Category: मुंबई

Mumbai news

प्रशासकीय कामकाजासाठी कार्यालयांमध्ये शून्य प्रलंबितता हे लक्ष – सत्यजित बडे*

अशोक गायकवाड नवी मुंबई :नागरिकांची महानगरपालिकेशी संबधित कामे विहित कालावधीत सहजपणे व्हावीत याकरिता समाधानकारक प्रशासकीय कामकाज करण्याच्या दृष्टीने कार्यालयांमध्ये शून्य प्रलंबितता हे लक्ष्य ठेवून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या…

लोकसेवा समितीच्या 27 व्या वर्धापन दिन निमित्त आयोजित भव्य कोकण मेळाव्यात यंदाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वीकारताना भास्कर दिलीप नलावडे आणि सौ. मीनाक्षी मालवणकर. उजवीकडे लोकसेवा समितीचे…

कर्करोग मुक्त भारत राष्ट्रव्यापी मोहीम

रमेश औताडे मुंबई : भारतात दरवर्षी कॅन्सरच्या १४ लाखांहून जास्त केसेस आढळून आल्या असून २०२५ पर्यंत त्यांची संख्या वाढून १५ लाखांवर पोहोचेल. यासाठी जनजागृती करण्यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर मे जागतिक…

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबईत

रमेश औताडे मुंबई : विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे १२ फेब्रुवारी रोजी कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या वतीने होत असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष लेखक व…

कस्तुरबा गांधी राष्ट्र सेवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

केतन खेडेकर कस्तुरबा गांधी राष्ट्रसेवा पुरस्काराचे आयोजन नुकतेच एम.डी.काॅलेज, परळ,मुंबई येथे करण्यात आले होते. माजी मुंबई युनिव्हर्सिटी कुलगुरू, खासदार व राष्ट्रीय नियोजन समिती सदस्य सन्माननीय डाॅ. भालचंद्र मुणगेकर , सामाजिक,…

चेंबूरमध्ये ७ व ८ फेब्रुवारीला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

मुंबई : मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर व श्री. ना.ग.आचार्य व श्री. दा.कृ. मराठे महाविद्यालय चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने  शुक्र. दि.०७ व  शनि.०८ फेब्रुवारी २०२५ रोजी या दोन्ही दिवशी दु.०३…

नवउद्योजक,व्यावसायिकांसाठी वरळीत उद्यापासून तीन दिवस प्रदर्शन

मुंबई : क्रिएटिव्ह आयडियाज अँड इनोव्हेशन्स इन ॲक्शन (CiiA) या स्वयंसेवी संस्थे तर्फे नवउद्योजक-स्टा स्टार्टअप,इतर व्यावसायिकांसाठी वरळी नेहरू सायन्स सेंटर येथे नवोपक्रम प्रदर्शन ५ ते ७  फेब्रुवारी दरम्यान सकाळी १०:३०…

धारावीत  रायफल शुटींग प्रशिक्षण अकॅडमीचे झाले उद्‌घाटन

केतन खेडेकर मुंबई : बौद्धिक विकासाबरोबरच वि‌द्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणेही तितकेच महत्त्वाचे असून शारीरिक विकासासाठी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या खेळाच्या अंगभूत कौशल्याला तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन तथा प्रशिक्षण घेणे आज काळाची…

तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाखाचा अवॉर्ड देणार

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान राजेंद्र साळसकर मुंबई : मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान आणखी ताकदीने पुढे नेण्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. मुलुंड (पूर्व) येथील आर्यावर्त इंद्रप्रस्थ को. ऑप. सोसायटीतील रहिवाशांनी कोणत्याही बँकेचे आर्थिक पाठबळ न घेता स्वयंपुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारत उभी केली आहे. या इमारतीतील रहिवाशांना आज सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत चावी वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी  विकास महात्मे, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक व मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, मनसे उपाध्यक्ष सत्यवान दळवी, सोसायटीचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे, सचिव विशाल मारकड, खजिनदार रत्नाकर वरळीकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित रहिवाशांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणाले कि, आज तुमच्याकडून आम्ही शिकायला आलोय. हे सगळं शिक्षण पुढे प्रचारीत, प्रसारित करणं म्हणजे घरांची चळवळ आणि ती मराठी माणसांच्या घरांची चळवळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी माणसाच्या घराची, कुटुंबाची चिंता असते म्हणून ते शासन निर्णय काढतात. शेलार पुढे म्हणाले कि,मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार आहे. तसेच तुमच्या ज्या काही नवीन सूचना आल्या आहेत त्या शंभर टक्के नवीन अध्यादेशात घालू. पण ही चळवळ वृद्धिंगत होवो. तुमचे कार्य अनेकांना प्रेरणा देईल, असेही आ. शेलार यांनी म्हटले. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले कि, मुंबईत स्वयंपुनर्विकास व्हावा हा माझा अट्टाहास होता. गेली १५ वर्ष मी यावर काम करतोय. मुंबईत मध्यमवर्गीय सर्वसामान्य मराठी माणसासाठी स्वयंपुनर्विकास हा दिशादर्शक आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच स्वयंपुनर्विकास गतीने होताना दिसतोय. मुंबई जिल्हा बँकेकडे १६०० प्रस्ताव आलेत. त्यातील ३६ प्रकल्पाना कर्जमंजुर केले असून १४ इमारतींमध्ये लोकं राहायला गेली आहेत. पुढील आठवड्यात चारकोप येथील श्वेतांबरा इमारतीच्या चावी वाटप कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्री यांना घेऊन जाणार आहे. गोरेगाव येथील गृहनिर्माण परिषदेत स्वयंपुनर्विकासासाठी १८ मागण्या केल्या होत्या त्यापैकी १६ शासन निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी काढण्यास सांगितले. आता राज्य सहकारी बँक स्वयंपुनर्विकासासाठी दीड हजार कोटी रूपये आणि एनसीडीसीकडून एक हजार कोटी मुंबई बँकेला मिळणार आहेत. त्यातून मुंबईतील स्वयंपुनर्विकास होणार आहे. तसेच सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन काढावे आणि हे अभियान मुंबई पुरते न राहता नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या ठिकाणी जावे व गरिबाला घर मिळावे यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असल्याचे दरेकरांनी सांगितले. आशिष शेलार आपण मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहात. मुंबईचे अध्यक्ष आहात. तुम्ही पुढाकार घेतलात आणि माझ्या खांद्याला खांदा लावून आपलाही आशीर्वाद या स्वयंपुनर्विकासाला लाभला तर मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी माणसाला चांगले घर मिळू शकते. सर्वार्थाने मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास महत्वाचा आहे. हे अभियान आणखी ताकदीने पुढे जावे यासाठी पालकमंत्री म्हणून आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही दरेकर यांनी यावेळी आशिष शेलार यांना केली.

सानपाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

नवी मुंबई : नवीन मुंबई सानपाडा येथील सेक्टर ८ च्या हुतात्मा बाबू गेनू सैद गणेश मैदानावर  गणेश जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सानपाडा  मंडळाच्या वतीने २६ जानेवारी ते २ फेब्रुवारीच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. आळंदीचे ह.भ.प. श्री. महादेव महाराज पैठणकर यांचे काल्याचे किर्तन झाले. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान  ह. भ. प. श्री.  अनिल महाराज पाटील,  ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज निंबोळे,  ह. भ. प. श्री. शंकर महाराज मोरे, ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे, ह. भ. प. श्री. देवेंद्र महाराज निढाळकर, ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज शिंदे,  ह.भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज काकडे,  या मान्यवर महाराजांची आध्यात्मिक ज्ञानदानाची किर्तनरुपी सेवा झाली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ. प. श्री. बाळू महाराज औटी व  ह. भ. प. श्री. मनोहर महाराज लांडे यांनी केले, तर दैनंदिन पूजा व्यवस्था सर्वश्री. रघुनाथ कवडे, ज्ञानेश्वर डोंगरे, शरद घोलप, अशोक घाडगे यांनी केली. या कार्यक्रमासाठी अनेक भाविकांनी देणगी देऊन  सहकार्य केले. भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजनबद्ध  असा सुंदर कार्यक्रम झाला. अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन करण्यात आले होते.