Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

सहकारातून गृहनिर्माणाला नवी दिशा – फडणवीस

सहकारातून गृहनिर्माणाला नवी दिशा – फडणवीस मुंबई, दि. — महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण क्षेत्राला नवे बळ देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळे आज मुंबईत उत्साहात पार पडले. कन्नमवार नगर, विक्रोळी येथे मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण…

राज्यात सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमित होणार

राज्यात सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमित होणार  १ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी बांधकामे नियमित होणार मुंबई – राज्यातील सरकारी जागेवरील २०११ पर्यंतची अनधिकृत निवासी बांधकामे नियमित करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.…

ठाण्यात बाटली-कॅनमधून पेट्रोल-डिझेल विक्रीला बंदी

ठाण्यात बाटली-कॅनमधून पेट्रोल-डिझेल विक्रीला बंदी ठाणे : पेट्रोल आणि डिझेलचा तुटवड्याच्या पार्श्वभुमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि ज्वलनशील पदार्थांच्या गैरवापरामुळे कोणतीही अनुचित घटना घडू…

वीज दरवाढ टळली

वीज दरवाढ टळली मुंबई : महावितरणच्या पुढील पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक…

रहिवासी जागेत शेड, गोदाम उभारू देणार नाही- नरेंद्र मेहता

रहिवासी जागेत शेड, गोदाम उभारू देणार नाही- नरेंद्र मेहता मिरा – भाईंदर : मिरारोड (पुर्व) परिसरातील प्लेझंट पार्क या भागात मंगळवारी सांयकाळी ८.३० च्या सुमारास मंडप डेकोरेटर्सचे साहित्य असलेल्या मोकळ्या भुखंडावर मंडप शेडला भीषण आग लागल्याची घटना घडली, मिरा भाईंदर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र आजुबाजुला असलेल्या इमारतीमध्ये राहणा-या रहिवाश्यांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले ही घटना अतिशय दुर्देवी असल्याचे मत आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी यामध्ये झाली नसली तरी यामध्ये नागरिकांच्या घरातील साहित्यांचे व सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करुन संबधित नागरिकांच्या झालेल्या वित्तहानी बाबत योग्य उपाययोजना करुन निर्णय घ्यावा अशा सुचना आमदार नरेंद्र मेहता यांनी केल्या. घटनास्थळी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सोबत प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले, अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र चव्हाण, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, महिला व बालकल्याण सभापती श्रीम.अनिता पाटील,नगरसेवक मोहन म्हात्रे, मनस्वी पाटील, सुरेखा सोनार,मनीष पराशर उपस्थित होते.मोकळ्या जागेत उभारलेली गॅरेज, गोडाऊन, फर्निचर दुकाने, झोपड्या इ. तात्काळ हटवणे व ज्वलनशील साहित्य साठवणाऱ्या अनधिकृत ठिकाणांवर कडक कारवाईचे करण्याचे निर्देश दिले आहे. मिरा भाईंदर शहरात यानंतर नागरी वस्तीत एकही गोदाम, शेड उभारू दिले जाणार नाही असे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.

पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती

पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती उल्हासनगर: ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यांक विभाग) तर्फे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली व इमरान प्रतापगढी यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी सह-समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही नियुक्ती त्यांच्या संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि संविधाननिष्ठ कार्यपद्धतीवरील विश्वासाचे प्रतीक आहे. काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्रातील एक बौद्धिक व जनआधारित नेतृत्व म्हणून त्यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. डॉ. इंगळे यांनी यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. डॉ. प्रशांत इंगळे यांचे बालपण कन्नमवार नगर येथे गेले असून त्यांचे शालेय शिक्षण उल्हासनगर येथे झाले. डॉ. प्रशांत इंगळे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय मिळवून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. सन २००८ मध्ये UDCT (आताचे ICT, मुंबई) येथे SC/ST/OBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी आंदोलन तसेच शिक्षकांच्या रोस्टरनुसार बढतीसाठी त्यांनी प्रभावी लढा उभारला होता .सन २००५ पासून कल्याण विद्यापीठ उपकेंद्र स्थापनेसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले, ज्यामुळे कल्याण–कर्जत भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.ते बहुजन समाज पक्षाचे (BSP) माजी राज्य महासचिव असून त्यांनी आमदार (MLA) व खासदार (MP) निवडणुका देखील लढवल्या आहेत. महाराष्ट्रात व शिक्षण क्षेत्रात त्यांचा मजबूत जनाधार आहे.ते भारतीय राज्यघटनेवर दृढ विश्वास ठेवणारे नेतृत्व आहे.डॉ. प्रशांत रमेश इंगळे हे दलित पँथर चळवळीच्या समृद्ध वारशात, त्यांचे वडील स्व. पँथर रमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले नेतृत्व आहे. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांच्या वडिलांनी सन १९७२ मध्ये माजगाव डॉक येथील व्यवस्थापक पदाचा त्याग केला होता.लहानपणापासूनच त्यांनी दलित पँथर चळवळ, लाँग मार्च आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन प्रत्यक्ष अनुभवले आहे.तसेच त्यांना त्यांचे काका एस.एल. इंगळे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले असून, डीसीपी वसंत इंगळे यांनी घाटकोपर येथील रामाबाई आंबेडकर नगर येथील गोळीबार प्रकरणानंतर अन्यायाविरुद्ध भूमिका घेत ३०० PSI सह दिलेला राजीनामा हा त्यांच्या विचारांवर प्रभाव टाकणारा ठरला आहे. पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 धारावीत लवकरच सुरु होणार आंदोलनाचा धडाका

धारावीत लवकरच सुरु होणार आंदोलनाचा धडाका धारावी बचाव आंदोलनची माहिती मुंबई,दि.२७ — धारावीतील झोपडपट्टीवासियांना  प्रत्येकी ५०० चौ.फू. चे घर देण्याबाबत राज्य सरकार करीत असलेली टाळाटाळ, धारावीतील सर्व झोपडपट्टीवासियांना धारावीतच घरे देण्याचे आश्वासन राज्य सरकार अजुनही देत नाही, धारावीतील झोपड्या एसआरए अदानी कंपनी मोठ्या प्रमाणात अपात्र करीत आहे, या प्रमुख मुद्द्यांकडे राज्य शासन,एसआरए व अदानी कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी ‘धारावी बचाव आंदोलन’ या संघटने तर्फे येत्या ५ एप्रिल नंतर व्यापक आंदोलन धारावीत सुरु करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी धारावी बचाव आंदोलनचे नेते, पदाधिकारी व  कार्यकर्त्यांची एक महत्वाची  बैठक बुधवारी सायंकाळी धारावीत झाली. या बैठकीत अदानी कंपनी आणि राज्य सरकार विरोधात काढण्यात येणारे मोर्चे, करण्यात येणारी निदर्शने ,रास्ता रोको, जनसभा आयोजित करण्याबाबतचे वेळापत्रक निश्चितीबाबत चर्चा झाली.या  बैठकीस  २०० कार्यकर्ते उपस्थित होते. आता  आगामी  धडक, व्यापक आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी आणखी  एक बैठक ५ एप्रिल रोजी धारावीत होणार आहे.या बैठकीनंतर आंदोलनाचा धडाका सुरु होणार आहे. हुसकावून लावण्यासाठी अपात्र करण्याचा धडाका धारावी झोपडपट्टीवासियांना ५०० चौ.फू.ची घरे देण्याची आमची मागणी ही पहिल्यापासूनच आहे.तसेच कोणालाही अपात्र न करता सर्व सव्वा लाख  झोपडपट्टीवासियांचे धारावीतच पुनर्वसन करावे हीही मागणी सुरवाती पासूनची आहे.तसेच झोपडपट्टीवासियांच्या सर्व्हेक्षणाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत.यात १०० झोपड्यांमागे  १५/२०  झोपड्या पात्र बाकीच्या ८०\८५ झोपड्या अपात्र… हे असे येथील झोपडपट्टीवासियांच्या  संतापाचे कारण आहे. येथील झोपडपट्टीवासियांना हुसकावून लावण्यासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात अपात्र केले जात आहे असा आरोप धारावी बचाव आंदोलनचे नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी केला आहे.सरकार हे झोपडपट्टीवासियांच्या मदतीसाठी आहे की अदानीच्या मदतीसाठी आहे असा प्रश्न सध्या येथील लोकांना पडलेला आहे.लोकांच्या मनातील या असंतोषाला मोकळी वाट करुन देण्यासाठी धारावीत ५ एप्रिल नंतर धरणे, मोर्चे,निदर्शने करण्यात येणार आहेत असेही बाबुराव माने यांनी सांगितले. दरम्यान हे आगामी आंदोलन यशस्वी करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन चे कार्यकर्ते पदाधिकारी हे  कामाला लागलेले आहेत. हे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी  नगरसेवक जोसेफ कोळी,टी.एम.जगदीश,दीपक काळे व नगरसेविका अर्चना शिंदे यांची भेट घेतली तेंव्हा या स्थानिक नगरसेवकांनीही या आगामी आंदोलनास पाठिंबा दिला असून ते ही या आंदोलनात उतरणार असून तसे त्यांनी आश्वासन धारावी बचाव आंदोलनला दिलेले आहे.याच बरोबर या आंदोलनात खासदार अनिल देसाई,खासदार वर्षा गायकवाड,आमदार महेश सावंत, आमदार ज्योती गायकवाड हेही आपला सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे धारावी बचाव आंदोलन ने म्हटले आहे. धारावी बचाव आंदोलनचे हे आगामी व्यापक आंदोलन अधिक यशस्वी करण्याच्या सूचना आमदार महेश सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत.त्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे.खासदार, आमदार, नगरसेवक या आंदोलनात उतरणार असल्याने धारावी बचाव आंदोलनचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्साह हा दुणावलेला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन धारावीतील झोपडपट्टीवासियांना धारावीतच प्रत्येकी ५०० चौ.फू.चे घर द्या, लोकांना अपात्र करण्याचा खेळ थांबवा,धारावीत छोट्या उद्योगांसाठी स्वतंत्र उद्योग क्षेत्र तयार करा, कुंभार बांधव, कोळी बांधव, गणेश मूर्तिकार यासारख्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाया प्रमाणे जागा देण्यात याव्यात आदी मागण्या धारावी बचाव आंदोलन च्या आहेत.या मागण्यांची पूर्तता लेखी स्वरुपात जो पर्यत अदानी कंपनी – राज्य सरकार करीत नाही तो पर्यंत आमचे हे आंदोलन चालू राहील असा इशारा बाबुराव माने यांनी दिला आहे.

कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये – रणजित यादव

कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये – रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे : गुरुवारी, २६ मार्चला मुरबाड तालुक्याचा दौरा करून विविध ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे तसेच सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाच्या सर्वसमावेशक व लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक सजग व तत्पर राहावे, तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी यावेळी दिले. दौऱ्याची सुरुवात मासले ग्रामपंचायतीपासून करण्यात आली. येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. ‘एक कुटुंब एक संचिका’ उपक्रम तसेच ‘पोषण परसबाग’ यांची पाहणी करून त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले. महिला बचत गटांशी संवाद साधताना स्थानिक स्तरावर होत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. न्हावे येथे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होईल यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शेलशेत येथील अंगणवाडी तसेच किशोर व सरळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देण्यात आली. औषध साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, माता-बालकांचे आरोग्य व पोषण या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. यामध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर करण्याच्या सूचना देत सेवा अधिक गुणवत्तापूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सिंचन सुविधांचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. शिरवली (जानपाटलाचापाडा) येथील लाभार्थी नारायण घागस तसेच शिवळे येथील अशोक इसामे यांच्या सिंचन विहिरींची पाहणी करून आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. टेम्भरे येथील ‘दुर्गा स्वयंसहाय्यता समूहा’कडून चालविण्यात येणाऱ्या खाकरा उत्पादन उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. या समूहाला यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ‘जनमन’ योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.संपूर्ण दौऱ्यात विकासकामांचा वेग, योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. स्थानिक पातळीवर लोकसहभाग वाढवून शाश्वत विकास साधण्यावर त्यांनी विशेष भर दिला.यावेळी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, उप अभियंता बांधकाम जडे, उपअभियंता पाणीपुरवठा जगदीश बनकरी, गटशिक्षणाधिकारी मधुकर गोरड, सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सीआरपी,  स्वयंसहाय्यता समूहाचे सदस्य तसेच पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का? – शानू पठाण

६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का? – शानू पठाण अनिल ठाणेकर ठाणे- ठामपा आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाला एका एजन्सीने थ्री स्टार दिले आहेत. या स्टार्सची विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी खिल्ली उडविली. शर्टवर स्टार चिकटवून तसेच बॅगला स्टार लटकवून सर्वसाधारण सभेत प्रवेश केला. ठाणे महानगर पालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त सौरव राव यांनी सादर केले असून या अंदाजपत्रकावर सध्या सभागृहात चर्चा झाली. या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाचे कौतूक करून एका एजन्सीने थ्री स्टार मानांकन दिले आहे. या मानांकनाची शानू पठाण यांनी खिल्ली उडविली. छातीवर तीन तारे आणि बॅगला तीन तारे लावून शानू पठाण हे सभागृहात प्रवेशकर्ते झाले. याप्रसंगी पत्रकारांशी  बोलताना शानू पठाण यांनी, घनकचरा विभागाचे कौतूक व्हावे, हा एक विनोदच आहे. कारण, ठाणे शहरात कदाचित कचरा दिसत नसेल पण मुंब्रा, कौसा आणि दिवा भागात कचरा वहनाची व्यवस्थाच नसल्याने कचऱ्याचे ढिग लागलेले दिसत असतात. हे स्टार देताना एजन्सीने कोणत्या दुर्बिणीतून पाहिले असेल ती दुर्बिण आम्हालाही द्या, अशी टीका केली. दरम्यान, ६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का, असा सवालही उपस्थित केला.

संमती, न्याय आणि समतोल तपासाची गरज

संमती, न्याय आणि समतोल तपासाची गरज राष्ट्रीय पुरुष आयोगाची भूमिका स्पष्ट रमेश औताडे मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरुष आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून त्यात कुठलीही तडजोड होऊ शकत नाही; मात्र कोणत्याही व्यक्तीवर आरोप करताना पुरावे आणि तपास यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. संमती आणि जबरदस्ती यामध्ये स्पष्ट फरक आहे. न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निकालांमध्येही परस्पर संमतीने घडलेल्या संबंधांना वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये सर्व बाजू ऐकून, पुराव्यांच्या आधारेच निष्कर्ष काढावेत, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने हेही स्पष्ट केले की, महिलांवर होणारे अत्याचार ही गंभीर बाब आहे आणि अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायलाच हवी. त्याचबरोबर, कोणत्याही व्यक्तीवर खोटे आरोप होणार नाहीत याची काळजी घेणेही न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे. समाजात दोन्ही बाजूंचा विश्वास टिकून राहण्यासाठी समतोल दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात संबंधित व्यक्तींना न्याय मिळावा आणि सत्य समोर यावे असे आयोगाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी सांगितले.