Author: bittambatami.com

फुगाळे येथील २५ ते ३० कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित असल्याची तक्रार

अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून दर महिन्याला सुमारे २५ ते ३० शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.विशेषतःमे आणि जून २०२६ या दोन महिन्यांचे धान्य अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी शहापूर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली आहे. गावातील शिधापत्रिकाधारकांनी सांगितले की, शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांसाठी वितरित करण्यात येणारे धान्य हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र फुगाळे येथील रास्त भाव दुकानातून अनेक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळा दुकानावर जाऊनही धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते किंवा विविध कारणे देऊन लाभार्थ्यांना परत पाठविले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील काही रेशनधारकांनी प्रत्यक्ष धान्य मिळत नसल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित प्रशासनाकडे पाठविला आहे. या व्हिडिओमध्ये लाभार्थी आपली व्यथा मांडताना दिसत असून अनेक कुटुंबांना धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील अनेक मजूर कुटुंबांना नियमित रोजगार उपलब्ध झालेला नाही. शेतीची कामे अद्याप पूर्णपणे सुरू नसल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत.अशा परिस्थितीत शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य हेच अनेक कुटुंबांसाठी जगण्याचा आधार ठरत असते.मात्र हे धान्य वेळेवर मिळत नसल्याने संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कामकाजाची तातडीने चौकशी करण्यात यावी, मे व जून २०२६ चे थकीत धान्य त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावे आणि भविष्यात कोणतेही कुटुंब धान्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यात यावी. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम राहावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ००००००००००० ००००००००

 शहापुरात बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

 २४ जण पोलिसांच्या ताब्यात, ५६  हजार ६५  रुपयांची रोकड जमा ठाणे :शहापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जुगार अड्डे , मटके  आदी अवैद्य बाबींचा  सुळसुळाट वाढला असल्याचे दिसून येते. पोलीस अधीक्षक (ठाणे ग्रामीणचे) डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे शहापुरातील  स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून शहापूर शहरातील सावंत विहार,कोकणी स्वाद हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या २४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ हजार ६५ रुपये  रोख व जुगार खेळण्याचे साहित्य तसेच तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. शहापूर तालुक्यातील कसारा,किन्हवली,वाशिंद, शहापूर आदी पोलीस ठाण्याच्य हद्दीत बेकायदेशीर धंदे तसेच अवैध भंगार व्यवसाय देखील वाढले असल्याचे दिसून येत आहेत. जुगार व मटके यांना शालेय विद्यार्थी बळी पडत आहेत. या सर्व गोष्टींचा शालेय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरच्या कारवाईत ठाणे पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनयकुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, पोलीस उपनिरीक्षक निरंजन पाटील, पोलीस शिपाई सचिन बोडके, एस.एस.गायकवाड, आर.टी.निवांगुने, आर. एस. मस्करे, एम.आर.तडवी, चालक पोलीस शिपाई ए.पी. हिलगुडे आदींच्या सहभाग होता. तालुक्यातील बेकायदेशीर धंदे कायमचे बंद करण्याचे काम पोलिसांनी हाती घ्यावे अशी जनतेची मागणी आहे.

मुंबई पोर्टमध्ये इंदिरा गोदीच्या खाजगीकरणाविरुद्ध कामगारांची तीव्र निदर्शने

मुंबई : केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या  खाजगीकरणाच्या धोरणानुसार मुंबई पोर्ट प्रशासनाने २१ जानेवारी २०२६ रोजी इंदिरा गोदीच्या खाजगीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावानुसार जून २०२६ पासून इंदिरा गोदीचे दोन…

 शिशिर रॉयसह अन्य बोगस डॉक्टरांवर गुन्हे

देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई संयुक्त पथकाची लवकरच धडक दिवा : बारा वर्षीय देवेंद्र आशिष सिंग यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करत धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संस्थापक अमोल धनराज केंद्रे आणि मुंब्रा शहराध्यक्ष युसुफ जंगबारवाला यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करताना डॉ. प्रसाद पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी बंगाली डॉक्टर शिशिर रॉय यांच्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी एका डॉक्टरवरही गुन्हा नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा आणि माजिवडा परिसरात कार्यरत असलेल्या अन्य बोगस डॉक्टरांविरोधातही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बोगस मेडिकल दुकाने तसेच अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवरही प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बोगस पॅथॉलॉजी लॅबविरोधातील कारवाईबाबत शासनाकडून आदेश अथवा पत्र प्राप्त होताच आरोग्य विभाग तातडीने पावले उचलेल, असे आश्वासनही डॉ. पाटील यांनी दिले. तसेच देवेंद्र सिंग यांच्या आई-वडिलांचे जबाब नोंदविल्यानंतर पोलीस तपास पूर्ण करून मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर योग्य ते गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (एफडीए), आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून बोगस डॉक्टर, बोगस मेडिकल दुकाने आणि इतर अनधिकृत वैद्यकीय व्यवसायांवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने मृत देवेंद्र आशिष सिंग यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच आरोपी शिशिर रॉय यांची मालमत्ता जप्त करून ती रक्कम पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देवेंद्र सिंग यांच्या मृत्यूमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. ०००००

– दिव्यातील सचिन पंडितचे दैदिप्यमान यश

नगरसेवक शैलेश पाटील यांच्या हस्ते गौरव दिवा: ग्लोबल इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थी सचिन पंडित याने एसएससी परीक्षेत ९५.८० टक्के गुण मिळवत दिवा शहरात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शैलेश पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यास शाळेचे विश्वस्त महेंद्र दळवी, प्राचार्या ज्योत्स्ना सोनी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सचिनच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि अभ्यासाप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले. मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या सचिनने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळविले. शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्याने आपल्या कुटुंबासह दिवा शहर आणि ग्लोबल इंग्लिश स्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि शाळा व्यवस्थापनाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. शाळा व्यवस्थापनाने सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त केले. सचिन पंडित याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून, कठोर मेहनत, सातत्य आणि समर्पणाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्याने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. ०००००००००

– विद्यालंकार मुंबई महानगर योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

– आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ ची संकल्पना “Yoga for Healthy Ageing” (निरोगी वृद्धत्वासाठी योग) ही सर्व वयोगटांतील व्यक्तींना निरोगी, सक्रिय आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेरणा…

न्यू इंग्लिश स्कूलच्या शतक महोत्सवाचा समारोप १५ जूनला

 गडकरी रंगायतन येथे होणार भव्य सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे ठाणे : पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, राम मारुती रोड, ठाणे या ऐतिहासिक शाळेच्या शतक महोत्सवी…

जि. प. बांधकाम विभागात ‘साहेबा’च्या खोट्या सह्या करून काढली लाखोंची बिले!

 ‘त्या ‘ठेकेदारांना काळ्या  यादीत टाकणार…! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या बोगस स्वाक्षऱ्या करून अनेक कामांची लाखो रुपयांची बिले परस्पर काढल्याचा प्रकार उघडकीस आला असून हे प्रकरण दडपण्यासाठी आता जिल्हा परिषदेचे  काही पदाधिकारीच  पुढे सरसावले असल्याचे समजते. हे प्रकरण उघडकीस येताच या गंभीर प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून गुन्हे दाखल न करता हे प्रकरण परस्पर  मिटविण्यासाठी कांही पदाधिकारी प्रशासनावर दबावही  आणत आहेत असे समजते. विविध  विकास कामांवर जिल्हा परिषद कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करते जि. प.चा स्वनिधी, जिल्हा नियोजनच्या  माध्यमातून येणारा निधी, आमदार खासदार निधी याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होत असतो विकास कामे विविध विभागांची असली तरी बांधकाम विभागामार्फतच ही कामे केली जातात. अंदाजपत्रक तयार करणे त्याला मंजुरी देऊन निविदा जाहीर करणे प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देणे कामे प्रत्यक्ष सुरू करणे आणि ती पूर्ण करून घेणे तसेच झालेल्या बिलांची कामे झालेल्या कामांची बिले काढणे ही सर्व प्रक्रिया बांधकाम विभागामार्फत केला जातात या विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या शहीनेच स्वाक्षरीनेच ठेकेदारांची अंतिम बिले काढली जातात. मात्र गेल्या काही वर्षात विशेषता प्रशासकाच्या कारकीर्दीत असे बोगस व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहिती नुसार १५ ते २० कामांची बिले दोन -तीन ठेकेदार आणि एक ठेकेदार कम एजंट यांनी बांधकाम विभागातील काही कर्मचारी, लेखा अधिकारी आणि अभियंत्यांच्या सहाय्याने कार्यकारी अभियंत्याच्या खोट्या सह्या करून लाखो रुपयांची बिले परस्पर काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. जि प बांधकाम विभागात टक्केवारी दिल्याशिवाय कोणतेच काम मार्गी लागत नाही आणि केलेल्या कामाचा मोबदलाही मिळत नाही हे सर्वश्रुत आहे.आणि म्हणूनच या  साखळीतील संबंधित सर्वांचे भागवल्याशिवाय बिल मंजूरच होणार नाही हे अनेक ठेकेदारांना आता   पक्क माहित  झालं आहे. या भागवा -भागवीत बिलांवर अंतिम सही करणारा कार्यकारी अभियंता हा सर्वात मोठा वाटेकरी असतो. अर्थात हे सर्व त्या त्या कार्यकारी अभियंत्यावर आणि त्याच्या मागणीवर अवलंबून असतो मोठ्या साहेबांनी वाजवी स्वरूपात आपला वाटा मागितला तर ठीक, जर त्याने मोठे तोंड उघडले तर मात्र ठेकेदाराचे नफा-तोट्याचे गणित बिघडते. कार्यकारी अभियंत्याच्या बोगस सह्या करण्याचा प्रकार हा त्यातूनच घडला असावा अशी चर्चा आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपल्या सहकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले असून या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर  कारवाई करण्याच्या  सूचना दिल्या आहेत. बांधकाम विभागातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणातील काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे समजते. तसेच बांधकाम आणि वित्त विभाग या दोन्ही विभागांच्या कारभारावर  लक्ष ठेवण्यासाठी लवकरच त्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात येणार असल्याचे समजते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी कालपर्यंत आग्रही भूमिका घेणारे काही पदाधिकारी आता ‘बॅकफूट’वर आले असून हे प्रकरण मिटविण्याच्या  दृष्टीने कामाला लागले असल्याचे समजते.

माथेरान वीजवितरण विरोधातील मनसेचे उपोषण मागे

मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मधील सातत्याने गायब होत असल्यामुळे माथेरान मनसे पक्षाकडून येथील राम चौक येथे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते परंतु कर्जत विभागीय अभियंते चंद्रकांत केंद्रे यांनी लेखी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. माथेरान येथे सातत्याने गायब होत असलेल्या वीजे मुळे येथील स्थानिक व्यावसायिकांच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला होता त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये वीज वितरण कार्यालयाबाबत त्रिव्र नाराजी व्यक्त केली जात होती त्यामुळेच माथेरान नवनिर्माण सेनेचे माथेरान शहर प्रमुख संतोष कदम यांनी वीज वितरणाला सेवा अखंडित करण्याकरिता इशारा दिला होता परंतु या काळात वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याने आज त्यांनी माथेरान येथील श्रीराम चौक येथे आमरण उपोषण चालू केले होते परंतु त्यांच्या सर्व मागण्या या माननीय करण्यात आले होते व त्याचे लेखी पत्र अभियंते केंद्रे साहेब यांनी त्यांना दिल्यानंतर मात्रांचे नगराध्यक्ष  चंद्रकांत चौधरी यांच्या हातून ज्यूस घेत त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

नाले सफाईची हाथसफाई करणाऱ्या ठेकेदाराची पालिका अधिकाऱ्याला धमकी

ठेकेदाराविरोधात  पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून कामाचे बिल अदा करू नये स्थायी समिती सदस्यांची  मागणी कल्याण : कल्याण पूर्वेतील पालिकेच्या नाले सफाई कामाच्या ठेकेदाराने नाले सफाई किती याची कोणतीच माहिती संबंधित विभागाच्या…