Category: होम

बेस्ट उपक्रमाच्या कामगारांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला सिटूचा जाहीर पाठिंबा

ठाणे- मुंबईकरांना वाहतुकीची अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सार्वजनिक बेस्ट उपक्रमाच्या आजी, माजी व वेटलीज कामगारांनी केवळ आपल्या आर्थिक मागण्यांसाठीच नव्हे तर अत्यावश्यक सार्वजनिक बेस्ट सेवेचे अस्तित्व टिकविण्यासाठी, बेस्टच्या मालकीच्या बसेसचा ताफा…

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणासाठी सूचना आणि अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

ठाणे : राज्यातील एकल महिलांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी राज्यातील एकल महिला,…

सारडा सर्कल परिसरातील ६५ अतिक्रमणे जमीनदोस्त

हरिभाऊ लाखे नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नाशिक महापालिकेने शनिवारी पहाटे धडक कारवाई करीत जुन्या नाशिकमधील सारडा सर्कल ते चौक मंडई, जहांगीर मशीद परिसर, डिलक्स हॉटेलमागील भागासह विविध ठिकाणांवरील सुमारे ६० ते ७० अनधिकृत दुकाने, टपऱ्या, पत्र्याचे शेड्स आणि इतर अतिक्रमणे हटविली. महापौर हिमगौरी आहेर आडके आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त (अतिक्रमण) सुवर्णा दखणे यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. यासाठी महापालिकेचे सहाही विभाग पोलिस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सहभागी झाली होती. कारवाईपूर्वी दोन दिवस परिसरातील व्यापारी आणि नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे तसेच तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक व्यावसायीकांनी आपल्या दुकानातील साहित्य मित्रपरिवाराच्या मदतीने पिकअप वाहनांमधून इतरत्र हलविण्यास सुरुवात केली होती. काहींनी स्वखुशीने अतिक्रमणे हटविली, तर काहींनी प्रशासनाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. काही दुकानदारांनी उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्याकडे दोन ते तीन तासांचा अवधी मागितला. मात्र मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सारडा सर्कल परिसरातील कब्रस्तान आरक्षणाची जागा, विकास आराखड्यातील (डी.पी.) रस्ता तसेच मंजूर अभिन्यासातील खुल्या जागांवर उभारण्यात आलेली अतिक्रमण हटविण्यात आली. डिलक्स हॉटेल मागील बाजूस मनपाच्या मोकळ्या भूखंडावर ठेवण्यात आलेले वाहनांचे भंगार साहित्यही हटविण्यात आले. आजच्या मोहिमेत फॅब्रिकेशन दुकाने, कपाट व कोट बनविणारे व्यवसाय, फूड स्टॉल, गॅरेज, मोबाइल रिपेअरिंग व मोबाइल शॉप्स, सर्व्हिस स्टेशन, फुलांची दुकाने तसेच अन्य अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. आ. फरांदे यांनी मानले आभार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे स्वागत केले. आयुक्तांची भेट घेत त्यांचे आभार मानले. प्रभाग क्रमांक २३ अंतर्गत पखाल रोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर मंगळवारी  कारवाई करण्यात येणार असून, यामध्ये अनधिकृत लॉन्स, मटण व चिकन दुकाने तसेच स्क्रॅप दुकाने यांचा समावेश आहे. रहिवाशांना पावसाळ्यानंतर मुदत हॉटेल यात्रिक परिसरातील तसेच काही अन्य ठिकाणांवरील अनधिकृत निवासी बांधकामांबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई टाळली आहे. शत्रुघ्न वाघचौरे, भरत वाघचौरे, कैलास हनुमान गांगुर्डे आणि किसन गांगुर्डे यांच्या घरांसह काही रहिवाशांना सप्टेंबर -ऑक्टोबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली. त्यानंतर जागा रिकामी न केल्यास अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. होर्डिंग हटविताना निर्माण झाला धोका साक्षी हॉटेलजवळील इमारतीवर लावण्यात आलेले मोठे जाहिरात होर्डिंग क्रेनच्या साहाय्याने हटविताना ते खाली कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी तातडीने नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविण्याचे आदेश दिले. परिसर रिकामा केल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली. गॅस गळतीमुळे धावपळ लोखंडी संरचना कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस कटरच्या सिलिंडरमधून काही काळ गॅस गळतीची घटना घडली. मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाल्यामुळे अघटित घडण्याचा धोका होता. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मोठा फौजफाटा तैनात मोहिमेसाठी सहा जेसीबी, चार ट्रॅक्टर, क्रेन, गॅस कटरसह अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. महापालिकेचे सुमारे १०० ते १५० कर्मचारी, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी, एनएमसी सुरक्षा पथक आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख तसेच मुंबई नाका, पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विषारी दारू प्रकरणातील पीडितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत द्यावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच बाधित झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी…

संपूर्ण मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ‘बेस्ट’ ही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहे आणि ती अविरत चालवणारा प्रत्येक कर्मचारी हा आपल्या मुंबईचा कणा आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते आमदार सुनिल प्रभु यांनी दिंडोशी बस आगाराला भेट दिली आणि तिथे उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्या बेस्ट कर्मचाऱ्यांची व कामगार प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली.कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, त्यांच्या अडचणी आणि त्यांना भेडसावणारे विविध शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी प्रश्न प्रत्यक्ष समजावून घेतले. मुंबईकरांना सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजीव साबडे यांच्या ‘खाऊगल्ली’ या पुस्तकाचं बुधवारी प्रकाशन

मुंबई : ज्येष्ठ संपादक संजीव साबडे यांच्या ‘खाऊ गल्ली’  पुस्तकाचे लज्जतदार प्रकाशन बुधवार, २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत (रवींद्र नाट्य मंदिर) होणार आहे.…

शिळफाट्यात २९ अनधिकृत गोडाऊनवर प्रशासनाची कारवाई

 नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका अर्चना पाटील यांच्या लक्षवेधीनंतर आरती परब दिवा,: प्रभाग क्रमांक २९ मधील नगरसेवक बाबाजी पाटील आणि नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी महासभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर प्रशासनाने…

अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, अश्विनी केंद्रे यांचा प्रशासनाला इशारा

दिवा: दिवा शहरातील बोगस व अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे…

दादर येथे साने गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा

ठाणे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (शतकोत्तर रौप्यमहोत्सवी संस्था) आणि साने गुरुजी बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत, थोर देशभक्त आणि प्रेमधर्माचा संदेश देणारे पूज्य साने गुरुजी यांच्या ७६ व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष…

केडीएमसीच्या वतीने ‘अत्याधुनिक आगरी ग्रंथालय’ सुरू करण्याची मागणी

 ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांचे महापौर, आयुक्तांना पत्र कल्याण : आगरी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने ४००-५०० चौरस फूट जागेत १० हजार पुस्तके, डिजिटल ऑडिओ स्टेशन, ई-लायब्ररी आणि स्मार्ट क्लासरूमसह ‘अत्याधुनिक आगरी ग्रंथालय’ सुरू करण्याची मागणी ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांच्यावतीने करण्यात आली असून त्यांनी याबाबत केडीएमसी महापौर, आयुक्तांना पत्र दिले आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, पालघर आणि रायगड हा संपूर्ण भौगोलिक पट्टा ऐतिहासिकदृष्ट्या आगरी आणि कोळी समाजाचे मूळ वसतिस्थान आहे. या भूमीच्या विकासात आणि शहरीकरणात इथल्या मूळ भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देऊन मोठे योगदान दिले आहे. परंतु, झपाट्याने होणाऱ्या या शहरीकरणामुळे आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आमची मातृभाषा असलेली ‘आगरी बोली’, आमची लोकगीते, पारंपरिक ज्ञान आणि आमचा शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा हळूहळू लोप पावत चालला आहे. कोणत्याही समाजाची भाषा जिवंत ठेवायची असेल, तर केवळ मौखिक परंपरेवर अवलंबून न राहता तिचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दस्तावेजीकरण करणे काळाची गरज बनली आहे. याच उदात्त हेतूने, ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्थेच्या वतीने आम्ही आपणास एक नावीन्यपूर्ण ‘अत्याधुनिक डिजिटल आणि ऑडिओ आगरी ग्रंथालय’ उभारण्याचा प्रस्ताव सादर करत आहोत. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी अथवा समाजमंदिरात अंदाजे ४०० ते ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मर्यादित जागेत ‘मोबाईल कॉम्पॅक्टर’  तंत्रज्ञानाचा वापर करून १० हजार पुस्तकांचे संकलन, आगरी साहित्यासाठी एक ई-लायब्ररी, लुप्त पावत चाललेल्या ‘धवला’ गीतांचे जतन करण्यासाठी ‘डिजिटल ऑडिओ स्टेशन’ आणि भावी पिढीला या भाषेची ओळख करून देण्यासाठी एक ‘स्मार्ट क्लासरूम’ उभारण्याचे अत्यंत सूक्ष्म तांत्रिक नियोजन सविस्तर प्रकल्प अहवालात  मांडले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा धोरण २०२४’ आणि ‘सांस्कृतिक थोरण २०२४’ मध्ये नमूद केलेल्या बोलीभाषा संवर्धनाच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत असून, यामुळे केडीएमसीचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात एका ‘संस्कृती-रक्षक’ महानगरपालिकेच्या रूपात प्रस्थापित होईल. महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर आणि ‘सिटीझन सेंट्रिक’ कारभार राबवण्याचा जो संकल्प केला आहे, त्याला हा डिजिटल प्रकल्प अत्यंत पूरक ठरणारा आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून या ग्रंथालयासाठी जागा आणि आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी प्रदान करण्याची मागणी आगरी ग्रंथालय चळवळ संस्था आणि ब-बोली च्या वतीने करण्यात आले आहे.