Author: bittambatami.com

चौल-२ शाखा कार्यालय रायगड जिल्ह्यातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटरयुक्त कार्यालय

१,५७० ग्राहकांचे सर्व मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर रायगड : राज्यभर महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग-१ उपविभागांतर्गत चौल-२ शाखा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या…

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आकाश पाटील यांची निवड

कल्याण  : दि.ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत “ठाणे तालुका” मतदारसंघातून युवा नेतृत्व आकाश  पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून सहकार क्षेत्रात नव्या पिढीच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याची भावना व्यक्त…

एमएमआरडीएच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्याचे आमदार कुमार आयलानी यांचे निर्देश

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासह दुभाजक रंगविणे व वृक्षारोपणावर भर सुनिल इंगळे उल्हासनगर : शहरातील एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकाम प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम…

 शिष्यवृत्ती व आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी ‘झुरळ फेको’ आंदोलन करण्याचा इशारा

सेव्ह एज्युकेशन सोसायटीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र कल्याण : डोंबिवली येथील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयातील शिष्यवृती व आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी माहिती दडपणे, चौकशी टाळणे, तक्रारदारावर पुरावे सादर करण्याचा दबाव आणणे याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया समोर झुरळ फेको आंदोलन करण्याचा इशारा सेव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रोहिदास सुरवसे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे. प्रकल्प विकास अधिकाऱ्यांनी सुरवसे यांच्याकडून कथित शिष्यवृती घोटाळ्याबाबत पुरावे व विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यास सांगितले आहे. हि बाब अत्यंत गंभीर, कायदेशीरदृष्ट्या चुकीची व प्रशासनिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न दर्शविणारी आहे. सुरवसे यांनी वेळोवेळी के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डॉबिवली येथील आदिवासी वि‌द्यार्थ्यांच्या शिष्यवृती, आर्थिक अनियमितता, निधी अपहार, वि‌द्याथ्यांच्या हक्कांचे उल्लंघन तसेच विविध प्रशासकीय गैरप्रकारांबाबत शासनाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत अनेक आरटीआय अर्ज करुन संबंधित माहिती मागविण्यात आलेली आहे. मात्र आजपर्यंत संबंधित विभाग व महावि‌द्यालयाकडून कोणतीही संपूर्ण, सत्य व कायदेशीर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे, सेव एज्युकेशन सोसायटी व सेव पेंडरकर कॉलेज संदर्भातील विविध आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार, प्रशासकीय गाँधळ व गंभीर घोटाळ्यांबाबत गेल्या दीड वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेला आहे. या तक्रारींची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने स्वतः के. व्ही. पेंडरकर महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे. शासनाने काढलेल्या प्रशासक नियुक्ती आदेशामध्ये देखील संस्थेमध्ये गंभीर अनियमितता व प्रशासकीय बिघाड असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत देखील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने प्रत्यक्ष चौकशी करण्याऐवजी तक्रारदारालाच “तुम्ही पुरावे द्या, मग आम्ही कारवाई करू” असे सांगितले जात आहे, ही बाब अत्यंत धक्कादायक, निषेधार्ह व संशय निर्माण करणारी आहे. माहिती अधिकार अंतर्गत माहिती न देणे आणि त्यानंतर तक्रारदाराकडूनच पुरावे मागणे हे वस्तुतः माहिती दडपण्याचा व चौकशी टाळण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर संशय निर्माण करणारे आहे. त्यामुळे तक्रारदाराकडून अशक्य स्वरूपाचे पुरावे मागण्याऐवजी संबंधित सर्व अभिलेख स्वतः ताब्यात घेऊन निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. सन २०१० पासून आजपर्यंतच्या सर्व शिष्यवृत्ती निधीचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे. उपयोगिता प्रमाणपत्रांची सत्यता तपासणी करण्यात यावी, व मंजूर व वितरित शिष्यवृत्तीची तुलना रिपोर्ट द्यावा.  माहिती दडपणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आदिवासी वि‌द्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक हक्कांशी संबंधित या गंभीर प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, व माहिती अधिकार अंतर्गत मागविलेली सर्व माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी सेव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणात निष्पक्ष व प्रभावी कारवाई न झाल्यास दिनांक २० जून  रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शहापूर येथील प्रकल्प अधिकारी यांच्या दालनासमोर समोर झुरळ फेको आंदोलन करण्याच्या इशारा रोहिदास सुरवसे यांनी दिला आहे. 00000000000 त होते. 000000000

दिवा शहरातील नालेसफाई कामांबाबत मनसेची तीव्र नाराजी

दिवा, दि. 3 जून (आरती परब) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहराचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन दिवा शहरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांबाबत…

भगवान बुद्ध भारत-म्यानमार संबंधांचा अध्यात्मिक दुवा

 – राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन अशोक गायकवाड मुंबई : ‘भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचे दृढ बंध असून या संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी आपण भारत…

मान्सूनपूर्व नालेसफाईची ९० टक्के कामे पूर्ण; उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

नालेसफाईनंतरचा गाळ व कचरा तात्काळ हटविण्याबाबत आयुक्तांची सूचना मिरा-भाईंदर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे नियोजनबद्ध, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. या…

कल्याण-मुरबाड महामार्गावरील भीषण अपघातात

दोन तरुणांचा मृत्यू कल्याण : टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण-मुरबाड महामार्गावर वरप येथे मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टिटवाळा पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर मुरबाडच्या दिशेने जात होता. त्याचवेळी त्याच्या पाठीमागून येणारी बर्कमन गाडी कंटेनरच्या मागील भागावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीतील तीनपैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पवन गुप्ता (वय २८, रा. चोप्रा कोर्ट, उल्हासनगर) आणि राजू गुप्ता (वय २२, रा. वरप) अशी झाली आहे. अपघातात जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच कंटेनर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे म्हणाले, “वरप परिसरात पहाटे झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.”

लाडकी बहीण योजनेत ८० लाख महिलांना अपात्र ठरवणे म्हणजे विश्वासघात : वर्षा गायकवाड

निवडणुकी वेळी निकष आठवले नाहीत का?; महायुती सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा निर्णय हा राज्यातील महिलांच्या विश्वासाचा घात असल्याची टीका मुंबई…

सिंहस्थात धावणार साडेचार हजार बसेस

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित, नियोजनबद्ध आणि सुलभ व्हावा, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक…