Category: होम

‌‘डायरेक्ट सेलिंग‌’ उद्योगाच्या व्यवसायात चार टक्क्यांनी वाढ

भारताच्या ‌‘डायरेक्ट सेलिंग‌’ उद्योगाचा व्यवसाय आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वार्षिक आधारावर चार टक्क्यांनी वाढून आतापर्यंतच्या सर्वोच्च 23 हजार 21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राज्यांमध्ये महाराष्ट्राने एकूण विक्रीत 15.31 टक्के वाट्यासह…

हिमालयाची सावली; त्यागमूर्ती माता रमाई

आज २७ मे, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची पुण्यतिथी. ७ फेब्रुवारी १८९७ रोजी माता रमाई यांचा जन्म एका गरीब कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव…

जगासमोर हळूहळू एक असे संकट उभे राहत आहे, जिथे तीव्र उष्णता आणि दुष्काळ या दोन वेगळ्या आपत्ती राहिल्या नसून एकत्रितपणे मानवी जीवनावर घातक परिणाम करत आहेत. एका नवीन वैज्ञानिक अभ्यासानुसार…

विद्यार्थ्यांचा साकल्याने विचार कधी?

गेल्या काही वर्षांमध्ये या परीक्षेभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणाने एक भयंकर प्रश्न समोर आणला आहे. भारतातील विद्यार्थी हे शिक्षणव्यवस्थेचे केंद्र आहेत की व्यवस्थेच्या प्रयोगांचे बळी, असा प्रश्न पडतो. ‌‘नॅशनल टेस्टिंग…

– काळू नदीत आंघोळीला गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

 अथक प्रयत्नांनंतर मृतदेह काढला बाहेर कल्याण : कल्याणनजीक  काळू नदीत आंघोळीला गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र मुलाचा शोध लागला नव्हता. अखेर दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृत मुलाची ओळख अटाळी कोळीवाडा येथील ऋषभ रवींद्र राणे अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ सोमवारी सायंकाळी आपल्या तीन मित्रांसोबत कालू नदीकाठी आंघोळीसाठी गेला होता. यावेळी अचानक त्याचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात गेला आणि नदीच्या प्रवाहात वाहू लागला. ऋषभला बुडताना पाहून त्याचा एक मित्र त्याला वाचवण्यासाठी नदीत उतरला. मात्र तोही पाण्याच्या प्रवाहात अडकला. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या इतर दोन मित्रांनी प्रसंगावधान राखत त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढले, मात्र ऋषभचा काहीच मागमूस लागला नाही. मित्रांनी जवळपास अर्धा तास नदीत शोध घेतला. मात्र यश न आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. कल्याण अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, सोमवारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधमोहीमेत मुलाचा शोध लागला नाही. त्यानंतर मंगळवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर ऋषभचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. ऋषभ हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. तो घरातून हात-पाय धुवून येतो असे सांगून मित्रांसोबत नदीकाठी गेला होता. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कल्याण पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १२ च्या वतीने प्रभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या प्रयत्नांतून…

मुलांमध्ये डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोकचा वाढता धोका- डॉक्टरांचा इशारा

दर दिवशी ३ ते ४ लहान मुलांवर होत आहेत उपचार मिरा -भाईंदर : देशातील अनेक भागांमध्ये तापमान सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी पारा ४५°C पेक्षा जास्त नोंदवला जात आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी पालकांना २५ मे ते २ जूनदरम्यानच्या “नौतपा” काळात लहान मुले आणि बालकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तीव्र उष्णतेमुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन, उष्माघात आणि हीट स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, विशेषतः नवजात बालक आणि सहा वर्षाखालील मुलांमध्ये हीटवेव्ह आणि नौतपामुळे संपूर्ण भारतात तापमानात मोठी वाढ होत असून त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई, वीज कपात तसेच डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. मिरा रोड येथील वोक्हार्टहॉस्पिटल्सच्या तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांचे शरीर प्रौढांच्या तुलनेत तापमान नियंत्रित करण्यात कमी सक्षम असते. त्यामुळे त्यांना उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो. अतिप्रमाणात घाम येणे, चिडचिड होणे, ओठ कोरडे पडणे, लघवी कमी होणे, उलट्या होणे, चक्कर येणे, जास्त झोप येणे, जलद श्वास घेणे आणि शरीराचे तापमान वाढणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. डॉक्टरांनी पालकांना मुलांना दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत बाहेर न नेण्याचा आणि त्यांना थंड व हवेशीर वातावरणात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मुलांमध्ये हीट स्ट्रोकची सूचना देणारी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या जास्त ताप येणे, त्वचा कोरडी, लालसर आणि गरम होणे चक्कर येणे, गोंधळ उडणे किंवा अतिशय सुस्ती येणे जलद श्वास घेणे किंवा अनियमित हृदयाचे ठोके वारंवार उलट्या होणे किंवा पाणी पिण्यास नकार देणे.

आखाती युद्धामुळे ‘आंबा कॅनिंग’ उद्योगालाही बसला फटका…!

शेतकरी बागायतदारांचे दुहेरी नुकसान…! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )–आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता कोकणातल्या आंबा प्रक्रिया उद्योगालाही बसला असून परदेशातील मागणी घटल्याने ‘कॅनिंग’ कंपन्यांनी यंदा आंब्याची कमी प्रमाणात खरेदी केली असल्याचे आढळून आले आहे.परिणामी आंब्याचा दर आता थेट ६२ रुपयांवरून थेट १7 रुपयापर्यंत प्रती किलो इतका खाली घसरला आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदाच्या वर्षी आंबा पिक संपूर्णपणे धोक्यात आल्याने शेतकरी आणि बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे. दहा ते पंधरा टक्के इतकेच आंब्याचे पीक यंदा शेतकरी – बागायतदारांच्या हाती लागले आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना आता ‘कॅनिंग’च्या आंब्याचे दर कमालीचे घसरल्याने शेतकरी – बागायतदारांवर एक प्रकारे दुहेरी संकट ओढवले आहे. यंदाच्या हंगामात आंबा उत्पादनात एकूणच घट होणार असल्याची सिंधुदुर्गातील शेतकरी  बागायतदारांची ओरड सुरू झाली होती. या हंगामातील तब्बल 8५ ते ९० टक्के पीक हातचे  गेल्याने शेतकरी – बागायतदार आधीच नुकसानीत गेले होते. आंब्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी -बागायतदार आक्रमक बनले होते. गेले महिनाभर आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली मात्र जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचे म्हणत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील शेतकरी-बागायतदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या  ‘वर्षा ‘ निवासस्थानी धडक देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मोर्चाही निघाला मात्र पोलिसांनी धरपकड केल्याने आंदोलनाची हवाच गेली. आंबा काढणीनंतर प्रतवारी झाल्यावर उरलेला आंबा प्रक्रिया उद्योगांना ( कॅनिंग ) दिला जातो त्यामुळे मिळेल त्या दराने आंबा द्यावा लागतो आणि त्याला पर्याय नसतो. यातून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ‘कॅनिंग’च्या आंब्याला हमीभाव मिळावा ही शेतकरी आणि बागायतदारांची फार जुनी मागणी आहे. परंतु शासन दरबारी याही मागणीची दखल घेतली गेली  नसल्यामुळे आता त्यांच्यासमोर  दुहेरी संकट उभे राहिले आहे. राज्य सरकारने या प्रश्नातही लक्ष घालून शेतकरी आणि बागायतदारांना दिलासा देण्याची गरज आहे. ‘कॅनिंग’चा दर सुरुवातीला ६२ रुपये प्रति किलो इतका होता  त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा दर घसरत जाऊन आता तो १7 रुपये प्रति किलो  इतका खाली आला आहे. आंब्यापासून रस (पल्प)जाम, आंबा वडी, सरबते,लोणची, चॉकलेट आदी  विविध खाद्य पदार्थ तयार केले जातात. सिंधुदुर्गातील अनेक महिला  बचत गट हा उद्योग करत आहेत. शिवाय आईस्क्रीम साठी या आंब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आईस्क्रीम उद्योगातील मोठमोठ्या कंपन्यांमार्फत या आंब्याची खरेदी केली जाते. मात्र शेतकरी- बागायतदारांना हवा तसा दर दिला जात नाही. परिणामी त्यांना नुकसान सोसावे लागते.परदेशात ‘पल्प’ ला  मोठी मागणी आहे मात्र आखाती युद्धामुळे यंदा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी- बागायतदार धास्तावले आहेत. ‘कॅनिंग’च्या आंब्याला हमीभाव मिळावा ही शेतकरी- बागायतदारांची मागणी सरकारने मान्य केल्यास हाही प्रश्न सुटू शकतो असं त्यांचं मत आहे.  गतवर्षीपेक्षा यंदा हापूसचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटल्याने प्रक्रिया उद्योगाकडे वळणारा हापूसही कमी प्रमाणात आला आहे. त्यातही युद्धजन्य परिस्थितीमुळे ‘कॅनिंग’च्या आंब्याची मागणी कमालीची घटली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 3० टक्के आंबाच  ‘कॅनिंग’ उद्योगाला गेला आहे.त्यातही फळमाशीचा प्रादुर्भाव, आंब्याची  हाताळणी करताना होणारे फळांचे नुकसान यामुळे प्रक्रिया उद्योगाकडे गेलेला सुमारे २० टक्के आंबा हा फेकून द्यावा लागला. याचाही परिणाम ‘कॅनिंग’चे दर घसरण्यावर झाला आहे. परिणामी प्रक्रिया  उद्योगांनीही सावधगिरी बाळगत खरेदीचे प्रमाण कमी केले आहेत. शिवाय दरही  पडला आहे. त्यामुळे शेतकरी- बागायतदारांची चिंता आणखी वाढली आहे.

ऐरोलीतील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या जी विभाग ऐरोली कार्यालयामार्फत अनधिकृत बांधकामाविरोधात तोडक कारवाई करण्यात आली. नोटीस बजावूनही संबंधितांनी त्याची दखल न घेतल्याने ही निष्कासन मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.…

‘भाजपमध्ये भीती आणि जनतेमध्ये आक्रोश’

 नाशिक दौऱ्यात आदित्य ठाकरे यांचा घणाघात हरिभाऊ लाखे नाशिक – शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये मागील आठवड्यात शिवसंवाद मेळावा घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आता शिवसेना (उध्दव ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही नाशिकचा दौरा करुन कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कोणकोणत्या समस्यांना हात घातला पाहिजे, प्रश्नांचा पाठपुरावा कसा केला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करतानाच पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशावर टीका केली. कुंभमेळ्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. परंतु, कुंभमेळ्यातील कामांचे कंत्राट कोणाला देण्यात येत आहे, त्याचा नाशिकला काही फायदा आहे काय, याचा विचार करण्याची गरज आहे. नाशिकमध्ये सर्वत्र खोदकाम करुन ठेवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर ही कामे यशस्वी होतील का, याची खात्री सरकार देणार आहे काय, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. जागतिक परिस्थिती वेगळी असली तरी या सरकारने मागील काही वर्षात आर्थिक परिस्थितीवर असे काही करुन ठेवले आहे की, त्याचा परिणाम सर्वाना भोगावा लागत आहे. पैसे नाही दिले तरी कंत्राटदार खोदकाम सोडून देणार नाही, याची हमी सरकार देऊ शकणार आहे काय, असा प्रश्न उपस्थित करुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नसल्याकडे लक्ष वेधले. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये होणाऱ्या रिंगरोडकरिता होणाऱ्या भूसंपादनाविरोधात आवाज उठविणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. संजय राऊत यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे हा मुद्दा मांडला होता. शेतकरी कधीही चांगल्या कामाला विरोध करीत नाही. परंतु, त्याच्या मागण्यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोण होता शिवाजी ? हे पुस्तक वाचले असते तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय शिक्षा दिली होती, याचा या गद्दारांना पळताना चारदा विचार करावा लागला असता. त्यांनी डोकं ठिकाणावर ठेवून देशात आणि राज्यात कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, रोजगार किती आहेत, सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झाली, या सरकारमुळे शहरांची काय अवस्था झाली, या प्रश्नांचा विचार करावयास हवा. असे प्रश्न अधिवेशनात मांडावयास हवेत. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे हेच पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत आहेत. त्यांनी अजून कशाप्रकारे प्रश्नांची मांडणी करावयास हवी, यासंदर्भात नगरसेवकांसह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इतर पक्षांमागे लागतात, तसे भाजप हे काॅक्रोच जनता पार्टीमागे लागले आहेत. काॅक्रोच जनता पार्टीला समाज माध्यमात बंदी घालावीशी भाजप सरकारला वाटले. यावरुन विचार करा त्यांच्यात किती भीती आहे. भाजपमध्ये भीती असल्याचे आणि जनतेमध्ये आक्रोश असल्याचे दिसून आले आहे. भाजपविरोधात कोणी बोलले की लगेच त्याचा पाकिस्तानशी संबंध जोडण्यात येतो, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांनी काॅक्रोच जनता पार्टीशी संबंधित विषयावरुन लोकांमध्ये किती आक्रोश आहे, हे लक्षात येत असल्याचे सांगितले. सरकारमधील मंत्री सर्वत्र पुरेसा इंधन साठा असल्याचा दावा करतात. परंतु, अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद झाले आहेत. इंधन मिळविण्यासाठी कुठे भांडणे होत आहेत. कुठे मारामाऱ्या होत आहेत. रांगा लागल्या आहेत. राज्यातील ही परिस्थिती सरकारमध्ये असूनही जर मंत्र्यांना माहीत नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. कोट “भाजपमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून जनतेमध्ये प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. भाजपविरोधात कोणी आवाज उठवला किंवा सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले की, लगेच त्याचा पाकिस्तानशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.” – आदित्य ठाकरे ०००००००