Category: होम

महावितरणाच्या बेफाम वीज खंडित विरोधात जनआक्रोश

०००००० कल्याण : कल्याण पूर्व ग्रामीण परिसरात महावितरणकडून वारंवार वीज खंडित प्रकार आता नागरिकांसाठी असह्य ठरत आहे. पहाटे नागरिक साखर झोपेत असताना वीज गायब होते, भरदुपारी कडाक्याच्या उष्णतेत कोणतेही ठोस…

नाशिकमध्ये पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर

हरिभाऊ लाखे नाशिक : महापालिकेमार्फत पाथर्डी फाटा- पाथर्डी गाव पिंपळगाव खांब फाटा या महत्त्वाच्या मार्गावरील नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मान्सूनपूर्व तयारीला वेग देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील ओएफसी, महा आयटी सीसीटीव्ही आणि एमएनजीएल गॅस पाइपलाइनची सर्व युटिलिटी कामे शंभर टक्के पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या नवीन नाशिक विभागाअंतर्गत येणारा हा डांबरी रस्ता सुमारे ३.८६२ किलोमीटर लांबीचा असून, ३१ मे २०२६ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. वाढती वाहतूक आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता रस्ते मजबुतीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. सध्या मार्गावरील नादुरुस्त पॅचेसची दुरुस्ती सुरू असून, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. स्टॉर्म वॉटर लाइन अंतर्गत २०० मीटर काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. महापालिका प्रशासनाने ओएफसी, गॅस पाइपलाइन आणि ड्रेनेज कामांमुळे भविष्यात पुन्हा रस्ते खोदकाम होऊ नये यासाठी संबंधित विभागांसोबत समन्वय बैठका घेतल्या आहेत. वाहतुकीवरील परिणाम कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कामांचे नियोजन करण्यात आले असून, दर्जेदार साहित्याचा वापर करून पावसाळ्यात खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी विभागीय पथक सतर्क ठेवण्यात आली असून रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या आणि युटिलिटी नेटवर्कचा एकत्रित आढावा घेऊन कामांना गती देण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. कोट महापालिकेकडून संबंधित विभाग व यंत्रणांच्या समन्वयातून कामांना गती देण्यात येत आहे. मान्सूनपूर्व सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुविधायुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. – मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका, नाशिक

शेतकऱ्यांच्या वेदना आणि श्रद्धेचा संवेदनशील प्रवास; ‘देऊळ बंद २’ ठरतो प्रभावी अनुभव

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक वास्तव आणि अध्यात्म यांचा संगम घडवणारे चित्रपट क्वचितच पाहायला मिळतात. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’मधून श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मानवी संघर्ष यांचा वेगळा…

टिटवाळा इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

  संघर्ष रहिवासी संघटनेचे केडीएमसी, पोलिसांना पत्र कल्याण : टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटना, तसेच इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी संघर्ष…

२५ दिवसीय योग महोत्सवाचा जीवनदीप महाविद्यालयात शुभारंभ

    कल्याण : जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दिनांक २८ मे रोजी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, आरोग्य योगा अँड…

२८०० कोटींच्या `टीडीआर’बाबत आयुक्तांनी ठाणेकरांना खुलासा करावा

भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची मागणी ठाणे : चितळसर-मानपाडा येथील १९३ एकर वन जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात ठाणे महापालिकेने समझोता केल्यानंतर देण्यात येणाऱ्या २८०० कोटींच्या `टीडीआर’बाबत महापालिका आयुक्तांनी…

महा DBT पोर्टलवरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा

  सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे महाविद्यालयांना निर्देश ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टलद्वारे विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, सद्यस्थितीत हे पोर्टल MahaDBT १.० वरून…

ठाणे ग्रामीण काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढ व टंचाई विरुद्ध तीव्र धरणे आंदोलन

    अंबरनाथ : शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी दरवाढ व टंचाई विरोधात पेट्रोल पंपासमोर तीव्र धरणे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या…

कल्याणमध्ये बकऱ्यांची अवैध कत्तलप्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर कारवाई

कल्याण: कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बकऱ्यांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी तिघांसह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमेश्वर गोपाळ महाले (वय ४५) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली…