Month: August 2026

रहिवाश्यांच्या पुनर्विकासाबाबत सचिन लोंढे आक्रमक

रमेश औताडे मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिव सुदर्शन गृहनिर्माण संस्थेच्या ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुनर्वसन प्रकल्पाबाबत अखेर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. ओमकार बिल्डर्सवर रहिवाशांचे तब्बल १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून, हे थकीत भाडे तात्काळ मिळावे आणि रहिवाशांचे पुनर्वसन व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोगेश्वरी तालुकाध्यक्ष सचिन लोंढे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा केला. या रखडलेल्या प्रकल्पाबाबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नगरसेवक अजितदादा रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर हेदेखील उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार बिल्डर्सकडे सुमारे १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून यावर आता कडक कारवाई केली जाणार आहे.

मोहनेमध्ये मुदत संपलेल्या औषधांचा ढीग

कल्याण : कल्याण नजीक आंबिवली मधील मोहने परिसरातील यादव नगर स्मशानभूमीजवळ उल्हास नदीकाठी  तारीख संपलेल्या औषधांचा ढीग आढळून आला आहे. त्यामुळे  नदी किनाऱ्याच्या आणि परिसराच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.…

 मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी

 एका बाजूला पाणीटंचाई, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शुद्ध पाणी वाया कल्याण: कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना, दुसरीकडे केडीएमसीच्या टिटवाळा येथील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात गळती, तांत्रिक बिघाड आणि देखभालीअभावी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे शहरातील अनेक भागांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे जलशुद्धीकरण केंद्रातूनच शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक नैसर्गिक संसाधनाची होणारी ही नासाडी तातडीने थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोहिली केंद्रातील गळती व तांत्रिक समस्या त्वरित दूर करून नियमित देखभाल आणि देखरेख व्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे. 0000

 उसाटणे गावात सराईत आरोपींची गुंडगिरी

 वाहनांचा ताफा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल कल्याण : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटणे परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. गंभीर…

 नाशिकच्या पावसाळी पर्यटनाला बहर

आदिवासी भागातील ‘होमस्टे’मुळे स्थानिकांना रोजगार हरिभाऊ लाखे नाशिक: पावसाची एक सर कोसळली की नाशिककरांना वर्षा सहलीचे वेध लागतात. शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदाकाठ, तर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा परिसरातील धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांनी फुलून जातात. या गर्दीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत असली, तरी आदिवासीबहुल भागातील स्थानिकांसाठी हा पावसाळा रोजगाराची नवी संधी घेऊन येत आहे. विशेषतः ‘होमस्टे’ संकल्पना, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि रानभाज्यांमुळे या भागातील पर्यटनाला वेगळी ओळख मिळत आहे. उन्हाच्या कडाक्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या पहिल्याच सरी वर्षा सहलीचे निमंत्रण घेऊन येतात. यंदा जूनमध्ये तुरळक पाऊस झाला. त्यानंतर जुलैमध्ये अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही काळ पर्यटनावर परिणाम झाला असला, तरी मुसळधार पाऊस, धबधबे आणि निसर्ग अनुभवण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. नाशिक शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदाकाठ आणि इतर पर्यटनस्थळांवर दर आठवड्याच्या शेवटी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम मका कणीस, भुट्टा, वडापाव, कांदा भजी, खारे शेंगदाणे आणि फुटाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची रांग लागते. त्यामुळे लहान-मोठ्या विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळत आहे. त्र्यंबकेश्वरमधील आंबोली, वाघेरा घाट, कश्यपी धरण, हरसूलमधील दावलेश्वर, खैराई किल्ला, तसेच सुरगाणा परिसरातील भिवतास धबधबा, खोकविहीर येथील केळावण, तातापाणी, पिंपळसोड, भारुंडी आदी ठिकाणे पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत आहेत. शहराच्या कोलाहलापासून दूर असलेल्या या आदिवासीबहुल परिसरात नाशिकसह मुंबई, पुणे आणि परराज्यांतील पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत. दिवसभर निसर्गाचा आणि जैवविविधतेचा अनुभव घेतल्यानंतर आदिवासी कुटुंबांकडून त्यांचा पारंपरिक पाहुणचार केला जातो. त्यामुळे या सहलींना केवळ पर्यटन नव्हे, तर ग्रामीण आणि आदिवासी जीवनशैलीचा अनुभव अशीही ओळख मिळत आहे. नाशिकमधील काही पर्यटन व्यावसायिकांकडून या सहलींचे नियोजन केले जाते. त्याअंतर्गत आदिवासी बांधवांच्या घरांमध्ये पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली जाते. महिला बचत गटांकडून भोजनाची जबाबदारी सांभाळली जाते. पर्यटकांच्या पसंतीनुसार शाकाहारी किंवा मांसाहारी भोजनाची व्यवस्था केली जात असली, तरी बहुतांश पर्यटक शाकाहारी जेवणालाच पसंती देतात. भात, डाळ, उडीद डाळीचे भुजिया, नागलीची भाकरी, विविध रानभाज्या आणि स्थानिक पद्धतीचे पदार्थ यांचा समावेश असलेले अमर्यादित भोजन अवघ्या १२० ते १५० रुपयांत उपलब्ध करून दिले जाते.

स्वच्छता दूत फाउंडेशनतर्फे सफाई कामगारांना साहित्य वाटप

रमेश औताडे मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दूत फाउंडेशन व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कामगारांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मेंटॉर व डी आय सी सी आय च्या महिला विभागाच्या सदस्या सीमा कांबळे म्हणाल्या की, “स्वच्छता दूत फाउंडेशन गेल्या वीस वर्षांपासून सफाई कामगारांना न्याय मिळवून देत आहे.फाउंडेशनच्या समन्वयक मैत्रयी कांबळे यांनी सांगितले की, प्रशिक्षक पाखरे यांच्या फाउंडेशनने प्रशिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी दिल्या आहेत. काही खासगी कंपन्या सफाई कामगारांच्या प्रशिक्षणासाठी सुमारे ४० हजार रुपये शुल्क आकारतात. मात्र, स्वच्छता दूत फाउंडेशन हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत देत आहे. रत्नमाला राजगिरे, माया साबळे, रिबेका पाखरे, पल्लवी पाखरे, हबीब खान, लता गायकवाड, रामचंद्र गायकवाड यांच्यासह सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

 पीठासीन अधिकाऱ्यांचे अधिकारी वर्गाने मानले आभार मुंबई, दि.  (प्रतिनिधी) :महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ३ ऑगस्ट रोजी पदोन्नतीचे आदेश रवाना झाले असून अधिकारी वर्गाने त्याबद्दल पीठासीन अधिकारी तसेच सचिव यांच्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. पदोन्नती प्राप्त झालेल्या १८ अधिकाऱ्यांची नांवे आणि पदोन्नतीचे पद पुढील प्रमाणे आहे. पदोन्नतीनुसार उपसचिव पदाकरिता सीमा तांबे, पुष्पा दळवी आणि घननीळ देबडवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अवर सचिव पदाकरिता विनोद राठोड, कैलास पाझारे, जयश्री म्हात्रे, जीवन गावकर, पवन म्हात्रे आणि नेहा कोठारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अवर सचिव (समिती) पदासाठी नितीन अहेर, रविंद्र मेस्त्री आणि अलका पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय कक्ष अधिकारी पदावर जान्हवी गमरे, दिनेश तरे, संतोष सुद्रिक, ज्योती कामतेकर, शुभांगी जगे आणि शितल मोरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.काल संध्याकाळी याबाबतचे आदेश विधान मंडळ सचिवालय, आस्थापना विभाग यांच्या मार्फत जारी करण्यात आले. ०००००

मिरा -भाईंदर मेट्रोच्या अखेरच्या टप्प्याची चाचणी सुरू

मिरा -भाईंदर: मिरा – भाईंदरच्या जनतेसाठी आनंदाची बातमी आली असून काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान या अखेरच्या टप्प्याची मेट्रो चाचणी सुरू झाली आहे.  मिरा -भाईंदर शहरातून मुंबईच्या दिशेने लवकरच मेट्रोला सुरुवात…

नवनिर्वाचित महाराष्ट्र शासन महसूल, नोंदणी व मुद्रांक विभाग, सह दुय्यम निबंधक कर्जत-१, जिल्हा- रायगड, भरत सूर्यवंशी यांचे, दैनिक बित्तंबातमीचे मुंबई, कोकण प्रतिनिधी अशोक गायकवाड यांनी सोमवारी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत…

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका कायम कटिबद्ध : शर्मिला पिंपळोलकर

अनिल ठाणेकर | ठाणे भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती, परंपरा आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्यास व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणेही सुलभ…