Month: August 2026

कल्याण डोंबिवली नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात

शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्यांची चलती  मनपा प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव नसणारयांची खोगीर भरती    कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाचा नगररचना विभाग या ना त्या कारणाने वादाच्या भोवर्यात सापडत असल्याचा प्रत्यय पुनश्च आला आहे. तीन वर्ष सहाय्यक नगररचनाकार पदावर काम केलेल्या प्रतिनियुक्तीवर आलेला अधिकारी पुनश्च या महापालिकेत नगररचनाकार पदावर नेमणूक करण्यात आल्याने त्यांची सहाय्यक नगररचनाकार म्हणून ढिसाळ कामगिरी पाहता, नगररचनाकार पदावर नेमणूक कशी कोणाच्या अशिवार्दाने झाली. या मागचा सूत्रधार कोण, अशा आरोपाच्या चर्चा महापालिका वुर्तळात रंगल्या असल्याने नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पालिका वुर्तळात संचालक नगरचना संतोष डोईफोडे, सहाय्यक नगररचनाकार स्वप्नील दळवी यांची भ्रष्टाचाराची रात्रीस खेळ चाले ही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.  यांची खमंग चर्चा पालिका वुर्तळात धुमाकूळ घालत असताना स्वप्नील दळवी हे मागील तीन वर्ष सहाय्यक नगररचनाकार म्हणून केडीएमसीत कार्यरत होते. मागील तीन वर्षातील त्यांची सुमार कामगिरी पाहता, मनपाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी कोणतेही भरीव कामगिरी केली नाही, तरी देखील त्यांची बदली पुन्हा मनपात करण्यात आली आहे. यामध्ये  त्यांची मागणी मनपाने केलेली नसताना पुन्हा त्यांची वर्णी नगररचनाकार म्हणून नेमणूक होते.  यामागे संचालक नगररचना डोईफोडे यांचा अदृश्य हात आहे का असा गंभीर आरोप जाणकारांकडून होत आहे.  महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मनपा आयुक्त, सर्व साधरण सभेला असताना, मनपाच्या प्रशासकीय सेवेमध्ये दळवीसाठी  अशी मागणी संचालक नगररचना यांचेकडे कोणी केली   याबाबत संपूर्ण चौकशीपुर्ण होईपर्यंत दळवी यांना महापालिका सेवेमध्ये हजर करून घेण्यात येऊ नये अशी मागणी होत आहे. डोईफोडे यांनी जर दळवी यांच्यासाठी मागणी केली असेल तर डोईफोडे यांना परत शासनाकडे पाठविण्यात यावे,अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे. केडीएमसी  नगररचना विभाग संचालक नगररचना संतोष डोईफोडे अकार्यक्षम असल्याच्या चर्चा होत आहेत. डोईफोडे यांचे सुरू असलेल्या कार्यकाळात मनपाचे नगररचना विभागाचे अर्थिक उद्दिष्ट २०० कोटींनी घसरले. वास्तु शिल्पकार व विकासक यांचे प्रस्ताव विहित कालावधीत मंजूर न झालेबाबत तक्रारी, बाह्यवळण रस्ता अथवा आरक्षणाच्या,भुसंपादनात दुर्लक्ष केल्यामुळे शहाराचा विकास भकास, मनपाच्या पैशाची उधळपट्टी सुमारे २५ कोटीची कामे ठाण्याच्या एकाच संस्थेस दिली. त्यांच्या कार्यकाळात नगररचना विभागात सर्वात जास्त प्रतिनियुक्तीवरील अधिकारी भरणा, सहाय्यक संचालक नगररचना यांच्यासह सर्वच अधिकारी यांना नवीन मनपा प्रशासनाचा अनुभव नाही. क्लस्टर योजना कागदावरच असून याची  अमंलबजावणी मात्र शून्य ठाण्यातील संस्थेस कंत्राट दिले संस्थेचे काम मात्र शुन्य. मनुष्यबळ नाही, तरी देखील कोट्यवधीची बीले, यातच भर म्हणून कलस्टर योजना अमंलबजावणीसाठी नगररचनाकार कृष्णा शिंदे या प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकारी यांची वर्णी लावली. संचालक पुणे नगररचना यांचेकडून महापालिका प्रशासानाचे सहाय्यक नगररचनाकार दळवी यांना नगर रचनाकार पद्दोतीने नेमणूक दिली असून डोईफोडे व दळवी यांचे भ्रष्टाचार व्हिडीओक्लिप काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाली होती. या सर्व चर्चा पाहता केडीएमसीचा नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला असून यासर्व वादग्रस्त कर्मचाऱ्यांबाबत स्थायी समिती अथवा महासभेने दखल घ्यावी अशी मागणी यानिमित्ताने जाणकारांकडून होत  असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत संचालक नगररचना संतोष डोईफोडे यांच्याशी दळवी यांच्या नगररचनाकार नियुक्ती  संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, हा सामान्य प्रशासनाशी निगडित विषय असून माझा संबंध असण्याचा प्रश्नच नाही. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता दळवी यांची नेमणूक सामान्य प्रशासन विभागाने केली नसल्याचे सांगितले.”

 वाहतूक कोंडीचा नाट्यप्रयोगाला फटका

तर बंद उपहारगृहामुळे नाट्यरसिकांची गैरसोय कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाजवळ असलेल्या आचार्य अत्रे नाट्यगृहात रविवारी झालेल्या ‘ऑल द बेस्ट’ या हाऊसफुल नाट्यप्रयोगाला शहरातील वाहतूक कोंडीचा फटका बसला. सायंकाळी ४ वाजता सुरू होणारा प्रयोग कलाकार वाहतूक कोंडीत अडकल्याने सुमारे अर्धा तास उशिराने सुरू झाला. रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कलाकार वेळेत नाट्यगृहात पोहोचू शकले नाहीत. आयोजकांनी प्रेक्षकांना विलंबाची माहिती दिल्यानंतर रसिकांनी संयम राखत प्रतीक्षा केली. या प्रयोगाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. मात्र, नाट्यगृह परिसरात उपहारगृह व अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रेक्षकांची गैरसोय झाली. यामुळे वाहतूक नियोजनासह सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर हे कल्याण-डोंबिवलीसह बदलापूर, अंबरनाथ आणि परिसरातील नाट्यरसिकांसाठी प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या रंगमंदिरातील उपहारगृह गेल्या काही आठवड्यांपासून बंद आहे. यामुळे प्रेक्षकांची मोठी गैरसोय होत असून मध्यंतरात बाहेर जाऊन पाणी, खाद्यपदार्थ आणावे लागत आहे. विशेष म्हणजे, उपहारगृह चालविणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर नवीन ठेका अद्याप कोणालाही देण्यात आला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ००००००

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीचे आमरण उपोषण मागे

 नगरसेवक शैलेश पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता आरती परब दिवा : दिवा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा तसेच त्यासंदर्भातील ठराव ठाणे महापालिकेच्या महासभेत तातडीने मांडून मंजूर करावा, या मागणीसाठी समाजसेविका सुवर्णा कांबळे आणि समाजसेवक सौरव अढांगळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची अखेर दुसऱ्या दिवशी सांगता झाली. शिवसेना उपशहर प्रमुख तथा नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा विषय ठाणे महापालिकेच्या महासभेत मांडण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल तसेच पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे लेखी आश्वासन शैलेश पाटील यांनी दिले. लेखी आश्वासनानंतर नगरसेवक शैलेश पाटील यांनी सुवर्णा कांबळे आणि सौरव अडागळे यांना नारळपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. त्यामुळे पुतळा उभारणीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे दिवा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी आंबेडकरी चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ नेते एकनाथ भगत (बाबा) यांच्या सामाजिक आणि चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने दिव्यातील एका रस्त्याचे नामकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी तेव्हा ग्वाही देण्यात आली. या प्रसंगी अजित भगत, भालचंद्र भगत, विश्वास भालेराव, बालाजी कदम, गंगाधर गायकवाड, रवी कदम, सुनील कांबळे, भरत मोहिते, प्रवीण उतेकर, सरला गायकर, शिला बहिरूने यांच्यासह शिवसैनिक, आंबेडकरी चळवळीचे अनुयायी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषण मागे घेतल्यानंतर समाजसेवक सौरव अडागळे आणि सुवर्णा कांबळे यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, आंबेडकरी संघटना, महिला मंडळे, शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि दिवा शहरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

 ९ ऑगस्ट क्रांतीदिनी गिरणी कामगारांची मूक मिरवणूक!

 राष्ट्रीय मिल मजदूर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने राजेंद्र साळसकर मुंबई -येत्या ९ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने,गिरणी कामगारांची सालाबाद प्रमाणे,…

महावितरणाने गृह संकुलात दाखवले स्मार्ट मीटर प्रात्यक्षिक

कल्याण: स्मार्ट मीटर संदर्भात असलेले गैरसमज दूर करून त्याचे महत्त्व वीज ग्राहकांना पटवून देण्यासाठी महावितरण कडून गृहसंकुलात थेट वीज ग्राहकांच्या दारात त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली आहे. महावितरणच्या कल्याण पूर्व…

 शेतकरी कर्जमुक्ती- ठाणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्याला वेग

 जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन अशोक गायकवाड ठाणे : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कमाल रु.२.०० लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना या योजनेचा तात्काळ लाभ मिळावा यासाठी आधार प्रमाणीकरणाची (आधार ई-केवायसी ) प्रक्रिया सध्या गतिमान करण्यात आली आहे. ३१ जुलैला अखेर प्राप्त झालेल्या यादीतील जिल्ह्यातील एकूण १० हजार ९६२ पात्र खातेदार शेतकऱ्यापैकी ८ हजार ४४४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. तर उर्वरित २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १६ हजार ८३६ आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत १ हजार २३२ अशा एकूण १८ हजार ६८ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० हजार ५२५ आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या ४३७ अशा एकूण १० हजार ९६२ पात्र खातेदार शेतकऱ्यांची पहिली यादी प्राप्त झाली आहे. ३१ जुलै २०२६ अखेर प्राप्त झालेल्या यादीतील ८ हजार ४४४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. तर उर्वरित २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा अग्रणी व्यवस्थापकांना (एलएमडी) तात्काळ सर्व खात्यांचे (उर्वरित २ हजार ५१८) आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देशही डॉ. पांचाळ यांनी दिले आहेत. आधार प्रमाणीकरणाचे काम सर्व ‘आपले सरकार’ व ‘महा-ई-सेवा’ केंद्रांवर सुरू असून या कामासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी १५ ऑगस्टनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करताच थकीत कर्जाची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पुन्हा नवीन पीककर्ज मिळणे शक्य होणार आहे. पात्र सभासदांच्या याद्या संबंधित बँक शाखा, सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार’ किंवा ‘महा-ई-सेवा’ केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करून घ्यावे; यासाठी कोणतेही शुल्क द्यायचे नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच प्रमाणीकरणात अडचण आल्यास संबंधित सेवा सहकारी सोसायटीचे गटसचिव किंवा बँक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा उपनिबंधक डॉ.मांडे यांनी केले आहे.

दिशा वेल्फेअर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य शिबीर

मुंबई – विक्रोळी कन्नमवार नगर जनता मार्केट येथील गेटवेल सर्जिकल येथे दिशा वेल्फेअर ग्रुप, सामाजिक संस्था मुंबई(रजि.)आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर रविवार २ ऑगस्टला सकाळी १०…

‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार – २०२६’ ने प्रा. वसंतराव पाटील यांचा गौरव

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदरचे संस्थापक-मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व समाजसेवक प्रा. वसंतराव यशवंत पाटील यांना “दैनिक लोक युवा वृत्तपत्राच्या” वतीने लोकमान्य बाळगंगाधर…

वाढवण बंदर खाण प्रकल्पाच्या जन सुनावणीमध्ये आंदोलकांचा गोंधळ

 दगड उत्खननासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केली होती जन सुनावणी पालघर :  खोल समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात भराव करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक गौण खनिजांचे उत्खनन करण्यात येणार आहे. पालघर तालुक्यातील गारगाव आणि खाणीवडे या नजीकच्या दगड खाणींमधून दगडाचे उत्खनन करण्यात येणार आहे. सदर बाबीच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने जाहीर सुनावणीचे आयोजन रविवार दिनांक २ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या तज्ञ मंडळींच्या अहवालावरून आणि जन सुनावणी पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी जन सुनावणीत गोंधळ घातला. गारगाव आणि खाणीवडे या नजीकच्या दगड उत्खननामुळे पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम आणि या प्रक्रियेमुळे स्थानिकांच्या जीवनमानावर होणारा बदल याबाबत मंडळाकडून एक अहवाल सादर करण्यात आला. सदर अहवाल अध्ययनासाठी दिलेला कालावधी अपुरा असल्याचे प्रथमतः आंदोलकांकडून सांगण्यात आले. सदर अहवाल मराठी मध्ये आणि त्याचा मतितार्थ संक्षिप्त रूपात सादर करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी त्याला देखील नकार दिला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने रविवारी शिगाव- खुताड येथे जाहीर जन सुनावणी आयोजित केली होती. या जनसुनावणीत आंदोलकांनी तज्ञ मंडळींच्या अहवाला सोबतच अतिवृष्टी आणि शेतीची कामे सुरू असताना जन सुनावणी का घेतली? असा सवाल उपस्थित केला. दगडखणींमधून होणाऱ्या उत्खननाचा संभाव्य जीवनमानावरील आणि पर्यावरणावरील परिणाम याबाबत तयार केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आजूबाजूच्या पाच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना या  सुनावणीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. अतिवृष्टी आणि शेतीची कामे यांची कारणे देत जन सुनावणी रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. गारगाव गट क्रमांक ८२ (क्षेत्र.२४.९४ हे.) साठी आयोजित सुनावणीमध्ये ९० नागरिक, गट क्रमांक ८२ (क्षेत्र.१७.०८ हे.) साठी ७२ आणि खानिवडे गट क्रमांक ९ (क्षेत्र.१५.३९ हे.) ६० ते ७० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पर्यायांना आंदोलकांनी धुडकारले. जन सुनावणीच्या सभा मंडपा बाहेर येऊन त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. पोलीस प्रशासनाने त्यांची समजूत काढल्यानंतर देखील आंदोलन सुरूच राहिले. अखेरीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जन सुनावणीचा कारभार सुरू करण्यात आला. यादरम्यान कुठलीही पोलिसी कारवाई होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली. जन सुनावणीचा कारभार सुरू असलेला पाहता घोषणाबाजीचे रूपांतर गोंधळबाजी मध्ये झाले. तुमच्या हरकती व सूचना लिखित अथवा कथित स्वरूपामध्ये प्रशासनाकडे नोंदवा अशी पोलिसांच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली. एकंदरीतच जन सुनावणी उधळून लावण्याचा आंदोलकांचा मानस होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकंदरीत झालेल्या घडामोडींची नोंद घेऊन जन सुनावणी पूर्ण केली.पोलिस प्रशासनाने देखील सर्व आंदोलकांच्या मागण्यांची नोंद केली. प्रशासनाच्या वतीने जन सुनावणी मध्ये ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. चौकट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला तज्ञ मंडळींचा अहवाल इंग्रजीमध्ये असून तो फार मोठा आणि क्लिष्ट असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. त्यावर मंडळाच्या वतीने तो मराठीमध्ये व संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सादर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले ते देखील ग्रामस्थांनी झिडकारले.सुनावणी मध्ये अपेक्षित समस्या निराकरण करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड व मोफत बस पास शिबिर उत्साहात संपन्न

औचित्य माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार  संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास काढून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक  सुनिल कुरकुटे,  नगरसेवक प्रभाग क्रमांक १९ यांच्या पुढाकारातून, भारत ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यंत आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हे शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई परिवहन समितीचे सदस्य राजेश राय, नगरसेवक सुनिल कुरकुटे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  मारुती विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच  संदीप नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. नगरसेवक  सुनिल कुरकुटे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मध्य रेल्वेच्या बोर्डावर सल्लागार सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांना नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल परिवहन समितीचे सदस्य  राजेश राय यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ०००००