Category: होम

 भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा

३२ बनावट खाती उघडून ५७ लाखांचा गंडा, सिन्नरमध्ये गुन्हा दाखल! हरिभाऊ लाखे नाशिक : अशोक खरातची वेगवेगळी गैरकृत्ये उघड होत असून त्याच्याविरुध्द सिन्नर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात…

आमच्या हक्काचे पैसे मृत्यूपूर्वी मिळणार का? सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिका प्रशासनाला सवाल 

  मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा उल्हासनगर( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगर महापालिका सेवेतून सन २०१६ ते आजतागायत सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ व महापालिकेच्या…

माथेरानमध्ये वृक्षतोडीचा सुळसुळाट

प्रशासनाचे मौन कायम मुकुंद रांजाणे (माथेरान) माथेरान मध्ये मागील काही वर्षांपासून जुने बंगले खरेदी करून त्याजागी आलिशान हॉटेल्स उभी रहात आहेत. या हॉटेलमध्ये रूम्स बांधताना अडसर ठरणारी झाडे मुळासहित छाटली…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात खासगी व्यक्तीला राहण्यासाठी घर

सबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी करण्याची मागणी कल्याण: कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात शासकीय जमिनीवर नियमांची पायमल्ली करून खासगी व्यक्तीला कायमस्वरूपी राहण्यासाठी घर बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला…

केडीएमसी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथमध्ये सामंजस्य करार

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिपत्याखालील कल्याण पश्चिमेतील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा रुग्णालय, कल्याण पूर्वेतील  शक्तीधाम रुग्णालय यामध्ये रुग्णसेवा देण्याकरिता सामंजस्य करार तत्वावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करण्याच्या…

तारापूर औद्योगिक क्षेत्रात घातक रसायनांची बेकायदेशीर विल्हेवाट

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश मुंबई  : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील  घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकार बद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी  दिले आहेत. विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र ८ डी/१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रायांनी अवैधरित्या व बेकायदेशीरपणे घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकार विल्हेवाट लावण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. औद्योगिक भूखंडाचा करार एमआयडीसीने २०१५ व २०२० मध्येच रद्द केला असतानाही कंपनीकडून बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उच्च रासायनिक घटक (High COD) असलेले सांडपाणी थेट नाल्यात व समुद्रात सोडले जात असल्याचे तक्रार समोर आले असल्याचे समोर आल्याने या प्रकरणात सविस्तर माहिती घेण्याकरिता प्रत्यक्ष पाहणे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.  

आयुष्य विकलांग होण्यापूर्वी सावध व्हा – डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी

मुंबई / रमेश औताडे “मेंदूचा विकास अपुरा असणे या ‘ऑटिझम’ आजाराची सुरुवात गर्भाशयातूनच होते. ऑटिझम आजार तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या मुलाच्या आयुष्याला विकलांग करण्यापूर्वीच त्याला ओळखा व ऑटिझमचे निर्मूलन करा”, अशी माहिती ‘रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन’ चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी यांनी मंगळवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन, शिवसेना मेडिकल हेल्प सेल , माझा ‘सु’ संकल्प अभियान आणि करुणा सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटिझमग्रस्त रुग्णांसाठी मोफत आतड्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मायक्रोबायोम चाचणी शिबिराचे आयोजन येत्या २६ एप्रिल, रोजी म्हैसूर ऑडिटोरियम, किंग्स सर्कल समोर, माटुंगा ईस्ट येथे करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना मेडिकल हेल्प सेल चे प्रमुख मंगेश चिवटे व इतर डॉक्टर पालक उपचार मुक्त रुग्ण पालक उपस्थित होते.

वाहन चालक मालकांच्या अन्यायाविरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये हप्ते वसुलीबाबतचा मोठा भ्रष्टाचार तसेच वाहन चालक मालक यांची आर्थिक लूट, वाहन चालकांवर होणाऱ्या अन्याय त्वरित बंद करावा अशी मागणी ऑल इंडिया चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कामगार नेते रमेश समुखराव यांनी केली. सरकारने आमच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील सर्व जिल्हयामध्ये आर. टी. ओ. अधिकारी ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन चालक मालकांकडून प्रती महिना सर्रास हप्ते वसुली करीत असतात. आर.टी. ओ. कार्यालयामध्ये वाहन चालक व मालकांची गाडी पासिंग व ड्रायव्हर लायसन्स रिनिव्ह करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे. राज्यातील सर्व चेक पोस्ट वर वाहन पेपर तपासणीच्या नावाखाली वाहन चालक व मालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. राज्यामध्ये वाहन चालक एन्ट्री देत नाही म्हणून वाहन चालकास गंभीर मारहाण केली जाते. गाडी मालक व वाहन चालक यांनी आर.टी.ओ. अधिकारी किंवा वाहतुक पोलिस यांना एन्ट्री नाही दिली तर अक्षरशा पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गाडीला आग लावले जाते अशा अनेक घटना घडत आहेत. असे प्रकार राज्यामध्ये सोशल मिडीयावर आपण सर्व पहात आहोत. गाडी खाली असतानासुध्दा ऑनलाईन नाहक चलन टाकला जातो. राज्यातील शहरी भागामध्ये वाहतुक पोलिस शुल्लक कारणावरून वाहन चालकांकडून मोठया प्रमाणात पैसे वसुली करतात. राज्यातील सर्व राज्य महामार्गावर टोल नाक्याच्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने लुटमार चालू आहे असे डॉ एल एच पाडुळे यांनी सांगितले. राज्यातील सर्व टोलनाके बंद करून नवीन धोरण तयार करणे. वाहन चालकांच्या अपघाती मृत्यु पश्यात त्याच्या परिवारास मदत म्हणून तात्काळ १० लाख रुपयाची तरतूद करण्यात यावी व त्या परिवारातील एक सदस्य सरकारी सेवेत रुजू करावे. राज्यातील सर्व महामार्गावर प्रती १०० किलोमीटर अंतरावर वाहन चालकांसाठी स्वतंत्र विश्रांती गृह बनवावे. महाराष्ट्र राज्य सरकारने वाहन चालक अभ्यास आयोग गठीत करावा. अशी मागणी त्यांनी केली.

कोकणातील आंबा-काजू बागायतदार शेतकरी १५ मे ला ‘वर्षा’वर धडकणार!

राजू शेट्टी यांचे प्रतिपादन रत्नागिरी (प्रतिनिधी )– कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना मागणी केल्याप्रमाणे येत्या १५ मे पर्यंत  नुकसान भरपाई न मिळाल्यास हजारो शेतकरी आणि बागायतदार मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.  बालाजी  मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी एल्गार मेळाव्यात शेट्टी  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  ‘उबाठा’ सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने,जिल्हाप्रमुख दत्ता कदम, बाबा साळवी,नेहा माने आदी  अनेक नेते उपस्थित होते. कोकणातील आंबा -काजू उत्पादक शेतकरी आणि बागायतदार निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.असे असताना सरकारकडून जाहीर झालेली मदत ही शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारी आहे आणि म्हणूनच आता ‘वर्षा’वर धडक दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्याल नुकसान भरपाई म्हणून प्रति झाड २५० रुपये देणे ही क्रूर थट्टा आहे. त्यांना प्रति झाड पाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या मागणीवर भर देऊन, प्रत्यक्षात मागितलेली मदत मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. कोकणच्या हापूसला जागतिक स्तरावर ‘जीआय’ टॅग मिळाला असला तरी हवामान बदलाच्या संकटामुळे हापूसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मागील दोन- तीन वर्षापासून सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे बागायतदारांचा उत्पादन खर्चही प्रचंड वाढला असून हा खर्च भरून निघणे अवघड झाले आहे. तेव्हा शेतकरी -बागायतदारांनी आता जागे व्हावे आणि १५, मे च्या या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मेळाव्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा  असलेल्या आंबा -काजू उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार  तिजोरी का उघडत नाही असा  सवाल करून १५, मे च्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यंदा उत्पादन अत्यल्प झाल्यामुळे शेतकरी- बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशावेळी खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावला आहे तो त्यांनी लावू नये अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. वाशी मार्केट मधील दलाल आणि अडत्यांनी संगनमत करून दर पाडू नयेत जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षाही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

 धर्मांतराच्या संशयावरून बजरंग दलाच्या गुंडांची महिलांना मारहाण

घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावरसुद्धा या गुंडांचा हल्ला मिरा -भाईंदर / अरविंद जोशी रविवारी अजय प्रताप यांच्या घरी प्रार्थना सभेसाठी सुमारे २०-२५ लोक जमले होते. दरम्यान, धर्मांतराचा आरोप करत बजरंग दलाचे काही गुंड घरात घुसले. बजरंग दलाच्या या सदस्यांनी घरात घुसून महिलांवर हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या एका पत्रकारावर पोलीस ठाण्याबाहेर बजरंग दलाच्या गुंडांनी हल्ला केला, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक नेहरू नगरमधील बबली यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. घरातील महिलांवर हल्ला करून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. नंतर काही लोकांना चौकशीसाठी भाईंदर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री सुमारे साडेआठ वाजता, घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकार केतन बरिया यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर जमावाने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, ते घटनास्थळाचे चित्रीकरण करत असताना, आपण पत्रकार असल्याचे सांगूनही जमावाने त्यांना घेरले आणि मारहाण केली. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले केतन बरिया म्हणाले, “मी पत्रकार आहे आणि माझे काम करत आहे, हे मी वारंवार सांगितले, पण कोणीही ऐकले नाही. त्यांनी मला घेरले आणि विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली.” बरिया यांना जखमी अवस्थेत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (टेंभा) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्याजवळ पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार संघटना आणि वृत्तसंस्थांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या घटनेला पत्रकार स्वातंत्र्यावरील गंभीर हल्ला म्हटले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धर्माच्या नावाखाली होणाऱ्या जमाव हिंसाचाराच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली असून, अशा घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे, असे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजूनही कोणाला अटक केलेली नाही.