Category: महाराष्ट्र

Maharashtra News

धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा मिळणार नाही – सुप्रीम कोर्ट

धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा मिळणार नाही – सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली : “हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही”, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च…

भयंकर : भोंदूबाबा खरातने ५ नरबळी दिल्याचा संशय

भयंकर : भोंदूबाबा खरातने ५ नरबळी दिल्याचा संशय खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी   रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार ० हरिभाऊ लाखे नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातच्या रोज नवनवीन भानगडी उघडकीस येत आहेत. सिद्धी प्राप्त करण्यासाठी या…

नाशिक कोर्टाच्या आवारात गोंधळ! तृप्ती देसाई भोंदू बाबाच्या अंगावर धावल्या

हरिभाऊ लाखे नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण पोलिसांनी स्थानिक पातळीवर दाबण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नेत्यांनी आणि पोलिसांनी पीडितांना न्याय मिळेल अशी कृती करणे अपेक्षित असताना प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला,…

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे मार्गदर्शन रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करुन ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची प्रचार प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. १० वी, १२ वी मुलींसाठी कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करुन एमपीएससी, युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लीनाथ कांबळे, परिविक्षा अधिकारी अनिल माळी आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. मुलांप्रमाणे मुलींनाही समान दर्जा प्राप्त करुन देणे, स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण समान करणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, स्त्री भ्रूण हत्या रोखणे, मुलींना संरक्षण पुरविणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे, मुलीच्या जन्माबाबत सकारात्मक विचार निर्माण करणे, शिक्षणासाठी मुलींना अधिकाधिक प्रोत्साहित करणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. पोलीस पाटील, सरपंच, निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांचे पीसीपीएनडीटी, पोक्सो, आरटीई बालविवाह या विषयांवर प्रबोधन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी जिंदल यांनी योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत सांगितले. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ कृती आराखडा २०२५-२६ ला मान्यता देण्यात आली.

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न अनिल ठाणेकर सांगली, स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था संचलित, बाबा नाईक महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांच्या हस्ते झाले. बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. एम. एस. देशमुख यांनी भारताच्या ७९ वर्षांच्या कृषी प्रवासाचा आढावा घेतला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला पाटील होत्या. या सत्राचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद राठोड यांनी केले. प्रथम सत्र: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय ठिगळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. जयवंत इंगळे यांनी भूषवले. या सत्राचे आभार प्रो.डॉ.के.आर.गावडे यांनी मानले.द्वितीय सत्र: पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथील डॉ. कुलविंदर सिंग यांनी १९४७ मधील कृषी स्थिती आणि आजची शाश्वतता यातील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. मनोहर कोरे होते.या परिषदेसाठी तांत्रिक सहाय्य आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रो. डॉ. अनिल काटे आणि प्रा.डॉ. संदीप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस. डी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश कांबळे यांनी मानले. या ऑनलाईन परिषदेत देशातील विविध भागांतून प्राध्यापक आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भोंदू खरातचा हायटेक बनाव!

भोंदू खरातचा हायटेक बनाव! 20 फुटी ‘ड्रोन’ नागाचा चमत्कार दाखवून करायचा वशीकरण हरिभाऊ लाखे नाशिक :भाविकांची फसवणूक करण्यासाठी अशोक खरात वेगवेगळे फंडे वापरायचा. त्यातील त्याचा २० फुटी नागाचा फंडा सध्या जोरदार चर्चिला जात आहे. त्याच्या या अजब प्रकाराला पोलिसांनी दुजोरा दिला असून, यातून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत खरात हा व्हायग्रा गोळ्यामिश्रित पाणी, ज्यास तो ‘ओस्नो जल’ असे संबोधायचा. तसेच रत्न खडे देऊन भाविकांची आर्थिक लूट करीत असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. आता २० फुटी नागाचा हा प्रकार तो भाविकांचे वशीकरण करण्यासाठी करीत होता. हा प्रकार त्याच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान येथे दररोज सायंकाळच्या सुमारास चालयचा. अंधार पडायला लागला की, तो भाविकांना एका ठिकाणी बोलवायचा. त्या ठिकाणी तंत्र-मंत्र करीत, २० फुटांचा नाग स्वतःकडे बोलवायचा. नागदेखील सरपटत त्याच्यासमोर येऊन फणा काढून उभा राहायचा. हा नाग बघून उपस्थित भाविकांची बोलतीच बंद व्हायची. खरात सांगेल, त्या पद्धतीने नाग हालचाली करायचा. त्यानंतर खरातच्या आदेशावरून साप निघून जायचा. हा सर्व प्रकार झाल्यानंतर खरात उपस्थितांना मी नागाला वश केल्याची बतावणी करायचा. खरातचा हा चमत्कार बघून अनेक जण अचंबित व्हायचे. खरातचा हा प्रकार बघून अनेक जण प्रभावित व्हायचे. तो सांगेल त्या पद्धतीने लोक वागायचे. पुढे त्याला बळीही पडायचे. मात्र, प्रत्यक्षात हा संपूर्ण प्रकार वेगळाच होता. हा साप खोटा होता. त्याने कागदाच्या लगद्यापासून हा साप तयार केला होता. त्यात ड्रोन यंत्रणा बसवली होती. त्याचे रिमोट तो स्वतःकडे ठेवायचा. रिमोटच्या साहाय्याने तो त्या खोट्या सापाला त्याच्या इशाऱ्यावर फिरवायचा. ही बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अल्पवयीन पीडितेची आपबिती खरातने अल्पवयीन मुलीवर देखीलदुष्कर्म केले. या मुलीने पुढे येत आपबिती सांगितली आहे. खरातने केबिनमध्ये बोलावून घेतले. मी येताच, त्याने केबिनचा लॅच बंद करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तांब्याच्या भांड्यात पाणी मला पिण्यास दिले. त्या पाण्याची चव खूपच खारट आणि कडवट होती. पाणी प्यायल्यानंतर मला मळमळ व्हायला लागली. मी पाणी पिण्यास नकार दिला. मात्र, खरातने मला म्हटले की, तू जेवढे जास्त पाणी पिणार, तेवढे जास्त तुला फळ मिळणार. नंतर पाणी भरलेला ग्लास त्याने माझ्या डोक्यावर ठेवून उभे राहण्यास सांगितले. तसेच गायत्री मंत्र म्हणण्यास सांगितले. मात्र, ते म्हणत असताना माझे डोके जड व्हायला लागले. तेवढ्यात खरातने त्या रूममधील लाइट बंद केली. त्यावेळी ‘मी कृष्णाचा अवतार आहे, तू माझी राधा आहेस’ असे सारखे कानाजवळ पुटपुटत त्याने जबरदस्ती केली आणि माझ्यावर बलात्कार केला. खरातला गावबंदीचा ठराव खरातच्या दर्शनाला मिरगावात अनेक नेते मंडळी येत होती. अगदी कलेक्टरपासून बडी अधिकारी मंडळी येथे बाबाच्या सेवेला हजर असायची. मिरगावातील अनेक ग्रामस्थांना खरातने दहशतीखाली ठेवले होते. सुरुवातीला ईशान्येश्वर महादेवाच्या मंदिर संस्थानात गावातील मंडळी पूजेसाठी दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला जमायची. नंतर खरातचे कारनामे कळाल्यानंतर या लोकांनी तेथे जाणे बंद केले. गावातील अनेक तरुणांवर खोटे आरोप करून त्यांना अटक करायलादेखील भाग पाडण्यात खरातचा हात होता असे मिरगावचे रहिवासी सांगत आहेत. आता या ईशान्येश्वर मंदिर संस्थानाचे मंडळ बरखास्त करून ते गावाच्या ताब्यात द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहेत. तसेच वर्षानुवर्षे खरातच्या दहशतीखाली दबलेले गावकरी आता निर्भयपणे पुढे येत आहेत. मिरगावात मंदिर बांधल्यानंतर खरातने एका शेतकऱ्याची वहिवाट बंद केली होती. त्यामुळे त्याला राहते घर सोडून गेल्या आठ महिन्यांपासून पत्र्याच्या खोलीत राहावे लागत असल्याचे गावकरी सांगत आहेत. त्यामुळे अशा विकृत वृत्तीच्या व्यक्तीला पुन्हा गावात स्थान द्यायचे नाही, असा निर्धार करीत गावकरी खरातविरोधात गावबंदीचा ठराव आणणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. जाधवकडे ४० महिलांचे मोबाइल नंबर खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधवकडे तब्बल ४० महिलांचे मोबाइल नंबर असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी नीरजचा मोबाइल ताब्यात घेतला असून, तो यातील किती महिलांच्या संपर्कात होता, याचा तपास केला जात आहे. तसेच नीरजकडे मिळालेले हे नंबर खरातला बळी पडलेल्या महिलांचे तर नाहीत ना? यादृष्टीनेदेखील तपास केला जात आहे.

विदर्भाचे ज्येष्ठ नेते  दत्ता मेघे यांचे निधन

  नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघोबाजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. सुमारे चार दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून…

भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांची थर्ड डिग्री

दिवसा तारे आठवले ० शक्ती गेल्याचा आलाप ० चेहरा लपवला नाशिक : भोंदूगिरीच्या जोरावर महाराष्ट्रातील महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या कॅप्टन उर्फ अशोक खरातला पोलिसांनी थर्ड डिग्री दिली. अटकेनंतरही तोऱ्यात चालणाऱ्या अशोक खरातला स्वताच्या पायावरही…

जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध सुविधा

जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध सुविधा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय रत्नागिरी : (अशोक गायकवाड )–जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सुरु असलेल्या सुविधा जलतरण तलाव, व्यायामशाळा, तायक्वांदो हॉल, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल कोर्ट जिल्हा क्रीडा संकुल स्वत: चालवेल, दुसऱ्या कोणत्याही बाह्य यंत्रणेला देणार नाही, असा धोरणात्मक निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी विषय पत्रिकेचे वाचन करुन सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, फ्लोरींग करिता १ कोटी ९८ लाख रुपये ची निविदा स्थानिक स्तरावर प्रसिध्द करावी. त्यानुसार कामकाम करुन घ्यावे. उत्तम प्रशिक्षक ठेवून त्यांना चांगल्या पगारावर नेमणूक करावी आणि जिल्हा क्रीडा संकुलाने सर्व स्वत: चालवावे. व्यावसायिक बाह्य यंत्रणेला चालविण्यास देऊ नये. सेवाशुल्क, अग्नीसेवा शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाची निविदा पुढील आठवड्यामध्ये मार्गी लावण्याची सूचना देऊन पालकमंत्री म्हणाले, महावितरणने सिंगल फेज वरुन थ्री फेज करण्याची मोहीम हाती घ्यावी. एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणे तसेच अनावश्यक उभे असणारे होर्डींग काढावेत. स्थानिकांसाठी त्याबाबत धोरण ठरविले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या ठिकाणीच विशेषतः डाजिटल होर्डींग उभी करण्याबाबत नगरपरिषदेने नियोजन करावे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय, ध्यान केंद्र इमारत, अल्पसंख्यांक वसतिगृह इमारत, एनसीसी इमारत, रत्नागिरी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत बैठक झाली.

मतदारयादी होणार ‘अपडेटेड’ अन् ‘स्मार्ट’!

मतदारयादी होणार ‘अपडेटेड’ अन् ‘स्मार्ट’! मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम् यांचे नाशिकमध्ये कडक निर्देश हरिभाऊ लाखे नाशिक : जिल्ह्यातील मतदारयादी अद्ययावत आणि अचूक अशी तयार करावी. मतदारयादी तयार करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी ठेवू नयेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम् यांच्या अध्यक्षतेखली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), कश्मिरा संखे (कळवण), मालेगाव मनपाचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले की, २००२ च्या यादीतील नावांची स्वयंजुळवणी तसेच कुटुंबातील एका मतदाराच्या नावावरून अन्य सदस्यांच्या नावांच्या जुळवणी कामाला गती द्यावी. मतदारांची अस्पष्ट छायाचित्रे, निरर्थक नोंदी दुरुस्तीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी प्रत्यक्ष भेट देत सुस्पष्ट रंगीत छायाचित्र संकलित करून बीएलओ अॅपमध्ये अपलोड करावीत. तसेच समान नाव आणि छायाचित्र असलेल्या मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत दुरुस्ती करून घ्याव्यात, मतदारांचे अर्ज क्रमांक सहा, सात आणि आठ वर तत्काळ कार्यवाही करावी. कोणतेही अर्ज १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीत प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मतदारांनी संपर्क केल्यावर त्यांना तत्काळ प्रतिसाद द्यावा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. मतदार नोंदणीबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असेही चोक्कलिंगम् यांनी दिले. जिल्ह्यात ५१ लाख ५६ हजार मतदार जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, जिल्ह्यात विधानसभेचे १५ मतदारसंघ असून, एकूण ५१ लाख ५६ हजार मतदार आहेत, या मतदारांपैकी २००२ मध्य विशेष सखोल पुनरीक्षण करून तयार झालेल्या यादीशी विद्यमान मतदारांची नावे जुळवणी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ लाख १६ हजार मतदारांच्या जुळवणीचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असेही त्यानी सांगितले.