Author: bittambatami.com

ठाण्याच्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याची सीबीएसई अध्यक्षपदी नियुक्ती

ठाणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्षपदी 2001 बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रशांत सीताराम लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रशांत लोखंडे हे ठाणे महानगरपालिकेच्या कै. सी.…

वाशी व तुर्भे भागात महापौर व उपमहापौर यांच्या उपस्थितीत विशेष जल तपासणी मोहीम

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी पातळी आज ७१.५. मीटर इतकी असून १५.७४ टक्के जलसाठा वापरण्यायोग्य आहे. हा जलसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतका आहे. मात्र आसपासच्या शहरांमधील पाणी टंचाईची भीषण परि‍स्थिती लक्षात घेता तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावेळी पावसाचे प्रमाण कमी आहे हे लक्षात घेता नवी मुंबईकरांनी पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आपल्याकडून पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही याची प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले. दोन दिवसाच्या शटडाऊनमध्ये जलवाहिन्या कोरड्या झाल्याने त्यांच्या आतील भागात खाली बसलेला बारीक गाळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरु झाल्यानंतर जलकुंभापर्यंत आला व गढुळ पाण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. या अनुषंगाने महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत शहराच्या विविध भागामध्ये मोठया प्रमाणात जलतपासणी मोहीम हाती घेण्यात आली. त्याचप्रमाणे महापौर, उपमहापौर यांचे समवेत नगरसेवकांनीही विविध विभागांमध्ये जाऊन जलतपासणी चाचणीची पाहणी करण्यास सुरुवात केली. या पाहणीमध्ये आंतरराष्ट्रीय आयएसआय मानकानुसार पाणी नमुन्यातील पीएच, टिडीएस, टर्बिडिटी व क्लोरिनचे प्रमाण तपासण्यात आले. या ठिकठिकाणच्या तपासणीमध्ये पाणी पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले. तरीही नागरिकांना आपल्या घरातील पाणी दूषित असल्याची शंका असल्यास तक्रार करण्यासाठी १८००२२२३०९ हा टोल फ्री विनामूल्य क्रमांक जाहीर करण्यात आला. आता तक्रारींचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून पाणी पूर्वीसारखे स्वच्छ मिळू लागले आहे. तरीही काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये लिकेजेस असल्याने नळाव्दारे मिळणारे पाणी गढूळ असल्यास लिकेजेस शोधून ते त्वरीत दुरुस्त करुन घेण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी आजच्या तुर्भे, वाशी भागातील पाणी नमुने तपासणी विशेष मोहिमेच्या पाहणी प्रसंगी दिले. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, क प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मोरे व ड प्रभाग समिती अध्यक्ष शैला पाटील, नगरसेवक शशिकांत राऊत, दयावती शेवाळे, शशिकला पाटील, अंजली वाळुंज, सुनिल कुरकुटे, शशिकला औटी, शिल्पा ठाकूर, प्रिती भगत तसेच अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता शंकर जाधव व संतोष उनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर महोदयांनी तुर्भे से. येथील मलप्रक्रिया केंद्र व टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचीही पाहणी केली. याप्रसंगी विशेषत्वाने गावठाण भागातील जलवाहिन्या जुन्या झाल्या असल्याने त्यामध्ये मोठया प्रमाणात लिकेजेस असल्याचे सांगत नगरसेवकांनी त्या वाहिन्या बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. काही नागरिकांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली १०% पाणी कपात ही सध्या सगळीकडे जाणवत असलेली पाण्याची कमतरता लक्षात घेता २० % पर्यंत करावी अशी सूचना केली. त्याचप्रमाणे काही नागरिकांकडून अशा पाणी टंचाईच्या काळातही नवी मुंबईत मुबलक पाणी मिळत असल्याने गाडया धुण्यासाठी पाईप लावून पाण्याचा अनाठायी वापर करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशीही मागणी याप्रसंगी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी मोठया कालावधीसाठी शटडाऊन घेण्यात आल्याने पाणी गढूळ असण्याच्या तक्रारी अधिक प्रमाणात आल्या. आता पाण्याची स्थिती जवळजवळ पूर्ववत झाल्याचे आढळून येत असून महानगरपालिकेमार्फत पाण्याच्या चाचण्या सुरुच ठेवल्या जाणार आहेत. 00000000000

स्वतःसाठी एक तरी झाड लावा – उद्धव बाबर

मुंबई / रमेश औताडे जगापुढे आज उभा ठाकलेला सर्वात भीषण आणि गहन प्रश्न म्हणजे वाढते जागतिक तापमान होय. औद्योगिकीकरण, बेसुमार वृक्षतोड, वाढते प्रदूषण, जलस्रोतांचा ऱ्हास आणि नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत “एक तरी झाड लावा… स्वतःसाठी!” हा संकल्प अंगीकारावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कारप्राप्त आणि पर्यावरणप्रेमी उद्धव बाबर यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. उद्धव बाबर म्हणाले, गेल्या काही दशकांमध्ये पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या तापमानवाढीमुळे ऋतुचक्रात मोठे बदल होत असून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, पूर आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढली आहे. याचा थेट परिणाम शेती, जलसंपदा, जैवविविधता आणि मानवी आरोग्यावर होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला हवामान बदलाचे सर्वाधिक चटके बसत असून कृषी क्षेत्र मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. ते म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प करावा. वाढत्या तापमानाला आणि पर्यावरणीय ऱ्हासाला रोखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हा सर्वात प्रभावी आणि शाश्वत मार्ग असून, “एक तरी झाड लावा… स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी”, असा संदेश उद्धव बाबर यांनी दिला. 0000000

आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवली जिल्हा कमिटीतर्फे वृक्षारोपण

कल्याण : रिपब्लब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बौद्धजन पंचायत समितीचे सभापती तथा चेअरमन, इंदू मिल स्मारकाचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा वाढदिवस रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली आजी माजी कमिटीतर्फे वृक्षारोपण करून…

टंचाईग्रस्त 39 गावे आणि 127 पाड्यांसाठी तातडीने 40 टँकर तैनात

– ठाणे जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार ठाणे : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने अत्यंत तत्परता दाखवत युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. ठाणे…

नाल्याच्या कामासाठी अनधिकृत चोरीने वीज पुरवठ्याचा वापर

कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये सद्ध्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. कडक उन्हाळ्यात अनेक वेळा विज पुरवठा खंडित होण्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात काहीजण खुलेआम विज चोरी करीत असल्याचे…

 राष्ट्रीय सब- ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका!

 अस्मि राऊत व यश शिंदे ‘बेस्ट पिचर’, तर आर्या चव्हाण ‘बेस्ट कॅचर’ ठाणे : भुवनेश्वर येथील प्रसिद्ध किट युनिव्हर्सिटीच्या मैदानावर पार पडलेल्या ३१ व्या राष्ट्रीय सब- ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मानाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने दिमाखात सुवर्णपदक  पटकावले, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. २४ मे ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. संघीय यशासोबतच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक कौशल्याने संपूर्ण स्पर्धकांचे लक्ष वेधून घेतले. अस्मि राऊत (मुलींचा संघ): स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट’ (Best Pitcher). यश शिंदे (मुलांचा संघ): मुलांच्या गटात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत ‘बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट’ (Best Pitcher) चा बहुमान पटकावला. आर्या चव्हाण (मुलींचा संघ): उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘बेस्ट कॅचर ऑफ द टूर्नामेंट’ (Best Catcher). आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा फायदा दोन्ही संघांना राष्ट्रीय पातळीवर सज्ज करण्यासाठी महाराष्ट्राच्या तज्ज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत अत्यंत मोलाची ठरली. मुलींच्या संघाला लाभलेल्या प्रशिक्षक आरती भगत आणि रिया आगवणे या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. तर मुलांच्या संघाचे प्रशिक्षक सोमनाथ सपकाळ आणि धनंजय शिरसाट हे स्वतः राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आहेत. या दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनामुळे व रणनीतीमुळेच महाराष्ट्राच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत दिमाखात मजल मारत हे घवघवीत यश संपादन केले. अध्यक्ष डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कौतुक महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि सचिव राजेंद्र इखणकर यांनी दोन्ही संघांच्या या अभूतपूर्व कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे. “महाराष्ट्राच्या मुला- मुलींनी राष्ट्रीय पातळीवर राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. खेळाडूंची जिद्द, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेत्या प्रशिक्षकांचे योग्य नियोजन यामुळेच हे सुवर्ण आणि रौप्य पदक आपण मिळवू शकलो. सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या मार्गदर्शकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो,” अशा शब्दांत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्राच्या या दुहेरी यशामुळे संपूर्ण राज्यातील क्रीडा क्षेत्रातून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 00000000

राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची चमकदार कामगिरी

ठाणे : नुकत्याच झालेल्या ७४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या धावपटूंनी स्पृहणीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत सात सुवर्णपदकांसह दोन रौप्य आणि…

वैभव सूर्यवंशीचा आदर्श घ्या, खो-खोमध्येही मोठी कामगिरी करा!

आमदार दिलीप माने यांचे खेळाडूंना प्रेरणादायी आवाहन सोलापूर, दि. ३ जून : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कुमार आणि मुली गटातील खो-खोपटूंनी क्रिकेटमधील युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी साकारावी, असे प्रेरणादायी आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केले. कमी वयात सातत्य, मेहनत आणि दर्जेदार कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे खो-खो खेळाडूंनीही जिद्द, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा उंचावावा, असे त्यांनी सांगितले. भव्य वातावरणात स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन आणि किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२व्या कुमार व मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे उद्घाटन नेहरूनगर येथील शासकीय मैदानावरील स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे होते. प्रारंभी अलकाताई राठोड, नागेश बिराजदार, मोहन रजपूत आणि शिवशंकर राठोड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ‘खेळाडू शपथ पाळतात, आम्ही राजकारणी नाही!’ कार्यक्रमात सोलापूरची राष्ट्रीय खो-खोपटू स्नेहा लामकाने हिने उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. या शपथविधीचा संदर्भ घेताना दिलीप माने यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवणारे, पण तितकेच वास्तववादी विधान केले. “खेळाडू नेहमी प्रामाणिकपणे घेतलेल्या शपथेचे पालन करतात आणि खेळाडूवृत्ती जपतात; मात्र आम्ही राजकारणी लोक त्याप्रमाणे आचरण करत नाही,” अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. राज्य स्पर्धांसाठी ‘रॉयल्टी’ कायमची बंद यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ यापुढे राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी कोणत्याही जिल्हा संघटनेकडून किंवा आयोजक संस्थेकडून ‘रॉयल्टी’ आकारली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. तसेच या स्पर्धेतून निवडले जाणारे महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत राज्याचा गौरव वाढवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती या उद्घाटन सोहळ्याला गोविंद शर्मा, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पवन पाटील, डॉ. प्रशांत इनामदार, सचिन चव्हाण, डॉ. बापूसाहेब अडसूळ, अश्विनी चव्हाण, डॉ. अरुण मनगोळी, महेश गादेकर, श्रीकांत ढेपे, अजितकुमार संगवे, सुनील चव्हाण, श्रीरंग बनसोडे, उमाकांत गायकवाड, राजाराम शितोळे, अजित शिंदे आणि संतोष कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य अंबादास पांढरे यांनी प्रास्ताविक केले, सचिन मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीकृष्ण कोळी यांनी आभार प्रदर्शन केले.

 मध्यंतराच्या पिछाडीवरून लातूरची जालन्यावर थरारक मात

 ५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सोलापूर, दि. ३ जून : स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी, नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरू असलेल्या ५२व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद…