Month: August 2026

मूग व उडीद पिकासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अनिल ठाणेकर ठाणे, पिकस्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे, “एक वेळची विशेष बाब” म्हणून मूग व उडीद पिकासाठी अर्ज करण्यास १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून नवनवीन प्रयोग करण्यात येतात व उत्पादनात भर घातली जाते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढून ते आणखी उमेदीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पीक स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आली आहे. कृषी एकविभागामार्फत राज्यस्तरावर खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेत सहभाग घेता येईल. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावरील उत्पादकता आधारभूत धरून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाईल. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगामातील एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. शासन निर्णयानुसार मूग व उडीद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ठरवण्यात आली होती. परंतु, पिकस्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे, “एक वेळची विशेष बाब” म्हणून मूग व उडीद पिकासाठी अर्ज करण्यास १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत खालीलप्रमाणे एकूण ११ पिकांचा समावेश असून त्यांच्या अर्ज करण्याची अंतिम मुदत खालीलप्रमाणे आहे: मूग व उडीद पीक : १० ऑगस्ट २०२६, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल : ३१ ऑगस्ट २०२६ स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे बंधनकारक आहे. शेतकरी एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. तसेच सहभागी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे फार्मर आयडी, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याची चलन पावती, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), आणि बँक खाते चेक किंवा पासबुक डिटेल्स. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये आणि आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. बक्षीस तपशील तालुका पातळी: प्रथम ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये आणि तृतीय २,००० रुपये. जिल्हा पातळी: प्रथम १०,००० रुपये, द्वितीय ७,००० रुपये आणि तृतीय ५,००० रुपये. राज्य पातळी: प्रथम ५०,००० रुपये, द्वितीय ४०,००० रुपये आणि तृतीय ३०,००० रुपये. कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बंधू-भगिनींना जास्तीत जास्त संख्येने या पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छूकांनी http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पिकस्पर्धा टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ००००

महात्मा गांधी विद्यालयात करपल्लवी गोंधळी लोककलेचा अनोखा सांस्कृतिक कलाविष्कार

कल्याण: श्रीकृष्ण कला फाऊंडेशनच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या करपल्लवी गोंधळी लोककलेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. पूर्वप्राथमिक विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर…

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दुर्मिळ ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका २० वर्षीय महिला रुग्णाच्या पोटातील सुमारे साडेआठ किलो वजनाचा दुर्मिळ ट्युमर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला…

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.…

 डॉ. विनय सांगळे यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुवर्ण कामगिरी

मलेशियातील हॉस्पेक्स मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईला विजेतेपद अशोक गायकवाड रायगड- कर्जत : कर्जतचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विनय सांगळे यांनी मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या हॉस्पेक्स आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत शानदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कतार, बांगलादेश, मलेशिया तसेच भारतातील मुंबई, दिल्ली, केरळ आणि गोवा येथील नामांकित मेडिकल क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाने गोवा संघाचा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयात डॉ. सांगळे यांचे योगदान मोलाचे ठरले. गेली १८ वर्षे कर्जतमधील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करणारे डॉ. विनय सांगळे यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच क्रिकेटची आवडही सातत्याने जोपासली आहे. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. सांगळे यांनी यापूर्वी दुबई, श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच पाँडिचेरी, बेंगळुरू, विशाखापट्टणम, चेन्नई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, हैदराबाद आणि नाशिक येथे झालेल्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सहा वेळा ‘राष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज’ पुरस्कार डॉ. विनय सांगळे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी तब्बल सहा वेळा ‘बेस्ट बॉलर’ (सर्वोत्तम गोलंदाज) हा राष्ट्रीय किताब पटकावला आहे. उदयपूर, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि नवी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी हा मान मिळवला असून, ही कामगिरी करणारे ते मेडिकल क्रिकेटमधील मोजक्या आणि अव्वल गोलंदाजांपैकी एक मानले जातात. ५६० विकेट्सचा विक्रम ‘डावखुरा जादुई फिरकी गोलंदाज’ अशी ओळख असलेल्या डॉ. सांगळे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धांमध्ये आतापर्यंत ५६० हून अधिक विकेट्स घेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकविण्याचा उल्लेखनीय पराक्रम केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी गोलंदाजीमुळे ते मेडिकल क्रिकेट क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी सांभाळत क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या डॉ. विनय सांगळे यांनी कर्जतचे नाव देश-विदेशात उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्र, क्रीडाविश्व तसेच कर्जत तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

 पोयसर जिमखान्याच्या धनुर्धरांनी ३५ पदके पटकावली

मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इंडोअर इनडोअर आर्चेरी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ – ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा…

दिवा- कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या धडकेत तरुणी ठार

दिवा : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रविवारी सकाळी एक सुन्न करणारी घटना घडली. अवघ्या १८ वर्षीय तरुणी कामावर जाते सांगत घराबाहेर पडली होती. दिवा- कोपर दरम्यान लोकलच्या धडकेत तिचा जागीच दुर्दैवी…

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय व ‘मूट कोर्ट’चे आज उद्घाटन

पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या अत्याधुनिक ‘मूट कोर्ट’चे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते…

 पनवेलमध्ये ८ ऑगस्टला ‘महारोजगार मेळावा २०२६’

दहावीपासून पदव्युत्तर व कुशल उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल : रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या व विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या वतीने ‘महारोजगार मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट  सकाळी ९ वाजता चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे होणार आहे.या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविध कौशल्ये असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध नामांकित कंपन्या व उद्योग या मेळाव्यात सहभागी होणार असून, उमेदवारांना थेट रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबरच जॉब इंटरव्ह्यू, करिअरच्या संधी आणि उत्तम नेटवर्किंग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. रोजगाराच्या संधींच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असून, ‘रोजगार शोधणाऱ्यांना सुवर्णसंधी’ या उद्देशाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, जाहिरातीतील क्यूआर कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून उमेदवार नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी ७४९८०७४१०५ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन युवकांनी आपल्या भविष्याची दिशा निश्चित करावी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 0

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचा गौरव

अशोक गायकवाड कर्जत : महसूल दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व महसूल दिन’ कार्यक्रमात कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन २०२५-२६ या महसूली वर्षात शासनाच्या धोरणे व उद्दिष्टांनुसार अत्युत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तिपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेंद्र दळवी, विक्रांत पाटील तसेच सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि कृषी सभापती वैकुंठ पाटील उपस्थितीत होते . प्रशासनाच्या वतीने कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, महसूल अपर आयुक्त वैशाली उंटवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदुलकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००००००