Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

ओंकार, वेदिका, शिवांश, निधी विजेते

सब जुनियर कॅरम स्पर्धा ओंकार, वेदिका, शिवांश, निधी विजेते मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथील महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये संपन्न झालेल्या ५९ व्या सब जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत १४ वर्षाखालील सब जुनियर गटात अंतिम विजेतेपद पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या राष्ट्रीय कॅरमपटू ओंकार वडारने मुंबई उपनगरच्या प्रसन्ना गोळेवार १९-१३, १६-६ असा एकतर्फी विजय मिळवला. तिसरा क्रमांक प्राप्त करताना मुंबई उपनगरच्या उमेर पठाणने ठाण्याच्या नील म्हात्रेला ११-२१, २१-०, २१-९ असे नमवले. तर १४ वर्षाखालील मुलींच्या अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या वेदिका पोमेंडकरने प्रतिस्पर्धी मुंबईच्या गौरी सावंतवर ११-४, १६-४ अशी मात केली. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ठाण्याच्या सारा देवनने धुळयाच्या कल्याणी मराठेवर २१-०, २१-१ असा सहज विनय मिळवला. १२ वर्षाखालील ( कॅडेट ) मुलांच्या गटात अंतिम सामन्यात ठाण्याच्या शिवांश मोरेने ठाण्याच्या आपल्या सहकारी समर्थ खंडेलवलवार तीन सेटमधील रंगतदार लढतीत २१-५, १-१६ व ९-८ असा उत्कंटावर्ध विजय मिळवून जेतेपद पटकावले. या गटात तिसरा क्रमांक मिळवताना पालघरच्या देवराज कथाडेने पुण्याच्या रुद्र इंगळेवर २१-०, १९-२ असा विजय मिळवला. मुलींच्या १२ वर्षाखालील ( कॅडेट ) गटात राष्ट्रीय कॅरमपटू रत्नागिरीच्या निधी सप्रेने बाजी मारली. तिने ठाण्याच्या देविका जोशींचा २१-१, १९-४ असा सहज धुव्वा उडवत आपल्या अंतिम विजयावर शिक्कामोर्तब केले. तर तिसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या सिंधुदुर्गच्या दिव्या राणेने पुण्याच्या आरवी शेलारवर ६-१८, १३-७ व १३-११ असा निसटता विजय मिळवला. सर्व विजेत्यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सरचिटणीस अरुण केदार, खजिनदार अजित सावंत व सहसचिव केतन चिखले यांच्या हस्ते व उपस्थितीत आकर्षक चषक व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

विशाल जाधव ठरला कोपरी केसरी २०२६ चा मानकरी

विशाल जाधव ठरला कोपरी केसरी २०२६ चा मानकरी ठाणे : सत्यनारायण प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ कोपरे विरार ( पूर्व ) , यांच्यातर्फे  सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त आयोजित केलेल्या श्री सत्यनारायणाच्या  भव्य यात्रे निमित्त भरवलेल्या कोपरी कुस्ती केसरी २०२६ या स्पर्धेत मिरा भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील युवा कुस्तीपटू विशाल सुनील जाधवने  कोपरी केसरी किताबाचा मान मिळवीला. किताबाच्या झालेल्या लढतीत विशालने कल्याणच्या विजय म्हात्रेचा  अटीतटीच्या लढतीत पराभव केला. ही कुस्ती तब्बल अर्धा तास चालली .या कुस्तीमध्ये विशालने झोळी या डावावर विजयला  अखेर चित्तपट करत प्रेक्षणीय विजय संपादन केला. त्याला बक्षीस म्हणून आकर्षक चषक , गदा व ११,००० रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कुस्ती मैदानामध्ये श्री गणेश आखाड्यातील प्रतीक बोबडे , विपीन गौतम , ओम जाधव , अनिकेत यादव यांनी देखील शानदार कुस्त्या करून कुस्तीप्रेमींची मने जिंकली . या मैदानात  ठाणे, कल्याण , भिवंडी, मुंबई उपनगर ,मुंबई शहर ,नवी मुंबई भाईंदर, पालघर येथील १५० पेक्षा जास्त  कुस्तीपटूंनी भाग घेतला . विशाल सध्या अभिनव कॉलेजच्या कला शाखेतील शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्याला वसंतराव पाटील व  एन.आय.एस.कुस्ती प्रशिक्षक वैभव माने यांचे  मार्गदर्शन मिळत आहे.  . विशाल सध्या जाणता राजा कुस्ती केंद्र लोणीकंद येथे सराव करतो. या मैदानाचे पालघर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव व मीरा-भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशामन दलाचे अधिकारी .सदानंद पाटील यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

‘अनधिकृत’ खो-खो स्पर्धांवर बंदी! सहभागी झाल्यास ‘आजीवन बंदी’

‘अनधिकृत’ खो-खो स्पर्धांवर बंदी! सहभागी झाल्यास ‘आजीवन बंदी’ भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचा कडक इशारा ‘खो-खो इंडिया’ व ‘खो-खो महाराष्ट्रा’च्या स्पर्धांपासून दूर राहा –प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव खेळाडूंच्या…

गुदाशय कर्करोग आजाराबाबत जनजागृतीचा अभाव

गुदाशय कर्करोग आजाराबाबत जनजागृतीचा अभाव रमेश औताडे मुंबई : धावपळीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि बैठे काम यामुळे पचनसंस्था बिघडत आहे. पचनाच्या तक्रारी वाढत असल्या तरी कोलोरेक्टल कर्करोग सारख्या गंभीर आजाराविषयी जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. अशी माहिती मर्क स्पेशालिटीज प्रा. लि. लिमिटेड च्या एका सर्वेक्षण अहवालात समोर आली आहे. अनियमित शौच, ऑसिडिट, शौचावाटे रक्त येणं यासारख्या लक्षणावर लोक कशी प्रतिक्रिया देतान, तसेच डॉक्टरांकडे जाण्यास होणारा विलंब व त्यामुळे निदान करण्यास होणारा विलंब आणि जागरुकतेचा अभाव यामागील त्यांच्या वर्तणुकीच्या तसेच सवयीचा अभ्यास करण्यात आला. या परिषदेला अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील वैद्यकीय आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती बाजपेयी, एस. एन. रहेजा हॉस्पिटल, मुंबई चेबीन वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शिवम शिंगला, हिरानंदानी हॉस्पिटल, मुंबई येथील वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुबारकुन्निसा टोसे, मर एच. एन. रिलायन्स हॉस्पीटल, मुंबई येथीन वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दर्शित शाह उपस्थित होते.

जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कल्याण नगरी

जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कल्याण नगरी रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : श्रीरामनवमी निमित्त कल्याण शहरात आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू समाजाच्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा नगरसेविका हेमलता पवार, तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शेकडो महिला, अनेक रामभक्त आणि युवक त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेला कल्याण पश्चिमेतील किल्ले दुर्गाडी येथील भवानी चौक येथून सायंकाळी प्रारंभ झाला. दुर्गाडी देवीची आरती करून शोभायात्रा सुरू झाली. तिथून पुढे लालचौकी, आग्रारोड, सहजानंद चौक, देवी अहिल्याबाई होळकर चौक, टिळक चौकमार्गे पारनाका येथील श्रीराम मंदिरापर्यंत अत्यंत उत्साहात काढण्यात आली. त्यानंतर येथील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य चित्ररथ, महापराक्रमी श्री बजरंगबलींची आकर्षक झांकी, विविध पारंपरिक चित्ररथ, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच साहसी खेळांचे प्रात्यक्षिक यांचा समावेश होता. यामुळे नागरिकांना आपल्या पारंपरिक कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचे दर्शन घडले. त्यामध्ये कल्याण कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे वंदे मातरम् ला दिडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित माहिती देणारा चित्ररथ, शीख बांधवांचे नववे धर्मगुरू गुरु श्री तेग बहाद्दुर यांच्या पराक्रमावर आधारित चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गिनिज बूक मध्ये नोंद झालेले नारायणी लेझीम पथक, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालय, उज्वला महिला मंडळ व राष्ट्रीय सेविका समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कृत भारती योग विद्याधाम संस्था, स्वराज्य मित्र मंडळ, लयभारी हास्य क्लब, कराओके, श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवा ट्रस्ट, बालक मंदिर संस्थेचे कॅप्टन रवींद्र माधव ओक शाळेचे लेझीम पथक, विश्व मांगल्य बालसभा, श्री गजानन महाराज शेगाव भक्त, श्री संत राम मारुती, सात संगिनी फाउंडेशन ट्रस्ट, बोहरा आदिवासी नृत्य, भटके विमुक्त समाजाचे मरीआई पोथराज, बंजारा समाजाच्या महिला, इस्कॉन मंदिर संस्था असे शहरातील अनेक नामांकित संस्थांचा समावेश होता. या रामनवमी उत्सवानिमित्त नागरिकांनी आपल्या घरांवर भगवे ध्वज फडकवून, रांगोळी काढून तसेच दीप प्रज्वलित केल्याने संपूर्ण शहर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात रंगून गेले होते. या शोभायात्रेचे लालचौकी, आग्रा रोड, सहजानंद चौक, पारनाका आदी मार्गावर जोरदार पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आले. तर या मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक संस्था, नागरिकांकडून पिण्याचे पाणी, आइस्क्रिम तसेच सरबत वाटप केले जात होते.

 ‘जिल्हाधिकारी मॅडम’चा नृत्याविष्कार…!

‘जिल्हाधिकारी मॅडम’चा नृत्याविष्कार…! ‘चिमणी पाखरं ‘सोबत धरला ताल! कुडाळ:‘सिंधु सरस’ प्रदर्शनातील चिमणी पाखरं डान्स   अकादमीच्या एका आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या…

चरईमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने रहिवाशांना हुसकावण्याचा डाव – संजय केळकर

चरईमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने रहिवाशांना हुसकावण्याचा डाव – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे, सर्वसामान्य रहिवाशांना दमदाटी करुन त्यांना जुन्या इमारतीमधून हुसकावण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत असल्याचा प्रकार ठाण्यातील चरई भागात उघडकीस आला आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील, अनिल भगत, किशोर मसुरकर, राजेश गाडे उपस्थित होते. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात चरईतील एका जुन्या इमारतीमधील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत माहिती देताना श्री.केळकर यांनी सांगितले की चरई हा ठाण्यातील जुना भाग असून येथे अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारतींना अधिकाऱ्यांना हाताशी धरून धोकादायक घोषित करण्याचे आणि रहिवाशांना हुसकावून लावण्याचे प्रकार विकासकांकडून होत आहेत. रहिवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. बिल्डरकडून रहिवाशांना दमदाटी करण्यात येत असून रहिवासी आणि विकासक यांच्यात योग्य करार झाल्याशिवाय रहिवाशांवर घरे खाली करण्याचा दबाव आणू नये, त्यांचा हक्क अबाधित राहावा, अशा स्पष्ट शब्दांत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी माध्यमांना दिली. या कार्यक्रमात ठाण्यातील एका सीबीएसई शाळेतील पालकही उपस्थित होते. पालक आणि शिक्षकांचा समावेश असलेल्या शाळा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्यादा शुल्क वसूल करून आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार या पालकांनी केली. याबाबत आमदार संजय केळकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित शाळेची चौकशी करून कारवाई करण्याची सूचना केली. विविध प्रकल्पांत बाधित झालेल्या रहिवाशांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. बाधित रहिवाशांना हक्काची घरे मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेंटल घरे प्रशासनाने दिली आहेत. मात्र त्या ठिकाणी सुविधांअभावी रहिवासी नरकयातना भोगत आहेत. त्यामुळे हक्काचे घरही नाही आणि आता रेंटलची घरेही सोडण्याच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. या प्रकरणी आता जन आंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. करवसुलीबाबतही सर्वसामान्य नागरीकांना मानसिक त्रास देऊन मालमत्ता सील करणे आणि नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली जात आहे. दुसरीकडे कोट्यवधींची थकबाकी असलेल्या मोठमोठ्या आस्थापना, विकासक यांना मोकाट सोडले जात आहे. सर्वसामान्य नागरीक कर भरण्यास तयार आहेत पण प्रशासनाने सापत्न वागणूक देऊ नये, अशी तंबीही केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दर्शनी इमारतीच्या खड्ड्यामुळे शेजारील इमारतीस धोका

ठाणे महापालिका क्षेत्रातील दर्शनी इमारतीच्या खड्ड्यामुळे शेजारील इमारतीस धोका अनिल ठाणेकर ठाणे: महानगरपालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटी जवळील महापालिका मंजूर नगररचना क्रमांक १ अंतिम भूखंड क्रमांक ३४१ या भूखंडावर संबंधित विकासकाने दर्शनी इमारतीचे काम करताना तीन ते चार वर्षांपूर्वी मोठा खड्डा खणून ठेवलेला आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्षांनी दिली. सदर खड्ड्यांमध्ये दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी साचत असल्याने परिसरात मलेरिया ,डेंगू सारख्या गंभीर आजारांची परिसरातील नागरिकांना लागण होत असल्याचा गंभीर प्रकार वारंवार उघडकीस आलेला आहे . त्यातच सदरच्या खड्ड्यामुळे आमच्या इमारतीच्या कंपाऊंडला तडे गेलेले असून बाजूची इमारत कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची गंभीर बाब वारंवार आपल्या निदर्शनास आणलेली,आहे ,येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . सदर गंभीर प्रकरणे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच गणेश कृपा हाउसिंग सोसायटीचे माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका यांचे कडे वारंवार तक्रारी करूनही सदर प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याने  येथील नागरिकांमध्ये  तीव्र असंतोष पसरलेला आहे .तसेच सदर दर्शनी इमारतीची महापालिकेची सी. सी.परवानगी एप्रिल  महिन्यात संपत आहे. सदर प्रकरणी  त्वरित कारवाई न केल्यास महापालिकेवर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल,आपण या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागास आवश्यक त्या सूचना करून सदर समस्या सोडवावी ही नम्र विनंती.

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले मुंबई / रमेश औताडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या राजकीय पक्षांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात विलीन करून मिलिंद सुर्वे यांचा शेकडो कार्यकत्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश तसेच राष्ट्रवादीचे नेते जीवन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकान्यांनी जाहीर प्रवेश केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील प् आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष आपण पोहचवला असून लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. त्या दृष्टीने रिपब्लिकन  पक्षाची घोडदौड सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे असे आवाहन आठवले यांनी केले.

येथे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत आढावा बैठक

येथे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत आढावा बैठक उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेतला आढावा अशोक गायकवाड रायगड-कर्जत : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, पुढील टप्प्यात महाराष्ट्रातही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत येथे कृषी संशोधन केंद्रात मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटुंबे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आढावा बैठक पार पडली. बैठकीस ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), मंडळ अधिकारी, मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. यावेळी विविध पूर्वतयारी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात येऊन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्र अधिकारी ऐप द्वारे मॅपिंग पूर्ण करणे तसेच प्रोजेनी मॅपिंग तत्काळ पूर्ण कराव्या, ८५ वर्षांवरील मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ भरून घेणे, मृत्यू दाखला उपलब्ध नसल्यास जबाब, पंचनामा व कुटुंबीयांची स्वाक्षरी घेऊन कार्यवाही करणे, अस्पष्ट / ब्लॅक अँड व्हाईट फोटो असलेल्या मतदारांचे रंगीत फोटो घेऊन फॉर्म क्रमांक ८ भरून घेणे, मॅपिंग कार्यवाहीबाबत मॅपिंगची प्रक्रिया तीन टप्प्यांत राबविण्याचे निर्देश टेबल टॉप एक्टिविटी द्वारे २००२ व २०२४ मतदार याद्यांचे जुळवणी (मॅपिंग) करणे, जुळवणी न झाल्यास प्रोजनी मॅपिंग(आई-वडील/आजी-आजोबा यांच्या आधारे) करणे, उर्वरित अद्याप सर्वेक्षण झालेले नाही अशा मतदारांसाठी घरभेट देऊन माहिती संकलन करणे, मॅपिंगनंतरची माहिती बूथ लेवल अधिकारी ऍप वर ऑनलाइन अपलोड करणे, राज्यातील ऑनलाइन मॅपिंग फक्त २१% पूर्ण असल्याने गती वाढविण्याचे निर्देश (मोजणी/ गणना फॉर्म) छपाई डेटा उपलब्ध झाल्यानंतर २ दिवसांत डाउनलोड व ३ दिवसांत छपाई पूर्ण करणे, छपाईसाठी जिल्हास्तरावर अभिकर्ता नियुक्ती तातडीने करणे, टप्प्याटप्प्याने (उदा. २०० फॉर्म) छपाई करून वितरण करणे, इंटरनेट वेग लक्षात घेऊन रात्रीच्या वेळेस डाउनलोड करण्याचे नियोजन, DSE पडताळणी भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील DSE Generation नंतर पडताळणी व वगळणी तातडीने पूर्ण करणे मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक बाबत प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करणे, मतदान केंद्र अधिकारी अधिकारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देणे, BLO Call Book सुविधा वापरून नागरिकांच्या कॉलला त्वरित प्रतिसाद देणे, प्रशासकीय व्यवस्था कामाचा ताण कमी करण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर्स नियुक्त करण्याची तयारी करणे , मतदान केंद्र अधिकारी पर्यवेक्षक मार्फत फॉर्म संकलन व नोंद प्रक्रिया करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करून लोकसहभाग वाढविण्याचे आवाहनकरणे, विशेष सूचना अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्रांची पडताळणी तातडीने पूर्ण करणे प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून विशेष सखोल पुनरिक्षणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून मतदार यादी शुद्ध, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी प्राधान्याने कार्य करावे, असे आवाहन केले.