Category: होम

कल्याण-डोंबिवली कुस्तीगीर परिषदच्या वतीने कोकण केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न 

कल्याण: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जय हनुमान तालीम संघ, सापाड कल्याणच्या वतीने बिट्टू ग्रुप सापाड आयोजित कोकण केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पौढ गट (५७ किलो)…

 शैक्षणिक साहित्य खरेदीतून पालकांची लूट रोखणाऱ्या ‘सुराज्य अभियाना’च्या उपक्रमाला मोठे यश

 शाळांची ‘व्हेंडर मोनोपॉली’ संपुष्टात; तक्रार निवारण यंत्रणा चालू करण्याचे आदेश कल्याण : खासगी शाळांकडून शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली पालकांची केली जाणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी ‘सुराज्य अभियाना’ने राबवलेल्या अभियानाला मोठे यश मिळाले आहे. शाळांनी ‘विशिष्ट दुकानातूनच गणवेश, वह्या किंवा शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती करू नये’, यासाठी शिक्षण संचालनालयाने 15 एप्रिल रोजी कडक परिपत्रक काढले आहे. या आदेशाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात केवळ नियम न सांगता सक्षम तक्रार निवारण यंत्रणा सक्रिय करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ‘सुराज्य अभियाना’ने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, अशीच पारदर्शक यंत्रणा देशातील सर्व राज्यांत आणि सर्व शिक्षण मंडळांत  लागू करण्याची मागणी देखील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचे सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी या ‍वेळी सांगितले. राज्य शिक्षण संचालनालयाने परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यात येणार नसल्याचा ठराव घेण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश दिले. तसेच याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी आपल्या कार्यालयाचा ई-मेल आयडी प्रसिद्ध करावा. तसेच विषयाच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. या परिपत्रकाची आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये माहिती होण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्यासाठी कार्यवाही करावी. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी  प्रशासन अधिकारी यांनी त्याबाबत शहानिशा करून तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे अनिवार्य केले आहे. मोहिमेच्या राष्ट्रीय व्याप्तीबाबत मुरुकटे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातील हा आदेश एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतातील काही अन्य राज्यांनीही अशाच स्वरूपाची पावले उचलली आहेत; मात्र हे संकट देशभर पसरलेले असून अनेक केंद्रीय मंडळांच्या  शाळा राज्याच्या नियमांना जुमानत नाहीत. त्यामुळे आम्ही केंद्रीय शिक्षण सचिव आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी केली आहे की, संपूर्ण देशासाठी एक समान ‘नॅशनल ॲडव्हायझरी’ जारी करावी, जेणेकरून कोणत्याही राज्यातील पालकांची आर्थिक लूट होणार नाही.”

अशोक खरातविरुध्द ‘हेल्पलाईन’वर शेकडो तक्रारी

 पोलिसांनी आश्वस्त केल्याने पीडितांकडून प्रतिसाद हरिभाऊ लाखे नाशिक –हाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक माहती पुढे येत आहे. विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तसेच खरातच्या आर्थिक व्यवहारांचा ईडीकडून…

 ‘वन्यजीव-निसर्ग-साहस’ व्याख्यानमाला रंगली

 दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश देत कळवा – निसर्ग, आकाश आणि वन्यजीव यांच्यातील नातं अधिक संवेदनशीलतेने जपण्याची गरज अधोरेखित करत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त…

 शिवसेनेने वितरित केले कचऱ्याचे डबे

शिवसेनाप्रमुखांची जन्मशताब्दी उत्साहात मुंबई, दि. (प्रतिनिधी): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशाब्दीनिमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१२ नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना  कचऱ्याच्या डब्यांचे…

कृषी क्षेत्रातील ‘ॲग्री स्टार्टअप ऑफ द इयर’ पुरस्काराने मुजफ्फर हुसेन यांचा गौरव.

मिरा – भाईंदर:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मिरा – भाईंदरचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या नाविन्याबद्दल नवी दिल्लीत ‘ॲग्री स्टार्टअप ऑफ द इयर (राष्ट्रीय)’ आणि…

महिला आरक्षणाच्या आडून देश फोडण्याचा भाजपाचा डाव

 भाजपाकडून संविधानाच्या गाभ्यावर थेट हल्ला – वर्षा गायकवाड.  (राजेंद्र साळसकर) मुंबई-हिला आरक्षणावरून भाजपा व सत्ताधारी पक्षातील काही घटक पक्षांनी जे आकांडतांडव सुरु केले आहे ते चुकीचे आहे. काँग्रेस पक्षाचा महिला आरक्षणाला…

लोककेंद्रित भूसंपादनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

२१६ एकर जमीन संमतीने संपादित मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या लोककेंद्रित व पारदर्शक सहभागात्मक भूसंपादन धोरणाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत रायगड जिल्ह्यातील नव्या ग्रोथ सेंटरसाठी तब्बल २१६ एकर…

मुंबईत खून, कोलकात्यात अटक

खेरवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई मुंबई: मुंबईच्या बांद्रा पूर्व येथील कल्पतरू स्पार्कल परिसरात झालेल्या अभिनवकुमार याच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना यश आले आहे. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी मुख्य आरोपीला ६० तासांच्या आत पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या १३ एप्रिल रोजी दुपारी २:२० च्या सुमारास अभिनवकुमार याला काही अज्ञात इसमांनी गाठून त्याच्या मानेवर चाकूने वार केले होते. या हल्ल्यात अभिनवचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, मृत अभिनव याचे प्रितीकुमारी नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, प्रितीकुमारीच्या घरच्यांनी तिचे लग्न निरजकुमार बिलास चौधरी (३१) याच्याशी ठरवले होते. प्रितीकुमारीने या लग्नास विरोध केल्याने निरजकुमारच्या मनात अभिनवबद्दल प्रचंड राग होता. याच रागातून निरजकुमारने आपल्या साथीदारांच्या मदतीने अभिनवची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी निरजकुमार हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता. तो सतत आपले लोकेशन बदलत होता. त्याने मुंबई ते कोलकाता प्रवासादरम्यान पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ३ ते ४ वेळा ट्रेन बदलल्या. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांचे एक पथक नागपूरला तर दुसरे कोलकात्याला रवाना झाले. अखेर आरोपी कोलकाता येथून विमानाने दिल्लीला पळण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी CISF च्या मदतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परमजीतसिंग दहिया, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ८) मनीष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त (खेरवाडी विभाग) संजय गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या तपासात पोलीस निरीक्षक सविता माळी, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल आटोळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप लोंढे, पोलीस उपनिरीक्षक चेतन पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय घोसाळकर, पोलीस हवालदार ठोंबरे, पोलीस हवालदार ठाकरे, पोलीस शिपाई गायकवाड, पोलीस शिपाई अमित शिंदे आणि पोलीस शिपाई प्रसाद पडवळकर या सर्वांचा सहभाग होता.

 अवैध वाळू आणि वाहतुकीविरुद्ध खुद्द जिल्हाधिकारी उतरल्या मैदानात…!

 एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत काल जिल्हाधिकारी स्वतः मैदानात उतरल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत बेकायदा वाळू वाहतूक करणारे 1५ डंपर पकडण्यात आले. हे ऑपरेशन काल एका रात्रीत पार पडले. काल रात्रीपासून सुरु झालेली ही धडक मोहीम पहाटेपर्यंत सुरु होती. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उप -जिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे   यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत ही व्यापक मोहीम राबवली. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार त्या त्या   तालुक्यांतील तहसिलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेत सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे तहसिलदार सूर्यकांत पाटील, कणकवलीचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे, मालवणचे तहसिलदार गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे तहसिलदार ओंकार ओतारी तसेच कुडाळचे तहसिलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता. कारवाई दरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला.  आचरा–कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने २ वाहने ताब्यात घेतली, तर देवलीमार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या ३ वाहनांवर वेंगुर्ल्याच्या  पथकाने कारवाई केली. कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने ३ वाहने पकडली, तोंडवली येथे सावंतवाडी पथकाने ३ वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ परिसरात कुडाळ पथकाने ४ वाहने ताब्यात घेतली. अशा प्रकारे विविध ठिकाणी समन्वयाने करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी रात्री झाराप परिसरात भेट देत कारवाईचा आढावा घेतला.रात्रभर चाललेल्या या मोहिमेत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपल्या वाहनातील वाळू टाकून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या.  प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला कायम स्वरूपी आळा बसेल की ही कारवाई एक उपचार ठरते हे आता पहावे लागेल.