Category: होम

– ठाण्यात रंगणार कलगीतुऱ्याचा थरार

लोककला रसिकांसाठी पर्वणी अनिल ठाणेकर ठाणे : कोकणातील पारंपरिक लोककलेचा अनोखा ठेवा असलेल्या ‘कलगीतुऱ्या’चा थरार आता ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शुक्रवार, १७ जुलै, सायंकाळी ७.३० वाजता भव्य कलगीतुऱ्याच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाबाबत लोककला रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या बहारदार सामन्यात कलगीवाले शाहीर संदीप मोरे आणि तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमन यांच्यात सवाल-जवाब, हजरजबाबी फटकेबाजी, उत्स्फूर्त सादरीकरण आणि पारंपरिक लोककलेचा रंगतदार आविष्कार पाहायला मिळणार आहे. पारंपरिक कलगीतुऱ्याचा वारसा आधुनिक सादरीकरणातून अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे. अतुल कदम आणि सुनील कदम यांच्या निर्मितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकरभाई सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, तिकिटांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कार्यक्रम हाऊसफुल होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, माजी महापौर अशोक वैती, युवासेना अधिकारी ऋषिकेश माने, अभिनेते मंगेश देसाई, भाऊ कदम, गौरव मोरे, उद्योजक विकास दाभाडे तसेच समाजसेवक संदीप बिरवटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे, कलगीतुऱ्याच्या इतिहासात प्रथमच १० भाग्यवान प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. कोकणच्या मातीत रुजलेली ही समृद्ध लोककला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि नव्या पिढीने तिचा वारसा जपावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. लोककलेची आवड असलेल्या प्रत्येकाने या सांस्कृतिक मेजवानीला उपस्थित राहून कलाकारांना उत्स्फूर्त दाद द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करा-वर्षा गायकवाड

मुंबई : महाराष्ट्रात ख्रिश्चन विवाह निबंधक (Registrar) नसल्याने या समाजातील विवाह व विवाह संबंधित कामे खोळंबली आहेत. विवाद निबंधक नसल्यामुळे मुंबई विभागाला प्रशासकीय विलंबाचा सामना करावा लागत आहे. सरकारने तातडीने…

समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक व महिला प्रतिनिधींचा समावेश करा – माकप

अनिल ठाणेकर ठाणे : समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक व महिला प्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी–मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मरियम ढवळे, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, रेहाना शेख यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात समान नागरी कायद्याचा (Uniform Civil Code) मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील कायदा करण्याचे संकेतही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. सर्व जाती-धर्मांतील महिलांना समान न्याय, समान हक्क आणि सामाजिक न्याय मिळावा, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, पोटगी अशा नागरी बाबींमध्ये महिलांना समान हक्क आणि न्याय मिळण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा झाल्याच पाहिजेत. समान नागरी कायद्याच्या कोणत्याही चर्चेच्या केंद्रस्थानी सर्व जाती-धर्मांतील महिलांचे हक्क, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष मूल्ये असली पाहिजेत. मात्र, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीची रचना पाहता तिच्या सर्वसमावेशकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. समान नागरी कायद्याबाबत देशभरात सर्वाधिक चर्चा ज्या मुस्लिम समाजाच्या वैयक्तिक कायद्यांच्या संदर्भात होत असते, त्या मुस्लिम समाजातील कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी किंवा सामाजिक तज्ज्ञ यांना समितीत स्थान देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, पारशी तसेच इतर संबंधित अल्पसंख्याक समाजांचेही प्रतिनिधित्व समितीत दिसून येत नाही. याशिवाय, सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या अधिकारांच्या दृष्टीने काम करणाऱ्या महिला प्रतिनिधींनाही समितीत स्थान देण्यात आलेले नाही. अशा महत्त्वाच्या विषयावर तयार होणारा कायदा व्यापक सामाजिक स्वीकारार्हता मिळवायचा असेल, तर त्याच्या मसुदा प्रक्रियेत सर्व संबंधित समाजघटकांचा सहभाग आवश्यक आहे. विशेषतः मुस्लिम समाजातील जाणकार कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी आणि सामाजिक तज्ज्ञ, तसेच सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समितीत समावेश करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कायद्यात महिलांच्या सामाजिक न्याय, समान हक्क आणि घटनात्मक संरक्षणासंबंधी अधिक प्रभावी तरतुदी करता येतील. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र शासनाकडे पुढील मागण्या करीत आहे: समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजातील पात्र कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी व सामाजिक तज्ज्ञांचा तातडीने समावेश करावा. सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींना समितीत स्थान द्यावे, जेणेकरून कायद्यात महिलांच्या सामाजिक न्यायाची प्रभावी हमी देणाऱ्या तरतुदी समाविष्ट करता येतील.ख्रिस्ती, पारशी तसेच इतर संबंधित समाजघटकांचेही प्रतिनिधित्व समितीत सुनिश्चित करावे.समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवावी.सर्व संबंधित धार्मिक, सामाजिक, महिला व कायदेविषयक संघटनांशी व्यापक सल्लामसलत करूनच अंतिम मसुदा तयार करावा. कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करण्याऐवजी भारतीय राज्यघटनेतील समानता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या आधारे कायदा तयार करावा. लोकशाही व्यवस्थेत अशा स्वरूपाचा व्यापक परिणाम करणारा कायदा लोकसहभाग, संवाद आणि सर्वसमावेशकतेच्या आधारेच तयार झाला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने समितीची पुनर्रचना करून त्यामध्ये मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक आणि सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  करत आहे. 00000000000

अंबरनाथ नगरपालिकेत ६ विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल सात महिन्यानंतर विषय समित्या आणि सभापती पदाची निवड अखेर बिनविरोध झाली. १७ सदस्यांच्या समितीत भाजपा गटबंधन ८ तर शिवसेना गटबंधन ९ अशा सदस्य…

नगरसेवक रमेश म्हात्रेंवर अद्यापही पक्षांतर्गत कारवाई नाहीच

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. या मारहाणीचा…

कल्याण न्यायालयात वकिलांचे पोलिसांविरोधात आंदोलन

 लाल फित बांधून कल्याण बार असोसिएशनचा निषेध कल्याण : डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या रिमांड सुनावणीदरम्यान पोलिसांनी वकिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत कल्याणमधील वकिलांनी आज अनोखे आंदोलन छेडले. न्यायालयीन कामकाज सुरू ठेवत वकिलांनी लाल फित बांधून पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे न्यायालय परिसरात चर्चांना उधाण आले आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे, यांच्या रिमांड सुनावणीवेळी काही पोलिस अधिकाऱ्यांनी वकिलांना धमकावल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप कल्याण बार असोसिएशनकडून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याण न्यायालयातील वकिलांनी लाल फित बांधून कामकाज सुरू ठेवले. न्यायालयीन प्रक्रियेत वकिलांचा सन्मान राखला जावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनामुळे पोलिस आणि वकील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी सुनावणीसाठी आणलेल्या एका  राजकीय आरोपीला पोलिसांनी विशेष सुरक्षा पुरवली होती. यावेळी सर्व पोलीस हे त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक असल्याप्रमाणे वावरत होते यावेळी पोलिसांनी वकिलांना धक्काबुक्की करत गुन्हा दाखल करू अशी धमकी देत विनापरवानगी वकिलांचे चित्रीकरण केले. याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून याबाबत लेखी तक्रार न्यायाधीशांकडे करण्यात आली असून उच्चन्यायालयात देखील हि बाब नेणार असल्याचे  ऍड श्रद्धा शिवमते जोशी यांनी सांगितले. तर याआधी कधीही अशाप्रकारे लाल फीत लावून काम करण्याची आवश्यकता वाटली नाही. मात्र वकिलांवर अन्याय झाल्याने हे लालफीत लावून आंदोलन केले आहे. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असून जोपर्यत पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत लालफीत लावून आंदोलन करणार असल्याची  प्रतिक्रिया ऍड प्रदीप बावस्कर यांनी दिली.

आशियाई जलतरण स्पर्धा

स्वराज लाड, गीतिका सालियन तर प्रशिक्षक तुषार गीतये यांची भारतीय संघात निवड मुंबई, प्रतिनिधी : थायलंडमधील बँकॉक येथे होणाऱ्या १२व्या आशियाई वयोगट जलतरण (अॅक्वॅटिक) अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून,ही स्पर्धा १६ ते २१ जुलै या कालावधीत बँकॉक (थायलंड) येथे होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील चार डायव्हर्स पैकी मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील दोन डायव्हर्स आणि एका प्रशिक्षकाची निवड झाली आहे. स्वराज राजेंद्र लाड याची १८ वर्षांखालील मुलांच्या गटातील ३ मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग प्रकारासाठी, तर गीतिका सालियन हिची १५ वर्षांखालील मुलींच्या गटातील प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तसेच, विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील प्रशिक्षक तुषार गितये यांची या स्पर्धेसाठी भारतीय डायव्हिंग संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत स्वराज लाड आणि गीतिका सालियन भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, प्रशिक्षक म्हणून तुषार गितये संघास मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. -000000

जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी भगवा फडकवणारच-  संजय केळकर

0000000 अनिल ठाणेकर ठाणे,जंजिरा किल्ल्यावर कोणी मालकी सांगणार असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ. हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आंदोलन सुरूच ठेवून कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्यास परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गुरुवारी सायन येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने दुर्गसेवक मुंबईत दाखल झाले होते. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता, जतन व ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी विभागाकडून नाकारण्यात आल्याने महाराष्ट्रातील दुर्गसेवक आणि हिंदूप्रिय नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली. स्वातंत्र्यानंतर सर्व किल्ले हे देशाच्या मालकीचे झाले आहेत. त्यामुळे कोणी यावर मालकी सांगू नये. अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. किल्ल्यात कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवणे का अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठान येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करेल. आम्ही केंद्रीय पुरातत्व खात्याला विनंती केली असून जोपर्यंत जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार श्री. केळकर यांनी व्यक्त केला. 00000000

मुलाच्या बेकायदा इमारतीवरून रमेश म्हात्रेंचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

सात महिन्यापासून निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा कल्याण : सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या मुलाने प्रभागातील जुनी डोंबिवली भागात एक बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीला पालिकेच्या बांधकाम परवानग्या नाहीत. पालिकेच्या ह प्रभागाने ही इमारत अनधिकृत घोषित केली आहे. रक्ताच्या नात्यामधील कोणीही बेकायदा बांधकाम केले असेल तर संबंधित नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द होते. त्यामुळे नगरसेवक म्हात्रे यांच्या मुलाने केलेल्या बेकायदा बांधकामांशी रक्ताच्या नात्याने रमेश म्हात्रेचा थेट संबंध येत आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करा, अशी तक्रार तक्रारदार कल्पेश जोशी यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त, नगरविकास प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे गेल्या सहा महिन्यापूर्वी केली आहे. या तक्रारीच्या प्रती कोकण विभागीय आयुक्त, ठाणे जिल्हाधिकरी, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त यांना देऊनही या गंभीर तक्रारीविषयी शासन दखल घेत नाही. यामागे राजकीय दबाव हेच मुख्य कारण आहे, असे तक्रारदार कल्पेश जोशी यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यापूर्वी झालेल्या कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सत्यप्रतिज्ञा पत्रावर मी, माझ्यावरील अवलंबित्व (पत्नी, मुले) यांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही असे लिहून दिले आहे. अशाप्रकारचे अनधिकृत बांधकाम केल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक राहण्यास अपात्र ठरेन याची मला जाणीव आहे, असे म्हटले आहे. रमेश म्हात्रेवरील अवलिंबत्व असलेल्या त्यांच्या मुलाने अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी तक्रारदाराची मागणी आहे. या मागणीसाठी पालिका आयुक्त ते ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी रमेश म्हात्रेच्या आक्रमक स्वभावामुळे त्यांच्या मुलाच्या बेकायदा इमारतींवर कारवाई केली नाही. तसेच म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. राजकीय दबावामुळे आपल्या अर्जावर शासन, पालिकास्तरावर कारवाई होत नाही. याप्रकरणात शासन, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घालून म्हात्रे यांचे नगरसेवक पद करण्यासाठी आणि आपणास न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. 000000000

आयडियल १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा १८ जुलैला

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे दि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहप्रायोजित १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या ६ वयोगटामध्ये बुध्दिबळ स्पर्धा १८ जुलै रोजी आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे.…