Category: होम

 डॉ. विनय सांगळे यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुवर्ण कामगिरी

मलेशियातील हॉस्पेक्स मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईला विजेतेपद अशोक गायकवाड रायगड- कर्जत : कर्जतचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विनय सांगळे यांनी मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या हॉस्पेक्स आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत शानदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कतार, बांगलादेश, मलेशिया तसेच भारतातील मुंबई, दिल्ली, केरळ आणि गोवा येथील नामांकित मेडिकल क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाने गोवा संघाचा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयात डॉ. सांगळे यांचे योगदान मोलाचे ठरले. गेली १८ वर्षे कर्जतमधील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करणारे डॉ. विनय सांगळे यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच क्रिकेटची आवडही सातत्याने जोपासली आहे. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. सांगळे यांनी यापूर्वी दुबई, श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच पाँडिचेरी, बेंगळुरू, विशाखापट्टणम, चेन्नई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, हैदराबाद आणि नाशिक येथे झालेल्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सहा वेळा ‘राष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज’ पुरस्कार डॉ. विनय सांगळे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी तब्बल सहा वेळा ‘बेस्ट बॉलर’ (सर्वोत्तम गोलंदाज) हा राष्ट्रीय किताब पटकावला आहे. उदयपूर, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि नवी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी हा मान मिळवला असून, ही कामगिरी करणारे ते मेडिकल क्रिकेटमधील मोजक्या आणि अव्वल गोलंदाजांपैकी एक मानले जातात. ५६० विकेट्सचा विक्रम ‘डावखुरा जादुई फिरकी गोलंदाज’ अशी ओळख असलेल्या डॉ. सांगळे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धांमध्ये आतापर्यंत ५६० हून अधिक विकेट्स घेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकविण्याचा उल्लेखनीय पराक्रम केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी गोलंदाजीमुळे ते मेडिकल क्रिकेट क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी सांभाळत क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या डॉ. विनय सांगळे यांनी कर्जतचे नाव देश-विदेशात उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्र, क्रीडाविश्व तसेच कर्जत तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

 पोयसर जिमखान्याच्या धनुर्धरांनी ३५ पदके पटकावली

मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इंडोअर इनडोअर आर्चेरी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ – ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा…

दिवा- कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या धडकेत तरुणी ठार

दिवा : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रविवारी सकाळी एक सुन्न करणारी घटना घडली. अवघ्या १८ वर्षीय तरुणी कामावर जाते सांगत घराबाहेर पडली होती. दिवा- कोपर दरम्यान लोकलच्या धडकेत तिचा जागीच दुर्दैवी…

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय व ‘मूट कोर्ट’चे आज उद्घाटन

पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या अत्याधुनिक ‘मूट कोर्ट’चे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते…

 पनवेलमध्ये ८ ऑगस्टला ‘महारोजगार मेळावा २०२६’

दहावीपासून पदव्युत्तर व कुशल उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल : रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या व विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या वतीने ‘महारोजगार मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट  सकाळी ९ वाजता चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे होणार आहे.या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविध कौशल्ये असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध नामांकित कंपन्या व उद्योग या मेळाव्यात सहभागी होणार असून, उमेदवारांना थेट रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबरच जॉब इंटरव्ह्यू, करिअरच्या संधी आणि उत्तम नेटवर्किंग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. रोजगाराच्या संधींच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असून, ‘रोजगार शोधणाऱ्यांना सुवर्णसंधी’ या उद्देशाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, जाहिरातीतील क्यूआर कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून उमेदवार नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी ७४९८०७४१०५ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन युवकांनी आपल्या भविष्याची दिशा निश्चित करावी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 0

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचा गौरव

अशोक गायकवाड कर्जत : महसूल दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व महसूल दिन’ कार्यक्रमात कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन २०२५-२६ या महसूली वर्षात शासनाच्या धोरणे व उद्दिष्टांनुसार अत्युत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तिपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेंद्र दळवी, विक्रांत पाटील तसेच सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि कृषी सभापती वैकुंठ पाटील उपस्थितीत होते . प्रशासनाच्या वतीने कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, महसूल अपर आयुक्त वैशाली उंटवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदुलकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००००००

रहिवाश्यांच्या पुनर्विकासाबाबत सचिन लोंढे आक्रमक

रमेश औताडे मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिव सुदर्शन गृहनिर्माण संस्थेच्या ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुनर्वसन प्रकल्पाबाबत अखेर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. ओमकार बिल्डर्सवर रहिवाशांचे तब्बल १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून, हे थकीत भाडे तात्काळ मिळावे आणि रहिवाशांचे पुनर्वसन व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोगेश्वरी तालुकाध्यक्ष सचिन लोंढे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा केला. या रखडलेल्या प्रकल्पाबाबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नगरसेवक अजितदादा रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर हेदेखील उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार बिल्डर्सकडे सुमारे १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून यावर आता कडक कारवाई केली जाणार आहे.

मोहनेमध्ये मुदत संपलेल्या औषधांचा ढीग

कल्याण : कल्याण नजीक आंबिवली मधील मोहने परिसरातील यादव नगर स्मशानभूमीजवळ उल्हास नदीकाठी  तारीख संपलेल्या औषधांचा ढीग आढळून आला आहे. त्यामुळे  नदी किनाऱ्याच्या आणि परिसराच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.…

 मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी

 एका बाजूला पाणीटंचाई, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शुद्ध पाणी वाया कल्याण: कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना, दुसरीकडे केडीएमसीच्या टिटवाळा येथील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात गळती, तांत्रिक बिघाड आणि देखभालीअभावी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे शहरातील अनेक भागांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे जलशुद्धीकरण केंद्रातूनच शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक नैसर्गिक संसाधनाची होणारी ही नासाडी तातडीने थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोहिली केंद्रातील गळती व तांत्रिक समस्या त्वरित दूर करून नियमित देखभाल आणि देखरेख व्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे. 0000

 उसाटणे गावात सराईत आरोपींची गुंडगिरी

 वाहनांचा ताफा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल कल्याण : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटणे परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. गंभीर…