माझी जीभ खुशाल कापा पण, भाजपाला एक्सपोज करणारच काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचे भाजपाला चँलेंज मुंबई : अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, भाजपाचा पर्दाफाश करतच राहणार असे चँलेंजच आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला २ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकर्यांचे अमेरिकेतून होणार्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल, चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा. सपकाळ पुढे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची किर्ती महान आहे, चंद्र जसा वाढत जातो तशीच महाराजांची किर्ती आणखी वाढत जावी, याबाबत दुमत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाने माझ्या विधानाचा “ध” चा “मा” करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, यामागचे कारस्थान समजून घेतले पाहिजे. एपस्टिन फाईल्समध्ये बरंच काही दडलेलं आहे, त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करणे हा एक भाग आहे तर अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्थ होणार आहे, महाराष्ट्रातही अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यावर भाजपा सरकारकडे उत्तर नाही म्हणून या प्रश्नांवर भाजपाला पडदा टाकायचा आहे, यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
अजित पवारांच्या अपघातग्र्स विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ?
अजित पवारांच्या अपघातग्र्स विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ? मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीतून दरदिवशी संशयास्पद घटना उघडकीस येत आहेत. आता अजित पवारांच्या अपघातग्र्स्त विमानातील ब्लॅकबॉक्स बंद होता अशी माहिती पुढे येत आहे. विमानातील तांत्रिक अडचणींची माहिती देणाऱ्या ब्लॅक बॉक्सबाबतही अनेक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असल्याचा दावा काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. तसंच, तपासणीसाठी हे ब्लॅक बॉक्स आता विदेशात पाठवला जाणार आहे, असंही म्हटलं जातंय. दरम्यान, यावर रोहित पवारांनीही आता शंका उपस्थित केलीय. ते म्हणाले, “ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. अतुल लोंढे म्हणतात त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स बंद केला असेल तर खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून आता एक कारण लोकांमध्ये पेरलं जात आहे. ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. पण ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे चौकशी करता येत नसेल तर मी म्हणतोय त्याप्रमाणे हा अपघात नव्हता, हा घातच होता हे क्लिअर होईल.”
पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा
पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी १७ फेब्रुवारीला एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत असून मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान दुपारी २.१५ वाजता मुंबईत येणार आहेत. त्यानंतर, दुपारी २.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात लोकभवन (यापूर्वीचे राजभवन) येथे द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. त्यानंतर, दुपारी ५ वाजता नरेंद्र मोदी आणि मॅक्रोन यांची हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंडटेबल चर्चा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया‘ परिसरात इंडो–फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संतापजनक: मढयाच्या टाळूवरील लोणी खाणारे ते अधिकारी कोण ?
संतापजनक: मढयाच्या टाळूवरील लोणी खाणारे ते अधिकारी कोण ? अजितदादांच्या निधनानंतर काही तासातच त्यांनी रोखलेल्या ७५ फाईलांना संशयास्पद मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल फडणवीसांनी दिली मंजुरीला स्थगीती स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित…
मेट्रो- ४ च्या स्लॅब दुर्घटनेप्रकरणी अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रावर कारवाई कधी करणार ?
खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल मुंबई : मेट्रो ४ चा मुलुंड भागातील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेत आतापर्यंत फक्त उपकंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना…
आठ दिवसांत अहवाल सादर करा – सभापती प्रा. राम शिंदे
माझगाव ताडवाडीतील बी.आय.टी. चाळ पुनर्विकास प्रकरणी २१ वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे मुंबई: माझगाव ताडवाडी येथील बी.आय.टी. चाळ पुनर्विकास प्रकरणी म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिका, विकासक व सर्व संबंधित अधिकाऱ्यांची महानगरपालिका…
दिलीप सुखटनकर व मिलिंद पूर्णपात्रे यांना राज्य उपविजेतेपद
योनिक्स सनराईज महाराष्ट्र मास्टर राज्य बॅडमिंटन स्पर्धा मुंबई: योनिक्स सनराईज महाराष्ट्र मास्टर राज्य बॅडमिंटन स्पर्धा ही प्रतिष्ठेची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच बॉम्बे जिमखाना येथे उत्साहात पार पडली. या…
दादर दणाणलं, खो-खोचा जंगी महायुद्ध सुरू!
कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धा पुरुष गटात पश्चिम रेल्वे वि बृहन्मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ इंडिया वि महाराष्ट्र पोष्ट; महिला गटात थरारक साखळी सामने मुंबई : दादरच्या कै. अजितदादा पवार…
वडाळा येथे राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा महिला व पुरुष संघ होणार सहभागी
मुंबई, दि. (प्रतिनिधी): येत्या शनिवार २१ व रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे महिला व पुरुष क्लासिक राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. योगेश गुंड,…
पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न
पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन रमेश औताडे मुंबई : राजगुरुनगर येथे कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक, पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. ढसाळांच्या जयंतीदिनी आयोजन केले होते. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात झाली. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे, संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे, स्वागताध्यक्ष प्रकाश शितोळे, ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण, बाजार समिती सभापती व जि.प.सदस्य ॲड. विजयसिंह शिंदे, काव्यसंमेलनाध्यक्ष अनंत धनसरे, राजगुरुनगर सह बँकेचे मा.अध्यक्ष दिनेश ओसवाल, राजेंद्र सांडभोर, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील थिगळे , कवयित्री ललिता सबनीस, दिलीपराव माशेरे, संतोष ताम्हाणे, बबनराव काटकर, कनेरसरच्या सरपंच सुनीताताई केदारी,प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे, सुरेश क्षीरसागर, बाळासाहेब खरपुडे, कल्याणी पवार, संदीप म्हसुडगे तसेच साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सतत तीन वर्षे नामदेव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन आयोजित करून कुलस्वामिनी साहित्य परिषद व निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांच्या कार्याचे कौतुक केले. नामदेवराव ढसाळ यांनी विद्रोही साहित्यातून केलेली निर्मिती अलौकिक असून त्याचा वारसा जतन करून वाचनसंस्कृती जतन ठेवण्याचे कार्य उल्लेखनीय आहे असे मत व्यक्त केले. संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी प्रास्ताविक करताना केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या असून पुढील वर्षी साहित्य संमेलन गडकरींच्या आग्रहास्तव नागपुर येथे होणार असे जाहीर केले. तसेच वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी साहित्य संमेलन आयोजित करीत असल्याचे नमुद केले. संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे यांनी नामदेवराव ढसाळ यांचा जीवनपट मांडला. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, सभापती विजयसिंह शिंदे, साहित्यिक म.भा.चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. जालिंदरनगर जि.प.शाळेचे दत्तात्रय वारे गुरूजी, अंबिका देवस्थान ट्रस्ट साबळेवाडी, सोनाली पवार, नीलेश घोडके, ॲड समीर गोडसे, बाळासाहेब चौधरी, विजयकुमार दाते, महेश लोखंडे, द्वारका सेवासदन व गुरुकुल व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विविध विषयांवरील कविता राज्यातून आलेल्या कवींनी सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले. आभार कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टाव्हरे यांनी मानले.
