Month: May 2026

चर्चगेट केंद्राचा विजेतेपदावर कब्जा

३४वी एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा मुंबई : ठाणे केंद्राचा झंझावात पहिल्या डावात १३८ धावांवर रोखल्यानंतर चर्चगेट केंद्राने ७ बाद ३७० धावांचा डोंगर उभा करत पहिल्या डावातील आघाडीच्या…

१ जून ते ३१ जुलैदरम्यान यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारणा अध्यादेश २०२१ च्या अनुषंगाने राज्याच्या सागरी क्षेत्रात यावर्षी १ जून ते ३१…

बाल गोपाळ-आयडियल व्यायामशाळेच्या उद्घाटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : बाल गोपाळ मित्र मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमाने काळेवाडी-काळाचौकी परिसरात व्यायामप्रेमी स्व. रामचंद्र कडवे स्मृती फोर स्टेशन मशीनसह सुसज्ज व्यायामशाळेचे शानदार उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते…

अवाडा ऑटर्स स्क्वॉश स्पर्धेत निरुपमाला अव्वल मानांकन

मुंबई, २४ मे: वांद्रे येथील ऑटर्स क्लबमध्ये सोमवारपासून खेळल्या अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेसाठी (२०२६) उत्तराखंडचा अंश त्रिपाठी आणि महाराष्ट्राची निरुपमा दुबे यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला मुख्य ड्रॉमध्ये…

एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धेला सुरुवात

मुंबई : बोरिवली पश्चिम येथे सुरु असलेल्या मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली पुरस्कृत ११ वी एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा पुरुष एकेरी गटाने सुरु…

डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंना रौप्यपदक

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रोईंग स्पर्धा पुणे : चंदीगड येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रोईंग स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय…

मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दणक्यात सुरुवात

वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबचा मीडिया टीमवर ४० धावांनी दमदार विजय मुंबई : दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट टर्फवर सुरू झालेल्या भव्य ‘महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’ने पहिल्याच दिवशी क्रिकेटप्रेमींना थरार, वेग आणि भन्नाट मनोरंजनाची मेजवानी दिली. महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुनील शिंदे व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी पार्क क्लबच्या कार्याध्यक्षा वरदा चुरी, मुंबई महिला क्रिकेटचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वेदक, वियोम फाऊंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर, महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल – स्टार सीसी, श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले आहे. इनडोअर क्रिकेटचा भन्नाट फॉरमॅट इनडोअर क्रिकेटमध्ये एका वेळी मैदानावर ८ खेळाडू खेळतात. प्रत्येक जोडीला २ षटके फलंदाजी करावी लागते, तर प्रत्येक खेळाडूला १ षटक गोलंदाजी करणे बंधनकारक असते. विशेष म्हणजे, फलंदाज बाद झाल्यास संघाच्या खात्यातून ५ धावा वजा होतात. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर सामना रंगतदार होताना दिसला. मीडिया टीमची उत्साही सुरुवात प्रथम फलंदाजी करताना मीडिया टिमच्या अंकुश धावरे (१५-५= १० धावा) व किरण महनवर (११-५= ६ धावा) यांनी १६ धावांची पायाभरणी केली त्यावेळी रोहन व ओमकारने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले. दुसऱ्या जोडीतील सिद्धेश कानसे (१२-५= ७ धावा) व निकुंज नाटेकर (७-१०= -३ धावा) यांना फक्त ४ धावांचीच भर घालता आली. यावेळी कुशने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले तर प्रसादाने निकुंजला एकदा बाद केले. त्यावेळी धावफलकावर २० धावा झाल्या होत्या. तिसऱ्या जोडीतील अतुल लोके  (१२-५= ७ धावा) व अन्वय सावंत (१०-५= ५ धावा) यांनी १२ धावांची भर घातली. यावेळी अजितने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले. तर शेवटच्या जोडीतील गणेश पुराणिक (६ धावा)  व कर्णधार रोहित नाईक (९-५=४ धावा) यांना आणखी १० धावा केल्याने संघाला ४२ धावांपर्यंत मजल मारता आली. यावेळी श्रेयसने रोहितला एकदा बाद केले. वियोम फाऊंडेशनकडून रोहन, ओमकार, कुश, प्रसाद, अजित आणि श्रेयस यांनी अचूक गोलंदाजी करत नियमित धक्के दिले. अनिकेत-प्रसाद-ओमकारची फटकेबाजी; वियोमचा विजय ४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वियोम फाऊंडेशनची सुरुवात डळमळीत झाली. पहिल्या जोडीने श्रेयस वैद्य (९-१०= -१ धावा) व खुश शहा (११-५= ६ धावा) अश्या ५ धावाच करता आल्या. याचे प्रमुख श्रेय गणेश व सिद्धेश च्या गोलंदाजीला दिले पाहिजे. गणेशने श्रेयसला एकदा तर सिद्धेशने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले. दुसऱ्या जोडीतील रोहन गावडे (१५-५= १० धावा) व अजित सेठी (१० धावा) यांनी दमदार भागीदारी करत २० धावा केल्या. यातील रोहनला अन्वयने एकदा बाद केले तर निकुंजला कोणालाही बड करण्यात यश मिळाले नाही. तिसऱ्या जोडीतील अनिकेत माडीये (१८ धावा) व प्रसाद आंब्रे (१४ धावा) यांनी अंकुश व अतुलच्या गोलंदाजीवर तब्बल ३२ धावा कुटल्या व संघाला भक्कम केले. तर चौथ्या व शेवटच्या जोडीतील कर्णधार ओमकार पाटोळे (१८-५= १३ धावा) व सुभम गुरव (१२ धावा) यांनी २५ धावांची भागीदारी करत संघाला ८२ धावांपर्यंत नेले आणि ४० धावांनी शानदार विजय मिळवून दिला. 0000000000

अंतर्गत कॅरम स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात अंतर्गत कॅरम स्पर्धा उत्साहात नवी मुंबई : सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात १७ ते २१ मे दरम्यान पुरुष व महिला…

संघर्ष नायक नारायण बागडे वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती ऐक्य संदेश दिवस

रमेश औताडे मुंबई : विविध समाजघटकांना जातीय अन्यायाचे चटके सहन करावे लागले होते. त्या सर्व पीडित समाजघटकांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका विचारमाळेत गुंफून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. मात्र आज उपवर्गीकरणाच्या नावाखाली हे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, त्याला वेळीच लगाम घालण्यासाठी राज्यभरात “अनुसूचित जाती समन्वय अभियान” राबविण्यात येणार असल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर करण्यात आली आहे. २५ मे रोजी नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त “अनुसूचित जाती ऐक्य संदेश दिवस” साजरा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाजघटकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडू शकते, हा धोका विविध घटकांना समजावून सांगण्यावर या अभियानाचा भर असणार आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात साहित्यभूषण अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव, जिल्हा सांगली येथे कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चोंडी येथे अभियान राबविण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात पोचिराम कांबळे यांच्या जन्मगाव तैरभुनी, जिल्हा नांदेड येथे कार्यक्रम होणार असून, चौथ्या टप्प्यात प्रथम अस्पृश्य परिषदेमुळे ऐतिहासिक ठरलेल्या सुकळी मानगाव, जिल्हा कोल्हापूर येथे अभियानाचा समारोप होणार आहे. या अभियानाद्वारे अनुसूचित जातींमध्ये सामाजिक ऐक्य, समन्वय आणि संविधानिक हक्कांविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रदेश जनसंपर्क प्रमुख डॉ. श्रीकृष्ण बेडसे यांनी माध्यमांना सांगितले. 00000000000

 अतिक्रमण हटवताना महापालिका पथकावर महिलांचा हल्ला

सरकारी कारवाईत अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल कल्याण  : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्ल्याणी नजीकच्या खजुरीनगर परिसरात अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी गेलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण निष्कासन पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २२ मे रोजी घडली. या घटनेत महिला अधिकाऱ्यांना धक्का बुक्की करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने खजुरीनगर परिसरातील अनधिकृत चाळीचे बांधकाम हटविण्याची कारवाई सुरू केली होती. कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र सकाळच्या सुमारास काही महिलांनी अचानक आक्रमक भूमिका घेत कारवाईला विरोध सुरू केला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आणि महिलांनी थेट महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला चढविला. यावेळी महिला अधिकारी यांच्याशी झटापट करीत धक्का बुकक्की केल्या प्रकरणी  सरकारी कामात अडथळा निर्माण करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आल्याचे समोर आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून संबंधित महिलांविरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी टिटवाळा पोलीस तपास करीत आहे. 00000000000