Category: मुंबई

Mumbai news

ठाणे मध्यवर्ती कारागृहात प्रसादिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन

ठाणे, महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभाग तसेच वै. प. पू. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी (देवाची) द्वारा संचालित “वारकरी आचारसंहिता परिषद, महाराष्ट्र” याचे  संयुक्त…

– कल्याणमध्ये कचऱ्यात सापडली नवजात मुलगी

 नवजात मुलीला फेकणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील चिकणीपाडा परिसरात कचऱ्यात सहा दिवसांची नवजात मुलगी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात राहणाऱ्या पूजा लावेकर या शाळेत काम करतात. सकाळच्या सुमारास त्या कचरा टाकण्यासाठी गेल्या असता एका पिशवीत ही नवजात मुलगी आढळून आली. त्यावेळी काही भटके कुत्रे या बाळाच्या आसपास फिरत होते. कुत्र्यांपासून बाळाला धोका असल्याचे लक्षात येताच पूजा यांनी तातडीने मुलीला उचलून घेतले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुलीला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून काही काळ तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, नवजात मुलीला अशा अवस्थेत टाकून जाणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

देवस्थान जमीन विधेयक स्थगितीचा निषेध

 किसान सभेची राज्यव्यापी आंदोलने ठाणे : शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात आणि देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क देणारे विधेयक तातडीने मंजूर करावे, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या…

ठाणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्याला वेग

 १.१६ लाख नागरिकांनी केली स्व-गणना ठाणे : केंद्र शासनाच्या ‘जनगणना २०२७’ मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात घर यादी व घरगणना (House Listing & Housing Census) या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून, स्व-गणना सुविधेला नागरिकांकडून…

मिरा-भाईंदरमध्ये रेशनकार्डमधून हजारो नावे गायब

गरिबांच्या अन्नावर घाला मिरा -भाईंदर : मिरा-ईंदर शहरातील हजारो रेशनकार्डधारकांना नावावर अचानक ऑनलाइन प्रणालीतून गंडांतर आले असून, गेल्या ८ ते १० महिन्यांपासून केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डमधील हजारो नावे गायब झाल्याची…

कलेक्टर एनओसीसाठी म्हाडा रहिवाशांना पडतोय दीड लाखाचा अतिरिक्त भुर्दंड

केतन खेडेकर मुंबई -भायखळा घोडपदेव येथील न्यू हिंद म्हाडा कॉलनी येथील कलेक्टरवरील जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डवर अजूनही कलेक्टरचे नाव असल्याने महाराष्ट्र शासनाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिका हस्तांतर करण्यासाठी हेलफाटे मारावे लागत…

घनकचरा नियमावली जनतेच्या दारी

 महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन अशोक गायकवाड नवी मुंबई :  १ एप्रिल २०२६ पासून घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ लागू झाले असून याची माहिती नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून पोहचविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ ते ११ जून या कालावधीत विविध सोसायट्या व वसाहतींमध्ये विशेष जनजागृती करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून संबधित स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांचेमार्फत नागरिकांपर्यंत पोहचून घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत लोकजागृती करण्यात येत आहे. यामध्ये से.१४,१५ ऐरोली येथील विविध सोसायट्या, दिघा कृष्णावाडी येथील त्रिमूर्ती सोसायटी, सानपाडा येथील मोराज सोसायटी, से.१२ कोपरखैरणे येथील फाम सोसायटी व से.५ येथील शकुंतला सोसायटी तसेच से.१९ ऐरोली येथील काकासाहेब थोरात सोसायटी, वाशी येथील वर्धमान पॅलेस सोसायटी, सिबीडी बेलापूर से.६ येथील वर्षा सोसायटी अशा विविध सोसायट्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत निर्मितीच्या ठिकाणी घरापासूनच ओला, सुका, घरगुती घातक व सॅनेटरी अशा चार प्रकारे कचरा वर्गीकरण करावयाचा आहे याविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे वर्गीकरण झालेला कचरा हा कचरा वाहतूक करणा-या वाहनांमध्ये वेगवेगळा देणे अत्यावश्यक असल्याचेही सूचित करण्यात आलेले आहे. दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या सोसायट्या यांनी स्वत:च्या आवारात कच-याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प राबविणे नव्या नियमानुसार बंधनकारक असल्याने याविषयी सोसायटी व संस्था पदाधिकारी, सदस्य यांना मार्गदर्शन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठही विभागांमध्ये एजी एन्व्हायरो आणि परिसर सखी या संस्थांच्या वतीने सोसायट्यांमध्ये जाऊन तसेच आस्थापना व संस्था याठिकाणी व्यापक जनजागृती करण्यात येत असून नवी मुंबईकर नागरिकांचा याकामी चांगला प्रतिसाद लाभत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मागाठाणे विधानसभेतर्फे श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले…

 भांडुपकरांची पाण्यासाठी वणवण

– पालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात जल अभियंत्यांकडे धाव  डोंगराळ भागातील नागरिकांचा संताप उफाळला! मुंबई : भांडुप विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, विशेषतः डोंगराळ भागातील रहिवाशांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ते डोंगराळ भागात पोहोचत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पाणीपुरवठा व प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज वरळी येथे जल अभियंता दिलीप पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक सुरेश शिंदे,  नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, शाखाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत भांडुपमधील डोंगराळ भागात पाणी पुरेशा दाबाने पोहोचत नसल्याचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडण्यात आला. अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येला सामोरे जात असताना पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली. विशेषतः उंच भागातील वस्त्यांमध्ये नळांना पाणीच न येणे किंवा अत्यल्प दाबाने येणे ही बाब प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जल अभियंत्यांकडे डोंगराळ भागात पाणी वरपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पंपिंग व्यवस्था, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण तसेच कमी दाबाच्या भागांसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली. तसेच खालच्या भागातही जास्तीत जास्त आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भांडुपकरांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना पालिका प्रशासन मात्र केवळ बैठका व आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बैठकीत नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने कार्यवाही करून डोंगराळ भागातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आता पालिका प्रशासन प्रत्यक्ष कृती करून भांडुपकरांचा पाणीप्रश्न सोडवते की पुन्हा एकदा आश्वासनांचीच मालिका सुरू राहते, याकडे संपूर्ण भांडुपकरांचे लक्ष लागले आहे.

शिक्षण धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

प्रति शिक्षणमंत्र्याला चपलांचा हार ठाणे-देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलेच गाजले आहे या पाठोपाठच सीबीएससी पेपर घोटाळा देखील उघडकीस आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे यात काही…