Category: होम

श्रेयस जायभाये, रितू सर्वोत्तम जगताप

– स्व. मंगलाताई अडसूळ ट्रॉफी योग शिबिर मुंबई :   आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिक सहाय्यक केंद्र संचलीत ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळातर्फे झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका स्व. मंगलाताई अडसूळ ट्रॉफी योग शिबिरात शालेय लहान गटात श्रेयस…

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणीत महेंद्रशेठ यांचे महत्त्वाचे योगदान: रामशेठ ठाकूर

महेंद्रशेठ घरत यांचे बॅडमिंटनसाठी अडीच लाख रुपयांचे प्रायोजकत्व उलवे, ता. २० : “महेंद्रशेठ घरत हे गेली अनेक वर्षे कामगारांसाठी उत्तम काम करीत आहेत. आता तर जागतिक पातळीवर कामगारांच्या हक्कासाठी लढतोय. त्याने उत्तम फिटनेस राखली आहे, तो साठीतही तरुणच असेल, एवढी त्याने व्यायामाने तब्बेत सांभाळली आहे. त्याला खेळाची आणि खेळण्याचीही आवड आहे. त्यामुळे खेळाडूंना तो नेहमीच प्रोत्साहन देत आला आहे. त्याने अनेक चांगले गुण आत्मसात केलेत. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणीसाठी त्याचे भरीव योगदान आहे, याची मला जाण आहे,” असे माजी खासदार रामशेठ ठाकूर गुरुवारी म्हणाले. योनेक्स-सनराईझ रामशेठ ठाकूर रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी १६ ते १८ जून रोजी घेण्यात आली. त्याच्या पारितोषिक वितरणप्रसंगी रामशेठ ठाकूर बोलत होते. बॅटमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडने याचे आयोजन केले होते. यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे प्रायोजक होते. त्यांनी अडीच लाख रुपयांचे प्रायोजकत्व स्विकारले होते. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “रामशेठ ठाकूर हे देशात अव्वल असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे सर्वाधिक मोठे देणगीदार आहेत. त्यांनी आपले सासरे दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांच्या नावे शिक्षण संस्था सुरू करून उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणाऱ्या शाळा सुरू केल्या आहेत. उच्च गुणवत्ता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारणीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, या कामात मी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहे. १०० कोटींच्या घरात त्यांनी त्यासाठी खर्च केले आहेत, जेणेकरून खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील. आज देशभरातून उलवे नोडमध्ये नागरिक राहायला आलेत, त्यांना आणि त्यांच्या मुलांना या स्टेडियमचा चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे येथील खेळाडू येत्या काळात जागतिक पातळीवर चमकतील, असा मला ठाम विश्वास आहे. येथील बॅडमिंटन खेळाडूंना सहकार्य करीत आलो आहे, यापुढेही करणार आहे.” या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. १८४ खेळाडूंनी २५ गटांमध्ये २६३ प्रवेशिका पाठविल्या. स्पर्धा मुले व मुलींसाठी एकेरी आणि दुहेरी प्रकारात ९ वर्षांखालील, ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि खुला गट अशा विविध वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, वाय. टी. देशमुख, साईकुमार जी., माताप्रसाद त्यागी हे विशेष उपस्थित होते. या प्रसंगी रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना सुमारे ३ लाखांची रोख बक्षिसे व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. याशिवाय, मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

 रायला देवी तलाव सुशोभीकरणाचा निधी झिरपला कुठे ?

 मागील सात – आठ वर्षांच्या कालावधीत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांची चौकशी करण्याची केली मागणी ठाणे : मागील आठ वर्षांच्या कालावधीत रायला देवी तलाव आणि परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण या तलाव आणि परिसराची सध्याची परिस्थिती पाहता महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे झिरपला आहे असा सवाल समाजसेवक आणि स्थानिक नागरिक नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी प्रशासनाला विचारला आहे. पाण्यासारखा पैसा खर्चूनही रायला देवी तलाव आणि परिसराची बकाल अवस्था का आहे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करून संबंधिंतावरी गुन्हे दाखल करण्याची मागणी हिवराळे यांनी केली आहे. यासंदर्भात नरेंद्र (रवी) हिवराळे म्हणाले, तलाव आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेने २०१९साली सुमारे साडे दहा कोटी रुपयांची निविदा काढली होती. त्यात तलावाची खोली वाढवण्याबरोबर तिथे संरक्षक भिंत बांधण्याची अट होती. पण  न्यायालयीन आदेशामुळे सिमेंट काँक्रिटची भिंतीच्या ऐवजी गॅबियन वॉल बांधण्याचा निर्णय नंतर घेण्यात आला.  त्यानुसार   तलावाची रुंदी कमी करून केवळ  केवळ अडीच बाजूला गॅबियन वॉल बांधण्यात आली. याशिवाय तलावाची खोली वाढवण्यासाठी मोठे पंप लावून त्यातील पाण्याचा उपसा करण्यात आला. हा उपसा करत असताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे तिथे असणारे जलचर, भारतीय प्रजातीची कासवं मरण पावलीत. याशिवाय तलावाची सध्याची परिस्थिती पाहता त्याठिकाणी तलावाची खोली किती वाढवण्यात आली असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या तलावात कुठल्याही प्रकारचे पक्के बांधकाम करू नयेत असे स्पष्ट निर्देश असताना त्यात सुशोभीकरणाच्या नावाखाली अर्धवट बांधकाम केलेले पहायला मिळते. या कामासाठीही नंतर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असल्याचा आरोप नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी केला.  अर्धवट सुशोभीकरणामुळे तलावाच्या उत्तर दिशेला रानटी झुडपं उगवली असून त्याठिकाणी कुठल्याही वेळेला प्रेमी युगल बसलेली आढळतात. याशिवाय पश्चिम बाजूला उत्तर भारतीय.  नागरिकांच्या छट पूजेकरता तात्पुरत्या छोटे पाण्याचे हौद तयार करण्यासाठी विटा आणि भुसा वापरण्यात आला होता. आता एवढे दिवस उलटून गेल्यावरही त्याठिकाणी तो भुसा तसाच पडून असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपुर्वी त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी महापौर शर्मिला पिंपोळलकर यांच्या कडे केली होती. ही मागणी जरी रास्त असली तरी त्याठिकाणी केवळ एकच सुरक्षा चौकी बांधण्यात आली आहे. तलावाचा एकूण परिसर पाहता त्याठिकाणी किमान पाच ते सहा सुरक्षा चौकींची आवश्यकता असल्याचे नरेंद्र मोदींनी (रवी) हिवराळे यांनी सांगितले. तलावाची सध्याची बकाल अवस्था पाहता अमृत योजनेच्या माध्यमातून मिळालेले चार कोटी रुपये, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी नागपूरच्या कंत्राटदाराने कुठे खर्च झाला याची चौकशी करावी अशी आग्रही मागणी नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी केली आहे. मागील आठ वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही बकाल अवस्थेत असलेला रायला देवी तलाव आणि परिसर सर्वसामान्यांसाठी केव्हा खुला होणार असा सवाल नरेंद्र ( रवी) हिवराळे यांनी उपस्थित केला आहे.

फिटनेस फ्रायडे क्लबतर्फे योग दिन उत्साहात साजरा!

मुंबई: फिटनेस फ्रायडे क्लबतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला सूर्यनमस्कार चॅलेंज आणि आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाला देशभरातून तसेच परदेशातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हे विशेष.…

मैत्रीबोध परिवाराद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

रमेश औताडे मुंबई : मैत्रीबोध परिवाराने शांतिक्षेत्र प्रेमगिरी आश्रम, कर्जत येथे एका अनोख्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून भारताच्या सभ्यतागत आणि सांस्कृतिक वारशाचा अमूल्य भाग आहे. या विचाराला अधिक बळ देण्यासाठी केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत हे कार्यक्रमाला उपस्थित होते.  या प्रसंगी  गोपाल कृष्ण अग्रवाल, आमदार  महेंद्र सदाशिव थोरवे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे  योगाचा अनुभव केवळ आसने आणि शारीरिक व्यायाम यापुरता मर्यादित न राहता, शरीर, मन आणि चेतना यांच्या एकात्मतेच्या रूपात घेता आला. कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणण्यासाठी गणेश वंदना तसेच भारताची प्राचीन योगिक कला असलेल्या मल्लखांबाचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. मल्लखांब ही शक्ती, लवचिकता, संतुलन आणि शिस्त विकसित करणारी भारतीय परंपरेतील एक अद्वितीय कला आहे.

मिरा -भाईंदरकर नागरिकांवर पाणीटंचाई आणखी तीव्र

 एमआयडीसीची १० टक्के, तर स्टेमचीही २० टक्के पाणीकपात मिरा -भाईंदर :पावसाने ओढ दिल्याने शहरातील नागरिकांसाठी पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एमआयडीसीकडून १० टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता स्टेम प्राधिकरणानेही २० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. ही कपात २४ जूनपासून लागू होणार असून त्याचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या केवळ २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाने मे महिन्यात १० टक्के पाणीकपात लागू केली होती. त्यानुसार एमआयडीसीकडून मिरा-भाईंदरला होणारा पाणीपुरवठा महिन्यातून दोन वेळा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, यापूर्वी स्टेम प्राधिकरणाने कोणतीही कपात लागू केली नव्हती. आता स्टेमने २० टक्के पाणीकपात जाहीर केल्याने शहरातील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात वगळण्याची आहे. या निर्णयाविरोधात विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महापौर डिंपल मेहता यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मिरा-भाईंदरला पाणीकपातीमधून मागणी केली होती. मात्र, ही मागणी प्रशासनाने फेटाळून लावली. सध्या एमआयडीसीच्या १० टक्के पाणीकपातीमुळे नागरिकांना दर ४२ तासांनी पाणीपुरवठा केला जात आहे. स्टेमच्या नव्या २० टक्के कपातीनंतर हा कालावधी ४२ तासांवरून तब्बल ५५ तासांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी अधिक हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत.

 खाशाबा जाधव पुरस्कार ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना जाहिर

– लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम कोल्हापूरः  पुण्यातील ध्रुवतारा फाऊंडेशनकडून दिला जाणारा मानाचा चौथा खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना गौरव करण्यात येणार आहे. कोल्हापूरात ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवार २३ जून रोजी हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खाशाबा जाधव पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम कोल्हापूर, कराडमध्ये ऑलिम्पिक दिनानिमित्त होत आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या सभागृहात सकाळी १० वाजता ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराने बंडा पाटील  गौरवित केले जाणार आहे. शाल, श्रीफळ, गौरव चिन्ह, रोख ५ हजार रूपये, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उद्योजक रोहित मुसळे, मनिष झंवर यांच्या हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शासनाचे कुस्तीचे क्रीडा अधिकारी अरूण पाटील, प्राचार्य गजानन खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराचा समारंभ करणार आहे. याप्रसंगी ऑलिम्पिकपटूंच्या परिवारातील शामराव जाधव व माणिक माणगावे, राष्ट्रीय खो-खो  खेळाडू सानिका चाफे, अमृता पाटील, श्रावणी पाटील, कुस्तीगीर पृथ्वीराज  मोहिते, क्रीडा प्रशिक्षक भीमा भांदिगरे यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती ध्रुवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधाणे यांनी दिली आहे. १९६४ च्या टोकिओमधील ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूरातील शाहूवाडी तालुक्यातील रेठरे गावातील बंडा पाटील यांनी सलग ७ वेळा राज्य तर २ वेळा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदकाचा पराक्रम केला आहे. राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेत कोल्हापूरच्या सानिका चाफेने महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. यापूर्वी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा यांचा खाशाबा जाधव पुरस्कारान गौरव करण्यात आला आहे. चौकट लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम ऑलिम्पिक दिनानिमित्त लेखक संजय दुधाणेंचे याचे कराड व कोल्हापूर येथे सलग ३ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणारे महान मल्ल खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यासाठी त्यांच्या चरित्राचे लेखक संजय दुधाणे यांचा विशेष संवाद कार्यक्रम सोमवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता शिवाजी पेठ, सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशालेत आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलमध्ये १९५२ काळात राजाराम महाविद्यालय भरायचे. या महाविद्यालाच्या मुख्य सभागृहात खाशाबांचा कोल्हापरकरांनी नागरी सत्कार केला होता. आता याच ऐतिहासिक सभागृहात खाशाबा जाधव पुरस्कार समारंभ ऑलिम्पिक दिनी रंगणार आहे. यावेळी खाशाबामय असणारे संजय दुधाणे हे कोल्हापूरातील खाशाबांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.  कराडमध्येही लेखक आपल्या भेटीला कार्यक्रम होणार आहे.

१९ वर्षांच्या रुद्रप्रताप पांडेचा मुंबईत धमाका

 ६५० किलो लेग प्रेस करून रचला नवा जागतिक विक्रम! राजेंद्र साळसकर मुंबई-द्द,अफाट शारिरीक ताकद आणि कधीही न डगमगणारा आत्मविश्वास यांच्या जोरावर मुंबईच्या एका १९ वर्षांच्या तरुणाने क्रीडा जगतात नवा इतिहास रचला…

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसकडून समाजाभिमुख राजकारणाचा संदेश

ठाणे- काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त औपचारिक कार्यक्रम न करता विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करून समाजाभिमुख राजकारणाचा संदेश देण्यात आला.…

आदिवासींच्या प्रश्नांवर अंबरनाथ तहसीलदारांची तीन तास चर्चा; पाणीटंचाईसह विविध समस्यांवर निर्णय

००००००० ठाणे : आदिवासी कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत तहसीलदार अमित पुरी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी…