Category: मुंबई

Mumbai news

आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा

आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा मुंबई-आरंभ स्पोर्टस आणि मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने   २१ व २२ फेब्रुवारी मोरया मित्र मंडळ मैदान, चारकोप, कांदिवली (पश्चिम), येथे मल्लखांब स्पर्धा  आयोजित करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत…

 ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर

६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील जलतरणपटू सज्ज मुंबई (क्री. प्र.) : अथांग अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटांवर जलतरणपटूंच्या जिद्दीचा आणि साहसाचा थरार अनुभवण्याची वेळ आली असून, प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ‘६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी दिमाखात पार पडणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणाऱ्या या महास्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे. जलतरणपटूंच्या जिद्दीला आणि समुद्राच्या लाटांना आव्हान देणारी ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून धाडस, चिकाटी आणि कौशल्याचा उत्सव ठरणार आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात होणाऱ्या या महास्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जलतरणप्रेमींचे लक्ष लागले असून, शेकडो खेळाडू समुद्राच्या लाटांवर आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऐतिहासिक परंपरेचा जलतरण महोत्सव : प्रतिष्ठित संस्थांच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन ‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) यांच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक स्पर्धेचे नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद माने आणि सरचिटणीस राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंनी रविवारी सकाळी ७:३० वाजता रिपोर्टिंग करणे आवश्यक असून, प्रत्यक्ष शर्यतीची सुरुवात साधारणपणे १०:३० ते ११:३० या वेळेत होणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना सकाळी ९:०० वाजता बोटीने प्रस्थान करणे अनिवार्य आहे. तीन अंतरांच्या आव्हानात्मक शर्यती विविध वयोगटांसाठी १ किमी, २ किमी आणि ५ किमी अंतरांचा थरार या सागरी स्पर्धेत जलतरणपटूंना त्यांच्या क्षमतेनुसार १ किमी, २ किमी आणि ५ किमी अशा तीन अंतरांच्या शर्यतींमध्ये सहभागी होता येणार आहे.…

आशियातील धारावी कोळीवाड्यात शिवजन्मोत्सव उत्साहात

आशियातील धारावी कोळीवाड्यात शिवजन्मोत्सव उत्साहात रमेश औताडे मुंबई : आशिया खंडात नावाजलेल्या धारावीतील कोळीवाडा परिसरात हिंदू धर्म रक्षक युवा हिंदुत्व संघटनेच्या वतीने शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळीवाडा होळी मैदान येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. गड-किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांचा प्रमुख सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे डबेवाले, शिवसेनेचे धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, शाखाप्रमुख किरण काळे, नवनिर्वाचित नगरसेवक जोसेफ कोळी, नगरसेविका अर्चना शिंदे, मनसेचे धारावी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सोनावणे तसेच धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिटकर यांची विशेष उपस्थिती होती. कोळीवाडा येथून सुरू झालेली मिरवणूक संत कक्कया मार्ग, कामराज हायस्कूल ९० फीट रोड, संत रोहिदास मार्ग, धारावी मेन रोड मार्गे पुन्हा होळी मैदान येथे विसर्जित झाली. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष कौशिक कोळी, समीर भोईटे यांनी केले. “कोणताही पक्ष नाही, एकच झेंडा तोही भगवा” हाच उद्देश होता.

 ‘मुंबई ड्रम डे २०२६’ची रंगीत तालीम; जागतिक दर्जाचे कलाकार एकत्र

‘मुंबई ड्रम डे २०२६’ची रंगीत तालीम; जागतिक दर्जाचे कलाकार एकत्र मुंबई : तालवाद्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘मुंबई ड्रम डे २०२६’ या विशेष संगीत मैफिलीपूर्वी जागतिक दर्जाचे कलाकार मरीन ड्राइव्ह येथे रंगीत…

भांडुपमधून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत झाला नगरसेवक

भांडुपमधून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत झाला नगरसेवक अनिल ठाणेकर मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भांडुप गावातील प्रभाग क्रमांक  १११ मधून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सीएमई विभागातून जून १९९१ साली सेवानिवृत्त झालेले श्री. राजाराम विष्णू (सावंत ) देसाई, चार्जमन, लोको शेड यांचा मुलगा दीपक सावंत हा शिवसेना ( उबाठा ) पक्षातून नगरसेवक  म्हणून निवडून आला आहे. पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला म्हणून त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने  हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली साधारण ३२ वर्षांपूर्वी दीपक सावंत यांना शिवाजी नगर, शिवडी, मुंबई पोर्ट ट्रस्ट कॉलनी वडाळा या प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी नक्की झाली होती. पक्षाचा AB अर्ज मिळाला होता. त्यामुळे पोर्ट ट्रस्ट  वसाहतीमधील रहिवाशांना खूप आनंद झाला.  कॉलनीत मिरवणूक, फटाके, ढोल ताशे वाजू लागले. पोर्ट ट्रस्ट कॉलनी मध्ये आनंद पसरला. पोर्ट ट्रस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाला उमेदवारी मिळाली म्हणून घराघरात आनंद झाला.घराघरातून ओवाळणी झाली. फुलांच्या अक्षता पडल्या. परंतु हा आनंद रहिवाशांना जास्त मिळाला नाही. पक्षात चक्र फिरली. की फिरवली.  दुसऱ्या दिवशी उमेदवारी फिरवली गेली. संपूर्ण वसाहत शोक सागरात बुडाली. जणू काही सुतक पडले. परंतु दीपक सावंत शांत होता. त्याने सगळ्यांना शांत केले. संधी हुकली. परंतु तो निष्ठेने शिवसेनेचे काम करत राहिला. दीपक  सावंतचे वडील राजाराम सावंत मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून  १९९१साली निवृत्त झाले. ते वसाहत सोडुन भांडुप गावात स्थायिक झाले. दीपक सावंत नोकरी बघून शाखेचे काम प्रामाणिक पणे आजतागायत करत आला. भांडुप गावचा तो शिवसैनिक झाला. दरम्यान संघटनेवर अनेक संकटे आली. परंतु दीपक सावंत निष्ठेने कम करत होता. आणि एवढ्या वर्षांनी पक्षाने परत संधी दिली आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भांडुप गावातून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा  मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला.

 वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार

वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे अनिल ठाणेकर मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक १३७३ दशलक्षांच्या पार

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक १३७३ दशलक्षांच्या पार मुंबई : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ (जानेवारी २०२६ पर्यंत) प्रवासी वाहतुकीत उल्लेखनीय वाढ नोंदवली असून उपनगरीय आणि गैर-उपनगरीय दोन्ही…

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघात शिवजयंती साजरी.

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघात शिवजयंती साजरी. संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ गोरेगाव यांच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 19 तारखेला महाराष्ट्राचे आद्य आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवशी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये जुन्या विविध तिकिटांचे व नाण्यांचे शिवकालीन मुद्रांचे प्रदर्शन प्रमोद नवरे व परब राहणार गोरेगाव यांनी जोपासलेला छंदाचे प्रदर्शन आयोजित केले होते प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम मुंबई अध्यक्ष सुरेश पोटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले. त्या प्रसंगी जुन ते सोन जुना इतिहास नवीन पिढी पुढे येणे गरजेचे आहे. सुरेश पोटे यांनी विचार मांडले, प्रदर्शनाला नगरसेवक सुहास वाडकर व नगरसेवक तुळशीराम शिंदे या नगरसेवकांनी व इतर मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन शिवजयंती निमित्त केलेल्या कार्यक्रमाबाबत खूप कौतुक केले. हे सर्व आयोजन संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिलीप धारकर,सचिव सोडा व संदीप परब यांनी चांगल्या रितीने आयोजन करून पार पाडले.

दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘वन मरीना’ ची घोषणा

दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘वन मरीना’ ची घोषणा रमेश औताडे मुंबई : वाय एम इन्फ्रा समूह आणि अश्विन शेठ समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मरीन लाइन्स, दक्षिण मुंबई येथे ७४ मजली ‘ वन मरीना ’ या आलिशान निवासी टॉवरची घोषणा करण्यात आली. सुमारे १५ लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या या प्रकल्पाची अंदाजित किंमत २८०० कोटी रुपये आहे. या प्रकल्पात २, ३, ४ खोल्यांची घरे तसेच ड्युप्लेक्स आणि पेंटहाऊस घरे ७ कोटी ते ४५ कोटी रुपयांदरम्यान असतील. बहुतांश घरे अरबी समुद्राकडे तोंड करून असून ६९ व ७० व्या मजल्यावर विशेष सुविधा आहेत. वाहनतळासाठी ७२२ गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाय एम इन्फ्रा समूहाचे अध्यक्ष सुहैल याकुब म्हणाले की, हा प्रकल्प दक्षिण मुंबईच्या विकासाला नवे रूप देईल. व्यवस्थापकीय संचालक अतिफ याकुब यांनी हा प्रकल्प दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारा ठरेल, असे सांगितले. अश्विन शेठ समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विन एन. शेठ यांनी दर्जेदार आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीवर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले. प्रकल्पाची वास्तुरचना ‘आर्क बाय रेजा काबुल आर्किटेक्ट्स’ यांनी केली असून महिमतुरा कन्सल्टंट्स (रचनात्मक सल्लागार), पीडीए असोसिएट्स (यांत्रिक व विद्युत सल्लागार), क्वांट लेझर्स (प्रकाशयोजना) आणि साइट कॉन्सेप्ट्स इंटरनॅशनल, फिलिपाईन्स (परिसर रचना) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ पुस्तकाचा सोहळा संपन्न

सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ पुस्तकाचा सोहळा संपन्न सुरेश प्रभू यांच्या ‘ध्येयधुंद’ पुस्तकाची संस्कृत आवृत्ती लवकरच वर्धमान श्रुतगंगा ट्रस्टचे अध्यक्ष संजय शाह यांची घोषणा मुंबई :“माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीकडून…