Category: ठाणे

Thane news

कल्याणमध्ये रंगांची उधळण उत्साहात

कल्याण : ‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणत धुलीवंदनच्या दिवशी  कल्याणच्या रस्त्यांवर तरुणाई रंगांचा आनंद लुटताना दिसली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण या रंगांच्या उत्सवात नाहून निघाले होते. यंदाही कल्याणकरांनी पाणी…

मिरा-भाईंदरमध्ये पदक विजेत्या कुस्तीगीरांसह मान्यवरांचा गौरव सोहळा

मिरा-भाईंदर : मीरा भाईंदर महानगर पालिका यांच्या सौजन्याने तसेच मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्या वतीने शहरातील मा. महापौर, मा. उपमहापौर, मा. नगरसेवक आणि विविध स्तरावर पदक प्राप्त कुस्तीगीरांचा…

एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातील सोशल मीडिया पोस्ट्सवर आक्षेप

शैलेश पाटील यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिवा :  गेले अनेक दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची सोशल मिडीयावार वारंवार बदनामी केल्या प्रकरणी येथील गणेश पाटील यांच्या विरोधात ठामपाचे प्रभाग क्र.२७ चे नगरसेवक शैलेश पाटील यांनी आज मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात वारंवार बदनामी केल्याप्रकरणी संतापही व्यक्त केला आहे. शैलेश पाटील हे दिवा शहरातील तीन टर्म मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले ठाणे महानगरपालिकचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी आज आपल्या  वरिष्ठ नेत्यांवर सोशल मिडीयावरील वारंवार होणारी बदनामी सहन न झाल्याने मुंब्रा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, गणेश निळकंठ पाटील हे वारंवार फेसबुकच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विविध प्रकारे आरोप करीत कार्यकर्त्यांच्या भावाना दुखावतील असे लिखाण करीत आहेत. एकनाथ शिंदे हे मुक्ता बिल्डरला हाताशी धरुन येथील कांदळवन बुजवण्यास सांगून बिल्डींगचे काम करण्यास सांगत आहेत. खाडी बुजवून मुक्ता बिल्डरला बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देत आहेत. गाववाल्यांच्या जमीनी बळकावित आहेत. कांदळवन आणि खाडी बुजविण्याचे काम करीत आहेत. तसेच हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या शिव हनुमान मंदिरही पाडण्यास एकनाथ शिंदेच सांगत आहेत. तसेच गणेश पाटील यांचे स्वताचे घर पाडण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन नोटीस पाठवित आहेत, असे विविध आरोप आणि आक्षेपार्ह लिखाण गणेश निळकंठ पाटील यांनी सोशल मिडीयावर केल्याचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. नगरसेवक शैलेश पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव येथील हनुमान मंदिर पाडण्याच्या कामात मुद्दाहून आणि वारंवार घेत असून लोकांमध्ये धार्मिक भावना भडकविण्यासाठी गणेश पाटील हे मुद्दामहून प्रयत्न करीत आहे, लोकांमध्ये अफवा पसरवून उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे नाव मुद्दामहून बदनाम करण्यासाठी फेसबुक सारख्या सोशल मिडीयाचा वापर करीत आहेत. येथील मुक्ता बिल्डरच्या प्रविण पाटील यांच्याशी कोणतेही सबंध नसताना वारंवार सोशल मिडीयावर वारंवार बदनामी करुन जनतेच्या भावनाही भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आज आम्ही मुंब्रा पोलीसांत तक्रार दाखल करुन सबंधित गणेश पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे असे शैलेश पाटील म्हणाले.

दिवा शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे आयोजन

दिवा: दिवा शहरात प्रथमच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. दिवा शहरातील लोकप्रिय प्रभास कराटे स्पोर्ट अकॅडमी यांच्या माध्यमातून प्रोफेसर प्रशांत कसबे यांच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनातून ही…

वहाँ दिया जला दू,  जहाँ अंधेरा है या भूमिकेतून स्थापन झालेल्या जविकिरण काव्य मैफल मिरा रोड येथे संपन्न

वहाँ दिया जला दू,  जहाँ अंधेरा है या भूमिकेतून स्थापन झालेल्या जविकिरण काव्य मैफल मिरा रोड येथे संपन्न मिरा – भाईंदर : जविकिरण काव्य मैफल आणि स्वरसंगम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मीरा रोड येथील विरंगुळा केंद्र सभागृहात एका काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार कवी सुनील ओवाळ होते.  ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कवी हृदयेश मयंक, ज्येष्ठ गझलकार भागवत बनसोडे, सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर, कवी प्रा. डॉ. अनिल साबळे, कवयित्री प्रांजली काळबेंडे, गझलकार मुस्तहसन अज्म,  कवी डॉ. मुक्तार खान, कवयित्री प्रा. संध्या वैद्य यांच्यासह ज्यांच्या नावातील जवि या आद्याक्षरांवरून ही संकल्पना सुचली ते मराठीतील ज्येष्ठ आंबेडकरवादी कवी ज.वि.पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मैफल संपन्न झाली. सुप्रसिद्ध निवेदक आणि जविकिरण काव्य मैफलीचे चिटणीस प्रा.उत्तम भगत यांनी सूत्रसंचालन केले. या संमेलनात एकूण ३२ कवींनी आपल्या रचना सादर केल्या. यावेळी प्रा. संध्या वैद्य यांच्या आव्हान व प्रा. भीमराव पेटकर यांच्या आयुष्याच्या वळणावर या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सिने-नाट्य सृष्टीतील हरहुन्नरी कलाकार  अशोक चाफे यांनी केलेल्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वरमाउली फाउंडेशन व जविकिरण काव्य मैफल पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला मिरा भाईंदर परिसरातील श्रोत्यांची उपस्थिती लाभली.

जंगल गप्प… आवाज माणसांचा!

येऊर : ठाणे परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या जैवविविधतेने समृद्ध उद्यान परिसरात वाढती वाहन रहदारी, पर्यटकांची गर्दी आणि विविध कार्यक्रमांमधून होणाऱ्या कर्कश ध्वनीप्रदूषणामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त…

 ठाणे जिल्हा माध्यवर्ती बॅकेंची निवडणूक कधी?

ठाणे जिल्हा माध्यवर्ती बॅकेंची निवडणूक कधी? निवडणूक कार्यक्रमाला उशीर का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल कल्याण: ठाणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत येत्या ३१ मार्च ला संपत आहे. अवघे तीस दिवस उरले असताना या बँकेचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गात संताप वेक्त केला जात आहे. ठाणे जिल्हा माध्यवर्ती बँक ठाणे पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून गणली जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून हीं बँक राज्यात  नावारूपास आलेली बँक आहे. या बँकेत शेतकऱ्यामधून तसेच गृह निर्माण संस्था, पत संस्था, मच्छिमार सहकारी संस्था, शेतकरी सेवा सोसायटी, मंजूर सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडून दिले जातात. २१ संचालक या बँकेच्या संचालक मांडळावर निवडले जातात. या संचालकांचा कार्यकाळ ३० मार्च २०२६ रोजी संपत आहे. कार्यकाळ संपण्यासाठी अवघे ३५ दिवस शिल्लक असताना निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झालेला आहे. सहकार विभागाने निवडणुकी बाबत नवीन नियमावली केलेली आहे. या  नियमाचा फटका बसणार असल्याने विद्यमान संचालक मंडळातील  १५ संचालकांना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध होणार असल्याने अनेक वर्ष या बँकेत संचालक पदावर असणाऱ्या विद्यमान संचालकांना धक्का मानला जात आहे.

मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश देत होळी साजरी

मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश देत होळी साजरी कल्याण:  सम्राट अशोकची लेकरं गाऱ्हाने घालताव रे महाराजा. जो काय आमच्या लेकरानो मोबाईलचो  नाद लागलो हा तो नाद काढून घे  महाराजा. अशा मालवणी भाषेत विद्यार्थ्यांनी पारंपारिक गाऱ्हाने घालत कल्याणच्या सम्राट अशोक शाळेत होळी साजरी करण्यात आली. मोबाईलचा अतिरेक वापरामुळे विद्यार्थी अभ्यासात दुरावत चालली त्याचा परिणाम गुणवत्तेवर होतोय म्हणून मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश दिला. तसेच होळी खेळतांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका. नैसर्गिक रंगांचा वापर करा. पर्यावरण रक्षण करा. अशी जनजागृती ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील विजया तांबे तसेच शिक्षक शिक्षकेतरांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सोलापूरात

४२ जिल्ह्यांतील ४००हून अधिक खेळाडूंचा सहभाग पुणे: सोलापूर येथे २८ व २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे संयोजन निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर यांच्याकडे सोपविण्यात आले असून ४२ जिल्ह्यांतील ४००हून अधिक महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तीन वेळा किताब पटकावलेल्या भाग्यश्री फंड हिच्याकडे चौथ्या विजेतेपदासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे. निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, संस्थेच्या संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघचे अध्यक्ष रामदास तडस व सरचिटणीस योगेश दोडके यांनी माहिती दिली. स्पर्धा सोलापूरमधील हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेसाठी ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके देण्यात येणार असून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे. भाग्यश्रीसमोर अमृता पुजारी, प्रगती गायकवाड, अंकिता फटाले व वेदांतिका पवार यांचे आव्हान असणार आहे. भाग्यश्रीने स्पेनमध्ये झालेल्या २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असून थायलंड येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. गतवर्षीच्या अंतिम लढतीत तिने अमृतावर मात करत किताब पटकावला होता. स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी वडील सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ २०२३ मध्ये निर्झरा केअर फाऊंडेशनची स्थापना केली. सोलापूर जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंना दर्जेदार सुविधा व व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आश्वासन देत आयोजकांना पाठिंबा दर्शविला.

 भूमी अभिलेख सुधारणा वेगात

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान’ आढावा अशोक गायकवाड मुंबई : राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे जलद व प्रभावी निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिक परिणामकारकपणे शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे, शेलेश नवाल यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महसूल सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पारदर्शक आणि जलद गतीने पोहोचवणे ही शासनाची प्राथमिकता आहे. फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमी लेयर अशी विविध प्रकारची प्रमाणपत्रे, अकृषक परवानगी, गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा या शिबिरांद्वारे तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. कोणताही नागरिक प्रलंबित प्रश्नामुळे त्रस्त राहू नये यासाठी कालमर्यादेत प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात यावा. पुढील दोन वर्षांत विभागातील प्रलंबित कामे, कार्यालयांचे आधुनिकीकरण, ऑनलाईन सुविधा आणि जमाबंदी यंत्रणा अधिक सक्षक करण्याचे नियोजन करून प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची गरज भासू नये, हीच या अभियानाची खरी फलश्रुती ठरावी. भूमी अभिलेख नोंदींचे अद्ययावतीकरण, डिजिटायझेशन, ऑनलाईन सेवा सुलभ करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे यावर विशेष भर देण्यात यावा. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेत न्याय मिळावा, अशी भूमिका मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केली. ‘महाराजस्व समाधान शिबीर’ या अभियानाचा पहिला टप्पा मार्च ते मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून राज्यात ७ आणि १४ मार्च, १० आणि १७ एप्रिल तसेच ८ आणि १५ मे या कालावधीत विविध स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे. या शिबिरांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी याकरिता व्यापक प्रसिद्धी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. दैनंदिन कामकाजाचा अधिक गतीमान होण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. यानुसार महसूल यंत्रणेने काम केल्यास राज्यातील महसूल सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून महाराष्ट्र देशात आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. ००००००