Category: मुंबई

Mumbai news

ग्राहकांच्या तक्रारींमध्ये स्मार्ट मीटरमुळे मोठी घट

मुंबई :राज्यात महावितरणतर्फे आतापर्यंत १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडींग होते. राज्यात स्मार्ट मीटरचे प्रमाण वाढल्यानंतर ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी खूप कमी झाल्या आहेत.…

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपचे पाटील – कथोरे आमनेसामने

ठाणेः ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन महत्वाच्या नेत्यांमधील वाद ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजपचे मुरबाड विधानसभा…

प्रसिध्द रील स्टार प्रेम भाटी यांचा खडीवर दुचाकी घसरून मृत्यू

कल्याण : कल्याण जवळील मोहने येथील प्रसिध्द रील स्टार प्रेम भाटी (३०) यांचा शनिवारी मध्यरात्री मोहने येथील आपल्या घरी दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर पडलेल्या खडीवर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू…

पाऊस लांबल्याने शहापूरमध्ये तीव्र पाणीटंचाई

धरणांचा तालुका असलेल्या शहापूरमध्ये पाण्यासाठी रणकंदन कसारा: मुंबई, ठाणे आणि कल्याणची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा पाऊस लांबल्याने पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. भातसा, तानसा, वैतरणा आणि मध्य वैतरणा या महाकाय धरणांच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींना मात्र घोटभर पाण्यासाठी डोंगर-दऱ्या तुडवत मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. एकीकडे प्रकल्पांसाठी लाखो लिटर पाणी सहज उपलब्ध होत असताना दुसरीकडे तहानेने व्याकूळ झालेल्या आदिवासींच्या वाट्याला कोरडी घागर आणि प्रशासनाची उदासीनता आली आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या योजनांमुळे आणि पाऊस उशिरा पडल्याने शहापूरमधील पाणीटंचाई आता मानवी संकटात रूपांतरित होत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूरमध्ये शेकडो गावे आणि पाड्यांतील नागरिकांना उन्हाळा सुरू होताच पाण्यासाठी डोंगर-दऱ्या पालथ्या घालाव्या लागतात. विहिरी, कुपनलिका, ओढे आणि नदीपात्रे कोरडी पडल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुले मैलोनमैल चालत पाण्याचा शोध घेत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, टंचाई निवारणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. २००८ पासून मंजूर असलेल्या अनेक नळपाणी पुरवठा योजना आजही भ्रष्टाचार, दिरंगाई आणि निष्क्रियतेच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. परिणामी, धरणांच्या उंबरठ्यावर राहणाऱ्या आदिवासींच्या नशिबी आजही पाण्यासाठीची वणवण कायम आहे. एका बाजूला नागरिक घोटभर पाण्यासाठी त्रस्त असताना दुसऱ्या बाजूला मोठ्या रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांसाठी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिकांच्या मते, रोज तीन ते चार लाख लिटर पाणी विविध प्रकल्पांकडे वळवले जात असताना प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे. गरीब आदिवासींना पाणी मिळत नसताना प्रकल्पांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. टंचाईग्रस्त भागात बांधण्यात आलेले अनेक बंधारे निकृष्ट कामांमुळे पाणी साठवण्यात अपयशी ठरत आहेत. पाटबंधारे आणि वन विभागाने दुरुस्ती केलेल्या काही बंधाऱ्यांमध्येही पाणी टिकत नसल्याने ते कोरडे पडले आहेत. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांवर खर्च झालेला निधीही वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. कळभोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच जया सोमनाथ वाख म्हणाल्या, मुंबईकर धरणातील शुद्ध पाण्याचा आनंद घेत आहेत; पण धरणालगत राहणाऱ्या आम्हाला पाणीही मिळत नाही. हा आमच्या नशिबी आलेला अन्याय आहे. यंदा हवामानातील बदल आणि एल निनोच्या परिणामामुळे पाणीस्रोत झपाट्याने आटत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या योजनांमुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहापूरमधील आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न आजही जैसे थे आहे. धरणांच्या कुशीत राहूनही तहानेने होरपळणाऱ्या या नागरिकांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यात मिळाला तरुणांना रोजगार

 नगरसेविका रेश्मा निचळ यांचा उपक्रम कल्याण : शिवसेना, ताठे स्टाफिंग आणि के. सोपानराव निचळ फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात कल्याण पूर्वेतील अनेक बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळाला. केडीएमसीच्या प्रभाग क्र. ११ च्या शिवसेना नगरसेविका रेश्मा निचळ आणि विभाग प्रमुख किरण निचळ यांच्या वतीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी निचळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या असून १०वी, १२वी,  आयटीआय, डिप्लोमा तसेच सर्व शाखांच्या पदवीधर उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याठिकाणी थेट मुलाखत घेऊन त्वरित निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये अनुभवी  आणि फ्रेशर या  दोघांसाठीही संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच आलेल्या उमेदवारांना  करिअर बाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले. यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले असून सोमवार पासून ते कामाच्या ठिकाणी रुजू देखील होणार आहेत. या रोजगार मिळालेल्या युवकांनी नगरसेविका रेश्मा निचळ आणि विभाग प्रमुख किरण निचळ यांचे आभार मानले.

फटका गँगच्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केली अटक

कल्याण : शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या अमरावती एक्सप्रेसमध्ये प्रवाशाच्या हातावर बांबूने फटका मारून त्याचा महागडा मोबाईल पाडून चोरी करणाऱ्या फटका गँगच्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या…

नगरपालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने अलेक्झांडर हॉटेलमध्ये विनापरवाना कामांना वेग !

मुकुंद रांजाणे माथेरान : धनाढ्य मंडळींनी बिनधास्तपणे अव्वाच्या सव्वा बांधकामे करा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशीच काहीशी भूमिका बजावत माथेरान नगरपालिका प्रशासन अधिकारी आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या सत्तेतील ज्या…

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉलचे वाटप

रायगड -अलिबाग : (अशोक गायकवाड )—अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील पादत्राणे दुरुस्ती व्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक व्यवसाय करता यावा या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या गटई स्टॉल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील…

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्यासाठी केडीएमसी महापौर, आयुक्तांची पाहणी

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याची मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, नगरसेविका अनघा देवळेकर…

१५ जूनला नवी मुंबईत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व शुभारंभ

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवा बळकटीकरणांतर्गत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, नवी मुंबईच्या महापौर सुजाता…