Category: महाराष्ट्र

Maharashtra News

पुण्यात ALIGN या संरचित रेजोनन्स उपक्रमाचा शुभारंभ

पुण्यात ALIGN या संरचित रेजोनन्स उपक्रमाचा शुभारंभ पुणे : सजगता -आधारित रेजोनन्स उपक्रम ALIGN चा औपचारिक शुभारंभ रविवारी बाणेर येथील Fitcue Fitness Studio येथे करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागींसाठी ध्वनी -आधारित, संरचित आणि सखोल अनुभव सादर करण्यात आला, ज्याचा उद्देश मज्जासंस्थेचे संतुलन, भावनिक स्थैर्य आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढवणे हा आहे. प्रिथा देशपांडे आणि डॉ. नेहा साटम यांनी अमोल चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची स्थापना केली आहे. ALIGN ची संकल्पना अशी आहे की ‘अलाइनमेंट’ ही अशी अवस्था आहे, ज्याकडे व्यक्ती जाणीवपूर्वक परत जाऊ शकते. चेतना-विषयक पद्धती आणि मोजता येणाऱ्या आरोग्य-जागरूकतेचा संगम घडवून संरचित आणि सर्वांसाठी उपलब्ध असे व्यासपीठ निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मार्गदर्शित रेजोनन्स-आधारित तसेच इतर उपचारात्मक अनुभवांच्या माध्यमातून व्यक्तींमध्ये संतुलित उपस्थिती, भावनिक समतोल आणि सजग जीवनशैली विकसित करण्याचे ‘ALIGN’चे ध्येय आहे. २०३० पर्यंत २३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत सकारात्मक प्रभाव पोहोचविण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे. उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात छोटेखानी समारंभाने झाली. त्यानंतर उपक्रमाच्या कार्यपद्धती आणि तज्ज्ञ टीमची ओळख करून देण्यात आली. विशेष बाब म्हणजे सत्रापूर्वी आणि सत्रानंतर सहभागींचे हृदयगती व ऑक्सिजन पातळी यांसारखे मूलभूत आरोग्य निर्देशांक नोंदवण्यात आले. अनुभवात्मक साधना आणि मोजमापयोग्य निरीक्षण यांचा संगम साधणारी ही रचनाबद्ध कार्यपद्धती ‘ALIGN’ची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरली आहे.

 सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत एकूण १,००,०००रकमेची पारितोषिके पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हि स्पर्धा रविवार, १ मार्च रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, “बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो विचारशक्ती, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करणारा बौद्धिक व्यासपीठ आहे. आपल्या भागातील लहान मुलांपासून युवा खेळाडूंना स्पर्धात्मक संधी मिळावी आणि त्यांच्यातील गुणवत्ता पुढे यावी, हा ‘सुपर सनी मंथ’ मागील मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडतील, असा मला विश्वास आहे.” स्पर्धेत एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके, करंडक देण्यात येणार आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेखाली होत असलेली हि स्पर्धा ७,१०,१२,१५ वर्षाखालील व खुल्या गटात पार पडणार आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत विविध वयोगटात मिळून १७० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये ५० रेटेड खेळाडूंचा देखील समावेश आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे (९८२२३०३५४०) व दिक्षा गडसिंग(७८३७८३०४०६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

  नाशिक मनपाच्या तिजोरीच्या चाव्या तरुण नेतृत्वाकडे

नाशिक मनपाच्या तिजोरीच्या चाव्या तरुण नेतृत्वाकडे मच्छिंद्र सानप स्थायी समितीचे 39 वे सभापती! हरिभाऊ लाखे नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची बिनविरोध निवड होताच शहराच्या आर्थिक निर्णयप्रक्रियेची घ्रा तरुण नेतृत्वाकडे आली आहे. स्थायी समितीचे ते ३९वे सभापती ठरले असून, आगामी काळात महापालिकेच्या अर्थकारणावर त्यांची निर्णायक छाप राहणार आहे. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. माजी महापौर तथा माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे संघटन, निवडणूक आणि प्रशासकीय व्यवहार यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना लहानपणापासूनच मिळत गेला. महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीत ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले, यापूर्वी २०१७ मध्ये पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या तिविकटावर त्यांनी विजय मिळवला होता. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, सार्वजनिक सुविधा यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी स्थानिक पातळीवर सक्रिय नगरसेवक म्हणून काम केले आहे. महापालिकेतील विविध समित्यांमधील त्यांचा अनुभवही उल्लेखनीय आहे. पंचवटी प्रभाग समितीचे सभापतिपद त्यांनी भूषवले आहे. वृक्षप्राधिकरण समिती तसेच विभागीय क्रीडा संकुल समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उत्तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राशीही त्यांचा संबंध राहिला असून, इंडिया स्पोर्टसच्या कार्यकारिणीत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. संघटन पातळीवर भाजप ओबीसी युवा मोर्चाच्या विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती लक्षणीय राहिलो आहे. औराम रथोत्सव, नवरात्रोत्सव, कृष्ण जन्मोत्सव, गणेशोत्सव यांसारख्या उत्सवांत ते सक्रिय सहभागी राहिले आहेत. यामुळे राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांच्यासमोर मोठी जबाबदारी आहे. कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी देणे, निविदा प्रक्रियेवर देखरेख ठेवणे आणि महापालिकेच्या आर्थिक शिस्तीची काळजी घेणे या सर्व निर्णयांमध्ये त्यांची भूमिका केंद्रस्थानी असेल, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नियोजनबद्ध विकासाची ग्वाही त्यांनी दिली असून, पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अधिसभा खेळीमेळीत संपन्न

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अधिसभा खेळीमेळीत संपन्न हरिभाऊ लाखे नाशिक: -महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सन २०२६ मधील प्रथम अधिसभा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस विद्यापीठाचे कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा.डॉ. संजीव…

बल्लाळेश्वर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ २०२५  पुरस्कार प्रदान

बल्लाळेश्वर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ २०२५  पुरस्कार प्रदान पुणे: सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि दिशादर्शक कार्य करणाऱ्या बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या संस्थेला  सन २०२५ चा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी प्रदान करण्यात आला, अशी माहीती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्यन रिव्हरवुड रिसॉर्ट, जांभळी,  वेल्हे रोड, भोर, पुणे येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सोहळा २०२५ (उर्वरित) तसेच एकदिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर म्हणून  सतिश मराठे (संचालक – भारतीय रिझर्व्ह बँक) तसेच उदय जोशी (राष्ट्रीय अध्यक्ष – सहकार भारती) उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे, संचालक दामाजी डोंगरे व सरव्यवस्थापक संजय घोगरे यांनी  हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून महासचिव  शशिकांत राजोबा व खजिनदार  दादाराव तुपकर यांनी जबाबदारी पार पाडली. फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी व कार्याध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. सहकार क्षेत्रात पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सभासदाभिमुख कार्यपद्धती यामुळे बल्लाळेश्वर पतसंस्थेने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी वाटचालीत सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतकांचे मोलाचे योगदान असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. हा पुरस्कार आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान आहे. हा गौरव संपूर्ण बल्लाळेश्वर परिवाराचा आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा चौकशी

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा चौकशी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा इशारा अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करण्यात येणारी कामे ही दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत. दिलेली डेडलाईन पाळली गेली पाहिजे अन्यथा, संबंधित विभाग प्रमुखाची चौकशी केली जाईल. कामाच्या दर्जाबाबतही चौकशी केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ बाबत आज जिल्हाधिकारी जिंदल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी सादरीकरण करुन विभागनिहाय माहिती दिली. जिल्हाधिकारी जिंदल यांनी विभागनिहाय आढावा घेतला. झालेली कामे, आलेली मागणी, दायित्व याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. ते म्हणाले, दायित्वाची मागणी करावी. ५ मार्चपर्यंत मागणी न आल्यास चौकशी केली जाईल. प्रशासकीय मान्यता घेताना घातलेल्या अटी, शर्ती प्रमाणे पाहिले जाईल. करदात्यांचा हा पैसा आहे, तो व्यवस्थित दर्जात्मक कामांसाठी वापरला गेला पाहिजे, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. बाह्य संस्थेमार्फत दर्जाबाबतदेखील तपासणी केली जाईल. १५ मार्चपर्यंत खर्च करावा, ज्याच्यासाठी निधी दिला जातो, ते काम देखील वेळेवर पूर्ण झाले पाहिजे, तुम्ही सर्वजण १०० टक्के निधी खर्च करणार अशी मला खात्री आहे. असे सांगतानाच त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

भुमरेंचा ‘समृद्ध’ घोटाळा

भुमरेंचा ‘समृद्ध’ घोटाळा  समृद्धी महामार्गात ११५० कोटींचा महाघोटाळा ० ड्रायव्हरच्या नावे हिबानामा ० अंबादास दानवेंचा पुराव्यानिशी आरोपाने खळबळ छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचा समृद्ध घोटाळ्याचा आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते…

रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार घोषित

रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार घोषित पुणे : बलराज साहनी – साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे  देण्यात येणारा प्रतिष्ठेचा बलराज साहनी पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र देवधर यांना घोषित झाला असून,…

राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट

अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट पुण्याच्या अनुभवी बॅडमिंटनपटूंचे जागतिक स्तरावर वर्चस्व अबू धाबी, युएई – अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ मध्ये भारतीय ध्वज अभिमानाने फडकवला गेला. अनुभवी भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विविध वयोगटातील अनेक पदके पटकावली. पुण्याचे राज सिंग यांनी या मोहिमेचे नेतृत्व करताना आपल्या चिकाटीचा आणि कौशल्याचा परिचय देत तब्बल तीन पदकांवर आपले नाव कोरले. रौप्य पदकाची कमाई ६०+ पुरुष दुहेरी गटात अव्वल स्थानासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राज सिंग आणि धनंजय देशपांडे या जोडीने रौप्य पदक पटकावले. संपूर्ण स्पर्धेत या जोडीने उत्कृष्ट समन्वय आणि रणनीतीचा वापर केला. अंतिम सामन्यात थोडक्यात सुवर्णपदक हुकले असले तरी, त्यांच्या खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भरभरून कौतुक झाले. ऐतिहासिक पदार्पण आणि कांस्य विजय या स्पर्धेत रेखा धुपर यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण स्वप्नवत ठरले. ६०+ मिश्र दुहेरी गटात राज सिंग यांच्यासोबत खेळताना या जोडीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मानाचे कांस्य पदक मिळवले. इतकेच नव्हे तर, राज सिंग यांनी आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवत ४५+ पुरुष दुहेरी गटात प्रताप मेकाला यांच्यासह खेळताना आणखी एक कांस्य पदक प्राप्त केले. या गटातील उपांत्य फेरीचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला: पहिला गेम: सिंग आणि मेकाला यांनी १५-८ असा एकतर्फी विजय मिळवला. निर्णायक खेळ: दुसऱ्या सेटमध्ये १८-२० अशा अटीतटीच्या संघर्षानंतर, तिसऱ्या सेटमध्ये (९-१५) या जोडीने झुंजार खेळ करत कांस्य पदक निश्चित केले. जागतिक दर्जाचे नियोजन आणि सोयी-सुविधा मैदानातील खेळासोबतच, २०२६ च्या या स्पर्धेचे नियोजन आणि खेळाडूंना दिलेल्या सुविधांचे मोठे कौतुक झाले. आयोजकांनी खेळाडूंसाठी विशेष व्यवस्था केली होती. प्रवास सुविधा (Pick-up & Drop): खेळाडूंना निवासाच्या ठिकाणाहून मैदानापर्यंत नेण्या-आणण्यासाठी २४ तास वाहन सेवा उपलब्ध होती, ज्यामुळे खेळाडू वेळेवर आणि ताजेतवाने होऊन पोहचू शकले.…

 कांदा दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

कांदा दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन चांदवडला बेमुदत उपोषणाला सुरुवात हरिभाऊ लाखे नाशिक : कांदा व मक्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे कांदा व मका उत्पादक शेतकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत योग्य बाजारभावाच्या मागणीसाठी सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत बेमुदत उपोषण सुरू केले. खासदार भास्कर भगरे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते जयंत पाटील यांच्याशी मोबाइलवरून चर्चा करून शेतकऱ्यांचा दराचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची विनंती केली. चालू अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. सध्या बाजारात कांद्याला प्रतिकिलो केवळ ७ ते ८ रुपये दर मिळत आहे, तर मक्याची सुरू असलेली शासकीय खरेदी अतिशय धिम्या गतीने सुरू असून, तातडीने उपयोजना कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करून जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. …या आहेत मागण्या -कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव द्यावा -आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्यास प्रतिक्विंटल पंधराशे रुपये प्रमाणे अनुदान द्यावे -कांद्यासह इतर शेतीमालास योग्य बाजारभाव मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात -कांदा निर्यातीसाठी वाहतूक अनुदान देण्यात यावे व रेल्वे वाहने उपलब्ध करून द्यावी -शेतकऱ्यांना मका हमीभावाचा फरक देण्यात यावा ‘तो’ निर्णय शेतकरीविरोधी राज्य कांदा उत्पादक संघटनेची भूमिका केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आरओडीटीईपी (निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि करांची सवलत) योजनेतील दर ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी निषेध केला आहे. ‘आरओडीटीईपी’दर कपातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, कृषी व कृषी प्रक्रिया उत्पादनांसाठी स्वतंत्र उच्च दर निश्चित करावा. कांदाप्रक्रिया उद्योगासाठी किमान ४ टक्के ‘आरओडीटीईपी’दर लागू करावा व निर्यात प्रोत्साहन धोरणात स्थैर्य आणावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली.