Author: bittambatami.com

मृत्यूशी झुंज देणाऱ्या बिबट्याला जीवनदान

 वन विभागाची थरारक मोहीम यशस्वी!” ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली वनपरिक्षेत्रातील येऊर नियंत्रण क्षेत्रात जखमी अवस्थेत झाडावर बसलेल्या बिबट्याची वन विभागाने थरारक बचावमोहीम राबवत यशस्वी सुटका केली. गंभीर जखमी आणि अशक्त झालेल्या या बिबट्याला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी बिबट्या बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पाचपाखाडी (इंदिरानगर)  राखीव वन क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ५२० मध्ये ३० मे रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एका झाडावर जखमी बिबट्या बसल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच वन विभाग, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ, WWA आणि RAWW संस्थांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या गंभीर जखमी असल्याने त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे दिसून आले. रात्रीच्या अंधारात बचावकार्य धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने वन विभागाने संपूर्ण रात्र परिसरावर कडेकोट नजर ठेवली. अखेर रविवारी सकाळी सहा वाजता शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी बिबट्या मूळ ठिकाणापासून सुमारे ७० ते ८० मीटर अंतर चालत जाऊन झाडीत पडल्याचे आढळले. वन्यजीव अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि बचाव पथकाच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितपणे भूल देऊन जेरबंद करण्यात आले. प्राथमिक तपासणीत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चारही पायांच्या तळव्यांना गंभीर जखमा असून मागील पायावरील मोठ्या जखमेमुळे हाड उघडे पडल्याचे दिसून आले. तसेच शरीरावर अनेक ओरखडे आणि जखमांचे व्रण आढळले. उपचारासाठी या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली येथील बिबट्या बचाव केंद्रात हलविण्यात आले असून त्याच्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. वन विभाग, बचाव पथक आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयामुळे एका  वन्यजीवाचा जीव वाचविण्यात यश आल्याने या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कोट बिबट्याच्या शरीरावरील जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे पकडून तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक होते. बचाव पथकाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी झाली असून बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मयूर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)

मृत्यूशी झुंज देणाऱ्या बिबट्याला जीवनदान

वन विभागाची थरारक मोहीम यशस्वी!” ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली वनपरिक्षेत्रातील येऊर नियंत्रण क्षेत्रात जखमी अवस्थेत झाडावर बसलेल्या बिबट्याची वन विभागाने थरारक बचावमोहीम राबवत यशस्वी सुटका केली. गंभीर जखमी आणि अशक्त झालेल्या या बिबट्याला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी बिबट्या बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पाचपाखाडी (इंदिरानगर)  राखीव वन क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ५२० मध्ये ३० मे रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एका झाडावर जखमी बिबट्या बसल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच वन विभाग, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ, WWA आणि RAWW संस्थांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या गंभीर जखमी असल्याने त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे दिसून आले. रात्रीच्या अंधारात बचावकार्य धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने वन विभागाने संपूर्ण रात्र परिसरावर कडेकोट नजर ठेवली. अखेर रविवारी सकाळी सहा वाजता शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी बिबट्या मूळ ठिकाणापासून सुमारे ७० ते ८० मीटर अंतर चालत जाऊन झाडीत पडल्याचे आढळले. वन्यजीव अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि बचाव पथकाच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितपणे भूल देऊन जेरबंद करण्यात आले. प्राथमिक तपासणीत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चारही पायांच्या तळव्यांना गंभीर जखमा असून मागील पायावरील मोठ्या जखमेमुळे हाड उघडे पडल्याचे दिसून आले. तसेच शरीरावर अनेक ओरखडे आणि जखमांचे व्रण आढळले. उपचारासाठी या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली येथील बिबट्या बचाव केंद्रात हलविण्यात आले असून त्याच्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. वन विभाग, बचाव पथक आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयामुळे एका  वन्यजीवाचा जीव वाचविण्यात यश आल्याने या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कोट बिबट्याच्या शरीरावरील जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे पकडून तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक होते. बचाव पथकाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी झाली असून बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मयूर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक

: अजितदादा नंतर अहिल्यादेवींचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभ – सुनेत्रा पवार मुंबई : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा…

अखेर साक्षीचा शोध लागला; १००० सीसीटीव्ही तपासून मुंब्रा- दिवा पोलिसांना यश

आरती परब दिवा : दिवा परिसरातून हरवलेल्या ८ वर्षीय साक्षी विजयकुमार पांडे हिचा अखेर सुखरूप शोध लागल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण दिवा शहराने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुंब्रा- दिवा पोलीस स्टेशनच्या पथकाने सलग दोन ते तीन दिवस अहोरात्र मेहनत घेत तब्बल १००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून ही यशस्वी शोधमोहीम पूर्ण केली. मुलगी हरवल्याची माहिती समोर येताच दिवा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाने तातडीने विशेष पथके तयार करून दिवा ते बदलापूर परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू केली. विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी कसून प्रयत्न केले. या मोहिमेत दिवा शहरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून माहिती प्रसारित करून मुलीचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवस- रात्र तपास सुरू ठेवत प्रत्येक धागा तपासला. अखेर अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि साक्षी पांडे हिचा सुखरूप शोध लागला. मुलगी सुरक्षितपणे सापडल्यानंतर कुटुंबीयांसह नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. या यशस्वी शोधमोहीमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, अमोल कोळेकर, रोहित केदार, तेजस सावंत, गणेश जाधव, विनायक माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा तसेच दिवा आणि मुंब्रा पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाने मोलाची भूमिका बजावली. पोलिसांच्या तत्परतेमुळे, नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि सातत्यपूर्ण तपासामुळे एका चिमुकलीला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यश आल्याने पोलिस दलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १ जूनला ‘स्वर संध्या’

सारेगमप लिटल चॅम्प फेम अंजली गायकवाड व ज्ञानेश्वरी गाडगे यांचे सुमधुर गायन पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”,…

माहिती फलक न लावल्यास होणार कारवाई

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा बाजार समित्यांना इशारा हरिभाऊ लाखे नाशिक : कांद्यासाठी १,५८० रुपये क्विंटलचा दर निश्चित झाल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्रांबाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली जात नसल्याची बाब समोर येत असून, त्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक नाफेडच्या खरेदी केंद्रासह बाजार समितीने कांदा खरेदी केंद्राची योग्य माहिती देणारा फलक, त्यावरच कांद्याचा दर आणि खरेदी केंद्राकडे जाणारे फलक दर्शनी भागात लावावेत, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. कांद्याच्या मागील महिन्यात गडगडलेल्या भावामुळे बळीराजाला मोठा फटका बसला. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलनेही झाली. त्याचे सर्वाधिक पडसाद नाशिक, लासलगाव, निफाडमध्ये उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यात येऊन आंदोलन केले. त्यानंतर शासनाने दखल घेत, कांद्याला १,५८० रुपयांचा दर निश्चित करीत नाफेडद्वारे त्याची खरेदीही सुरू केली. अशातच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही त्यातील बारीकसारीक बाबी शोधून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली. त्यात प्राधान्याने नाफेडचे केंद्र तसेच बाजार समितीत कांदा खरेदी केंद्र कुठे आहे, याची माहितीच शेतकऱ्यांना दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर आता जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रत्येक खरेदी केंद्राकडे जाणारा मार्ग दर्शविण्याचे, स्पष्ट फलक अन् त्यावर कांद्याच्या दरांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. पथके कांद्याच्या लागवडीपासून, साठवणूक व माहिती, विक्रीतील घोळ, घोटाळा अन् फसवणूक यावर नियंत्रणासाठी आता कृषी, पणन आणि महसूल विभागाचे एकत्रित पथक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तालुका स्तरावर कार्यरत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपली कुठलीही अडचण, समस्या या पथकांकडे मांडावी. त्यावर त्यांना योग्य तो सल्ला अन् मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. 0000000000

हेडलाईटच्या प्रकाशावरून वाद, तरुणावर जीवघेणा हल्ला

कल्याण  : कल्याण पुर्वेतील  कोळसेवाडी परिसरात मोटारसायकलच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यांत पडल्याच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद हिंसक वळणावर गेला. तिघा तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना…

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी केडीएमसीतर्फे अभिवादन

कल्याण : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका सचिव किशोर शेळके यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या…

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कृपाआशीर्वादाने विनापरवाना कामे पूर्णत्वाकडे !

मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरानला सध्याच्या घडीला नगरपालिकेत ताळमेळ दिसत नसल्याने गावात कोणकोणती कामे सुरू केली आहेत त्याबाबत ठावठिकाणा दिसून येत नाही. तर दुसरीकडे विनापरवाना कामांना ऊत आल्याचे देखील पहावयास मिळत आहे. आणि या विनापरवाना कामांना अप्रत्यक्षपणे काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभत असल्याने या कामांवर आक्षेप घेतला तरीसुद्धा अशाप्रकारची कामे युद्धपातळीवर सुरूच आहेत.यामागे मोठ्या प्रमाणावर अर्थकारण झाले असल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात आहे. माथेरान मध्ये जानेवारी महिन्यापासून बेबी डिसोझा मार्गावर विनापरवाना जांभ्या दगडातील रस्त्याचे काम सुरू होत असल्याने नगरपालिका विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे तूर्तास हे काम बंद करण्यात आले होते.सर्व साहित्य नगरपरिषदेने जप्त सुध्दा केले होते. परंतु सद्यस्थितीत आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहे. प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे की अशा विनापरवाना कामांना आर्थिक लोभापायी  अप्रत्यक्षपणे पाठींबा देत आहेत असा प्रश्न स्थानिकांना सतावत आहे. नियमबाह्य कामांना सध्याच्या काळात प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधी हातभार लावत असून एकीकडे अतिक्रमणवर कारवाईचा दिखावा तर दुसरीकडे विनापरवाना रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत.काही सर्वसामान्य स्थानिक  लोकांना घराच्या दुरुस्ती साठी लागणारे साहित्य आणण्यासाठी बंदी घालण्यात येते आणि दुसरीकडे धनाढ्य लोकांना बंगल्याच्या कामासाठी लागणारे साहित्य आणण्यास मुभा दिली जात आहे.यामुळे नागरिक द्विधामनःस्थितीत सापडले आहेत.आणि विशेष म्हणजे ज्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी याच बेबी डिसोझा मार्गासाठी आकांडतांडव केले होते तीच मंडळी आता मूग गिळून गप्प का बसले आहेत ?की त्यांनीही आपला आर्थिक कार्यभाग अपेक्षेप्रमाणे साधला आहे की काय ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.या कामांशी निगडीत काही अधिकारी वर्गाने तर स्वतःचे आर्थिक दृष्ट्या चांगभलं करून नुकताच अन्य ठिकाणी बदल्या सुध्दा करून घेतल्या आहेत अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहे. 000000

अभय मोकाशी शेवटपर्यंत लढत राहिले; ७० दिवस अन्न-पाण्याविना कर्करोगाशी झुंज

वडील बंधू संदेश मोकाशी यांनी कथन केली अंगावर शहारे आणणारी हकीकत मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ झुंझार पत्रकार अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ उत्तर…