Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

ठाणे मनपाचा ६,२२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

ठाणे मनपाचा ६,२२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करवाढ नाही, विकासाला गती – सौरव राव सिद्धेश शिगवण ठाणे: ठाणे महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत सादर केला. सुमारे ६ हजार २२१ कोटी १२ लाख रुपयांचा हा अर्थसंकल्प असून, यंदाही नागरिकांवर कोणतीही नवीन करवाढ करण्यात आलेली नाही, ही विशेष बाब ठरली आहे. हा अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर आयुक्तांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात येणार असून शहराच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.रस्ते विकास, आरोग्य सेवा बळकटीकरण, उद्यानांचे सुशोभीकरण तसेच नाट्यगृहांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ ठाणेकरांना २०२७ अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता विकास साधण्यावर भर देण्यात आला आहे. पर्यायी महसूल स्रोतांचा वापर करून आर्थिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच, शहराच्या विकासासाठी काही प्रमाणात महसूल वाढ आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी शासन निधी आणि खाजगी लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महापालिकेवर सुमारे ३३ कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक असून, २०२६-२७ मध्ये सुमारे ६२ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्ज उभारण्याचे नियोजन आहे. याशिवाय केंद्र शासनाकडून मागील दोन वर्षांत बिनव्याजी अर्थसहाय्यही उपलब्ध झाले आहे. दरम्यान, अमृत २.० योजनेअंतर्गत पाणीपुरवठा विस्तार आणि तलाव संवर्धनासाठी ५५५.१६ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी २५ टक्के आणि महापालिकेचा ५० टक्के हिस्सा राहणार आहे. महापालिकेच्या वाट्याचे सुमारे २७७ कोटी रुपये म्युनिसिपल बॉण्ड किंवा कर्जाद्वारे उभारण्याचे नियोजन आहे. तसेच शाश्वत पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन आणि क्लस्टर योजनेसाठीही म्युनिसिपल व ग्रीन बॉण्ड उभारले जाणार आहेत. या अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त, महसुली उत्पन्न वाढ, आरोग्य व शिक्षणातील गुंतवणूक, पर्यावरण संरक्षण, हरित ठाणे संकल्पना, वाहतूक सुधारणा आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला आहे. महापालिका शाळांचा दर्जा उंचावणे, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग कल्याण योजनांना गती देणे, तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत तृतीयपंथीयांसाठी शौचालयांची उभारणी करण्याचाही समावेश आहे.एकूणच, कोणतीही करवाढ न करता विकासाला गती देणारा आणि नागरिकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

रोहीत पवारांचा ‘लेटरबॉम्ब’

रोहीत पवारांचा ‘लेटरबॉम्ब’ राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रफुल पटेल. तटकरेंनी निवडणूक आयोगालाच लिहीले होते पत्र मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत आज लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ…

खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवारांबाबत ‘मौनव्रत’

खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवारांबाबत ‘मौनव्रत’ मुंबई : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी  स्थापन करण्यात आलेल्या विकास खारगे समितीचा  तब्बल ४ हजार ३९२ पानांचा जंबो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. या अहवालात कुणालाही स्पष्टपणे क्लीन चिट देण्यात आलेली नाही, पार्थ…

महाराष्ट्रात चाललंय काय ?

महाराष्ट्रात चाललंय काय ? झिरवळ हे वागणं बरं नव्हं माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांचे सेक्सकांड ० सरकारी बंगल्यात तृतीयपंथीसोबत शय्यासोबत आणि ‘दारू’बाजी ० पवन यादव या तृतीयपंथीविरोधात त्याच्या भावानेच केला भांडाफोड ०…

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा 0 विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२ हजार रुपये ०  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार ० हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान  ० सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

सेक्स, सौंदर्य,सत्ता आणि संपत्ती भोंदूगिरीचे चार खांब !

सेक्स, सौंदर्य,सत्ता आणि संपत्ती भोंदूगिरीचे चार खांब ! सेक्स, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती हे मनुष्य जातीचे कायम आकर्षण केंद्र राहिले आहे आणि संपूर्ण आयुष्य त्याचे याच्या भोवती फिरत असते. यापैकी…

 शिक्षणातील गंभीर प्रश्नांवर २६ मार्चला साखळी उपोषण

पेंढारकर कॉलेज व सिस्टर निवेदिता स्कूल प्रकरणी चौकशीची मागणी कल्याण: डोंबिवलीतील के. व्ही.  पेंढारकर कॉलेज व सिस्टर निवेदिता स्कूल तसेच संबंधित ट्रस्टच्या कार्यपद्धतीबाबत विविध गंभीर प्रश्न समोर येत असून, या संदर्भात निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी ‘Save Education Society’ अंतर्गत साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेतील अनियमितता, विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भातील प्रश्न, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकतेचा अभाव, तसेच शैक्षणिक संस्थांच्या वापराबाबत निर्माण झालेल्या शंका या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात येणार आहे. या सर्व बाबींवर संबंधित प्राधिकरणांकडून सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. हे साखळी उपोषण गुरुवार, २६ मार्च  रोजी के.व्ही. पेंढारकर कॉलेज समोर आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व रोहिदास सुरवसे करत असून, हा लढा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी व शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 00000000

ठाण्यातील गॅस सिलेंडर पुरवठ्याचा महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा

ठाणे : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थ‍ितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीत घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध साठा तसेच वितरण व्यवस्था याबाबतचा सव‍िस्तर आढावा घेण्यासाठी महापौर शर्मिला…

केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत ‘टीबी मुक्त भारत अभियान २.०’ ची सुरुवात

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त १०० दिवसांची विशेष मोहीम- निक्षय मित्रांचा होणार सत्कार कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘टीबी मुक्त भारत अभियान २.०’ अंतर्गत १०० दिवसांच्या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाद्वारे शहरातील क्षयरोगाचे उच्चाटन करून “टीबी मुक्त कल्याण-डोंबिवली” हे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जागतिक क्षयरोग दिना निमित्त रुक्मिणीबाई रुग्णालय येथे विशेष जनजागृती पर कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी रुग्णासाठी पोषण आहार वाटप तसेच MDR रुग्णाकरिता विशेष PFT आणि XRAY तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ  कल्याण, रोटरी क्लब ठाणे जिल्हा ३१४२ आणि आय एम ए कल्याण यांच्यावतीने एकूण २१० क्षय रुग्णांना पोषण आहार किट यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी आणि उपचार पूर्ण करावा शिवाय भारत सरकारतर्फे  राबविण्यात येणाऱ्या या पुढील शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन आयएमए प्रेसिडेंट डॉ सुरेखा इटकर यांनी  केले. या कार्यक्रमावेळी बाई रुक्मिणी बाई रुग्णालय यांच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुलक्षणा त्रिभुवन,डॉ गणेश डोईफोडे , शहर क्षयरोग अधिकारी डॉ पौर्णिमा ढाके, चेस्ट फिजिशियन डॉ श्रेयस गोडबोले, डॉ रुतिका भोसले, डॉ धाकतोडे इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या दीप्ती दिवाडकर, डॉ चिटणीस, एड नीता कदम आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार दरवर्षी २४ मार्च हा दिवस क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. १८८२ साली डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात विविध जनजागृती उपक्रम, आरोग्य शिबिरे, तसेच तपासणी व उपचार सुविधा राबविण्यात येणार आहेत. २४ मार्च पासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुढील १०० दिवस निरनिराळे कार्यक्रम राबवून क्षयारोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेत  घराघरांत जाऊन संशयित रुग्णांचा शोध घेणे. मोफत कफ तपासणी व एक्स-रे सुविधा, निदान झालेल्या रुग्णांना तत्काळ उपचार सुरू करणे, उपचार पूर्णत्व दर वाढवण्यासाठी विशेष पाठपुरावा, उच्च जोखमीच्या भागांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहेत. क्षयरोग निर्मूलनासाठी “निक्षय मित्र” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह तसेच नागरिकांनी टीबी रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार, मानसिक आधार व आवश्यक मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निक्षय मित्रांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. शासनाच्या “निक्षय पोषण योजना” अंतर्गत टीबी रुग्णांना उपचार कालावधीत दरमहा ₹१०००/- आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे रुग्णांच्या पोषण स्थितीत सुधारणा होऊन उपचार परिणामकारक होण्यास मदत होते. “क्षयरोग हा संसर्गजन्य पण पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी व उपचार पूर्ण करावेत. तसेच ‘निक्षय मित्र’ बनून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा.” असे आवाहन या वेळी महापालिकेतर्फे करण्यात आले. 0000000

 पियुष कनोजियाचे २ धावांत ६ बळी

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा ठाणे : पियुष कनोजियाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने गोदरेज स्टाफ क्लबचा सात गडी राखून दणदणीत पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट…