Category: होम

चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज

चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवरीस अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र प्रशासन,  मुंबई महापालिका व पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत. चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जी/उत्तर विभागातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क व आसपासच्या परिसरात सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक तयारी करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून उंच टेहळणी मनोरेही उभारले आहेत. याशिवाय ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, २० मेटल डिटेक्टर आणि ३० हँडहेल्ड मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी अनुयायांसाठी सुमारे ५०० मीटर अंतरावर दुतर्फा पडदे लावण्यात आले आहेत. आरोग्य सेवांसाठी ३० वैद्यकीय अधिकारी आणि ७० सहाय्यक कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून पाच रुग्णवाहिका, एक अतिदक्षता रुग्णवाहिका तसेच दादर चौपाटीवर सुरक्षेसाठी रेस्क्यू बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप

  माथेरान :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून काल येथील कम्युनिटी सेंटर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला…

 ठाण्यात ज्येष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व मेळावा उत्साहात संपन्न

  ठाणे : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासना मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती व्हावी, या उद्देशाने ठाणे…

गीत संगीत सादरीकरणाच्या कार्यक्रमातून अवयवदानाचे आवाहन

कल्याण : कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे शनिवारी पार पडलेल्या हिंदी चित्रपट गीत संगीताच्या रंगारंग कार्यक्रमात नेत्रदान, देहदानाबद्दलचे आवाहन उपस्थित गानरसिकांच्या संवेदनशीलेतेला स्पर्शून गेल्याचे पाहायला मिळाले. ‘शरद कराओके ॲण्ड लाईव्ह…

 काशिगाव मेट्रो स्थानकातील वाहतूक कोंडीवर एमएमआरडीएला २ महिन्यांचा ‘अल्टिमेटम’!

– प्रताप सरनाईक ‘ॲक्शन मोड’वर मीरा-भाईंदर, मीरा-भाईंदरच्या दळणवळणात क्रांती घडवणाऱ्या मेट्रो ९ च्या प्रवासाला गती मिळाली असली, तरी प्रवाशांना भेडसावणारी ‘कोंडी’ फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मैदानात उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. काशिगाव मेट्रो स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, अपूर्ण एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स आणि पार्किंगच्या भीषण समस्येची दखल घेत सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानक परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ‘येत्या दोन महिन्यात प्रवाशांच्या अडचणी सुटल्याच पाहिजेत,’ असा सज्जड दम भरत एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाला २ महिन्याचे अल्टीमेटम दिले आहे. पाहणी दरम्यान समोर आले की, तांत्रिक अडचणी आणि काही जागा मालकांच्या आडकाठीमुळे ४ पैकी २ एन्ट्री-एक्झिट पॉईंट्सचे काम प्रलंबित आहे. बिल्डर आणि ७/११ कंपनी मालकाच्या जागेच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे हे काम रखडल्याचे समोर येताच सरनाईक यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या सोयीसाठी आता कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. विशेषतः ७/११ कंपनीच्या जागेबाबत त्यांनी मोठे विधान केले असून, केवळ १३३ मीटरच नव्हे तर संपूर्ण भूखंड एमएमआरडीएला देऊन तिथे भव्य *’पार्किंग प्लाझा’ उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.काशिगाव मेट्रो स्थानकालगत ओसवाल बिल्डरच्या जमिनीच्या वादामुळे थांबलेले काम तातडीने सुरू करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. या कामात अडथळा आणणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच ७/११ कंपनीच्या मालकी जागेवरील १३३ मीटर जागा मेट्रोच्या एन्ट्री-एक्झिट पॉईंट्ससाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, शहराच्या हितासाठी त्यांनी केवळ १३३ मीटर जागा न देता, तो संपूर्ण भूखंडच ‘पार्किंग प्लाझा’साठी एमएमआरडीएला हस्तांतरित करावा, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे. जर ७/११ कंपनीने हा भूखंड दिला, तर त्या ठिकाणी सुमारे १५०० ते २००० खाजगी वाहनांची सोय होईल असा प्रशस्त पार्किंग प्लाझा उभारता येईल. “शहरातील जनतेने त्यांना दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे, आता त्यांनी जनतेच्या सोयीसाठी ही जागा द्यावी,” असे आवाहन करत मंत्री सरनाईक यांनी चेंडू ७/११ कंपनीच्या कोर्टात टाकला आहे. मेट्रो स्थानकापर्यंत येणाऱ्या नागरिकांना स्वत:ची गाडी पार्क करून निश्चिंतपणे प्रवास करता यावा, अशी व्यवस्था पुढील ६० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणतात कि, “मेट्रो ही जनतेच्या सोयीसाठी आहे, त्रासासाठी नाही! काशिगाव स्थानकाबाहेर प्रवाशांना होणारा मनस्ताप मी सहन करणार नाही. जागा हस्तांतरण आणि तांत्रिक नावाखाली कामात दिरंगाई करणाऱ्यांना माझा स्पष्ट इशारा आहे—येत्या २ महिन्यांत एन्ट्री-एक्झिटचे दरवाजे उघडा आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लावा. ७/११ कंपनीच्या मालकाला माझी विनंती आहे की, ज्या जनतेने आपल्याला दोनदा निवडून दिले, त्या सामान्यांच्या सोयीसाठी आपला भूखंड एमएमआरडीएला द्यावा. रेडीरेकनर दराने मोबदला घ्या, पण तिथे भव्य पार्किंग प्लाझा उभारून शहराला कोंडीमुक्त करण्यासाठी सहकार्य करा. यात कुचराई खपवून घेत

महाराष्ट्रातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी आक्रोश मोर्चा

कल्याण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन दोन वर्ष होत आले. त्याआधी सुमारे आठ वर्ष त्यांनी मुखमंत्री म्हणून काम केलेले आहे. या काळात वारंवार पाठपुरावा करूनही कामगारांचे प्रश्न…

 जिल्ह्यात ‘सुपर निपुण’ शाळांच्या संख्येत पाचपट वाढ

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा हरिभाऊ लाखे नाशिक – महाराष्ट्र शासनाच्या ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानातंर्गत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मागील महिन्यात (फेब्रुवारी ते मार्च) शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व ऐतिहासिक प्रगती नोंदविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘लक्षित उपचारात्मक अध्यापन’ आणि ‘१०० दिवस वाचन मोहीम’च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली असून ‘सुपर निपुण’ शाळांच्या संख्येत तब्बल पाचपट वाढ झाली आहे. जिल्हा मूल्यांकन अहवालानुसार, सध्या जिल्ह्यातील १,३९,७०१ विद्यार्थी ‘निपुण’ श्रेणीत पोहोचले असून, केवळ एका महिन्यात ५५,९९० नव्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे. ही वाढ जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे द्योतक मानली जात आहे. आकडेवारीनुसार, ‘सुपर निपुण’ शाळांची संख्या २३३ वरून थेट १,११३ पर्यंत वाढली आहे, तर ‘निपुण’ शाळांची संख्या ३५३ वरून १,४७१ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, अत्यंत कमी कामगिरी असलेल्या १३१ पैकी ९७ शाळांनी (७४ टक्के) आपली गुणवत्ता सुधारून ‘निपुण’ श्रेणी प्राप्त केली आहे. हे यश जिल्हा प्रशासन, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. या यशामागे जिल्हा परिषदेने राबवलेली ‘पंचसूत्री’ रणनीती महत्त्वाची ठरली आहे. यामध्ये उपचारात्मक स्तराधारित कृतीपुस्तिकांचे वितरण, वाचन संस्कृतीला चालना देणारी ‘१०० दिवस वाचन मोहीम’, प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चिती, विद्यार्थी व अधिकाऱ्यांमधील थेट संवाद आणि क्षेत्रीय पातळीवरील नियमित भेटी यांचा समावेश आहे. उपचारात्मक शिक्षण उपक्रमांतर्गत ५,६२५ विद्यार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ‘उपचारात्मक संच’ उपलब्ध करून देण्यात आले. भाषा आणि गणित विषयांसाठी दररोज एक तास स्वतंत्र वेळ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांमध्ये सुधारणा दिसून आली. ‘१०० दिवस वाचन मोहीम’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी व्हॉट्सॲप चॅनेलद्वारे दररोज दोन डिजिटल पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासकीय पातळीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या विशेष बैठका घेऊन कामाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले. तसेच, आव्हानात्मक भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दररोज विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून शाळांना नियमित भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा घेण्यात आला.

“सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन

“सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन जयंत चाचरकर यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात ‘सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम’ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुंषगाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” ही विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड जयंत चाचरकर यांनी दिली आहे. इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने बऱ्याचदा मागासवर्गीय विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती उद्भवते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर असा बिकट प्रसंग येऊ नये व त्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये. यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळवले आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरीत अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी

कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात

कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात इकोची सिमेंट मिक्सरला धडक, भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू कल्याण : कल्याण मुरबाड मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोमवारी घडली. एक सिमेंट मिक्सर आणि काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रायते पुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको गाडीचा सकाळी ८.३० च्या सुमारास अपघात झाला. गाडीतील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामध्ये ८ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून मृतदेह गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आली. प्रवाशांनी भरलेली इको कार मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 1२ प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने केले. टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला? हे अद्याप समजू शकलेले नाही. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. या मृतांमध्ये प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने, वय २1 वर्ष, देवगाव मुरबाड, भूषण घोरपडे, वय ४९ वर्ष, अंधेरी मुंबई. तहसीलदार कार्यालय मुरबाड या कार्यालयात महसूल सहाय्यक, जिजा गोविंदा केंबारी, वय ५० वर्ष, टेंभरे मुरबाड, अनंता पवार, साखरे मुरबाड, दीपक गवळी, राहणार कल्याण, गणपत जैनू मधे, वय ३२ वर्ष, देवराळवाडी मुरबाड, स्नेहा मोहपे, वय अंदाजे २२ वर्ष, मानसी मोहपे, वय अंदाजे २० वर्ष, प्रथमेश मोहपे, वय अंदाजे 1७ वर्ष हे तिघेही एकाच कुटुंबातील  नारायणगाव मुरबाड येथील आहेत. तर अन्य दोन व्यक्तींची ओळख पटवणे सुरू आहे. कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावर सकाळी रायते परिसरात झालेल्या अपघतात प्राथमिक माहिती नुसार नऊ प्रवासी मृत्यूमुखी झाले आहेत. या अपघातातील इको संर्वगातील वाहनाची सर्व कागदपत्रे वैध्य आहेत, आरटीओ इनस्पेक्टर यांनी घटनास्थळी पोहचत माहिती घेऊन याबाबत सविस्तर अवहाल तयार करणार आहोत. अनधिकृत प्रवासी वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ बाबत आरोप असल्याच्या बाबत अवैध वाहतूक संदर्भात आरटीओकडून कारवाई केली जाते अशी प्रतिक्रिया कल्याण उप प्रादेशिक अधिकारी अशुतोष बारकुल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तर रायते येथील महामार्गावर झालेल्या भीषण अपघाता संदर्भात, रायते येथील ग्रामस्थ संतोष सुरोशी यांनी प्रतिक्रिया दिली की, रायते, पिंपळोली ग्रामस्थांनी रस्त्या संदर्भात निवेदन देखील दिले होते. रस्त्याचे काम अर्धवट असून, दिशा दर्शक फलक लावले नाहीत, वाहतूक सुरु करू नका असे असून देखील मिक्सर अवजड वाहनांची होणारी वाहतूक पाहता आरटीओचे नियंत्रण नाही यामुळेच आजच्या या भीषण अपघातात निष्पाप लोकांचे बळी गेले असल्याचा आरोप करत  शासनाचा  धिक्कार करतो अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष सुरोशी यांनी दिली. तर एनएच ६१ महामार्गावर रायते येथे इको आणि मिक्सर या वाहनांच्या अपघाततील इको मधील प्रवाशांचे मृतदेह गोवेली शासकीय रूग्णालयात आणले असून ११ मृतदेह असल्याची प्रतिक्रिया कल्याण ग्रामीण डीवायएसपी अनिल लाड यांनी दिली.

आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया कागदपत्र पडताळणीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत

आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया कागदपत्र पडताळणीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व नियम २०११ अंतर्गत आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये प्रवेशस्तर वर्गात २५% जागा वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम फेरीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस १० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी अॅलॉटमेंट लेटर, हमीपत्र व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शासनाने २० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. ही पडताळणी कै. शंकरराव झुंझारराव मनपा शाळा क्रमांक १, गांधी चौक, बारदान गल्ली, कल्याण पश्चिम येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वेळेत (शासकीय सुट्ट्या वगळून) करण्यात येणार आहे. ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रेच ग्राह्य शासनाच्या निर्देशानुसार पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अपलोड केलेली मूळ कागदपत्रेच पडताळणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रतींसह छायांकित प्रतींचे दोन संच सोबत आणणे आवश्यक आहे. पालकांनी आरटीई पोर्टलवरून अॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून निर्धारित कालावधीत पडताळणी पूर्ण करून आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.