Category: होम

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क

नदीपातळीवर सातत्याने लक्ष ठाणे- जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर जिल्हा आपत्ती…

साला…. एक फोन कॉल आदमी को ‘ कंगाल ‘ बना देता है !

  ‘ भारत पेट्रोलियम ‘ च्या निवृत्त कर्मचाऱ्याचे बँक अकाऊंट साफ ! १० लाख रुपये लंपास महानगर गॅस कंपनीच्या नावे फसवणूक दिवाकर शेजवळ मुंबई : मालाड ( पूर्व) भागात घडलेल्या…

‘ऑरेंज अलर्ट’’च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

३ दिवसांत २२२ मि.मी. पाऊस, कणकवलीत सर्वाधिक ३२० मि.मी. सिंधुदुर्ग : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६ जुलैला ऑरेंज अलर्ट, तर ७ व ८ जुलैला ‘यलो अलर्ट’ जारी…

संततधार पावसामुळे कौलारू घराचा भाग कोसळून महिला जखमी

कल्याण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगर परिसरातील एका कौलारू चाळीचा काही भाग कोसळून आशाबाई बाळकृष्ण गांगुर्डे या महिला गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे…

दत्त निवारा इमारतीचा भाग कोसळल्यानंतर बाधितांना बीएसयूपी घरांमध्ये तात्पुरता निवारा द्या

– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी आरती परब दिवा : दिवा शहरातील वैभव हॉटेलच्या मागे असलेल्या ‘दत्त निवारा’ इमारतीच्या जिन्याचा आणि स्लॅबचा काही भाग रविवारी कोसळल्यानंतर येथील रहिवाशांसमोर निवाऱ्याचा…

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पद रद्द

 महिन्याभरात नवीन नियुक्त्या होणार-पालकमंत्री डॉ. उदय सामंत अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी ही सध्याची पदे रद्द करुन येत्या महिन्याभरात नवीन नियुक्तीची यादी जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे १२ जुलैला संगीत कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा…

 १३ वर्षांखालील गटात दिविशा सिंग, रुद्र मनोहरला दुहेरी मुकूट

 योनेक्स सनराइज १ली महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर  निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा मुंबई: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित योनेक्स सनराइज पहिली महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत दिविशा सिंग आणि रुद्र मनोहरने १३…

 डोंबिवली-नेरूळसारखी दुर्घटना टळली

 गुरुदेव चौकातील धोकादायक ट्रान्सफॉर्मरची तक्रार; प्रशासन तातडीने हलले पाहणीनंतर महावितरणला त्वरित दुरुस्ती व सुरक्षेचे आदेश कल्याण : डोंबिवलीत करंट लागून महिलेचा मृत्यू आणि नेरूळ येथे उघड्या वीजतारा व पाण्यातील विद्युत प्रवाहामुळे दोन विद्यार्थ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील गुरुदेव हॉटेलजवळील संत रोहिदास महाराज चौकातील धोकादायक ट्रान्सफॉर्मरमुळेही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत तक्रारीची दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तातडीने दुरुस्ती व सुरक्षेचे आदेश दिले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा सहसंघटक रुपेश  भोईर यांनी संबंधित ट्रान्सफॉर्मरच्या धोकादायक स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने पाहणीची मागणी केली होती. त्यानंतर केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, ‘क’ प्रभागाचे क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर ट्रान्सफॉर्मर परिसरातील धोका लक्षात घेऊन महावितरणला लेखी पत्राद्वारे उघड्या वीजतारा इन्सुलेट करणे, ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करणे आणि परिसर सुरक्षित करण्याचे निर्देश देण्यात आले. रुपेश भोईर यांनी सांगितले की, डोंबिवली व नेरूळमधील दुर्घटनांतून धडा घेत पावसाळ्यात शहरातील सर्व उघड्या वीजतारा, ट्रान्सफॉर्मर आणि वीजखांबांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवितहानी टाळता येईल. प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून महावितरणने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात उघड्या वीजतारा, तुटलेले वीजखांब किंवा विद्युत पेट्यांमधून स्पार्किंग दिसल्यास त्याची तात्काळ माहिती महावितरणला द्यावी, जेणेकरून वेळेत आवश्यक उपाययोजना करता येतील.