक असणार आहे.  वैयक्तिक कामगिरी करणा-या सर्वोतम खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील दोन स्वतंत्र स्पर्धांच्या अंतिम फेरीचे सामने सेक्टर ३ सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकूलात संपन्न होणार आहेत. विशेष म्हणजे हे सामने क्रीडा संकुलात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रखर विद्युत व्यवस्थेत प्रकाशझोतात संपन्न होणार आहेत. तरी क्रिकेटप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून चाळीशीनंतर आपले आरोग्य जपणा-या ४० प्लस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.