Category: होम

कळवा मुंब्र्यात लोकच बदल घडविणार- आनंद परांजपे

पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणार- नजीब मुल्ला ठाणे : १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नजीब मुल्ला यांनी कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि अभिवादन करून कळवा…

रविवारच्या दिवशी रायगड गल्ली परिसरात केळकरांच्या झंझावाताला जोरदार प्रतिसाद

अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची रविवारी सकाळी जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा श्रीगणेशा रायगड गल्ली परिसरातील गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनाने झाला. रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. याचदरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले. पाचपाखाडी, चंदनवाडी , नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या झंझावात रॅली रायगड गल्ली भागातुन सुरू झाली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक (भाऊ) राऊळ,…

ओवळा माजिवड्यात प्रताप सरनाईक यांचा झंझावात

अनिल ठाणेकर ठाणे : प्रताप सरनाईक यांच्या प्रचार रॅलीत आगरी कोळी बांधवांनी त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन प्रचाराचा उत्साह द्विगुणीत केला. त्यांनी प्रताप सरनाईक यांना देखील पारंपारिक वेशभूषा परिधान करण्याचा आग्रह…

गुजरात उच्च न्यायालयाचा अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश देशभरात लागू करा !

अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : गुजरात उच्च न्यायालयाचा अंगणवाडी सेविका, मदतनिसांना वर्ग ३ व ४ चे शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश संपूर्ण देशात ताबडतोब लागू करा, अशी मागणी अखिल भारतीय…

उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे तपासणीकरिता सादर करावीत -मुकेश चव्हाण

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये १९२ अलिबाग विधानसभा मतदारसंघात एकूण १४ अधिकृत उमेदवार असून अंतिम झालेल्या उमेदवारांनी खर्च नोंदवही, निवडणूक खर्चासाठी उघडलेली स्वतंत्र बँक खाते पासबुक, निवडणूक…

अभिषेक बजाज, राहुल सचदेवची आगेकूच

मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धा मुंबई, 10 नोव्हेंबर: मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धेत सिक्स रेड तिसर्‍या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत मुंबईच्या अभिषेक बजाज आणि राहुल सचदेवने आगेकूच कायम ठेवली. एमएचसी बिलियर्ड्स…

ई रिक्षा वाढत्या पर्यटनाचा केंद्रबिंदू

माथेरान : माथेरानच्या पर्यटन वाढी सोबतच राजकारणाचा एक अविभाज्य भाग बनलेल्या ई रिक्षामुळे इथल्या गल्लीबोळातले राजकारण सुध्दा रंगताना दिसत आहे.काही राजकीय पक्षांनी या ई रिक्षाचा मुद्दा घेऊन पतसंस्था निवडणुकीत विजय मिळवला होता तर काही गावाचे हित पाहणाऱ्या राजकीय लोकांनी राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक विचार करून गावात सुविधा उपलब्ध व्हायलाच हव्यात याकामी ई रिक्षा साठी आपली प्रतिष्ठा पणाला लावून परिणामाची चिंता न करता पतसंस्था निवडणुकीत पराभवाला सामोरे गेले आहेत.मुळात ज्यांनी ज्यांनी ई रिक्षाला प्रखर विरोध दर्शवून राजकारण करून सर्वसामान्य लोकांची मते घेऊन पतसंस्थेत सत्ता स्थापन केली तीच राजकीय पक्षांची मंडळी या ई रिक्षाचा आपल्या घरापर्यंत वापर करताना दिसत आहेत. ह्याच ई रिक्षा यापुढेही प्रत्येक राजकीय वातावरणात महत्वाचा विषय ठरणार आहेत. एकीकडे ई रिक्षाला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूने याचा वापर सुध्दा तितक्याच जोमाने करायचा अशी दुहेरी भूमिका विरोधक मंडळी बजावत आहेत. सध्या ह्या रिक्षांची संख्या वीस असून अद्यापही उर्वरित ७४ रिक्षा येणार आहेत. आणि याच येणाऱ्या रिक्षांची संख्या कमी व्हावी यासाठी राजकीय पक्षांना हाताशी धरून कुणी या पक्षातून दुसऱ्या पक्षात बेडूक उड्या मारत आहेत.आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकी मध्ये ई रिक्षा समर्थक आणि विरोधक असाच सामना पहावयास मिळणार आहे. ई रिक्षामुळे खऱ्या अर्थाने पर्यटन क्रांती घडत आहे हेही विरोधात असणाऱ्या लोकांना माहीत आहे परंतु केवळ राजकारण करून लोकांची दिशाभूल करून सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय मंडळी अग्रेसर दिसत आहेत. लवकरच ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर महिन्यात पूर्ण होऊन उर्वरित ७४ रिक्षा डेरेदाखल होणार आहेत यात शंकाच नाही. या सर्व मिळून ९४ ई रिक्षा सुध्दा पर्यटकांना कमी पडणार आहेत. गावाच्या इतिहासात प्रथमच एक नाविन्यपूर्ण बदल ई रिक्षाच्या माध्यमातून समस्त नागरिक अनुभवत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध मंडळी बरोबरच रुग्णांना सुध्दा या सेवेचा लाभ मोठया प्रमाणावर होत आहे. स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने पर्यटकांना ही एक पर्वणीच ठरली आहे. आजवर हजारो पर्यटकांसह स्थानिक लोक सुध्दा याचा उपभोग घेत आहेत.अधिकारी वर्गाला सुध्दा आपल्या कार्यालयापर्यंत सध्या तरी मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.मुळात ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी सहकार्याची भूमिका बजावली नव्हती त्यांनी आपले हात झटकले होते.कारण हा एक संवेदनशील विषय असल्यामुळे सुप्रीम कोर्टाशिवाय परवानगी मिळणे कठीण होते. त्यासाठी रिक्षा संघटनेने जवळपास बारा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सनियंत्रण समितीच्या परवानगीने पायलट प्रोजेक्ट म्हणून या रिक्षा कार्यरत आहेत.पर्यटकांची वाढती संख्या पाहता वीस रिक्षा अपुऱ्या पडत आहेत त्यासाठी सनियंत्रण समितीने लवकरच उर्वरीत ७४ रिक्षांना परवानगी देऊन इथे पर्यटन क्रांती घडवून आणावी अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. या ई रिक्षांची संख्या कमी आहे इथे आल्यावर खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते. एक सोयीस्कर आणि स्वस्त प्रवास उपलब्ध झाला आहे हे खूपच छान आहे.रिक्षात मोठया बॅगा घेत नाहीत त्यासाठी हमाल करावा लागतो हा खर्च परवडत नाही त्यासाठी सामान सुध्दा घ्यायला हवे. लोचन पानसरे—-पर्यटक मुंबई

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार

 चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे राज भंडारी पनवेल : सर्व गटई कामगार महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे यांनी दिली. शिवदास कांबळे यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजातील गटई कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, कामगारनेते व प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, जगदीश ठाकूर, युवक अध्यक्ष नेरूळकर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष सुनिल मोहोड, माजी नगरसेवक सुनिल नाईक, कारंडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि गटई कामगार उपस्थित होते. शिवदास कांबळे यांनी पुढे बोलताना सांगितले कि, चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी सरकार काम करीत आहे. त्या अनुषंगाने विविध योजना प्रत्येक कामगाराला मिळाली पाहिजे यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलो आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने लोकांच्या हिताचे काम करीत असतात. त्यामुळे त्यांना सर्व कामगारांचा पाठिंबा, असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. रोहिदास चर्मकार समाज देशभर पसरलेला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजाचे कौतुक केले आहे. देशाशी एकरूप असलेला या समाजाचा देशाच्या योगदानात वाटा आहे. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मविश्वासाने काम होत आहे. सरकार संविधानाच्या विरोधात आहे असा खोटा प्रचार आणि दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत असतात. मात्र सर्वप्रथम २६ नोव्हेंबर २०१५ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान दिन झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा करून लोकशाहीच्या मंदिरात नतमस्तक झाले होते. सोयीनुसार संविधान बदलण्याचे काम काँग्रेस पक्षाने स्वार्थासाठी केले असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. पीएम आवास, उज्वला गॅस, शौचालय, मातृवंदन योजना, जलजीवन मिशन, लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, पीएम किसान, शेतकरी सन्मान, पीक विमा, आरोग्य योजना, अशा अनेक लोकहिताच्या योजना राबवल्या आहेत, त्यामुळे लोकांचे काम करणारे हे सरकार पुन्हा येण्यासाठी मला विजयी करा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

पूर्वपिठिका २०२४ निवडणूक काळात अत्यंत मार्गदर्शक – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित रायगड अलिबाग पूर्वपिठिका-२०२४ निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही…

मुरबाड विधानसभा क्षेत्रात नक्कीच परिवर्तन घडेल-सुरेश म्हात्रे

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांना अनुकूल वातावरण आहे. महायुतीच्या कारभाराला कंटाळलेले नागरिक मुरबाड मध्ये नक्कीच परिवर्तन घडवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी आज व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या सरळगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी सरळगाव, टोकावडे येथील कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. तसेच शिरोशी येथील कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले. तर तळेगाव, न्याहाडी, मोरोशी भागात रॅली काढून मतदारांना महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी उमेदवार सुभाष पवार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आप्पा घुडे, महिला उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौरे, आरपीआय सेक्युलर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. रुपाली कराळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कविता वारे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत परिवर्तनाची नांदी घडविली. तीच परंपरा विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त करून महायुती सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीला विजयी करावे, असे आवाहन श्री. म्हात्रे यांनी केले. मुरबाड तालुक्याबरोबरच बदलापूर शहर, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातूनही मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व कॉंग्रेसचे कार्यकर्तेही झोकून कार्य करीत आहेत. महायुतीचे काही भागातील कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच परिवर्तन घडेल, असा विश्वास उमेदवार सुभाष पवार यांनी व्यक्त केला. मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २०२१ मध्ये सर्व शाळांमध्ये १०० टक्के शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील काही शिक्षक निवृत्त झाले असून, तेथील रिक्त जागी शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शिक्षकांच्या रिक्त जागांच्या मुद्द्यांवरुन तालुक्यातील मतदारांची दिशाभूल केली जात आहे, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले.