Category: होम

आरटीई प्रवेशासाठी बनावट उत्पन्न दाखल्यांचा गैरवापर

आरटीई प्रवेशासाठी बनावट उत्पन्न दाखल्यांचा गैरवापरSlug – दोषींवर कठोर कारवाईची नरेंद्र पवार यांची मागणी कल्याण : शिक्षणाचा हक्क  कायद्याअंतर्गत शालेय प्रवेशासाठी बनावट उत्पन्नाचे दाखले सादर करून प्रवेश मिळविल्याच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित महा-ई-सेवा केंद्र चालकांवर कठोर कारवाई करून त्यांची नोंदणी तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळालेले आरटीई प्रवेशही रद्द करण्यात यावेत अशी महत्त्वाची मागणी भाजपाचे भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या गंभीर विषयासंदर्भात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आज भेट घेऊन आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या गैरप्रकारांकडे लक्ष वेधले आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य असताना काही प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता बनावट अथवा खोटे उत्पन्नाचे दाखले तयार करून दिल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. या बनावट उत्पन्नाच्या दाखल्यांमुळे पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे नरेंद्र पवार यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच उत्पन्नाचा दाखला देताना अर्जदाराकडून सत्यप्रतिज्ञापत्र, संबंधित संस्थेच्या वार्षिक उत्पन्नाचा तपशील, तलाठी पंचनामा तसेच शासनाने विहित केलेली इतर आवश्यक कागदपत्रे घेणे बंधनकारक असतानाही काही महा-ई-सेवा केंद्रांमार्फत नियमबाह्य पद्धतीने बनावट उत्पन्नाचे दाखले तयार करून दिले जात असल्याचेही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभिर्य पाहता निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी, संबंधित महा-ई-सेवा केंद्र चालक तसेच या गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी त्यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे. तसेच  बनावट उत्पन्नाचे दाखले तयार करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रांची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात यावी आणि भविष्यात अशा प्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबविण्याची आवश्यकता असल्याचेही नरेंद्र पवार यांनी यावेळी नमूद केले. याशिवाय, खोट्या उत्पन्नाच्या दाखल्यांच्या आधारे RTE अंतर्गत मिळालेले शालेय प्रवेश रद्द करून पात्र आणि गरजू विद्यार्थ्यांना न्याय दिला जावा अशी कळकळीची विनंतीही पवार यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

 भरपावसात ज्येष्ठ नागरिकांची फरफट, टीएमटी पाससाठी हेलपाटे

सहा-सात महिन्यांनंतरही पास नाही – काँग्रेस आक्रमक अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे परिवहन सेवेच्या ढिसाळ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांना भर पावसात तासन्‌तास रांगेत उभे राहूनही पास मिळत नसल्याचा गंभीर आरोप ठाणे  काँग्रेसने केला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील सॅटीस (SATIS) पुलावरील पास वितरण केंद्राला अचानक भेट देत त्यांनी परिवहन प्रशासनाच्या निष्काळजीपणा वर जोरदार टीका केली. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी पिंगळे यांच्यासमोर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला. बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी नाही, पावसापासून संरक्षणासाठी छत नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर एका महिन्यात मिळायला हवा असलेला डिजिटल पास सहा ते सात महिने उलटूनही मिळत नसल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली. स्वातंत्र्यसैनिकांकडूनही पाससाठी शुल्क आकारले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. याबाबत उपस्थित परिवहन अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, पास वितरणाचे काम खासगी कंपनीकडे असल्याचे सांगण्यात आले. कंपनीशी संपर्क साधल्यानंतर सध्या नगरसेवकांकडून आलेले २०० ते ३०० पास तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर देण्यात आले. या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त करत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी लवकरच परिवहन व्यवस्थापकांची भेट घेऊन सर्व समस्या त्यांच्या निदर्शनास आणणार असल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वारंवार पास काढण्याचा त्रास होऊ नये म्हणून पासची वैधता पाच वर्षांची करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिवहन सेवेतील विलंब, नियोजनाचा अभाव आणि ज्येष्ठ नागरिकांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे ठाणे परिवहन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांसह ठाणे काँग्रेस चे ज्येष्ठ नेते राम भोसले,महेंद्र म्हात्रे,शिरीष घरत,ब्लॉक अध्यक्ष अजिंक्य भोईर,हर्षल कोळी,चंद्रकांत पाटील,शरद जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 000000000

सपना गार्डन पार्किंग परिसरातील जर्जर मार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर

आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगर येथील सपना गार्डन परिसरातील पार्किंग क्षेत्राकडे जाणारा मार्ग अनेक दिवसांपासून अत्यंत जर्जर अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या…

विकासकाने केली लाखोंची फसवणूक, घर खरेदी प्रकरणी गुन्हे दाखल

मिरा -भाईंदर मीरा रोड येथील शांतीनगर परिसरात फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घर खरेदीसाठी लाखो रुपये भरूनही फ्लॅटचा ताबा न देता तेच फ्लॅट इतर ग्राहकांना विकल्याप्रकरणी मे. श्रीनाथ इंटरप्रायजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे भागीदार नरेश सुंदरलाल जैन आणि किसनसिंह तुलसीसिंह राजपूत यांच्याविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्लेझंट पार्क परिसरात राहणाऱ्या सुमनबेन विकास यादव (३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी पारसनाथ गार्डन येथील इमारत क्रमांक ४ मधील दोन फ्लॅट एकूण ३७ लाख ९३ हजार ४०० रुपये किमतीला बुक केले होते. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी धनादेश व रोख स्वरूपात मिळून १३ लाख ९७ हजार रुपये विकासकांकडे जमा केले होते. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फ्लॅटचा ताबा देण्याऐवजी विकासकांनी तेच दोन्ही फ्लॅट इतर व्यक्तींना नोंदणीकृत कराराद्वारे विकले. संबंधित विकासकांनी केवळ एका कुटुंबालाच नव्हे, तर परिसरातील अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, भावेश विजय पटेल, पूनम कनोजिया, सर्वेश यादव, गंगाप्रसाद यादव, नीरज कुमार, चंदन रामचंद्र यादव, उमाशंकर राधेश्याम यादव, चंद्रशेखर यादव, समयलाल यादव, हरिशंकर यादव, बबलू विश्वकर्मा, विमल कुमार यादव आणि अभिषेक यादव यांच्याकडूनही लाखो रुपये स्वीकारून त्यांच्या नावावर बुक केलेले फ्लॅट इतरांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे मिरा-भाईंदर परिसरातील घर खरेदीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूक, विश्वासघात, धमकी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संविधान चौरे करत आहेत.

खाद्यपदार्थांच्या आड लपवून मद्याची आलिशान वाहनातून तस्करी

 खाद्यपदार्थांच्या आड लपवून मद्याची आलिशान वाहनातून तस्करीSlug – उत्पादन शुल्क विभागाची कारवाई  ३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट मद्याची वाहतूक करणारी वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे ३४ लाख ८४ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आलिशान वाहनांतून खाद्यपदार्थांच्या आडून अवैध मद्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज पालघर जिल्ह्यातील जव्हार खानवेल रोड, विशाल ढाब्याच्या समोर, जव्हार तसेच जव्हार-खंबाळे रोडवर, रातुना फाटया जवळ, रातुना वडवली जव्हार…

 ‘खजाना – अ फेस्टिव्हल ऑफ गझल्स’चा रौप्यमहोत्सवी सोहळा २४-२५ जुलैदरम्यान मुंबईत

 महोत्सवातून झालेले निधीसंकलन ‘सीपीएए’ आणि ‘पीएटीयुटी’च्या समाज कार्यासाठी मुंबई : दिवंगत पद्मभूषण पंकज उधास यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘खजाना – अ फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. २४ आणि २५…

 दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे माझे कर्तव्य : महेंद्रशेठ घरत 

 शेलघरच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जतच्या विद्यार्थ्यांना दफ्तर-छत्रीचे वाटप उलवे : ‘दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची वानवा असते. त्यामुळे अशा शाळेत जाणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे दफ्तर, छत्री यांसारख्या प्राथमिक सुविधा देण्याचा गेली १५ वर्षे मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. कर्जत तालुक्याशी आपले वेगळे नाते आहे’, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कर्जत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. पनवेल तालुक्यातील शेलघरच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जत येथील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दफ्तर आणि छत्रीचे मंगळवारी वाटप करण्यात आले. कर्जत येथील रायगड जिल्हा परिषदेच्या खांडस, तुंगी, आंबेरपाडा, काठेवाडी, तेथील अंगणवाडी आदी सहा शाळांतील ३५० विद्यार्थ्यांना यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, शुभांगीताई घरत यांच्या वतीने हे शैक्षणिक दान करण्यात आले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांचे कुटुंबीय हिरीरीने सहभागी झाले होते. यावेळी कर्जतच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनीही भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, “महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे दानशूर समाजात आहेत, याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहेत.” यावेळी राम म्हात्रे, वासंती म्हात्रे, गुलाबशेठ घरत, ललिताताई घरत, श्रीकांत घरत, मिनाक्षी घरत, शकुंतलाताई ठाकूर, बानुबाई भगत, यशवंत ढोंगे आणि एम. जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते. 000000000 00000000 000000000

संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार

नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) या रिक्त पदावर सरळ सेवेने नवनियुक्त झालेले संजू उत्तम चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. नवी…

– स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार

 शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश मुंबई : राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती आणि आज तात्काळ सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलैला या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून अजितदादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला आहे. परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती २२ जुलैला राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे.याशिवाय सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जयंती साजरी होणार आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वर्गीय अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांना जनमानसात हक्काचे ‘दादा’ म्हणून स्थान मिळाले. शासनाचा हा निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीला दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे.यामुळे आता दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर दादांच्या लोकसेवेचा वारसा अधिकृतपणे आठवला जाणार आहे.