Author: bittambatami.com

नगरसेविका लता ढेबे यांच्याकडून फुलांच्या रोपांची लागवड

मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या पेमास्टर उद्यानात विद्यमान नगरसेविका लता ढेबे यांच्या माध्यमातून  स्वखर्चाने विविध प्रकारच्या फुलांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.माथेरान मधील सर्वात उंच ठिकाणी हे उद्यान असून काही वर्षांपासून इथे फुलांची झाडे नाहीत. अनेकदा नगरपरिषदेच्या कार्यालयात रोपे पुरविण्याबाबतीत कळविण्यात आलेले असताना अद्यापही काहीच हालचाली दिसत नाहीत. अखेरीस नगरसेविका लता ढेबे यांनी गुलाब, जास्वंद, पिंपळ, बेल अशाप्रकारे विविध रोपे आणून स्वतः रोपण केले आहे. या उद्यानात पर्यटक विश्रांतीसाठी येत असतात. त्यासाठी हे उद्यान कायमस्वरूपी विविध फुलांच्या सुगंधांनी बहरलेले असावे जेणेकरून पर्यटकांना आकर्षित करू शकेल.यासाठी संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्गातील अनैतिक धंद्यांना पोलीस अधिक्षक दहीकर यांचाच आशीर्वाद…!

आमदार निलेश राणे यांचा थेट आरोप..! दोडामार्ग-गांजाचे ग्रीन कॉरिडोर…! सिंधुदुर्ग : (राजन चव्हाण )– जिल्ह्यातील अनैतिक धंदे वाढण्यास जिल्हा पोलीस अधिक्षक मोहन दहीकर हेच जबाबदार असून अशा भ्रष्ट,निष्क्रिय अधिकाऱ्याची जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी जाहीर मागणी शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी आज येथे एका भरगच्च पत्रकार परिषदेत केली. अगदी अलिकडेच राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत जिल्ह्यातील मटका,जुगार, बेकायदा दारू धंदे, बनावट दारू वाहतूक, अमंली पदार्थांची वाहतूक आदी सर्व प्रकारचे अनैतिक धंदे फोफावण्यास सिंधुदुर्गचे पोलीस अधिक्षक मोहन दहीकर हेच  जबाबदार असून त्यांच्याच आशीर्वादाने  हे सर्व सुरू आहे असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील पोलीस दलात आणि अनैतिक धंदेवाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आमदार निलेश राणे हे आज सकाळी ११ वा.जिल्हा मुख्यालयातील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेणार असे काल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र एकच चर्चेचा विषय होता आणि तो म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेत  जिल्हा पोलीस यंत्रणेवर विशेष करून पोलीस अधिकक्षकांवर राणे  कोणता ‘बॉम्ब’ टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक दहीकर यांच्या गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाच आहे  शिवाय जिल्ह्यातील अनैतिक धंदेही मोठ्या प्रमाणावर वाढले आणि पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटले असा थेट आरोप राणे यांनी केला. जिल्ह्यातील अनैतिक धंदेवाल्यांकडून दरमहा किमान सव्वा दोन ते अडीच कोटी रुपये इतका किमान ‘हप्ता’ जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला जातो असा खळबळजनक आरोपही राणे यांनी यावेळी केला. हा आकडा जास्तही असू शकतो असे सांगून राणे  म्हणाले, बीट हवलदार, संबंधित पोलीस ठाणे, ‘एलसीबी’ आणि पोलीस अधिक्षक अशी ही थेट साखळी असून याच माध्यमातून हा हप्ता दरमहा गोळा केला जातो. लवकरच आपण जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, गृह खाते सांभाळणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या नजरेस आणणार असल्याचे सांगून असा भ्रष्ट, निष्क्रिय, बेजबाबदार अधिकारी पोलीस सेवेतही असता नये असे आपले मत असल्याचे राणे म्हणाले. राणे यांनी दहीकर यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळातील पोलीस यंत्रणेच्या गैरकारभराचे अनेक दाखले देत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून अनैतिक धंदेवाले, गुन्हेगार, यांना आता पोलिसांचा धाकच उरला नाही असा आरोप केला. याच कालावधीत जिल्ह्यात सुमारे ११०० ते १२०० गुन्ह्यांची नोंद झाली मात्र त्यापैकी २० टक्केच गुन्ह्यांमध्ये आरोपी दोषी ठरले. ‘दोषसिद्धी’चा हा दर लक्षात घेतला तर ८० टक्के गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून भ्रष्ट मार्गाने तडजोडी केल्या जात असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला. गोव्यातून मुंबईकडे व राज्याच्या अन्य भागात होणाऱ्या अनधिकृत दारू वाहतुकी विरुद्ध सिंधुदुर्ग पोलिसांनी किती कारवाई केली याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती देण्यात टाळाटाळ करण्यात आली मात्र गेल्या दीड वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात किती दारू पकडली आणि त्याची किंमत काय याची आकडेवारीच राणे यांनी जाहीर करून पोलिसांच्या आशीर्वादानेच ही दारू सिंधुदुर्गातून पुढे गेली असा आरोप राणे यांनी केला. गोव्यात जवळपास दररोज गांजा नेमका कुठून येतो हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता मात्र या प्रश्नाचे धक्कादायक उत्तर आज राणे यांनीच दिले त्यांच्या म्हणण्यानुसार दोडामार तालुक्यात रबर लागवडीच्या नावाखाल शेकडो हेक्टर जमिनीवर गांजाची बेकायदा शेती केली जात आहे. हे पोलिसांना दिसत नाही का..? त्यांनी काय कारवाई केली याचे उत्तर मिळाले पाहिजे अशी मागणी राणे यांनी केली  दरम्यान दहीकर हे गेले आठ दिवस प्रशिक्षणासाठी बाहेर असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

विधान परिषद आचारसंहितेमुळे केडीएमसी आयुक्तांचा लोकशाही दिन रद्द

००००००० कल्याण : सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या, तक्रारी यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील  आयुक्त महोदयांच्या दालनात  लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. तथापि महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक -२०२६ चा कार्यक्रम जाहीर झाला असून १८ मेपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे   सोमवार १ जून रोजी कल्याण महानगरपालिकेत संपन्न होणारा लोकशाही दिन, ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची वार्षिक निवडणूक- २०२६ची आचारसंहिता शिथिल होईपर्यंत महापालिकेत होणार नाही. याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असे महानगरपालिका प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

ऑनलाइन करभरणा सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच नवी मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटी मालमत्ता कर वसूल नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुरू असलेल्या मालमत्ता करवसूली…

H- दिवसाप्रमाणे रात्रीही उष्णतेचा कहर

 कल्याण-डोंबिवलीत रात्रीच्या सर्वाधिक ३०.४ सेल्सिअस तापमानाची नोंद कल्याण डोंबिवलीसह मुंबई एमएमआरमध्ये रात्रीचे १३ वर्षांतील विक्रमी तापमान कल्याण : एकीकडे दिवसा सूर्यदेव अक्षरशः आग ओकत असताना दिवसाप्रमाणेच आता रात्रीच्या तापमानावरही त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे. मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये गेल्या १३ वर्षांतील रात्रीचे सर्वाधिक तापमान २९ मे २०२६ म्हणजेच काल नोंद झाले असून कल्याण डोंबिवली हे रात्रीच्या तापमान वाढीचे हॉट स्पॉट ठरल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा उष्णतेचा प्रभाव केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश  आणि उत्तर कोकण पट्ट्यात जाणवला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, अंबरनाथ, विरार, कर्जत आणि कर्जत परिसरात गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक उष्ण रात्रींपैकी काही रात्रींची यावर्षी नोंद झाली आहे. हवामान तज्ज्ञ अभिजीत मोडक यांच्या मते वातावरणातील वाढलेला आर्द्रतेचा स्तर, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी वाहणारे वारे यामुळे दिवसभर साचलेली उष्णता वातावरणात सहजपणे विरून जात नाही. परिणामी रात्रीचे तापमान अपेक्षेप्रमाणे खाली येत नसल्याने नागरिकांना दिवसाप्रमाणे रात्रीही प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उत्तर कोकणातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान हे २९ अंशांच्या वर राहिले. कल्याण-डोंबिवली येथे सर्वाधिक ३०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पनवेल-पलावा ३०.३ अंश, बिरवाडी ३०.२ अंश, अंबरनाथ-विरार ३०.१ अंश आणि ठाणे-नवी मुंबईमध्ये ३० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हवामानाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे  सक्रिय होईपर्यंत अशाच प्रकारच्या उष्ण आणि दमट रात्रींचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, आवश्यक तेवढाच बाहेरचा प्रवास करणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे. ०००००००

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

अहिल्यानगर : माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत…

बांधकाम कामगारांची सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

नवी मुंबई महापालिका व क्रेडाई-बीएएनएमतर्फे विशेष जागरूकता शिबिर नवी मुंबई : विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धन आणि कामगार सुरक्षा यांनाही समान महत्त्व दिले पाहिजे. मजबूत बांधकाम, ग्रीन बिल्डिंग, जलसुरक्षा आणि ऊर्जा बचत यांच्याबरोबरच बांधकाम क्षेत्रातील…

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबई : येत्या ७ जून रोजी गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा आयोजित ‘पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन’ संपन्न होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा गझलकार गोपाल मापारी यांची…

भाटाळे तलावावरील अतिक्रमणे हटवून तलावाचे संवर्धन करण्याची भाजपची मागणी

 केडीएमसी सभागृह नेते वरुण पाटील यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यालगत असलेल्या ऐतिहासिक भाटाळे तलावावरील अतिक्रमणे हटवून तलावाचे संवर्धन करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली असून याबाबत केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे वरुण पाटील यांनी याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना देखील पत्र देऊन या तलावाच्या संवर्धनासाठी प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी केली आहे. कल्याण शहर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेले प्राचीन शहर असून, येथील दुर्गाडी किल्ला व परिसर हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. दुर्गाडी किल्ल्यालगत असलेला भाटाळे तलाव हा देखील शहराच्या ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या तलावाच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली, असून तलावाचे मूळ क्षेत्र कमी होत चालले आहे. तलावाच्या काठावर अनधिकृत बांधकामे, भराव टाकणे, कचरा टाकणे व इतर बेकायदेशीर उपक्रमांमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक वारशाचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाटाळे तलावाची अधिकृत हद्द व क्षेत्रफळ अभिलेखांनुसार निश्चित करण्यात यावे. तलाव परिसराचे संयुक्त मोजमाप करून सर्व अतिक्रमणांची यादी तयार करण्यात यावी. तलावावरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी. तलावाभोवती संरक्षक भिंत/कंपाऊंड उभारण्यात यावे. तलावाचे सुशोभीकरण, संवर्धन व पुनरुज्जीवन करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात यावा. भविष्यात कोणतेही नवीन अतिक्रमण होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. तलावाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचा “वारसा स्थळ” म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. भाटाळे तलाव हा केवळ जलस्त्रोत नसून कल्याण शहराच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे ही महानगरपालिकेची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी केली आहे.

स्वयंघोषित मोडी भाईची पोलिसांनी जिरवली 

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील रोहिदास वाडा आणि आसपासच्या परिसरात स्वतःला भाई म्हणवून घेत नागरिकांमध्ये आणि तरुणांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अभिषेक निंबोळकर उर्फ ‘मोडी भाई’ची पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. निंबोळकरच्या मुसक्या…