Author: bittambatami.com

 प्लॅटिनम आरएक्सने केला १० लाख युजर्सचा टप्पा पार

भारतीयांच्या औषधांच्या खर्चात १२८ कोटी रुपयांहून अधिक बचत केली ठाणे : परवडणाऱ्या ब्रँडेड- जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील सर्वात विश्वासार्ह प्लॅटफॉर्म असलेल्या प्लॅटिनमआरएक्सने मोठा टप्पा गाठला असून देशभरातील १० लाखांहून अधिक रुग्णांना आपली सेवा दिली आहे. दर्जेदार जेनेरिक पर्याय उपलब्ध करून देत कंपनीने ग्राहकांच्या औषध खर्चात एकूण १२८ कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केली आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या आजारांमुळे लाखो भारतीयांना दरमहा २,००० ते ५,००० रुपयांपर्यंत औषधांवर खर्च करावा लागतो. या वाढत्या खर्चामुळे ७० कोटींहून अधिक लोक औषधांचे डोस चुकवतात, औषधे पुन्हा घेण्यास उशीर करतात किंवा उपचार अर्धवट सोडतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्लॅटिनमआरएक्सची सुरुवात करण्यात आली. हा प्लॅटफॉर्म प्रत्येक औषधासाठी एक काळजीपूर्वक निवडलेला आणि उच्च दर्जाचा ब्रँडेड जेनेरिक पर्याय उपलब्ध करून देतो. ही औषधे नामांकित फार्मा कंपन्यांकडून थेट घेतली जातात आणि त्यामध्ये मूळ ब्रँडेड औषधांप्रमाणेच १०० टक्के समान सॉल्ट कॉम्पोझिशन असते. परवानाधारक फार्मासिस्टमार्फत औषधे दिली जातात आणि भारतातील २० हजारांहून अधिक पिनकोडपर्यंत डिलिव्हरी केली जाते. मोठ्या शहरांमध्ये एका दिवसात, तर इतर भागांत १ ते ३ दिवसांत औषधे पोहोचवली जातात. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रुग्ण गुणवत्ता आणि सुरक्षिततेत कोणतीही तडजोड न करता दर महिन्याला औषधांच्या खर्चात ५० ते ६० टक्के बचत करू शकतात. आशुतोष पांडे, सह-संस्थापक, प्लॅटिनमआरएक्स म्हणाले, “भारतीय रुग्णांचे १२८ कोटी रुपये वाचणे हे आमच्यासाठी केवळ आकडेवारी नाही, हे ते पैसे आहेत जे आता कुटुंबांच्या दैनंदिन गरजांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि घरखर्चासाठी वापरले जात आहेत. औषधांच्या वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येतो आणि अनेकदा या गरजा मागे पडतात. आमचा विश्वास आहे की चांगल्या दर्जाची औषधे ही लक्झरी असू नयेत, प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीत मिळायला हवी. आज जवळपास १० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचल्यानंतर हा विचार मोठ्या बदलाचे रूप घेत आहे.” प्लॅटिनमआरएक्सची स्थापना आशुतोष पांडे आणि पियुष कुमार यांनी केली. हे दोघेही अनुक्रमे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाता येथील माजी विद्यार्थी आहेत. भारतात परवडणारी औषधे उपलब्ध असली तरी लोकांमध्ये विश्वास आणि योग्य माहितीची कमतरता आहे, या विचारातून त्यांनी कंपनी सुरू केली. रुग्णांमध्ये ब्रँडेड जेनेरिक औषधांचा वापर २०२४ मध्ये २२ टक्के होता, तो २०२५ मध्ये जवळपास दुपटीने वाढून ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. २०२६ अखेरीस हा आकडा ७० टक्क्यांहून जास्त होण्याची अपेक्षा आहे. या आकडेवारीवरून रुग्णांचा ब्रँडेड जेनेरिक औषधांवरील विश्वास हळूहळू वाढत असल्याचे दिसून येत आहे. दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण दरमहा औषधांच्या खर्चात सरासरी १,५०० रुपयांची बचत करत आहेत.

 वाढत्या तापमानामुळ मासे मृत झाल्याचा केडीएमसीचा निष्कर्ष

कल्याणच्या काळा तलावात मृत मासे प्रकरण काळा तलावातील मासे काढून तलाव स्वच्छ करण्याचे काम सुरू कल्याण : कल्याण शहरातील काळा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. तलावाच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक सकाळ संध्याकाळ काळा तलाव येथे फिरण्यासाठी चालण्यासाठी तसंच व्यायाम करण्यासाठी येत असतात. त्यांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. तलावाच्या पाण्यावर आणि किनाऱ्यावर शेकडो मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसून आले होते. नागरिकांकडून  तलाव स्वच्छ करण्याची मागणी होत होती. वाढते तापमानामुळे माशांचा मृत्यू झाल्याची केडीएमसीनी निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे गर्मीमुळे आणखी मासे मरुन दुर्गंधी पसरू नये यासाठी  केडीएमसी कडून जिवंत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.

बोगस जन्मदाखल्यांसंदर्भात किरीट सोमय्या यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

२००० संशयित जन्म प्रमाणपत्र सापडल्याची केडीएमसी आयुक्तांकडून माहिती कल्याण : कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्रे तयार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चर्चा करण्यासाठी माजी भाजप खासदार किरीट सोमैया यांनी शुक्रवारी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. या बैठकीला कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, उपमहापौर राहुल दामले, सभागृहनेते वरुण पाटील, गटनेते शशिकांत कांबळे यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी आणि नगसेवक उपस्थित होते. या बैठकीत समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या तीन महानगरपालिकांमध्ये १०,००० हून अधिक बनावट जन्म प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचा संशय आहे. एकट्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात २,००० हून अधिक बनावट प्रमाणपत्रे आढळली आहेत. या घोटाळ्यात हजारो बांगलादेशी नागरिकांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. या बैठकीनंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी जन्म प्रमाणपत्रे जारी करण्यामध्ये घोटाळा झाल्याचे मान्य केले. संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुढील १० दिवसांत एक विशेष तपास पथक स्थापन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. हे पथक बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा तपास करून गुन्हेगारांना शोधण्यात येईल. भाजप नेते किरीट सोमैया यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबईत अशाच एका प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. सोमैया यांनी सांगितले की, मुंबईत अशीच कारवाई करण्यात आली असून, कल्याण-डोंबिवलीतील गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे जारी करण्याशी संबंधित आहे. या प्रमाणपत्रांचा वापर बेकायदेशीर नागरिकत्व मिळवण्यासाठी, सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी आणि इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यातही अंदाजे १५,००० बनावट जन्म प्रमाणपत्रांची नोंद झाली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वीच्या तातडीच्या कामांना आचारसंहितेतून सूट द्या

खासदार नरेश म्हस्के यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ठाणे : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे रखडली असून, या कामांना आचारसंहितेतून विशेष सूट देण्यात यावी, अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. राज्यात सध्या २५ जूनपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची अनेक विकासकामे आणि निविदा प्रक्रिया प्रलंबित राहिल्या आहेत. विशेषतः आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा व्यवस्था, ड्रेनेज दुरुस्ती, संरक्षक भिंती, सांडपाणी व्यवस्थापन तसेच आपत्कालीन प्रतिबंधात्मक कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी निवेदनात नमूद केले आहे. आचारसंहितेमुळे संबंधित कामांना मंजुरी देणे, निविदा प्रक्रिया राबविणे आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात करणे शक्य होत नसल्याने नागरिकांना आगामी पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीतीही खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक हिताचा विचार करून पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक व आपत्कालीन स्वरूपाची कामे करण्यास विशेष परवानगी द्यावी, तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांना निविदा प्रक्रिया व कामे सुरू करण्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे केली आहे.

जेएनपीए ते सफाळे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्ग कार्यान्वित

पालघर : भारत सरकारच्या डेडेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या मालवाहतुकीसाठी विशेषत्वाने राखीव लोहमार्गाचा पहिला टप्पा २५ मे रोजी कार्यान्वित करण्यात आला. जेएनपीए ते सफाळे असा टप्पा…

– ५ जून रोजी सोलापुरात होणार राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा

२ जूनपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने शुक्रवार, ५ जूनला राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर येथे होणाऱ्या या परीक्षेमुळे राज्य परीक्षा पास झालेल्या पंचांना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या परीक्षेबाबत माहिती दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण पंचांनी राष्ट्रीय परीक्षेला बसावे आणि राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी २ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पूर्ण करावी. यासाठी प्रशांत पाटणकर (मो. क्र. ९९६७५६२४६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने पंचांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. 0000000000

सरस्वती, प्रबोधन, ॐ साईश्वर आणि अमरहिंदची दमदार कामगिरी अनेक संघांची विजयी आगेकूच

 मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा मुंबई : मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन मुंबई खो-खो संघटनेने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे २७ ते ३० मे कालावधीत आयोजन केले…

मध्य रेल्वेचा निसटता विजय

 १५वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) पुरुष एलिट गटात मध्य रेल्वेने मुंबई पोर्ट अथॉरिटीवर ३-२ असा निसटता विजय मिळवला. वांद्रे येथील…

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा २०२६

हरियाणाचा हर्षल उपांत्य फेरीत मुंबई : अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाच्या हर्षल राणाने दमदार झुंजार खेळ करत कर्नाटकच्या आर्यमन सिंगला चार गेममध्ये पराभूत केले. वांद्रे पश्चिम येथील ऑटर्स क्लबच्या स्क्वॉश कोर्टमध्ये गुरुवारी दोन १५ वर्षीय प्रतिभावान खेळाडूंमध्ये वर्चस्वासाठी तीव्र चुरस पाहायला मिळाली. गेल्या वर्षीचा ज्युनियर राष्ट्रीय विजेता हर्षल पहिला गेम हरला. पण डावपेचात्मक खेळ करत त्याने पुढील तीन गेम जिंकताना ६-११, ११-६, १२-१०, ११-९ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल दोन मानांकित खेळाडूंपैकी, श्रेयांश झा याने प्रदीपसिंग राठोडचा ११-६, १२-१०, ११-३ असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित अगस्त्य राजपूतने अगस्त्य बन्सलवर ११-८, ३-११, ११-९, ११-३ अशी चार गेममध्ये मात केली. निकाल (१३ वर्षांखालील मुली – उपांत्यपूर्व फेरी): १-ईशा शेळके विजयी वि. सीरत घुमन ११-२, ११-5, ११-4; श्रिया माहेश्वरी विजयी वि. रुही लोढा ११-२, ११-२, ११-5; अक्षरा माखिजा विजयी वि. अरणा राव ११-७, ११-३, ११-८; २-आध्या ग्रोव्हर विजयी वि. सानवी तिडके ११-9, १0-१२, ११-9, ११-६. १३ वर्षांखालील मुले: झेन अली विजयी वि. निर्वाण उप्पल १0-१२, ११-८, 9-११, ११-4, ११-३; निर्मान चमरिया विजयी वि. निर्वाण पारिख ११-4, 5-११, ११-9, ११-5; रिदान गुप्ता विजयी वि. कृशिव मित्तल ११-७, ११-5, ११-१; आर्यन एस के. विजयी वि. अरित्रा देबनाथ ११-9, ११-८, ११-७. १५ वर्षांखालील मुली : शनाया रॉय विजयी वि. समीरा गोरसिया ११-६, ११-4, ११-9; नंदिकाश्री कलैवनन विजयी वि. रायशा नाईक ११-१३, ११-८, ११-5, १0-१२, ११-9; २-त्रिशा शहा विजयी वि. एकम घुमन ११-२, ११-5, 5-११, ६-११, ११-२. मुले: रुआन राम तडंकी विजयी वि. आर्यन प्रभू ११-5, ११-६, 4-११, १२-१0; विनय शिंदे विजयी वि. ऋषभ श्याम ११-६, 5-११, ११-9, ८-११, ११-६; फरीद अंद्राबी विजयी वि. प्रभू बाजोरिया ११-9, ११-5, ११-६; अयान धनुका विजयी वि. २-वेदांत अग्रवाल ११-4, ११-६, ३-११, ११-६. १७ वर्षांखालील मुली : वसुंधरा नांगरे विजयी वि. आरवी रैना ११-१, ११-5,११-5; फबिहा नफीस विजयी वि. अहाना सिंग 9-११, ११-६, 9-११, ११-३, ११-८; देवश्री अरोरा विजयी वि. अनुष्का जोहरी ११-८, ११-5, १4-१२; २-आरिका मिश्रा बीटी अमायरा मेहता ११-4, ११-६, ७-११, ११-२; मुले : १-श्रेयांश झा विजयी वि. ११-६, १२-१०, ११-३ प्रदीपसिंग राठोड; हर्षल राणा विजयी वि. आर्यमन सिंग ६-११, ११-६, १२-१0, ११-9; सहर्ष शहारा विजयी वि. इंद्रांशसिंग राकेश बडगुजर ११-5, ११-4, १२-१0; २-अगस्त्य राजपूत विजयी वि. अगस्त्य बन्सल ११-८, ३-११, ११-9, ११-३. 000000000