Month: July 2026

आझाद मैदानात अजून किती वर्ष न्याय मागायचा

रमेश औताडे मुंबई : प्रत्येक वेळी आश्वासन देणाऱ्या सरकारने एकदा सांगून टाकावे की आम्ही अजून किती वर्ष आंदोलन करायचे असा सवाल करत शेतकरी लोकनेते रमेश हिंदुराव यांनी आझाद मैदानात साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. भिवंडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचार चौकशीच्या मागणीसाठी भाई आकाश निर्मळ आणि रमेश हिंदुराव त्यांच्या सहकाऱ्यांनी आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले. उपविभागीय अभियंता दत्तू गीते ३ वर्ष भिंवडी सार्वजनिक बांधकाम उपविभागात सेवा पूर्ण होऊनही त्यांची बदली का झाली नाही. एक कोटी १७ लाख ७२ हजार ६४८ इतक्या रकमेचे वाढीव बिल काढल्याचा आरोप करत संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आझाद मैदानात न्याय मिळणार आहे की फक्त आश्वासनच असा सवाल रमेश हिंदुराव यांनी केला आहे.

आखाड्यांना त्यांच्या पारंपरिक जागा तातडीने द्याव्या’

– सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत साधू-महंतांची मागणी हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी कुंभमेळा प्रशासनाकडे साधुग्राम आणि कुंभग्रामसाठी जागा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयातील सभागृहात सोमवारी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निर्मोही आखाड्याचे महंत तथा राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांनी पत्रकार परिषद घेत कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर आखाड्यांच्या महंतांनी आपल्या पारंपरिक जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या जागांवर अतिक्रमाणे असल्यास ती तातडीने हटवून आखाड्यांना जागा ताब्यात देण्यात यावीत, अशी आग्रही मागणी करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांच्यासह महंत मोहनदास महाराज (खाकी आखाडा), रामजीदास महाराज (निर्मोही आखाडा, चित्रकूट), महंत राजेंद्रदास महाराज (महामंत्री, आखाडा परिषद), मुलीदास महाराज (निर्वाणी आणि आखाडा), भक्तीचरणदास महाराज (पंचवटी, नाशिक), हेमंतदास महाराज (हनुमान गढी, अयोध्या) आदी उपस्थित होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती साधू-महंतांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे साधू-महंतांच्या मागणीनुसार पारंपरिक जागा उपलब्ध झाल्यास आखाड्यांचे निवास आणि धार्मिक कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पडतील, असा विश्वास साधू-महंतांनी व्यक्त केला. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने साधू-महंतांसोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी साधू-महंतांनी साधुग्राम उभारणी व साधू-महंतांच्या सुरक्षेविषयी प्रशासनाकडून काय तयारी सुरू आहे? याविषयी माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ०००००००००

झाडांच्या पडलेल्या फांद्या मुळे कोपरीत साथीच्या रुग्णसंख्येत वाढ –  भरत चव्हाण

00000 अनिल ठाणेकर ठाणे : महापालिकेत चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीप्रमाणे कारभार सुरू असून, महापालिका अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा फटका २८ लाख ठाणेकरांना बसला. पावसाच्या काळात झाडाच्या पडलेल्या फांद्या वेळीच उचलल्या न गेल्यामुळे कोपरीत साथीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत केला. तसेच पावसाळ्याच्या काळात अग्निशमन, घनकचरा, सार्वजनिक बांधकाम आणि आपत्कालीन विभागाने एकत्रितपणे समन्वयाने काम करावे, अशी मागणी भरत चव्हाण यांनी केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. पावसाळा लांबल्यानंतर महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची अपेक्षा होती. परंतु, पहिल्याच पावसात मोठ्या संख्येने झाडे पडण्याबरोबरच पूरस्थिती निर्माण झाली. त्यानंतर आपत्कालीन विभागाचा बोजवारा उडाल्याचे ठाणेकरांनी पाहिले. वृक्ष प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांकडून अर्धे काम कोपरीत, तर अर्धे काम तीन हात नाका येथे सुरू होते. चेंदणी कोळीवाड्याजवळ रेल्वे बोगद्याखाली सातत्याने पाणी साचत असल्याची तक्रार केल्यावर, एसटीपी विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते. अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या सामान्य ठाणेकरांनी कोणाकडे दाद मागायची, असा सवाल नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला. कोपरीमध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी झाडाच्या पडलेल्या फांद्या उचलल्या जातात. तो कोपरी पॅटर्न ठाणे शहरात लागू करावा, अशी सूचना भरत चव्हाण यांनी केली. कोपरीहून पटणी पूलापर्यंत पूल उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. परंतु, भूमाफियांकडून सर्रास अतिक्रमणे करून खाडी बुजूवूचाळी उभारल्या जात आहेत. त्यामुळे काही वर्षांनंतर पूल उभारण्याची गरजही लागणार नाही, असा टोला भरत चव्हाण यांनी लगावला. ठाण्यात होणाऱ्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने पोलिसांच्या वाहतूक विभागात ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध केले आहेत. मात्र, आजही अनेक भागातील वाहतूककोंडी अधिक भीषण होत आहे. दहा मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. वाहतूक कोंडीत शाळांमधील मुले अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाहतूक पोलिसांबरोबर समन्वय साधून कार्य करावे, अशी सूचना नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली. मॅरेथॉनच्या प्रतिकाचा पुतळा गायब ठाणे शहराला मॅरेथॉनचा इतिहास आहे. मॅरेथॉननिमित्ताने कोपरीत तीन फूटांचा आकर्षक पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, तो मुसळधार पावसानंतर गायब झाला आहे. त्याच्या चोरीबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना काहीही माहिती नाही, याकडेही नगरसेवक भरत चव्हाण यांनी लक्ष वेधले. 00000000000

पारमिता धर्मादाय न्यासाकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

कल्याण : पारमिता धर्मादाय न्यास, कल्याण (प.) या शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय विकासकामे करणाऱ्या संस्थेच्या वतीने नालंदा विद्यालय, कल्याण (पूर्व) येथील इयत्ता १ ली ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत…

पावसाळ्यातील उपाययोजना संदर्भात श्वेतपत्रिका काढावी : नम्रता कोळी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसानंतर महापालिकेच्या यंत्रणेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रकारची संकटे आल्यास महापालिकेने हाताळण्याची परिस्थिती, उद्भवलेल्या अडचणी, त्या दूर करण्यासाठी आलेले…

 ठाण्यातील नालेसफाईचा गाळ कागदोपत्री अंबरनाथच्या जमिनीवर?

 भाजप नगरसेविका अर्चना मणेरा यांचा आरोप, निविदांच्या चौकशीची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील नालेसफाईतून काढलेला गाळ चक्क अंबरनाथ तालुक्यातील ज्युवेली व दिवा येथील जमिनीवर टाकण्यात आल्याची कागदोपत्री नोंद आहे. मात्र, शहरातील खाडी परिसरातच गाळ फेकला गेल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली, असा आरोप भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. तसेच जमिनीच्या सातबारा उताऱ्यांची छाननी न करताच बेकायदेशीरपणे नालेसफाईच्या तांत्रिक निविदा मंजूर केल्यामुळे चौकशी करावी, अशी मागणी अर्चना मणेरा यांनी महासभेत सोमवारी केली. ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले. प्रत्यक्षात बहुसंख्य नाल्यांची सफाई झाली नाही. तर किरकोळ गाळ काढून खाडी परिसरातच फेकला गेला. महापालिकेच्या नियमानुसार, गाळ काढण्यासाठी कंत्राटदाराकडे स्वत:ची किंवा भाड्याची जमीन असावी. मात्र, दिवा, मुंब्रा, माजिवडा आणि उथळसर येथील कंत्राटदारांनी एकाच व्यक्तीच्या दिवा येथील जमिनीवर गाळ टाकल्याची नोंद आहे. एका कंत्राटदाराने ठाण्यापासून ४० किलोमीटरवरील अंबरनाथ तालुक्यातील ज्युवेली येथील जमीन दाखविली. तसेच या जमिनीचा जुना सातबारा दाखविला असून, महापालिकेला दिलेल्या `एनओसी’वर पाचपैकी केवळ एकाच मालकाची नोंद आहे. दिवा येथील जमीनमालकाने स्टँम्प पेपरऐवजी साध्या कागदावर `एनओसी’ दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिले अदा करू नयेत, अशी मागणी अर्चना मणेरा यांनी केली. अंबरनाथ तालुक्यातील जमिनीवर गाळ टाकण्यात आलेला नाही, असा थेट आरोप नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. तसेच संबंधित कंत्राटदारांकडून गाळ वाहून नेताना जीपीएस ट्रॅक रेकॉर्डिग प्रशासनाने उपलब्ध करावे, अशी मागणी करीत अर्चना मणेरा यांनी त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्याची विनंती महासभेत केली. चौकट कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणे, खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू बोरिवडे येथील मैदानाच्या विकासासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने खोदलेल्या खड्ड्यात बुडून १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील काळ्या यादीतील कंत्राटदाराला नियमबाह्यपणे हे कंत्राट दिले गेले. या कंत्राटदाराने खड्डा खोदताना कोणतेही बॅरिकेड व सुरक्षा फलक लावले नव्हते. या प्रकरणी कंत्राटदारावर कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही महापालिकेकडून दंडात्मक वा कंत्राट रोखण्याची कारवाई झालेली नाही. संबंधित कंत्राटदार हा काळ्या यादीत असल्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार करूनही अद्यापी, मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करून महापालिकेच्या संबंधित अभियंत्याला निलंबित करून कंत्राट रद्द करावे. तसेच मुलाच्या कुटुंबियांना कंत्राटदार व महापालिकेने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना मणेरा यांनी दिली. 0000000000

 माळशेज घाटात अभुतपुर्व सौंदर्य

 पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अविनाश उबाळे ठाणे : पावसाळा मोसम सूरु होताच सहयाद्रीच्या उंच पर्वत रांगेतील माळशेज घाटातील डोंगर माथे,हे हिरवेगार दिसतात जशी काय डोंगरांनी हिरवी शाल परिधान केल्याचा भास होतो.आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच डोंगर माथ्यावरुन खोसळणारे धबधबे व रिपरिप पाऊस व पांढऱ्याशुभ्र धुक्यात दिसेनासे होणारे डोंगर जणू काही आकाशातील ढग जमिनीवर उतरल्याचा भास आपणास होतो.चहूबाजूने दिसणारी हिरवीगार वृक्षांची रांग आणि पावसाळ्यातील गडद पांढऱ्या धुक्यांचा खेळ आणि धुक्यांत हरविलेल्या वाटा असा अद्वभूत नजरा प्रत्यक्ष अनुभवयाचा असेल तर पावसाळ्यात माळशेज घाटाची सफर करायलाच हवी असं हे माळशेज घाट सध्या पावसाळ्यात  पर्यटकांना भुरळ घालत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगर पुणे या मार्गावर माळशेज घाट लागतो उंच डोंगर माथे,घनदाट असं जंगल,दुर्मिळ वन्यप्राणी,पशुपक्षी, यांचा मुक्त संचार घाटातील नागमोडी रस्ते वृक्षांची सभोवताली दिसणारी रांग,उंच डोंगर माथे व खोल दऱ्या,पक्षांचा किलबिलाट पांढऱ्या शुभ्र गडद दाट धुक्यांत लपलेले डोंगर आणि धुकं व पाऊस यांचा शिवाशिवीचा खेळ रस्त्याकडेला मुक्तपणे संचार करणारी वानरं हा सारा अनमोल ठेवा माळशेज घाटात आहे.पावसाळ्यात तर येथील धबधब्यांत चिंब भिजण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे येतात पावसाळ्या मोसमात पर्यटकांनी माळशेज घाटाल विशेष अशी पसंती दिली आहे.निसर्गाची मजा लुटण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची पावले माळशेज घाटाकडे वळत आहेत.  मुंबई ,ठाणे,कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ,बदलापूर,डोंबिवली,शहापूर ,मुरबाड, कर्जत,नगर पुणे,नाशिक,या भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात माळशेज घाटात सहलीसाठी येत असतात घाटात येणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम दर्शन होतं ते इथल्या जंगली वानरांचं रस्त्यावर घाटात वानरांचे तांडेच तांडेच येथे पहावयास मिळतात माळशेज घाटातील ही अनोखी सफर करताना निसर्गाच्या जवळ गेल्याचा एक विलक्षण अविस्मरणीय आनंद मिळतो असे शहापूरचे पर्यटक गजानन वरकुटे यांनी बोलतांना सांगितले.माळशेज घाटा जवळील स्थानिक आदिवासी येथे आवळे,रानभाज्या,विकतांना नजरेस पडतात तर घाटात गरमागरम  चहा,वडापाव,भाजलेले कणीस, विक्रीतुन स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो आहे हे विशेष आहे . माळशेज घाटात जायचे कसे – माळशेज घाटात जाण्यासाठी खाजगी वाहनाने अथवा कल्याणहून आळेफाटा,नगर,पुणे या परिवहनच्या एसटी बसने जाता येते पर्यटकांना राहण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टॉरंट व येथे निवासस्थांन उपलब्ध आहेत.तसेच येथे भोजनासाठी असंख्य लहान मोठे हॉटेल व ढाबे मुरबाड,सरळगाव,टोकावडे,व माळशेज घाटा पर्यंत रस्त्याकडे ला पाहण्यास मिळतात.

– रानभाज्या विक्रीसाठी दाखल!

– शहापूरात हिरव्यागार रानभाज्यांचा  बाजार फुलला आदिवासींना मिळाली रोजीरोटी ! अविनाश उबाळे ठाणे : शेवळी,तेलपाट,ससेकांद, कोळु ,अळू ,कोरडु ,पेंढरं खुरनासनी ,तेरा ,लोत,या दुर्मिळ अशा दाट जंगलात खास पावसाळ्याच्या मोसमातील मिळणाऱ्या रान…

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण आंदोलन निर्धार सभा

रमेश औताडे मुंबई: अनुसूचित जाती आरक्षणाचे ऊपवर्गीकरण लवकर करावे या करीता आझाद मैदान मुंबई येथे २९ सप्टेंबर २०२६ रोजी होत असलेल्या आंदोलनाचाआढावा घेण्यासाठी सकल मातंग समाजाची निर्धार बैठक शेगाव बुलढाणा येथे पार पडली. या संभाव्य आंदोलनाची पुढील दिशा कशी असेल याबाबत राज्य समन्वयक बाबूराव मुखेडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे माहिती दिली. बैठकीचे अध्यक्षपद निमंत्रक विजयभाऊ आंभोरे यांनी भूषवले. बैठकीस राज्य समन्वयक बाबूराव मुखेडकर, सुदाम धुपे, पंडित सूर्यवंशी, कैलाश डाखोरे, ॲडव्होकेट राम चव्हाण,परिमल कांबळे, रणधीर कांबळे, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे, ल. सा. क. म. चे विश्वस्त अध्यक्ष ऊपाडे, सचिव  सुभाष तोंडारकर, प्रा. अंबादास सकट, ए टी अवचार, प्रदेश अध्यक्ष प्रा संजय गायकवाड, अविनाश  बागवे मातंग एकता आंदोलन प्रमुख, सुनिल बावकर, दयानंद आडागळे,विलास साबळे ,संजय कठाळे, संजय उबाळे जी, विनोद जोगदंड देवीलाल अवचार, ऍड नरसिंग सूर्यवंशी, मंदाकिनी चव्हाण, संजय कठाले,आणि डॉ. चंदन शिवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विभागीय बैठक, जिल्हा निहाय, तालुका निहाय बैठका घेत ऑगस्ट महिन्यात साहीत्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात अंदोलनाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बाबूराव मुखेडकर यांनी यावेळी सांगितले.

आधारचा आदिवासी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार

मुंबई : लालबाग येथील आधार युवा प्रतिष्ठान ट्रस्ट गेली १५ वर्षे पालघर, जवार, विक्रमगड तसेच कर्जत येथील आदिवासी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रिडा तसेच जीवनावश्यक अशा अनेक स्वरुपात मदत करत…