Category: होम

डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत

 शास्त्रीनगर हॉस्पिटल डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रे कल्याण न्यायालयात हजर कल्याण : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील  डॉक्टरांना मारहाण प्रकरणातील प्रमुख आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार…

वालधुनी पुलावरील अवजड वाहन प्रतिबंधक बॅरिकेडला टेम्पोची धडक संपूर्ण बॅरिकेड कोसळले कल्याण : कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या वालधुनी पुलावर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेडला शुक्रवारी सकाळी सुमारे ८ च्या दरम्यान एका दुध वाहतूक करणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने संपूर्ण बॅरिकेड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झालेले नाही. घटनेनंतर काही काळ पुलावरील वाहतुकीवर परिणाम झाला. बॅरिकेड कोसळल्यामुळे अवजड वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली व्यवस्था निष्प्रभ झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. दरम्यान, ही घटना सकाळच्या वर्दळीच्या वेळेत घडल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. पुलावरील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच बॅरिकेडची मजबुती आणि नियमित देखभाल करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नालेसफाईतील भ्रष्टाचार, निष्काळजीपणा हे प्रशासनाच्या अपयशाचे धक्कादायक उदाहरण – ऍड. रोहिदास मुंडे

दिवा :- ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाई कामांमध्ये झालेल्या दिगंराई आणि गंभीर त्रुटींबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संपूर्ण ठाणे शहरातील विविध प्रभागांतील ठेकेदारांवर सुमारे ₹२८.36 लाखांचा दंड आकारण्यात आला असून, त्यामध्ये दिवा विभागातील…

 एअर गन शूटिंग स्पर्ध्येत पीटीकेएसवर पदकांची बरसात

मुंबई : नुकतेच नागपूर येथे आयोजित महाराष्ट्र एअर गन शूटिंग स्पर्धेतील (ISSF Events) सामने यशस्वीरित्या पार पडले.प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील PTKS शूटिंग रेंजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत भरभरून पदके पटकावली…

केडीएमसीमध्ये ११ ते १८ जुलैदरम्यान ‘जागतिक लोकसंख्या दिन’ सप्ताह

 ‘दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर’ या घोषवाक्यावर जनजागृती अभियान कल्याण : कल्याण-बिवली महानगरपालिका हद्दीत ११ ते १८ जुलै या कालावधीत ‘जागतिक लोकसंख्या दिन’ सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. केंद्र…

 बेस्टच्या २३ आगारांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव

मॉल, निवासी टॉवर व्यावसायिक संकुल उभारणार अनिल ठाणेकर मुंबई, आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाने आपल्या मालकीच्या २३ बस आगारांचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर पुनर्विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावातून मिळणाऱ्या निधीच्या आधारे बेस्टच्या ताफ्यात सुमारे पाच हजार नवीन बसेस समाविष्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बेस्टच्या मालकीच्या सुमारे १३२ एकर जागेवरील २३ बस आगार ३० ते ६० वर्षांच्या दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव आहे. या जागांवर मॉल, संग्रहालये, निवासी टॉवर, शॉपिंग कॉम्प्लेक्स, क्रीडा सुविधा तसेच इतर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या प्रस्तावात कोलाबा, बॅकबे, मुंबई सेंट्रल, वरळी, वडाळा, धारावी, शिवाजीनगर, वांद्रे, सांताक्रूझ, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, अणिक (सायन), प्रतीक्षा नगर, देवनार, माजगाव, ओशिवरा, मालाड, मरोल, दिंडोशी, गोराई, कांदिवली या २३ आगारांचा समावेश आहे. बेस्ट समितीचे अध्यक्ष आर. गुप्ता यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पातून सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असून, त्याचा वापर नवीन बस खरेदी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केला जाणार आहे. मात्र, या प्रस्तावाला विरोधाचे सूरही उमटले आहेत. बेस्ट समितीचे सदस्य नितीन नंदगावकर यांनी आगारे खासगी विकासकांना भाड्याने देण्याऐवजी बेस्टनेच त्यांचा पुनर्विकास करावा, अशी भूमिका मांडली आहे. व्हर्सोवा आगारावर बेस्ट ने स्वतः मॉल उभारल्याचे तसेच कुर्ला आणि माहिम आगारांवर निवासी टॉवर विकसित झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले. दरम्यान, हा प्रस्ताव सध्या मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर अंतिम निर्णयासाठी ठेवण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मुंबईतील बेस्ट च्या अनेक प्रमुख आगारांचे स्वरूप बदलण्याची शक्यता असून, सार्वजनिक वाहतूक आणि शहरी विकास या दोन्ही क्षेत्रांवर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. ००००००००००००

पाच वर्षांनंतरही वाङ्मयचौर्य चौकशी अहवाल अद्याप गुप्त

 मुंबई विद्यापीठाने भूमिका स्पष्ट करावी – मनविसे राजेंद्र साळसकर मुंबई : मुंबई विद्यापीठाने प्रा. डॉ. किशोर गायकवाड यांच्या समितीने सुमारे पाच वर्षांपूर्वी सादर केलेल्या कथित वाङ्मयचौर्य (Plagiarism) प्रकरणातील चौकशी अहवाल, दोषनिश्चिती व त्यानंतर झालेल्या शिस्तभंगात्मक कारवाईबाबत आजपर्यंत कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिक केलेली नाही. या विलंबामुळे शैक्षणिक प्रामाणिकता, पारदर्शकता आणि संशोधनाच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) राज्य सरचिटणीस ॲड. संतोष गांगुर्ड यांनी केला आहे. मनविसेच्या मते, या प्रकरणात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी आजपर्यंत कोणती भूमिका घेतली, चौकशी अहवाल अद्याप का जाहीर करण्यात आलेला नाही, चौकशी पूर्ण झाली असल्यास तो सार्वजनिक का करण्यात येत नाही आणि चौकशी प्रलंबित असल्यास त्यास जबाबदार कोण, याबाबत विद्यापीठाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे. यासंदर्भात मनविसेने मुंबई विद्यापीठाकडे पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत— १) प्रा. संदेश वाघ यांच्या कथित वाङ्मयचौर्य प्रकरणातील चौकशीची सद्यस्थिती काय आहे? २). संस्थात्मक शैक्षणिक प्रामाणिकता समिती (Institutional Academic Integrity Panel) व संबंधित प्राधिकरणाने या प्रकरणात कोणते निष्कर्ष नोंदविले आहेत? ३)संबंधित प्रकरणात कोणती शिस्तभंगात्मक अथवा प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे? ४) चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यास कोणता कायदेशीर किंवा प्रशासकीय अडथळा आहे? याबाबत समाधानकारक खुलासा व आवश्यक कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (UGC) अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही मनविसेने दिला आहे. मुंबई विद्यापीठ हे राज्यातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असल्याने वाङ्मयचौर्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये मौन बाळगण्याऐवजी पारदर्शक, उत्तरदायी आणि कायदेशीर भूमिका घेणे ही विद्यापीठाची जबाबदारी असल्याचे मनविसेने स्पष्ट केले आहे. कोट “यूजीसीच्या वाङ्मयचौर्य प्रतिबंध नियमावलीनुसार विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ अजय भामरे द्वारे ४५ दिवसाच्या आत अहवाल जाहीर करायचा असताना देखील, पाच वर्ष उलटून अद्यापही अहवाल जाहीर न करने व तसेच माहितीच्या अधिकारात अहवाला बद्दल माहितीला नकार देणे यावरून वाङ्मयचौर्य  प्राध्यापकांना विद्यापीठ बळ  देऊन गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे सिद्ध होत आहे”. -आयु. गांगुर्डे संतोष (राज्य सरचिटणीस: मनसे विद्यार्थी सेना )

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश  ३० खाटांचा निकष शिथिल होणार, कर्करोग उपचार अधिक व्यापक, मनमानी बिलिंगवर बसणार लगाम मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लवकरच व्यापक बदल करण्यात…

कचरा संकलनावर उच्च न्यायालयाचे आदेश

  रमेश औताडे मुंबई : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या कचरा संकलन केंद्राबाबत मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा सुनावणी पार पडली. टाकळकरवाडी व जऊळकेखुर्द ग्रामस्थांनी केलेल्या रिट याचिका प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए.एस.गडकरी व न्यायमूर्ती अजय खट्टा यांच्या खंडपीठाने पर्यायी जागेबाबत याचिकाकर्त्यांनी सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर करावे असे आदेश देऊन पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली असल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.विराज कदम यांचे वतीने सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी दिली. राजगुरुनगर नगरपरिषदेस गायरान जमीन कचरा संकलन केंद्रासाठी जागा देताना ग्रामपंचायतीची मंजुरी घेतली नव्हती.१२ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार ग्रामसभा ठराव व ग्रामपंचायत मंजुरी आवश्यक असताना त्याची पुर्तता झाली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारच्या बांधकामास मनाईचा आदेश मागील वर्षी पारित केला असून पर्यायी जागा उपलब्ध असेल तर ग्रामस्थांनी तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वर्षभर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावण्यांमध्ये ॲड.वासिम सामलेवाले ॲड.विराज कदम व ॲड. तेजपाल इंगळे यांनी ग्रामसथांच्या वतीने प्रभावी बाजु मांडल्याचे  टाव्हरे यांनी सांगितले.

 नाशिकहून ३०० सायकल वारकरी पंढरपूरकडे रवाना

‘अवयवदान हेच श्रेष्ठ दान’चा संदेश हरिभाऊ लाखे नाशिक: येथील नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात १४ व्या नाशिक ते पंढरपूर सायकल वारीला उत्साहात सुरुवात झाली. अनंत कान्हेरे मैदान येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या आरतीने भक्तिमय वातावरणात सायकलस्वार वारकऱ्यांनी विठ्ठलनामाचा गजर करत ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा जयघोष केला आणि सायकल वारीच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. याप्रसंगी पोलिस महानिरीक्षक संजय येणेकर, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, महापौर हिमगौरी आहेर-आडके, नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीश बैजल, फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे तसेच माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून वारकऱ्यांना शुभेच्छा देत वारीचा शुभारंभ केला. यंदाच्या वारीमध्ये सुमारे ३०० सायकल वारकरी सहभागी झाले असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतील सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विशेष आकर्षण म्हणजे मुंबईतील ब्लाइंड संस्थेचे ९ दृष्टिहीन सायकलपटू आणि त्यांच्यासोबत ९ रायडर्स टँडेम सायकलवरून पंढरपूरपर्यंतचा प्रवास करत आहेत. त्यांचा सहभाग जिद्द, आत्मविश्वास, समावेशकता आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश देणारा आहे. याशिवाय, एका पायाने दिव्यांग असलेले तीन सायकल वारकरीही या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला सलाम करत नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनने त्यांना पंढरपूरपर्यंतच्या या पवित्र सायकल वारीत सहभागी करून घेतले आहे. त्यांचा सहभाग इच्छाशक्ती, चिकाटी आणि प्रेरणेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. यंदाच्या वारीची मुख्य संकल्पना “अवयवदान हेच श्रेष्ठ दान” ही असून, समाजामध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचा संदेश ही सायकल वारी पंढरपूरपर्यंत पोहोचविणार आहे. विठ्ठलभक्ती, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत ही वारी पुढे मार्गक्रमण करत आहे. अशी आहे सायकल वारी… पहिल्या दिवशी नाशिक- सिन्नर-नांदुर-लोणी-राहुरी-अहिल्यानगर असा प्रवास राहील. अहिल्यानगर येथे मुक्काम होणार आहे. दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर- करमाळा- टेंभुर्णी- पंढरपूर असा प्रवास करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांपासून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या पुढाकारातून पंढरपूर येथे सायकल रिंगण सोहळा आयोजित करण्यात येत आहे. १२ जुलै रोजी सकाळी सहा वाजता राज्यातील विविध भागांतून आलेले सायकलस्वार पंढरपूर शहरात एकत्र येऊन नगर प्रदक्षिणा करतील. त्यानंतर सर्व सायकलस्वारांच्या उपस्थितीत सायकल रिंगण सोहळा होईल.  रिंगण सोहळ्यानंतर सायकलिस्ट संमेलन आयोजित करण्यात येईल. या संमेलनात वर्षभर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सायकलस्वारांचा गौरव व सत्कार करण्यात येणार आहे.