Category: होम

आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : रामदास आठवले

आरक्षण हा संविधानिक अधिकार, वंचित घटकांना अधिक संधी देण्याची गरज अनिल ठाणेकर ठाणे : देशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी…

ठाण्यात मंगळागौरीच्या उत्साहाची नजाकत

– स्नेहा सखी गटाला राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिल ठाणेकर ठाणे : पारंपरिक खेळांना आधुनिकतेची जोड देत शेकडो महिलांनी ठाण्यात मंगळागौरीचा उत्सव उत्साहात साजरा केला. युवतींसह मध्यमवयीन महिलांनी सादर केलेल्या मंगळागौरीच्या…

 कराडमध्ये खो-खोच्या पंचगिरीला आधुनिकतेचा ‘टच’

राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न डिजिटल स्कोअरिंगपासून ऑडिओ-व्हिज्युअल प्रशिक्षणापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराड, ता. २६ : खो-खो आता केवळ मैदानावर वेगाने धावणारा खेळ राहिलेला नाही; पंचगिरीपासून स्कोअरिंगपर्यंत संपूर्ण व्यवस्थेलाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. कराडमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिरातून महाराष्ट्राच्या खो-खोला अधिक अचूक पंचगिरी, डिजिटल स्कोअरिंग आणि आधुनिक तांत्रिक व्यवस्थेचा नवा अध्याय मिळाला आहे. नियमांच्या बारकाव्यांपासून निर्णयक्षमतेपर्यंत झालेल्या या प्रशिक्षणामुळे राज्यातील पंचगिरीला नवी धार मिळणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, द ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशन (सांगली) आणि सद्गुरू गाडगे महाराज (एसजीएम) कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. एसजीएम कॉलेजच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील सभागृहात झालेल्या समारोप सोहळ्याने शिबिराची सांगता झाली. राज्यभरातून सहभागी झालेल्या पंचांना आधुनिक नियम, तांत्रिक बाबी आणि सामन्यातील निर्णयप्रक्रियेचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पीपीटी आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर. सामन्यातील गुंतागुंतीचे प्रसंग प्रत्यक्ष दृश्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्याने पंचांना अचूक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान अधिक प्रभावीपणे मिळाले. त्यामुळे पंचगिरीत अचूकता, सातत्य आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. समारोपावेळी एसजीएम कॉलेजच्या शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी खो-खोच्या इतिहासाचा आढावा घेत अशा प्रशिक्षणामुळे पंचांची निर्णयक्षमता अधिक अचूक व दर्जेदार होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. रविंद्र (भाऊ) पवार यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला खो-खो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने पोहोचत असल्याचे सांगितले. संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी खो-खोच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी संघटनेच्या आधुनिक उपक्रमांची माहिती दिली. गुणलेखन अर्थात स्कोअरिंग डिजिटल व ऑनलाइन पद्धतीकडे नेण्याची प्रक्रिया सुरू असून, सामन्यांची नोंद, गुणपत्रिका आणि निकाल अधिक वेगवान व अचूक करण्यावर भर दिला जात आहे. एसजीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. जे. खिलारे यांनी सहभागी पंचांच्या उत्साहाचे कौतुक केले. विशेष म्हणजे संपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणाचा आवाका प्रत्यक्ष सहभागी पंचांपलीकडे खो-खोच्या व्यापक क्षेत्रापर्यंत पोहोचला. यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा, सांगली असोसिएशनचे अध्यक्ष गौरव नायकवडी, उपाध्यक्ष अर्जुन माने आणि कार्याध्यक्ष डॉ. समीर शेख उपस्थित होते. सहभागी पंचांसाठी एसजीएम कॉलेजतर्फे उत्कृष्ट भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन प्रा. सचिन चव्हाण यांनी केले, तर डॉ. प्रशांत इनामदार यांनी आभार मानले. कराडचे हे शिबिर केवळ पंचांचे प्रशिक्षण ठरले नाही, तर महाराष्ट्राच्या खो-खोला आधुनिक, अचूक आणि तंत्रस्नेही बनविणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात ठरले. खेळाडूंच्या गुणवत्तेसोबत पंचगिरी, डिजिटल स्कोअरिंग आणि तांत्रिक व्यवस्थाही सक्षम झाली, तर महाराष्ट्राचा खो-खो देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक भक्कमपणे झेप घेईल. 0000

भारतमाता चौक नामकरणासाठी १५ वर्षांची लढाई यशस्वी…

भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले यांच्या वतीने आभार ठाणे : शिवाईनगर, देवदयानगर येथील मुख्य चौकाला भारतमाता चौक असे नाव देण्यासाठी सुमारे १५ वर्षांपासून सुरू असलेल्या हिंदू संघटनांच्या प्रयत्नांना यश आले आहे. भाजपचे नगरसेवक सिताराम राणे यांच्या प्रयत्नाने अखेर या चौकाच्या नामकरणाचा ठराव मंजूर झाला. त्याबद्दल भाजपचे  शिवाईनगर-वसंत विहार मंडल अध्यक्ष राकेश चौगुले यांच्या वतीने सिताराम राणे यांचा, तर भाजप अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल नताशा सोनकर यांचा सत्कार करण्यात आला. शिवाईनगर, देवदयानगर परिसरातील चौकात अनेक वर्षांपासून १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी भारतमातेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असते. या चौकाचे भारतमाता चौक असे नामकरण करावे, अशी मागणी सातत्याने भाजप, हिंदूत्ववादी संघटना आणि राष्ट्रप्रेमी संघटनांकडून केली जात होती. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती. महापालिकेच्या निवडणुकीत या भागातून नगरसेवकपदी भाजपचे सिताराम राणे यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी याबाबत पाठपुरावा सुरू केला. या संदर्भात महापालिकेत प्रस्ताव सादर केल्यानंतर नुकत्याच झालेल्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे या चौकाला लवकरच भारतमाता चौक असे नाव देण्यात येणार आहे. या कार्याबद्दल भाजप शिवाईनगर-वसंत विहार मंडलाचे अध्यक्ष राकेश चौगुले यांनी नगरसेवक सिताराम राणे यांचा सत्कार केला. तसेच नागरिकांच्या वतीने आभार मानले. येऊर, उपवन भागात अनेक वर्षांपासून भाजपचे संघटनात्मक आणि आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या नताशा सोनकर यांची नुकतीच भाजप अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाली. त्याबद्दल त्यांचाही राकेश चौगुले यांनी सन्मान केला. या कार्यक्रमाला भाजप पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी भारतमातेच्या विजयाचा जयजयकार करण्यात आला.

 साउथ मुंबईचा मुंबई स्नायपर्सवर निसटता विजय

बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग मुंबई, २६ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित आणि नॉर्थ मुंबई डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनच्या विद्यमाने खेळवल्या जाणाऱ्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई पर्वात गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर…

आज राष्ट्रवादी (श.प.) क्लस्टर कार्यालयावर धडक देणार – मनोज प्रधान

अनिल ठाणेकर ठाणे :  शहरात क्लस्टर योजना राबविण्यासाठी “क्लस्टर विकास कंपनी” ला ठाणे महानगर पालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरूवारी हजारो ठाणेकरांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तीन हात नाका ते कशीश पार्क येथील क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली. खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणे ठरविण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आला आहे. यापुढे क्लस्टर डेव्हलपमेंट बाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार सदर कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार आहे. तसेच, ठाणे महानगर पालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा देखील हा अपमान आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखविल्यासारखे झाले आहे, असा आरोप करीत डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या यांच्या उपस्थितीत मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेण्यात येणार आहे. याबाबत मनोज प्रधान म्हणाले की,  या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मूलभूत प्रश्नांना हात घालणार आहोत. या शहरात 4 हजार एकरवर बांधकाम केले जाणार आहे. त्यांना १२.५ चा एफएसआय कोणत्या आधारावर दिला जात आहे? या बांधकामानंतर ठाण्यात किती घरांची निर्मिती होणार आहे? ठाण्यात किती लोक वास्तव्यास येतील? त्यांना पाणीपुरवठा कसा करणार? सांडपाणी आणि मलनिस्सारण याचे नियोजन कसे करणार? जर मालकी हक्काची घरे दिली जाणार आहेत तर ३० वर्षांचे करार का केले जात आहेत. मोठी घरे असणाऱ्यांनाही ३२३ चौरस फुटाचीच घरे देऊन पुढील आकारमानासाठी दर आकारणी का केली जाणार आहे? वाणिज्य वापराच्या सदनिकांना १८० चौरस फुटाच्या पुढे दर का आकारले जाणार आहेत? घरांच्या खालील जमिनीची मालकी ठाणे महानगर पालिकेकडेच का असणार आहे? आदी प्रश्न आम्ही विचारणार आहोत, असे प्रधान म्हणाले. दरम्यान, या मोर्चात किमान ३ हजार ठाणेकर नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मोर्चानंतरही क्लस्टर कंपनी रद्द करून नियोजनपूर्वक विकास केला नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही प्रधान म्हणाले.

 ‘हा धर्मवीर ठाण्याचा’ गीतातून आनंद दिघेंना सुरांची आदरांजली

स्मृतिदिनाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गीताचे अनावरण अनिल ठाणेकर ठाणे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत त्यांच्या कार्याला आणि विचारांना सुरांची आदरांजली वाहणारे ‘हा धर्मवीर ठाण्याचा…’ हे गीत साकारण्यात आले असून, या गीताचे अनावरण शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी यावेळी खासदार नरेश मस्के, ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख सचिन दाने,सदाशिव गव्हाणे उपजिल्हाप्रमुख,अंकुश नाना कुंभार शहरप्रमुख, सतीश पाटील संघटक, बालाजी पवार, गट प्रमुख भगवान शिंदे, शुभम लोखंडे युवासैनिक, नितीन कांबळे, विशाल कोल्हे.व सर्व लातूर जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे धर्मवीर आनंद दिघे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जात. सामान्य नागरिकांशी असलेला जिव्हाळा, सामाजिक कार्य, हिंदुत्वाची भूमिका आणि शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी त्यांनी केलेले कार्य आजही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी मानले जाते. दिघे साहेबांच्या याच कार्याची आणि विचारांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हे गीत तयार करण्यात आले आहे. शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांच्या संकल्पनेतून ‘हा धर्मवीर ठाण्याचा…’ या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. दिघे साहेबांच्या कार्याचा वारसा आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे. भगव्याचा स्वाभिमान, शिवसेनेची निष्ठा आणि दिघे साहेबांप्रती असलेली शिवसैनिकांची भावना या गीतातून व्यक्त करण्यात आली आहे. या गीताला विक्रम कोतवाड यांनी आवाज दिला असून विनायक राठोड यांनी संगीतबद्ध केले आहे. गीतलेखन महादेव ढमने यांनी केले असून, व्ही ट्यून्स संगीत स्टुडिओ, लातूर येथे संगीतनिर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाला शिवसेना सचिव संजय मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. ‘हा धर्मवीर ठाण्याचा…’ हे गीत लवकरच स्पॉटिफाय, जिओसावन आणि यूट्यूब म्युझिक यांसह विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रदर्शित होणार आहे. दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त साकारण्यात आलेले हे गीत त्यांच्या कार्याला वाहिलेली भावपूर्ण संगीतात्मक आदरांजली ठरणार असून, त्यांच्या आठवणी आणि विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठाण्यात समृद्ध मराठी परंपरेतील

मंगळागौरीच्या उत्साहाची नजाकत! भाजप व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम, वृषाली वाघुले यांचे आयोजन ठाणे : जुन्या काळातील पारंपरिक पद्धतीबरोबरच बदलत्या काळानुसार नाविन्यपूर्ण पद्धतीने बदल करीत शेकडो महिलांनी मंगळागौरीचा उत्सव साजरा केला. युवती बरोबर मध्यमवयीन महिलांनी एकत्र येत अपूर्व समन्वय साधत मांडलेल्या मंगळागौरीच्या खेळांमुळे समृद्ध मराठी परंपरेच्या उत्साहातील नजाकत रसिकांना अनुभवता आली. निमित्त होते भाजप व विश्वास सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने, दरवर्षी गडकरी रंगायतनमध्ये भाजप व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे मंगळागौरी स्पर्धा भरविले जाते. मराठमोळ्या सणांबरोबरच पिढ्यान पिढ्या सुरू असलेल्या संस्कृतीची युवा पिढीला ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. या स्पर्धेला राज्याच्या विविध भागातून महिलांनी उपस्थिती दर्शविली. सकाळी साडेदहापासून सुरू झालेला हा उत्सव सायंकाळी ७ पर्यंत सुरू होता. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले यांनी आयोजित केलेल्या उत्सवात मंगळागौरीचे खेळ साजरे केले जात असतानाच, पारपंरिकतेबरोबरच सामाजिक संदेश आणि जनजागृतीवर भर दिला गेला. या उत्कंठावर्धक स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्नेहासखी गटाने ३१ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस मिळाले. तर नवी मुंबईतील रुचिरा गटाने २१ हजारांसह द्वितीय, डोंबिवलीतील साझ ह्यो तुझा गटाने ११ हजार रुपयांचे तृतीय, करीरोड येथील शिवाई गटाने ५ हजार रुपयांचे चतुर्थ आणि डोंबिवली येथील मराठमोळ्या गटाला २५०० रुपये मिळाले. या कार्यक्रमाला भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, माधुरी मेटांगे, जिल्हा सरचिटणीस समीरा भारती, विक्रम भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, युवा मोर्चा अध्यक्ष समर्थ नायक, मंडल अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेच्या नियोजनासाठी ज्ञानेश्वर अंदुरे, जगदीश मोहिते, प्रशांत कळंबटे, आकाश गोसावी, बाळकृष्ण शिंपी, वसंत वाघुले, हनीफ खान, भक्ती मोहिते, राणी क्षीरसागर, पूजा सरवदे, वैशाली विधाटे, शिल्पा उतेकर, मधुरा जोगळेकर, भाग्यश्री मुळे, भंडारे काकी यांनी प्रयत्न केले. 0000

देशातील पहिला अंतराळ संशोधन मेळावा महाराष्ट्रात

रमेश औताडे मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने भारतातील पहिल्या भव्य अंतराळ संशोधन मेळावाची घोषणा उद्योग मंत्री उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. हा मेळावा अंतराळ, विज्ञान आणि सायन्स-फिक्शन वर आधारित असणार आहे. असे सामंत यांनी सांगितले. मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. अंतराळ क्षेत्रातील ज्ञान, नवकल्पना, गेमिंग आणि मनोरंजन यांना एकाच व्यासपीठावर आणून महाराष्ट्रातील स्पेस-टेक स्टार्टअप्सना जागतिक गुंतवणूकदार व तज्ज्ञांशी जोडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.असे न नोडविण गेमिंग चे संस्थापक अक्षत राठी यांनी सांगितले. जागतिक तज्ज्ञांची चर्चासत्रे, सायन्स-फिक्शन गेमिंग झोन, स्पेस तंत्रज्ञान प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष शाळा-कॉलेज उपक्रम आयोजित केले जातील. असे आय ए एस डॉ. पी. अनबलगन, आय ए एस दीपेंद्रसिंग कुशवाह  आणि प्रिमस पार्टनर्सच्या आरती हरभजंका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या निश्चित तारखा लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.

नाशिकमध्ये कुंभमेळा रामकुंडात, मग आमच्या जमिनी कशासाठी?

शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल हरिभाऊ लाखे नाशिक : कुंभमेळा व साधुग्रामच्या नावाखाली प्रशासन नांदूर, टाकळी परिसरातील सुपीक शेतजमिनी अन्यायकारकपणे ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मागील अडीच दशकांत डीपी रोड, छत्रपती संभाजीनगर रस्ता, साधुग्राम व सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) यासाठी घेतलेल्या, वापरलेल्या जागांचा मोबदला अद्याप दिला नसल्याची तक्रार करीत साधुग्राम शेतकरी कृती समितीने साधुग्रामसाठी नव्याने जागा देण्यास ठाम विरोध दर्शविला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने नाशिक, नांदूर व टाकळी शिवारातील सुमारे एक हजार एकर जमीन साधुग्रामसाठी तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या विरोधात साधुग्राम शेतकरी कृती समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देत शेतकऱ्यांची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी अपर तहसीलदार अमोल निकम यांच्यासमोर संबंधित शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी सुरू झाली. यावेळी जमीन मालकी, शेती, कुटुंबाची उपजीविका आणि अधिग्रहण संबंधी हरकतींशी संबंधित कागदपत्रे शेतकऱ्यांनी सादर केली. कुंभमेळा रामकुंडात भरतो. आमच्या सुपीक जमिनींचा कुंभमेळ्याशी काहीच संबंध नाही. वर्षानुवर्षे आम्ही शेती करीत असून प्रशासन मनमानीपणे नोटिसा देऊन मोजण्या करीत आहे, असा आरोप शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष समाधान जेजुरकर आणि शेतकऱ्यांनी केला. यापूर्वी विविध कारणांसाठी आमच्या ताब्यात घेतलेल्या, वापरलेल्या जमिनींचे पैसे थकवून नवीन विकास आराखड्यातील (डीपी) जमिनींसाठी मात्र प्रशासनाने ९०० कोटी रुपयांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला. प्रशासनाने थकीत पैसे न दिल्यास सातबारा उताऱ्यावर आमची नावे असून ऐन कुंभमेळ्यात जमिनींवर ताबा घेऊन खोदाई केली जाईल, असा इशाराही जेजुरकर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला. प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी पूर्ण होईपर्यंत संबंधित जागेवर जैसे थे परिस्थिती कायम ठेवली जाणार असल्याचे म्हटले आहे. तात्पुरत्या अधिग्रहणातील मूल्यांकन व अर्जदारांनी न्यायालयात मांडलेल्या सर्व मुद्यांवर सविस्तर सुनावणी घेतली जाईल. नागरिकांच्या शंका, समस्या व कायदेशीर हरकतींचा सहानुभूतीपूर्वक व कायदेशीर चौकटीत विचार केला जाणार असल्याचे प्रशासकीय वर्तुळातून सांगण्यात आले. गोदावरी काठावर दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू-महंतांच्या निवासासाठी नाशिकमध्ये साधुग्राम वसविण्यात येते. २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात सुमारे १६१८ एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्याचे प्रस्तावित आहे. यातील तपोवन परिसरातील सुमारे ३१८ एकर जागा साधुग्रामसाठी आरक्षित असून यावेळी ती कायमस्वरूपी संपादित केली जाणार आहे. याव्यतिरिक्त लागणारी सुमारे १२५० एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात घेतली जाणार आहे. नव्याने जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. मागील २०१५ च्या कुंभमेळ्याच्या वेळी साधुग्रामसाठी जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. सिंहस्थ संपल्यानंतर या जमिनी पुन्हा शेतीयोग्य करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र प्रत्यक्षात खडी, मुरूम, सिमेंट, दगड, पाइप आदी साहित्य पूर्णपणे काढून जमीन पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने अनेक जमिनी पुन्हा शेतीसाठी योग्य राहिल्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा हजारो एकर सुपीक व बागायती जमीन अधिग्रहित केल्यास शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होईल, अशी भूमिका समितीने घेतली आहे.