Category: होम

बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणसंबंधित कडक अंमलबजावणी करण्यात यावी

बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणसंबंधित कडक अंमलबजावणी करण्यात यावी डॉ डी एल कराड यांची मागणी अनिल ठाणेकर नाशिक, शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार तसेच युवकाचा धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसात एकूण ९ गुन्हे दाखल असून ६ संशियतांना अटक केली आहे. हे एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे. बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा,अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य, संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली हे स्वागतार्ह आहे.  तक्रारदारांमध्ये ८ महिला तर १ पुरुषाचा समावेश आहे. युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची तक्रार आहे. या कंपनीतील महिलांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु वरिष्ठांनी तक्रारीची दखल घेतली नाही. नाशिक जिल्ह्यात व शहरात अनेक उद्योग व आस्थापनांमध्ये महिला कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु कायद्यानुसार अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या नाहीत असे दिसून आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून ज्या आस्थापना मध्ये महिला कर्मचारी काम करतात त्या आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन झाली पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही करणे आवश्यक आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा.या बाबत वरील मागणी करण्यात आली.यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली मा. विकास माळी साहेब,कामगार उपायुक्त, नाशिक व मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सिताराम ठोंबरे, ॲड. तानाजी आप्पा जायभावे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे,कॉ मोहन जाधव, संतोष कुलकर्णी, गौतम कोंगळे, छाया जाधव, विजया टिक्कल, कॉ हिरामण तेलोरे, युवराज पाटील उपस्थित होते.

“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याची मुदत वाढ

“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याची मुदत वाढ ठाणे : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त (२०२६-२७), सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने साकार होत असलेल्या “क्रांतीसूर्याचं देणं” या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. राज्यभरातील कवी-लेखकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विनंतीचा विचार करून, आता कविता पाठविण्याची अंतिम मुदत  २४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. या ऐतिहासिक काव्यप्रकल्पासाठी कवींनी समता, सामाजिक न्याय, मानवता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य, त्यांचे मौलिक विचार, विविध सत्याग्रह आणि विशेषतः महाडच्या चवदार तळ्याची क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न, विचारप्रवर्तक आणि मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या कवितांमधून केवळ निवडक आणि दर्जेदार कवितांचीच निवड करण्यात येणार असून, कविता स्वतःची, मौलिक व अप्रकाशित असणे अनिवार्य आहे. तसेच, प्रथम सहभाग नोंदविणाऱ्या कवींना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रा. आशा रणखांबे (सार्थक साहित्य प्रकाशन) तसेच साहित्यिक नवनाथ रणखांबे ९९६७४३५०३२ / ९९६७४८०९३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

निलिकॉन कंपनीतील कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ मिळणार

निलिकॉन कंपनीतील कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ मिळणार कामगारांतर्फे संजय वढावकर यांचा सत्कार अनिल ठाणेकर ठाणे, रायगड जिल्ह्यामधील रोहा येथील निलिकॉन कंपनी व्यवस्थापन आणि  जनरल मजदूर सभेच्या वतीने नुकत्याच झालेल्या वेतन करारानुसार कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ व इतर सुविधा मंजूर झालेल्या आहेत. त्यानिमित्ताने कंपनीतील कामगारांनी संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर आणि अध्यक्षा संज्योत वढावकर यांचा जाहीर सत्कार केला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. कामगारांना मिळालेल्या भरघोस पगारवाढीमुळे  ठाणे येथील जनरल मजदूर सभेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.  आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, कामगारांची एकजूट,  संयम आणि संघटनेवरील विश्वास यामुळेच हा वेतन करार संपन्न झाला. कारखाना टिकला तरच कामगार टिकेल, अशी  स्पष्ट भूमिका मांडून  त्यांनी आपली संघटना ही कामगारांच्या न्याय हक्कासाठी  कायम खंबीरपणे उभी राहील. धाटाव एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये संघटनेने आत्तापर्यंत अनेक यशस्वी वेतनकरार केले असून, टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी नोकऱ्या मिळवून देण्याचे काम केले आहे. संघटनेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर यांनी सांगितले की,  कामगारांनी संघटित राहून  आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे,  तरच आपणास न्याय मिळेल. सदर सत्कार सोहळ्यास शामकांत जोशी, जगदीश उपाध्ये, सुहास खरीवले, प्रशांत शेट्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत कोतवाल यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन निलिकॉन कामगार सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले होते. हा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष भरत कोतवाल, उपाध्यक्ष जनार्दन राजीवले, सेक्रेटरी एच.पी. वर्मा तसेच नितीन रटाटे, अनंता ढमाल, चिंतामणी साळस्कर, लक्ष्मण भोकटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मिरा-भाईंदरच्या विकासाचा मार्ग मोकळा करा – प्रताप सरनाईक

मिरा-भाईंदरच्या विकासाचा मार्ग मोकळा करा – प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर : मुंबईच्या वेशीवर असलेल्या आणि झपाट्याने विस्तारणाऱ्या मिरा-भाईंदर शहराचा रखडलेला विकास पुन्हा रुळावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पाऊले उचलली आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला विकास आराखडा अद्याप अंतिम न झाल्याने अनेक विकासकामे रखडली असून, नागरिकांना त्याचा थेट फटका बसत आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि प्रलंबित नागरी प्रकल्प लक्षात घेता, महानगरपालिकेचा ‘सुधारीत विकास आराखडा’ (DP) शासन स्तरावर तातडीने अंतिम करावा, अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मिरा- ईंदर शहराची मूळ विकास योजना १९९७ आणि २००० मध्ये मंजूर झाली होती. वाढत्या गरजा लक्षात घेऊन १५ ऑक्टोबर २०१५ रोजी सुधारीत आराखड्याचा इरादा घोषित करण्यात आला.…

शिक्षकांना मिळणार थकबाकी!

शिक्षकांना मिळणार थकबाकी! मुंबई पालिका प्रशासनाकडून प्रलंबित मागण्या मान्य मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची जून-जुलैपासून थकबाकी देण्यात येणार आहे. त्याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून असलेली प्रवास भत्त्याची मागणीही मान्य करण्यात आली असून पुढील महिन्यात याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात श्रमिक पालिका शाळेतील शिक्षकांना मासिक २,७०० प्रवास भत्ता मिळतो. तर प्राथमिक अनुदानित शाळेतील २,५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अवघा ६०० रुपये प्रवास भत्ता मिळतो. पण यावर तोडगा निघाला असून महापालिकेने प्रवास भत्ता देण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती कामगार नेते प्रशांत पाटील यांनी दिली. उत्कर्ष सभा यांच्या पदाधिकाऱ्यांची कामगार नेते प्रसाद लाड, बाबा कदम, भालचंद्र साळवी, प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर, उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर यांच्या सोबत बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासनाने काही प्रलंबित मागण्या मान्य केल्या. पालिकेच्या अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आला. पण अद्याप सातवा वेतन आयोगाची थकबाकी मिळालेली नाही. मात्र या बैठकीत जून-जुलैपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता देण्याचे मान्य केले आहे.

फुले – आंबेडकर – गाडगे महाराज यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला

फुले – आंबेडकर – गाडगे महाराज यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला सुनील कदम यांचे प्रतिपादन अभिनव महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह अरविंद जोशी मिरा – भाईंदर : ‘महात्मा फुले हे त्या काळातील मोठे उद्योजक होते. ते रोड कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी मुंबईतील अनेक इमारती बांधल्या. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त काम फुले यांनी केले. शेतमालाच्या मार्केटिंगचं काम त्यांनी केलं. समाजातील अंधश्रद्दा दूर करण्याचं काम  फुले, संत गाडगे महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. फुलेंच्या कार्याचा गौरव म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. संत गाडगे महाराजांनी देव दगडात नाही, तर माणसात आहे हे सांगितलं. या महापुरुषांचा विचार आजच्या परिप्रेक्षात समजून घ्यावा लागेल,’ असे प्रतिपादन समान संधी अभियानाचे प्रणेते सुनील कदम यांनी केले. भाईंदर येथील अभिनव महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात आला होता, त्यानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र गीतानंतर पाहुण्यांचा परिचय प्रा. राजेश सोनवणे यांनी करून दिला. त्यानंतर प्रा. वैष्णवी पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी कॅप्टन अजित खेडकर, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष किरण पाटील व प्राचार्य डॉ. ऑल्विन मेनेजिस यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास मिडिया विभाग प्रमुख प्रा. उत्तम भगत यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी उपस्थित होते. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अमोल पाटील, कार्यवाह मंगेश पाटील, सहकार्यवाह प्रकाश पाटील, खजिनदार अशोक पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष विष्णू पाटील तसेच सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ठाण्यात भव्य ‘महिला मेळावा’ संपन्न

सामाजिक समता सप्ताहानिमित्त ठाणे :- अनुसूचित जाती, जमाती आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संपूर्ण राज्यात ८ ते १४ एप्रिल…

इंदू मील मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास महायुती सरकारकडून वेळकाढूपणा, ठोस धोरण व योग्य नियोजन नसल्याने स्मारकास विलंब- वर्षा गायकवाड.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार फक्त अदानी अंबानीसाठी असून देश विकण्याचे काम बिनबोभाट सुरु आहे. सरकारकडे कोणतेही निश्चित धोरण, नियोजन व आर्थिक शिस्त नसल्याने अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होत…

केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

अग्निशमन सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कल्याण:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये २०० हुन अधिक सायकलिस्टने भाग घेतला. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरवात करण्यात आली.  १४ एप्रिल ते २० एप्रिल देशभर अग्निशमन सप्ताहाचं आयोजन केले जाते. केडीएमसी अग्निशमन दलाकडून सप्ताह साजरा केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.  रक्तदान शिबीर, सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना अपघात कसे टाळावे, आपत्कालीन परिस्थिती आली तर काय करावे याबाबत जनजागृती करण्यात आली. ०००००००

ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा, प्रभादेवी-२०२६.

मुंबईतील वरळी येथे आजपसून होणाऱ्या पहिल्या पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर. वरळीकरांना प्रो-कबड्डी स्टार खेळाडू्नच्या खेळाची मेजवानी पुढील चार दिवस मिळणार. मुंबई :- ओम् ज्ञानदीप मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १४ एप्रिलला सुरु होणाऱ्या हंगामातील पहिल्या पुरुष व्यवसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली. युवा पलटण विरुद्ध स्वामी समर्थ स्पोर्टस्, आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध न्यू इंडिया एन्शुरन्स या दोन लढातीने या स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्ताने ओम् ज्ञानदीप मंडळाने प्रभादेवी, वरळी येथील कबड्डी रसिकाना प्रो-कबड्डी स्टार खेळाडूचा खेळ प्रत्यक्ष पहाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. वरळी, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावरील मॅटच्या २ क्रीडागणावर ही स्पर्धा संध्याकाळी ६ ते १० या वेळेत प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येईल. या स्पर्धेची तयारी जोमाने सुरु असून स्पर्धेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून ओम् ज्ञानदीप मंडळाचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या स्पर्धेचे उदघाटन स्थानिक विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे व आमदार महेश सावंत यांच्या हस्ते संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १८ व्यावसायिक पुरुष संघांची ६ गटात विभागणी करण्यात आली. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. स्पर्धेची गटवारी आज प्रसार माध्यमाकरिता एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली. पुरुष व्यावसायिक गट विभागणी :- १) अ गट :- १) युवा पलटण, २) मुंबई पोष्टल, ३)स्वामी समर्थ स्पोर्टस्. २) ब गट :- १) भारत पेट्रोलियम, २) पश्चिम रेल्वे, ३) न्यू इंडिया एन्शुरन्स.…