Category: होम

आंबिवलीत पाण्यासाठी अ प्रभाग कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन

‘बेकायदेशीर नळ जोडण्या तोडा, नियमित पाणी द्या’ची जोरदार मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आंबिवली परिसरात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ संतप्त महिला आणि नागरिकांनी अ प्रभाग कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी “पाणी आमचा हक्क आहे”, “बेकायदेशीर नळ जोडण्या बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंबिवलीतील अटाळी परिसरातील शंभू पाटील चाळ, साईकृपा चाळ, धर्मात्मा नगर, ज्योतिर्लिंग चाळ आदी भागांमध्ये अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः महिलांना पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत असून घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा फटका बसत आहे. सकाळपासून पाण्याच्या प्रतीक्षेत राहूनही नळ कोरडेच राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर नळ जोडण्या झाल्याचे सांगितले. काही अनधिकृत बांधकामांना चोरून पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप महिलांनी केला. “आम्ही नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला पुरेसे पाणी मिळत नाही. मात्र बेकायदेशीर जोडण्यांमुळे पाण्याचा दाब कमी होत असून आमच्या भागात पाणीच पोहोचत नाही,” असे रेशमा बोत्रे आणि जयश्री ढेकळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले. दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करण्याचे आदेश देत लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. ००००००

अंमली पदार्थांच्या व्यापाराला विरोध केल्यामुळे कुटुंबावर हल्ला

कल्याण : कल्याण पश्चिम येथील फिश मार्केट कॉम्प्लेक्समध्ये अंमली पदार्थांच्या व्यापाराला विरोध करणाऱ्या एका कुटुंबावर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले असून…

– राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे खासदार सुरेश म्हात्रे यांनी फिरवली पाठ ?

– राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कल्याण : कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे हे आज दिवसभर कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात उपलब्ध असतांना देखील त्यांनी या आंदोलनात उपस्थित न राहिल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून कार्यकर्त्यांकडून खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. तर खासदार सुरेश म्हात्रे यांनी नुकतेच भाजपा सरपंचांचे आणि शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यातच त्यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

नगराध्यक्षांच्या प्रयत्नातून माथेरानचा पाणीप्रश्न मार्गी

मुकुंद रांजाणे माथेरान :एखादे काम हाती घेतल्यावर त्याचा संपूर्ण निपटारा होईपर्यंत प्रयत्न करून गावाला अभिप्रेत असणाऱ्या महत्वपूर्ण कामाला तडीस नेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरींनी अनेक दिवसांपासून पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे पाणी प्रश्नांची उकल करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ऐन सुट्टयांच्या हंगामात पाण्याची समस्या उद्भवली होती ती अखेरीस मार्गी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे सहज शक्य झाले आहे. त्यांच्यासोबत उप नगराध्यक्ष संतोष शेलार सुध्दा वेळोवेळी हजर राहून जातीने लक्ष देत होते.आजवर नेरळ माथेरानला पाणी पुरवठा करणाऱ्या या योजनेच्या अधिकारी वर्गाने पाण्याच्या जुन्या पंपांकडे दुर्लक्ष केल्यामुळे याठिकाणी अनियमित पाणी पुरवठा होत असे.तर या पाण्याच्या पाईप मधून सर्रासपणे पाण्याची चोरी करणाऱ्या लोकांकडे देखील दुर्लक्ष करीत असल्याने माथेरानला अनियमित पाणी पुरवठा व्हायचा. मागील चार महिने तर हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता.त्यामुळे शारलोट तलावातून पाण्याचा उपसा केला जात होता. उल्हास नदीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली होती परंतु सदर बाब स्थानिकांनी गांभीर्याने घेतली नाही. त्याचवेळी माथेरान करांनी लक्ष दिले असते तर एवढा खटाटोप करण्याची वेळ आली नसती असेही बोलले जात आहे. दरम्यान  महाराष्ट्र सोमवारी जीवन प्राधिकरणाच्या पनवेल येथील कार्यालयात नगराध्यक्ष चौधरी आणि शेलार यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन पिंपरी चिंचवड येथून नवीन पंप खरेदी करून संबंधित ठेका असलेल्या कल्पतरू या कंपनीच्या माध्यमातून नवीन पंप माथेरान नियोजित पाणीपुरवठ्यासाठी वॉटरपाईप पंपिंग हाऊस येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर पंप रात्री ११वाजता स्वतः नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या देखरेखी खाली वॉटर पाईप येथील पंपिंग हाऊस येथे युद्ध पातळीवर बसवण्यात आला आहे.त्यामुळे मंगळवार पासून माथेरानकरांना पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला आहे. मागील काही दिवसांपासून गेले दोन-तीन आठवडे पाण्यासंदर्भात चाललेल्या समाजमाध्यमांवरील  चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उप नगराध्यक्ष संतोष शेलार यांचे अभिनंदन केले आहे.

उथळसर प्रभाग समिती परिसरात पहिल्याच पावसात पूर परिस्थिती?

भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची भीती ठाणे : उथळसर प्रभाग समितीच्या परिसरात पहिल्याच पावसात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे. नालेसफाईचे काम समाधानकारक झाले नसून, अनेक नाल्यांमधील गाळ व कचरा नाल्यालगत ठेवण्यात आला आहे. पहिल्या पावसात कचरा पुन्हा नाल्यात गेल्यामुळे पूराचा फटका नागरिकांना बसेल, अशी शक्यता नारायण पवार यांनी व्यक्त केली. प्रभाग समितीच्या हद्दीत अनेक ठिकाणी नाल्यांमधील कचरा उचलून नाल्यालगत ठेवण्यात आला आहे. तर अनेक नाल्यांमध्ये अजूनही प्लॅस्टिक कचरा व गाळ साचलेला आहे. या संदर्भात भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घनकचरा विभागाकडे सातत्याने तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. संबंधित कंत्राटदार अधिकाऱ्यांनाही जुमानत नसून, त्याला काळ्या यादीत टाकण्यासाठी नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी राहिलेला आहे. येत्या आठवड्यात कोणत्याही दिवशी वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी नाल्यालगत ठेवलेला कचरा पुन्हा नाल्यात गेल्यामुळे पहिल्याच पावसात उथळसर प्रभाग समितीच्या परिसरात पूर येण्याची भीती आहे. त्यामुळे नालेसफाई करण्याबरोबरच नाल्यालगत ठेवलेला गाळ उचलावा, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

ग्राहक तक्रार निवारण व स्मार्ट मीटरिंगवर विशेष प्रशिक्षण

मुंबई : महावितरणच्या ग्राहकांना अधिक सक्षम व पारदर्शक सेवा देण्यासाठी तसेच अधिकारी- कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भांडुप परिमंडलात ‘ग्राहक तक्रार निवारण मंच’ व स्मार्ट मीटरिंग या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

जी/उत्तर विभागातील गैरकारभारावर चौकशीची मागणी

मुंबई : जी/उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कनिष्ठ पर्यवेक्षकांकडून कथित गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारींमुळे महापालिका प्रशासनाची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने केला आहे. याबाबत तातडीने चौकशी…

प्रभादेवी येथील पुनर्विकासात घर न मिळाल्याने रहिवाश्यांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरालगत असलेल्या जनार्दन अपार्टमेंट्स (पुरुषोत्तम वाडी) येथील जवळपास १४० मराठी कुटुंबांना जून २०२२ मध्ये इमारत धोकादायक घोषित करून एका रात्रीत घराबाहेर काढण्यात आले.या अन्यायकारक कारवाई…

रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची चक्क नाल्यात बसून नालेसफाई 

उल्हासनगर  : पावसाळा सुरू व्हायला मोजकेच दिवस उरले असून उल्हासनगर महानगरपालिकेने मोठ्या नाल्यांची सफाई जेसीबी मशीन द्वारे सुरू केली आहे. शहरात अनेक छोट्या नाल्या देखील आहेत. दरवर्षी काही प्रभागातील नाल्यातील…

मतदार मॅपिंग प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसरा…!

 जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ९१ टक्के मॅपिंग पूर्ण…! सिंधुदुर्ग : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिम (एसआयआर -२०२६) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांच्या डिजिटल मॅपिंग प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि निवडणूक यंत्रणेच्या समन्वयाने सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. विशेष पुनःरीक्षण  मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग  प्रशासन सुसज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  धोडमिसे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदार मॅपिंगची सुरुवातीची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः या मोहिमेचा आढावा घेत विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथ पातळी अधिकारी (बीएलओ) यांच्या स्वतंत्र बैठका घेत कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले. या बैठकीत तांत्रिक अडचणींचे निराकरण, माहिती संकलनातील त्रुटी दूर करणे आणि मॅपिंग प्रक्रियेत अचूकता राखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि योग्य नियोजनामुळे अल्पावधीतच जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मतदाराचे नाव विद्यमान मतदार यादीतून सन २००२ मधील मतदार यादीशी जोडण्याचे कार्य करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे मतदार नोंदींची खातरजमा होण्यास मदत होणार असून मतदार यादी अधिक स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक बनणार आहे. निवडणूक विभागाच्या समन्वयातून संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात काटेकोर नियंत्रण ठेवत मोहिमेला गती दिली. तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून बीएलओंकडून हे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.