Category: होम

 एडिबल ऑईलच्या नावाखाली बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त

४६.५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे निर्देश ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित टँकरवर ‘ईडीबल ऑईल’ (खाद्यतेल) असे लिहिण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी चालकासह एकूण ८ जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा घटक-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर, मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचण्यात आला होता. या ठिकाणी संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर (क्रमांक MH-46-BB-7१३4) थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव पदार्थ आढळून आला. टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपनियंत्रक शिधावाटप विभाग, ठाणे यांच्या आदेशानुसार शिधावाटप अधिकारी  सुभाष रामनाथ डुंबरे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या संयुक्त तपासणीत टँकरच्या ५ कप्प्यांमध्ये एकूण २५,००० लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये २४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५,००० लिटर डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थाचा आणि २२ लाख रुपये किमतीच्या टाटा टँकरचा समावेश आहे. नियमानुसार तपासणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून रासायनिक चाचणीसाठी नमुने गोळा केले असून, टँकर व इतर मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. प्राथमिक तपासणीत महत्वाची माहिती समोर आली असून सर्व आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून विरार खाडीच्या किनारी बोटीमधून आणलेले डिझेल टँकरमध्ये भरले होते आणि ते नाशिकच्या दिशेने घेऊन जाण्याचा त्यांचा बेत होता. पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करण्याचे कोणतेही वैध मापदंड न पाळता, सामान्य टँकरमधून अशी धोकादायक वाहतूक करून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण करण्याचे कृत्य आरोपींनी केले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेल (वय ३७ वर्षे, रा. वाशी, नवी मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. तसेच टँकर मालक रितेश अभय नारायण सिंग (रा. दिवा, ठाणे) यांच्यासह पालघर व सुरत येथील रोशन शिरोडकर, नितीन कोली, राजू पंडित, दीपक पवार, सागर पाटील आणि अनिल सुरत या इतर ७ साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. शिधावाटप अधिकारी  सुभाष रामनाथ डुंबरे यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, मोटार स्पीरीट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर २००५ आणि बायोडिझेल धोरण २०२१ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक रावजी उतेकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. या मोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जाहीर आवाहन केले आहे की, जिल्ह्यात डिझेल व तत्सम इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जनतेने कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त इंधन साठा करून ठेवू नये आणि इंधनाच्या तुटवड्याबाबत पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाकडून अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

भोंदू खरातच्या साथीदाराच्या खात्यातून १३.५० कोटी जप्त

हरिभाऊ लाखे नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक आणि फसवणूक खंडणी प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करीत त्याच्या साथीदारांकडून तब्बल १३ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात १३.१२ कोटी रुपयांची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिन्यांचा समावेश असून, अशोक खरातच्या बँक खात्यातील २.२५ कोटी रुपयांच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. त्याच्या मालकीची आलिशान मर्सिडीज कारही ईडीने जप्त केल्याने या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी १८ मार्चला अशोक खरातला अटक केली. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. अटकेनंतर अवघ्या पाच दिवसांत या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला. एसआयटीने जवळपास दीड महिना विविध पैलूंवर तपास करत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या. त्यानंतर शिर्डी व नाशिक ग्रामीण पोलिसांनीही फसवणुकीच्या गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास सुरू केला. तपासादरम्यान अवतार पूजा, धार्मिक मार्गदर्शन आणि चमत्काराच्या नावाखाली लोकांकडून ५.६२ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप समोर आला आहे. जगदंबा व समता पतसंस्थांमधील २०० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून खरातच्या निकटवर्तीयांचीही कसून चौकशी सुरू असून, या चौकशीतून नवनवीन आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचे धागेदोरे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभर या तपासाकडे लक्ष लागले आहे.

मानवतेच्या पवित्र आध्यात्मिक नवीन युगाचा उत्सव

रमेश औताडे मुंबई: अत्यंत भक्ती, आध्यात्मिक आनंद आणि शांत आदराच्या वातावरणात, मुंबईतील बहाई समुदाय २३ मेला सायंकाळी बहाई केंद्रात बाब यांच्या घोषणेचा पवित्र उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमला होता. हा तो क्षण होता ज्याने मानवतेच्या आध्यात्मिक इतिहासात एका नवीन युगाच्या पहाटेची घोषणा केली. या कार्यक्रमात १८४४ सालच्या त्या ऐतिहासिक रात्रीचे स्मरण करण्यात आले, जेव्हा इराणमधील शिराझ येथील एक तरुण व्यापारी असलेल्या बाब यांनी आपले दिव्य कार्य घोषित केले आणि जगातील धर्मांच्या पवित्र ग्रंथांमध्ये सांगितलेले प्रतिज्ञात पुरुष, बहाउल्लाह यांच्या लवकरच होणाऱ्या आगमनाची घोषणा केली. तीव्र छळ, तुरुंगवास आणि अखेरच्या हौतात्म्यानंतरही, त्यांच्या शिकवणींनी मानवतेला बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांच्या आगमनासाठी तयार केले, ज्यांच्या दूरदृष्टीने मानवजातीच्या एकतेची आणि सार्वत्रिक शांततेच्या स्थापनेची मागणी केली. स्त्री-पुरुषांची समानता, विज्ञान आणि धर्माचा सुसंवाद, पूर्वग्रहांचे निर्मूलन, सार्वत्रिक शिक्षण, न्याय आणि सर्व लोक व राष्ट्रांची मूलभूत एकता. सहभागींनी आशा व्यक्त केली की हे आदर्श आजच्या समाजात अधिक सामंजस्य, करुणा आणि सामूहिक कृतीसाठी प्रेरणा देऊ शकतील. जगभरातील बहाईंसाठी, बाब यांची घोषणा ही बहाई दिनदर्शिकेतील नऊ पवित्र दिवसांपैकी एक आहे आणि मानवजातीच्या आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीसाठी समर्पित असलेल्या जागतिक चळवळीची सुरुवात म्हणून याला गहन आध्यात्मिक महत्त्व आहे. मुंबई बहाई समुदाय बहाई केंद्र मुंबई यांच्या वतीने सांगण्यात आले.

कूटनीतीचा नवा अध्याय

कूटनीतीचा नवा अध्याय भारताच्या परराष्ट्र धोरणात गेल्या दशकात झालेला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे बहुआयामी आणि हितसंबंधकेंद्रित कूटनीती. जागतिक राजकारणात वेगाने बदलणारी समीकरणे, पुरवठा साखळीचे पुनर्संतुलन, ऊर्जा सुरक्षितता, तंत्रज्ञानातील स्पर्धा आणि…

स्थानिकांना नोकरी, कर्जबुडव्यांची मालमत्ता जप्ती

अर्थनगरीमध्ये सरत्या आठवड्यात इंधन दरवाढीपलिकडेही काही लक्षवेधी बातम्या चर्चेत राहिल्या. पहिली बातमी म्हणजे जिल्हा बँकांमधील नोकरभरतीत यापुढील काळात स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसरी बातमी म्हणजे कर्ज न फेडल्यास यापुढे…

खाद्यतेलाची आयात वाढली

‌‘सॉल्व्हन्ट एक्सट्रॅकर्स असोसिएशन ऑफ इंडिया‌’ (एसईए)च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची खाद्यतेल आयात तीन टक्क्यांनी वाढून 166.51 लाख टनांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या वाढीमागे नेपाळकडून होणाऱ्या शुल्कमुक्त आयातीत…

खत अनुदानावर सत्तर हजार कोटी जादा खर्च

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारताच्या खत अनुदानावर मोठा आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये देशाच्या खत सबसिडी बिलामध्ये मोठी वाढ होऊ शकते, अशी…

खत अनुदानावर सत्तर हजार कोटी जादा खर्च

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारताच्या खत अनुदानावर मोठा आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये देशाच्या खत सबसिडी बिलामध्ये मोठी वाढ होऊ शकते, अशी…