Month: April 2026

वन्यजीव-निसर्ग-साहस’ व्याख्यानमाला रंगली

– दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश कळवा: निसर्ग, आकाश आणि वन्यजीव यांच्यातील नातं अधिक संवेदनशीलतेने जपण्याची गरज अधोरेखित करत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.…

दिव्यांग मुलांची विशेष सहल!

मती मंद मुलांच्यात कार्य करणाऱ्या विश्वास संस्थेच्या मुलांची सहल, नेरळ येथील बेंद्रे वेद ऍग्रो फार्म मध्ये १४ एप्रिलला संपन्न झाली आहे.  या सहलीचे नियोजन आणि आयोजन अशी संपूर्ण जबाबदारी ‘जिज्ञासा’ संस्थेने…

 नगरसेवकांचा संताप, ‘एस’ विभागात कामांचा बोजवारा

 पालिका प्रशासनावर ताशेरे मुंबई–डुप परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पालिकेच्या ‘एस’ विभागातील नगरसेवकांनी सहाय्यक आयुक्तांच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला. रखडलेली कामे, गॅस जोडणीचा ठप्प…

वृक्षतोडी विरोधात हरकतींचा पाऊस

– पंचवटीतील प्रस्तावित वृक्षतोडीवर शंभरहून अधिक हरकती हरिभाऊ लाखे नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पंचवटी परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात नागरिकांनी हरकतींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. रस्ते रुंदीकरणासाठी तब्बल ५८४ वृक्ष तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर शंभरहून अधिक हरकती प्राप्त झाल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. वृत्तपत्र सदस्यता तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ट असतानाच महापालिकेने नव्याने पंचवटीतील नांदूर गाव ते नांदूर नाका आणि नांदूर नाका ते जत्रा चौक या मार्गावर १९७ वृक्ष, पेठ रोड ते आरटीओ कॉर्नर, आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी स्कूल आणि नीलगिरीबाग या मार्गावर ३८७अशा प्रकारे एकूण ५८४ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. रस्ते रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याचा दावा प्रशासनाने केला असून, संबंधित वृक्षांवर लाल खुणा करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी प्राथमिक खोदकामालाही सुरुवात झाली आहे. या वृक्षतोडीवर हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी नागरिकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले गेले आहेत. विशेषतः करंज, कडुनिंब, आंबा, जांभूळ, गुलमोहर, सोनमोहर, बकुळ, बेल यांसारख्या वृक्षांच्या तोडीला विरोध होत आहे. काही वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला, तरी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड पर्यावरणासाठी घातक ठरेल, अशी भूमिका हरकतदारांनी घेतली आहे. यापूर्वी तपोवन येथे साधुग्रामसाठी प्रस्तावित औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी १८२५ वृक्ष तोडीचा मुद्दा गाजला होता. तो सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यातच आता पंचवटीतील नव्या वृक्षतोडीच्या प्रस्तावामुळे पर्यावरणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी लवकरच होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते. नागरिकांच्या आक्षेपांना कितपत न्याय दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एसटी महामंडळाचा कर्मचारी गंभीर जखमी

उल्हासनगर ( सुनिल इंगळे ): उल्हासनगर शहरात मोकाट आणि चावक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरील या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नुकताच उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील साईनाथ नगर…

– उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व ९ विशेष समिती सभापती पदासाठी नामनिर्देशक पत्र दाखल

 सर्वांचीच बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित उल्हासनगर( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व ९ विशेष समिती सभापती”पदासाठी नामनिर्देशन पत्र बुधवारी उल्हासनगर महापालिका सचिव अनंत जावद्वार यांच्याकडे दाखल करण्यात आले. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याचा स्पष्ट झाले आहे.  स्थायी समिती सभापती पदासाठी सहोता कलवंत सिंग यांनी अर्ज दाखल केला तसेच सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी दुधानी दिप्ती नवीन नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी मिनाकौर अजितसिंग लबाना, पाणी पुरवठा व जलः निसारण समिती सभापती पदासाठी दीपा नारायण पंजाबी, आरोग्य परिक्षण व वैद्यकिय सहाय्य समिती सभापती पदासाठी  सविता प्रवीण तोरणे, माध्यमिक शिक्षण व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी साक्षी संदिप सुर्वे, गलिच्छ वस्ती व निर्मुलन समिती सभापती पदासाठी विपुल दत्ताराम मयेकर, क्रीडा समाज कल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी प्रीती विनोद मखिजा, महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी मिना दिपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी प्रेरणा अजित माखिजानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याचा स्पष्ट झाले आहे. त्यावेळी महापौर अश्विनी कमलेश निकम, उपमापोर अमर लुंड, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेश वधारीया, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना गटनेते अरुण आशान, मनोज लासी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यावेळी गोपाळ लांडगे म्हाणाले महापालिकेच्या नियमाप्रमाणे महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती आणि ९ इतर विशेष समित्या यांच्या सभापतीची आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची वेळ होती, सर्वांनी वेळेमध्ये फॉर्म दाखल केले आहेत, शिवसेनेला ५ विशेष समित्या आणि भाजपाला ४ समित्या मिळाल्या आहेत .याप्रमाणे फॉर्म भरण्यात आले आहेत. निश्चितपणे ५ वर्षांमध्ये सर्वांना संधी मिळेल त्यामुळे पहिल्याच वर्षी सगळ्यांना अपेक्षाप्रमाणे संधी मिळालेली नाही. ही जरी वस्तुस्थिती असली तरी सर्वांनाच ज्या कमिटी आहेत त्याप्रमाणे सर्वांना संधी मिळणार आहे आणि या महापालिकेचे कामकाज समितीच्या माध्यमातून यापुढे अधिक गतीने निश्चित होईल असे सांगितले.

 लग्नाच्या आश्वासनांनी लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

‘लुटेरी दुल्हन’सह दोन जणांना अटक मिरा -भाईंदर : लग्नाची आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या एका संघटित टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका कारवाईत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी खोट्या लग्नाच्या नावाखाली नवऱ्याकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. सेवकुमार बंगपांडी (५३), यांना आरोपींनी लग्नासाठी उपलब्ध असलेली एक महिला शोधून देण्याचे आश्वासन देऊन फसवले. आरोपींनी त्या महिलेचे फोटो पाठवले, तिच्याशी संवाद साधला आणि तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली, आरोपींनी पीडिताला विविध बँक खात्यांमध्ये अंदाजे ₹४४,६५० जमा करण्यास फसवले. त्यानंतर आरोपी महिलेने (बनावट वधू) त्यांचा विश्वास संपादन केला आणि पीडिताच्या घरातून अंदाजे ₹४७६,००० किमतीचे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून पसार झाली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी नेहा उर्फ जया (वय ३२) आणि नाशिक येथील रहिवासी केसरीमल लक्ष्मीलाल रांका (वय ४५) यांचा समावेश आहे. दोघांना १३ एप्रिल २०२५ रोजी अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, आरोपींनी अहमदनगर, मुंबई (जोगेश्वरी, बोरिवली) आणि जळगाव यांसारख्या जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारच्या फसवणुकी केल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलीस इतर संभाव्य पीडित आणि टोळीच्या उर्वरित सदस्यांचा शोध घेत आहेत.

सासऱ्यांनी दिलं आयुष्याचं अनमोल गिफ्ट

दुर्मिळ किडनी ट्रान्सप्लांट, जावयाला मिळालं नवजीवन मिरा – भाईंदर : नात्यांची खरी ताकद काय असते, हे दाखवून देणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका सासऱ्यांनी आपल्या जावयाला नवजीवन मिळावे म्हणून स्वतःची किडनी दान केली. माणुसकी आणि नात्यांच्या भावनेचा हा सुंदर संगम मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स, येथे पाहायला मिळाला, जिथे डॉक्टरांनी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ३९ वर्षीय रुग्ण, जो मधुमेहाने त्रस्त होता आणि शारीरिकदृष्ट्याही खूप अशक्त झाला होता, तो बराच काळ किडनी फेल्युअरशी झुंज देत होता. कुटुंबात योग्य डोनर मिळत नव्हता. अशा वेळी ५५ वर्षीय सासऱ्यांनी पुढाकार घेत आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला—जरी त्यांचा ब्लड ग्रुप वेगळा होता (एबी पॉझिटिव्ह डोनर ते बी पॉझिटिव्ह रुग्ण). या प्रकरणाबद्दल बोलताना वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे नेफ्रॉलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. पुनीत भुवानिया यांनी सांगितले की, हा केस वैद्यकीय आणि मानवी अशा दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत विशेष आहे. इतक्या उच्च अँटीबॉडीज असताना एबीओ इनकम्पॅटिबल ट्रान्सप्लांट करणे खूप आव्हानात्मक असते, पण सासऱ्यांच्या निःस्वार्थ निर्णयामुळे हे शक्य झाले. ते पुढे म्हणाले की, हा “एबीओ इनकम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट” होता, जो सामान्य ट्रान्सप्लांटपेक्षा अधिक धोकादायक असतो. शरीरातील अँटीबॉडीज नव्या किडनीला नाकारू शकतात, ज्यामुळे इन्फेक्शन आणि गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी आधी विशेष “डिसेन्सिटायझेशन” प्रक्रिया करून अँटीबॉडीजची पातळी कमी केली आणि त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया पार पाडली। ऑपरेशननंतर अवघ्या एका महिन्यातच सकारात्मक परिणाम दिसून आले—रुग्ण आता डायलिसिसमुक्त झाला आहे, त्याचे वजन वाढत आहे आणि तो हळूहळू सामान्य आयुष्याकडे परतत आहे. विशेष म्हणजे किडनी दान करणारे सासरेही पूर्णपणे निरोगी आहेत. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारतीय कुटुंबांची मुळे अजूनही घट्ट आहेत। सासरा आणि जावई हे नातं अनेकदा औपचारिक मानलं जातं, पण इथे ते वडील-मुलाच्या नात्यात बदलले.  ही घटना आपल्याला एकच संदेश देते—जीवन कितीही आधुनिक झालं तरी नात्यांची ऊब, त्याग आणि प्रेम हेच आपल्या संस्कृतीचं खरं बळ आहे. 00000000000

अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा पसरवणारे विधान करणारे संजय शिरसाट यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निषेध !

अनिल ठाणेकर ठाणे : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर बांधलेली असल्याने तिथे ‘आत्मे’ दिसतात आणि त्यामुळे पालिका कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण असून काम करणे कठीण जात आहे, असा अत्यंत अविवेकी, अवैज्ञानिक, धक्कादायक दावा  महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्या सामाजिक न्याय विभागाने भारतात पहिला असा जादूटोणा विरोधी कायदा पारित करून घेतला, त्याच विभागाचे मंत्री त्याच कायद्याची मूल्ये पायदळी तुडवणारी, लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढवणारी, भय निर्माण करणारी विधाने करतात हे देशातील प्रगत मानल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्याचा आणि संत-समाज सुधारकांचा अवमान करणारे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले. जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे खीळ बसू शकते. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. म्हणून महा. अंनिस त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. आम्ही आवाहन करीत आहोत की महापालिकेची ही कथित आत्म्यांचे वास्तव्य असलेली इमारत या मंत्र्यांना काम करण्यायोग्य वाटत नसेल तर ती पाडण्याऐवजी आमच्या समितीकडे हस्तांतरित करावी. आम्ही त्या जागेत व्यवस्थित  सामाजिक कामे करून, विविध उपक्रम करून  दाखवू.छत्रपती संभाजीनगर महापालिकेबाबत  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेले विधान हे पूर्णपणे अविवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळ फासणारे आहे. मानवी मेंदू भीती, अज्ञान आणि अफवांच्या प्रभावाखाली अनेक गोष्टींची कल्पना करतो. अंधार, एकटेपणा, मानसिक ताण किंवा पूर्वग्रह यांच्या परिणामामुळे लोकांना “काहीतरी आहे” असे वाटू शकते. पण त्या अनुभवांचा अर्थ अलौकिक शक्ती असा होत नाही.महापालिकेसारख्या सार्वजनिक संस्थांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे जबाबदार लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. यामुळे समाजात भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धा वाढीस लागते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्पष्ट मतप्रवाह असा आहे की—कोणतीही घटना तर्क, विज्ञान आणि पुराव्यांच्या आधारे समजून घेतली पाहिजे,भूत-प्रेत, आत्मा यांसारख्या संकल्पना या मानवनिर्मित आहेत, वास्तव नाहीत,समाजाने अंधश्रद्धेऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे, महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा हा सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने २०१३ ला मंजूर झाला असून त्या कायद्याअंतर्गत हजारो भोंदू बुवाबाबा ,मांत्रिक यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे, काहींना या गुन्ह्यात शिक्षा झाल्या आहेत.त्याचा मंत्रालयाचा मंत्री असे अवैज्ञानिक दावे करतात,याचा आम्ही निषेध करतो,मंत्री संजय शिरसाट यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा द्यावा.अशा अवैज्ञानिक,अतार्किक विधाने करणाऱ्यांनी पुरोगामी महाराष्ट्र मागे खेचत आहेत. संविधानिक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने विधाने करावीत. अशा भीती पसरवणाऱ्या कल्पनांपासून दूर राहूया, आणि विवेक, विज्ञान व सत्याच्या बाजूने ठाम उभे राहूया.विवेकी समाज बनण्याच्या प्रक्रियेमध्ये अशी विधाने समाजाला घातक ठरतात, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत सर्वंकष स्वच्छता मोहीम

ठाणे :  ठाणे वर्तक नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग ४ परिसरात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत  आज सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वसंत विहार सर्कल, नळपाडा, खेवरा सर्कल, हॅपी व्हॅली…