Category: होम

बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव कापरे यांनी वयाच्या ७४ व्या वर्षात पदार्पण केले त्याबद्दल त्यांचे अभीष्टचिंतन करतांना बोरीवली पूर्व येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख राजा खोपकर, अभय नामजोशी, कुशन…

सत्ताधारी भाजपातर्फे १० ऑगस्टला ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा

 महायुतीत भाजपा शिवसेना आमने सामने मिरा-भाईंदर: मिरा-ईंदर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरुन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या आरोपांना आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर देत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका पत्रकार परिषदेत…

 कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य!

ॲग्री स्टॅक वर तात्काळ नोंदणी करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्ग : कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य असून त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘फार्मर आयडी’ नसलेले१२०७ शेतकरी असून त्यांनी तातडीने ‘ॲग्रीस्टॅक ‘वर नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ प्राप्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ नाही त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आवाहन  केले आहे. कर्जमुक्ती योजनेच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे जिल्हा सुकटे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रदीप मालगावे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ६५०० कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत ३७०८ आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यापैकी २१४५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर १५६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे यामध्ये १२०७ शेतकऱ्यांकडे ॲग्री स्टॅक/फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया रखडलेली आहे अशी माहिती  जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आधार प्रमाणे करण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या ३७०८ शेतकऱ्यांचे याद्या संबंधित विकास सेवा संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत जिल्हा उपनिबंधक तसेच तालुका सहाय्यक निबंधक या कार्यालयांमध्ये याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत १एप्रिल २०१९ ते ३१,मार्च,२०२५ या कालावधीत वाटप केलेले अल्पमुदत पीक कर्ज, ३० सप्टेंबर,२०२५ रोजी थकीत आणि ३१,मार्च,२०२६ अखेर परतफेड न झाले असल्यास मुद्दल व व्याजासह अधिकतम दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे थकीत कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त रक्कम संबंधित बँक किंवा संस्थेला परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता ओटीएस अंतर्गत २ लाख रुपये पर्यंत चा लाभ मिळणार आहे तसेच २०२२-२३,२०२३ -२४ आणि २०२४ -२५ यातील आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली. ००००००००

आचार्य अत्रे रंगमंदिरात आशा भोसले, रफी आणि सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजलीपर गाणी

कल्याण :  येथील आचार्य अत्रे रंगमदिरात दिवंगत गायिका, आशा भोसले, गायक रफी आणि सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजलीपर तसेच आणि पाऊस या विषयावरील गाण्यांना श्रोत्यांचा अलोट प्रतिसाद लाभला. यावेळी २२ गायक, गायिका…

तर साडेतीन वर्षांत रिंग मेट्रो धावणार – श्रावण हर्डीकर

अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचे संपूर्ण भूसंपादन व इतर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास हा प्रकल्प अवघ्या साडेतीन वर्षात पूर्ण करू, अशी ग्वाही बैठकीत व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. अडीच वर्षांत पुणे मेट्रोचे वेगाने काम करण्यात आले. त्याच धर्तीवर ठाण्याचे काम पूर्ण करता येईल, अशी आशा हर्डिकर यांनी व्यक्त केली. त्याचे आमदार ॲड. माधवी नाईक यांनी स्वागत केले आहे. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाण्यातील सामान्य नागरिकांच्या शंका व भीती थेट नागरिकांबरोबर संवाद साधून दूर केली जाणार आहे. भाजपच्या आमदार ॲड. माधवी नाईक यांच्या सूचनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिंग मेट्रो मार्ग जाणाऱ्या विविध भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांबरोबर एकत्रपणे संवाद साधण्याच्या सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहात ठाणे शहरातील रिंग मेट्रो रेल्वेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक यांची उपस्थिती होती. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बैठकीत लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली. ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार रिंग मेट्रो प्रकल्प हा आवश्यक आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत महामेट्रो, महापालिका किंवा कोणत्याही सरकारी आस्थापनांकडून सामान्य नागरिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत ठाणे शहरात गैरसमज निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सामान्य नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अभ्यासू व्यक्तींबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या शंकांचे समाधान करण्याची आवश्यकता आहे. रिंग मेट्रोच्या कामामुळे नुकसान होणार नसून, ठाणेकरांना फायदा होईल. या प्रकल्पाबाबत ठाणेकरांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ठाण्यातील विविध भागात व नियोजित मेट्रोच्या स्थानकांच्या ठिकाणी परिसंवाद भरवावेत. त्यात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी, अशी सूचना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी केली. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. त्यानुसार लवकरच ठाणे शहरातील नागरिकांबरोबर थेट संवाद साधण्यासाठी परिसंवाद भरविले जाणार आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळातही महामेट्रोकडून रिंग मेट्रोबाबत फलक लावण्यात येणार आहेत.

मूग व उडीद पिकासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अनिल ठाणेकर ठाणे, पिकस्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे, “एक वेळची विशेष बाब” म्हणून मूग व उडीद पिकासाठी अर्ज करण्यास १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून नवनवीन प्रयोग करण्यात येतात व उत्पादनात भर घातली जाते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढून ते आणखी उमेदीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पीक स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आली आहे. कृषी एकविभागामार्फत राज्यस्तरावर खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेत सहभाग घेता येईल. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावरील उत्पादकता आधारभूत धरून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाईल. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगामातील एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. शासन निर्णयानुसार मूग व उडीद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ठरवण्यात आली होती. परंतु, पिकस्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे, “एक वेळची विशेष बाब” म्हणून मूग व उडीद पिकासाठी अर्ज करण्यास १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत खालीलप्रमाणे एकूण ११ पिकांचा समावेश असून त्यांच्या अर्ज करण्याची अंतिम मुदत खालीलप्रमाणे आहे: मूग व उडीद पीक : १० ऑगस्ट २०२६, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल : ३१ ऑगस्ट २०२६ स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे बंधनकारक आहे. शेतकरी एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. तसेच सहभागी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे फार्मर आयडी, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याची चलन पावती, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), आणि बँक खाते चेक किंवा पासबुक डिटेल्स. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये आणि आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. बक्षीस तपशील तालुका पातळी: प्रथम ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये आणि तृतीय २,००० रुपये. जिल्हा पातळी: प्रथम १०,००० रुपये, द्वितीय ७,००० रुपये आणि तृतीय ५,००० रुपये. राज्य पातळी: प्रथम ५०,००० रुपये, द्वितीय ४०,००० रुपये आणि तृतीय ३०,००० रुपये. कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बंधू-भगिनींना जास्तीत जास्त संख्येने या पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छूकांनी http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पिकस्पर्धा टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ००००

महात्मा गांधी विद्यालयात करपल्लवी गोंधळी लोककलेचा अनोखा सांस्कृतिक कलाविष्कार

कल्याण: श्रीकृष्ण कला फाऊंडेशनच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या करपल्लवी गोंधळी लोककलेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. पूर्वप्राथमिक विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर…

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दुर्मिळ ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका २० वर्षीय महिला रुग्णाच्या पोटातील सुमारे साडेआठ किलो वजनाचा दुर्मिळ ट्युमर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला…

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.…