Author: bittambatami.com

ठाण्यात प्रथमच ज्येष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान

००००००००० ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृतकालातील ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आशीर्वाद फाऊंडेशन, ठाणे यांच्या वतीने “राष्ट्रजागृती : आव्हाने, समाधान आणि सनातन धर्म” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी…

‘१५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लॉकलमध्ये सयंचलित दरवाजे बसवावे’

 स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा – नरेश म्हस्के अनिल ठाणेकर ठाणे : केंद्रीय कामकाजाच्या नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांनी या मानवी संकटाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. नरेश म्हस्के हे निवडून आल्यापासून मुंबई आणि ठाणे उपनगरीय प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी संसदेत आवाज उठवत आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी संसदेचे कामकाज गोंधळ घालून ठप्प केले आहे. आज खासदार नरेश म्हस्के यांना संसदेत बोलायची संधी मिळताच त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासावर आवाज उठविला. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) अंतर्गत ५७ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झालेली आहे. उपनगरीय रेल्वेच्या स्थितीत अजूनही सुधारणा करणे गरजेचे आहे. २०२४ मधील आकडेवारीनुसार अतिगर्दी, रेल्वे रुळ ओलांडणे आणि रेल्वेतून पडण्याच्या घटनांमुळे हजारो प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. सध्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये क्षमतेपेक्षा चारपट अधिक प्रवासी प्रवास करत असल्याने ‘सुपर-डेन्स क्रश लोड’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, दरवाज्यांवर लटकून प्रवास करणे आणि अपघात होणे ही नियमित बाब बनली असल्याचे नरेश म्हस्के यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिले. संसदीय समित्या आणि न्यायालयांच्या स्पष्ट निर्देशांनंतरही १५ डब्यांच्या गाड्यांचा विस्तार, स्वयंचलित दरवाजे, फेन्सिंग आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे यांसारख्या मूलभूत सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने होत असल्याची खंतही नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून सर्व १२ डब्यांच्या लोकलचे टप्प्याटप्प्याने १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करावे, सर्व रेकमध्ये ऑटो-डोअर क्लोजिंग सिस्टीम अनिवार्य करावी तसेच स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निगराणी यंत्रणा उभारावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. भविष्यात अशा दुर्दैवी मृत्यूंना आळा घालण्यासाठी या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचेही  नरेश म्हस्के यांनी  स्पष्ट केले.

 दिवा पोलीस स्टेशन कधी सुरू होणार? इमारत तयार, तरीही नागरिकांना मुंब्र्याची वारी!

 वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी आणि अपुरे पोलीस बळामुळे दिवेकर त्रस्त; रात्रीच्या वेळी तक्रार करण्यासाठी मोठी अडचण दिवा, दि. ५ ऑगस्ट (आरती परब) -दिवा शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या…

आरक्षणासाठी मराठ्यांचे वादळ दिल्लीत धडकणार

रमेश औताडे मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने ९ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मराठ्यांचे वादळ धडकणार असून आता आर या पार ची लढाई दिल्लीत लढणार.  असा इशारा  अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. मराठा समाज ३५ वर्षे संघर्ष करत आहे.  मात्र न्यायालयीन कसोटीवर टिकेल असे कायमस्वरूपी आरक्षण देण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. वेळोवेळी सरकारने मराठा समाजाला आश्वासन दिले होते. प्रत्येक वेळी आनंदोत्सवही साजरा केला; मात्र आरक्षणाचा प्रश्न आजही कायम आहे. नानासाहेब जावळे पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या भावना अधिक काळ दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे आम्ही सरकारला मुदत दिली आहे. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होण्याअगोदर आरक्षणाचा योग्य निर्णय घ्यावा. सरकारने जर गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहिले नाही तर, देशातील मराठा समाजबांधवांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. भीमराव मराठे, लक्ष्मण शिरसाठ, पंजाबराव काळे, राहुल पाटील आदी समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव कापरे यांनी वयाच्या ७४ व्या वर्षात पदार्पण केले त्याबद्दल त्यांचे अभीष्टचिंतन करतांना बोरीवली पूर्व येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख राजा खोपकर, अभय नामजोशी, कुशन…

सत्ताधारी भाजपातर्फे १० ऑगस्टला ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा

 महायुतीत भाजपा शिवसेना आमने सामने मिरा-भाईंदर: मिरा-ईंदर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरुन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या आरोपांना आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर देत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका पत्रकार परिषदेत…

 कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य!

ॲग्री स्टॅक वर तात्काळ नोंदणी करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्ग : कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य असून त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘फार्मर आयडी’ नसलेले१२०७ शेतकरी असून त्यांनी तातडीने ‘ॲग्रीस्टॅक ‘वर नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ प्राप्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ नाही त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आवाहन  केले आहे. कर्जमुक्ती योजनेच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे जिल्हा सुकटे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रदीप मालगावे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ६५०० कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत ३७०८ आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यापैकी २१४५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर १५६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे यामध्ये १२०७ शेतकऱ्यांकडे ॲग्री स्टॅक/फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया रखडलेली आहे अशी माहिती  जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आधार प्रमाणे करण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या ३७०८ शेतकऱ्यांचे याद्या संबंधित विकास सेवा संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत जिल्हा उपनिबंधक तसेच तालुका सहाय्यक निबंधक या कार्यालयांमध्ये याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत १एप्रिल २०१९ ते ३१,मार्च,२०२५ या कालावधीत वाटप केलेले अल्पमुदत पीक कर्ज, ३० सप्टेंबर,२०२५ रोजी थकीत आणि ३१,मार्च,२०२६ अखेर परतफेड न झाले असल्यास मुद्दल व व्याजासह अधिकतम दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे थकीत कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त रक्कम संबंधित बँक किंवा संस्थेला परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता ओटीएस अंतर्गत २ लाख रुपये पर्यंत चा लाभ मिळणार आहे तसेच २०२२-२३,२०२३ -२४ आणि २०२४ -२५ यातील आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली. ००००००००

आचार्य अत्रे रंगमंदिरात आशा भोसले, रफी आणि सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजलीपर गाणी

कल्याण :  येथील आचार्य अत्रे रंगमदिरात दिवंगत गायिका, आशा भोसले, गायक रफी आणि सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजलीपर तसेच आणि पाऊस या विषयावरील गाण्यांना श्रोत्यांचा अलोट प्रतिसाद लाभला. यावेळी २२ गायक, गायिका…

तर साडेतीन वर्षांत रिंग मेट्रो धावणार – श्रावण हर्डीकर

अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचे संपूर्ण भूसंपादन व इतर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास हा प्रकल्प अवघ्या साडेतीन वर्षात पूर्ण करू, अशी ग्वाही बैठकीत व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. अडीच वर्षांत पुणे मेट्रोचे वेगाने काम करण्यात आले. त्याच धर्तीवर ठाण्याचे काम पूर्ण करता येईल, अशी आशा हर्डिकर यांनी व्यक्त केली. त्याचे आमदार ॲड. माधवी नाईक यांनी स्वागत केले आहे. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाण्यातील सामान्य नागरिकांच्या शंका व भीती थेट नागरिकांबरोबर संवाद साधून दूर केली जाणार आहे. भाजपच्या आमदार ॲड. माधवी नाईक यांच्या सूचनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिंग मेट्रो मार्ग जाणाऱ्या विविध भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांबरोबर एकत्रपणे संवाद साधण्याच्या सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहात ठाणे शहरातील रिंग मेट्रो रेल्वेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक यांची उपस्थिती होती. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बैठकीत लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली. ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार रिंग मेट्रो प्रकल्प हा आवश्यक आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत महामेट्रो, महापालिका किंवा कोणत्याही सरकारी आस्थापनांकडून सामान्य नागरिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत ठाणे शहरात गैरसमज निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सामान्य नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अभ्यासू व्यक्तींबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या शंकांचे समाधान करण्याची आवश्यकता आहे. रिंग मेट्रोच्या कामामुळे नुकसान होणार नसून, ठाणेकरांना फायदा होईल. या प्रकल्पाबाबत ठाणेकरांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ठाण्यातील विविध भागात व नियोजित मेट्रोच्या स्थानकांच्या ठिकाणी परिसंवाद भरवावेत. त्यात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी, अशी सूचना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी केली. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. त्यानुसार लवकरच ठाणे शहरातील नागरिकांबरोबर थेट संवाद साधण्यासाठी परिसंवाद भरविले जाणार आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळातही महामेट्रोकडून रिंग मेट्रोबाबत फलक लावण्यात येणार आहेत.