Author: bittambatami.com

अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात सभापतींवर कारवाई का नाही?

 सय्यद आफरीन यांचा भाजपला प्रश्न मिरा -भाईंदर : काशीमिरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांचे सख्खे भाऊ राजेश चव्हाण यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या दुसऱ्या भावाचे नावही तक्रारीत समोर आले आहे. या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन म्हणाल्या की, “महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या समितीच्या सभापतींच्या निकटवर्तीयांवर अशा गंभीर स्वरूपाचे आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे महिला व बालकल्याण समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी आणि समितीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सभापतींनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा.” तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सन्मान व सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी दिला आहे. ०००००००००

भिसेगाव दिशेकडील तिकीट खिडकी आता दोन शिफ्टमध्ये सुरू

– कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांचे विशेष प्रयत्न  कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश अशोक गायकवाड कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, भिसेगाव बाजूच्या तिकीट बुकिंग खिडकीचे कामकाज शनिवारपासून दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून, तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून कर्जत रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनकडून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना लांबच लांब रांगा, वेळेचा अपव्यय आणि तिकीट मिळवण्यासाठी होणारा त्रास यामुळे ही मागणी अधिक जोर धरत होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अखेर सकारात्मक निर्णय घेतला आहे. यासाठी कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे. या नव्या व्यवस्थेमुळे भिसेगाव परिसरातील तसेच स्थानकाच्या त्या बाजूने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे. तिकीट बुकिंग खिडकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : पहिली शिफ्ट : सकाळी ६.३० ते दुपारी २.३० ️ जेवणाची वेळ : दुपारी १२.१५ ते १२.३५ हिशोबाची वेळ : दुपारी २.३० ते २.४५ ️ दुसरी शिफ्ट : दुपारी २.४५ ते रात्री १०.३० ️ जेवणाची वेळ : रात्री ८.४० ते ९.०० या निर्णयामुळे कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत केले जात आहे.

विविध संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ लागू करा – सिटु

नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणी ठेंगोडा  यांच्यातील कामगारांना पेन्शन सुरू करण्याबाबत व एचपी गॅस कंपनीतील कंत्राटी कामगारांचे वेळेवर पीएफ कायद्यानुसार पीएफ लागू करा अशी मागणी सिटूचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबर, जिल्हा…

ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये १५ जूनला विद्यार्थ्यांचे होणार जल्लोषात स्वागत

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सोमवार, १५ जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी महानगरपालिकेच्या…

एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्ताही वाढवणार – प्रताप सरनाईक

ठाणे- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता…

– ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी पहिल्या दिवशी जुने बूट व गणवेशात!

 निविदा प्रक्रियेला विलंब, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांची नाराजी ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसाबरोबरच पहिल्या महिन्यात जुने बूट व गणवेशावरच शाळेत यावे लागणार आहे. आचारसंहिता व निधीच्या कारणावरून गणवेशाची निविदा प्रक्रिया राबविण्यास उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. या प्रकाराबद्दल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी महापालिकेच्या शाळांमधील सुमारे २४ हजार विद्यार्थ्यांना बूट, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गणवेश मिळणे आवश्यक असते. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी नव्हे तर जून महिन्यातही गणवेश व बूट मिळणार नाहीत. यापूर्वी सातत्याने महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश उशीरा मिळत होते. मात्र, गेल्या वर्षी प्रशासनाने मेच्या पंधरवड्यात निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, यंदा निविदा प्रक्रिया रखडली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणूक व अर्थसंकल्प मंजुरीच्या कारणामुळे निविदा प्रक्रिया रखडल्याचे कारण प्रशासनाकडून अनौपचारिकरित्या दिले जात आहे. मात्र, त्यावर ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी तीव्र नाराजी केली. महापालिकेच्या शाळा दरवर्षी १५ जूनच्या सुमारास सुरू होणे अपेक्षित असते. त्यानुसार प्रशासनाने गणवेशाची निविदा प्रक्रियेची तयारी सुरू करण्याची आवश्यकता होती. अर्थसंकल्पाला मंजुरी नसल्याचे कारण सांगण्यात येत असले, तरी ते चुकीचे आहे, असे मत संजय वाघुले यांनी व्यक्त केले. दरम्यान, येत्या १८ जून रोजी होणाऱ्या महासभेत प्रशासनाने दोन वर्षांसाठी गणवेश पुरवण्यासाठी निविदा मागविण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. चौकट ७२ ब अन्वये गणवेशाचा प्रस्ताव का मांडला नाही? आतापर्यंत झालेल्या चार महासभांमध्ये महापालिकेने शेकडो प्रस्ताव ७२ ब अन्वये मंजूर केले आहेत. गणवेशासाठीचाही प्रस्ताव ७२ ब अन्वये सादर केला असता, तर त्याला सर्वपक्षीय मंजुरी मिळाली असती. त्यामुळे गणवेश निविदा प्रक्रिया रखडण्यासाठी प्रशासन दोषी आहे, असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. 000000000

वेतनाच्या विलंबामुळे कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर काही तासांत आंदोलन मागे कल्याण : वेळेवर वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी खंबाळपाडा परिसरातील हजेरी शेडवर कामबंद आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम झाला आणि हजेरी शेडवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा काम सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील काही  प्रभागांच्या स्वच्छतेचे कंत्राट सुमित एल्कोप्लास्ट कंपनीला दिले आहे. या कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ठरावीक तारखेला वेतन दिले जाते. मात्र, यावेळी वेतन मिळण्यास झालेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी कामबंद आंदोलन छेडले. काही तास चाललेल्या आंदोलनानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग, ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत तोडगा निघाला. वेतन तातडीने देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा स्वच्छता कामाला सुरुवात केली. याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले की, बँकिंग प्रक्रियेतील तांत्रिक कारणामुळे वेतन देण्यास एका दिवसाचा विलंब झाला. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराला कडक सूचना देण्यात आल्या असून, पुन्हा अशी निष्काळजीपणा झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

१९ वर्षाच्या अन्यायाविरोधात रहिवाशांचा म्हाडा कार्यालयावर मोर्चा

मुंबई / रमेश औताडे म्हाडा न्यू पीएमजीपी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मुलुंड (पूर्व) येथील १,३९९ सभासदांचा पुनर्विकास प्रकल्प सन २००७ पासून सुरू असून, तब्बल १९ वर्षे उलटूनही हा प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. आजही ६०६सदनिका व ४७ दुकाने म्हाडा प्रशासनाकडून बांधून पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पातील रहिवासी व सभासद गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या हालअपेष्टा सहन करीत आहेत. गेल्या वर्षभरापासून बाधित रहिवासी सभासदांनी म्हाडा मुख्यालय, बांद्रा येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व उपाध्यक्ष (VP) यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळ देण्यात येत नव्हती. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत जनकल्याण रहिवासी विकास समितीच्या वतीने ९ जूनला म्हाडा मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे २५० हून अधिक बाधित रहिवासी सभासद सहभागी झाले होते. तसेच छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक मा. नामदेवराव जाधव व समितीचे कायदेशीर सल्लागार यांनी या आंदोलनास मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने नागरिक म्हाडा कार्यालयात दाखल झाल्याचे समजताच, नागरिकांच्या भेटीचा दिवस असतानाही संबंधित वरिष्ठ अधिकारी कार्यालयातून निघून गेले. तसेच प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या नागरिकांना इमारतीमध्ये प्रवेश करण्यासही मज्जाव करण्यात आला. यानंतर मा. नामदेवराव जाधव  यांच्या उपस्थितीत काही प्रतिनिधी सभासदांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून बाधित रहिवासी सभासदांची बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात येईल, असे जनकल्याण रहिवासी विकास समितीला आश्वासन देण्यात आले.

 दिवंगत अजित पवार प्रकरणी आझाद मैदानात उपोषण

 रमेश औताडे मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित अलीकडील घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते जगदीश कुमार इंगळे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. इंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संबंधित घटनेमागील वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष तपासणी होऊन सत्य समोर आणावे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, संबंधित घटनेबाबत अधिकृत तपास यंत्रणांकडून कोणताही अंतिम निष्कर्ष जाहीर झालेला नसल्याने, घातपात किंवा अन्य कोणत्याही कारणांबाबत निश्चित दावा करण्यात आलेला नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकले नाही असे सांगत बिगर सातबारा शेतकरी संघटनेने या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बासरीवादक राकेश चौरसिया यांना प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

मुंबई, ११ जून : प्रख्यात बासरीवादक आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते राकेश चौरसिया यांना २०२४-२५ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय रंगकला आणि संगीत क्षेत्रातील हा…