Category: महाराष्ट्र

Maharashtra News

मतदार मॅपिंग प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसरा…!

 जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ९१ टक्के मॅपिंग पूर्ण…! सिंधुदुर्ग : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिम (एसआयआर -२०२६) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांच्या डिजिटल मॅपिंग प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि निवडणूक यंत्रणेच्या समन्वयाने सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. विशेष पुनःरीक्षण  मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग  प्रशासन सुसज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  धोडमिसे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदार मॅपिंगची सुरुवातीची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः या मोहिमेचा आढावा घेत विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथ पातळी अधिकारी (बीएलओ) यांच्या स्वतंत्र बैठका घेत कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले. या बैठकीत तांत्रिक अडचणींचे निराकरण, माहिती संकलनातील त्रुटी दूर करणे आणि मॅपिंग प्रक्रियेत अचूकता राखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि योग्य नियोजनामुळे अल्पावधीतच जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मतदाराचे नाव विद्यमान मतदार यादीतून सन २००२ मधील मतदार यादीशी जोडण्याचे कार्य करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे मतदार नोंदींची खातरजमा होण्यास मदत होणार असून मतदार यादी अधिक स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक बनणार आहे. निवडणूक विभागाच्या समन्वयातून संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात काटेकोर नियंत्रण ठेवत मोहिमेला गती दिली. तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून बीएलओंकडून हे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

बकरी ईदच्या दिवशी दुर्गादेवी मंदिर बंद ठेवण्याची प्रथा तात्काळ बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण: दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून कल्याणमध्ये राजकारण तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी सत्ताधार्यांवर सडकून टीका केली आहे. हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदूंना मंदिरात प्रवेश मिळत नाही, सत्ताधारी पक्ष संघटनांना आंदोलनाची भाषा करावी लागत हे लज्जास्पद आणि हास्यास्पद असल्याचे विजय साळवी यांनी सांगितले. तसेच बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी येथील श्री दुर्गादेवी मंदिर दर्शनासाठी होणारे निर्बंध व मंदिर बंद ठेवण्याची प्रथा तात्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. किल्ले दुर्गाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पशनि पवित्र झालेले ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. किल्ले दुर्गाडीवरील थी दुगदिवी मंदिर हे ठाणे जिल्हयातील जागृत देवस्थान असुन लाखो हिंदु भाविकांच्या श्रध्देचे केंद्र आहे. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करुन दुर्गाडी मंदिर परिसरात निर्बंध लादले जातात. मंदिराकडे जाणारे मार्ग बंद केले जातात, घंटानादावर निर्बंध आणले जातात आणि अनेक भाविकांना देवीच्या दर्शनापासून वंचित रहावे लागते. अशा प्रकारे हिंदुंच्या धार्मिक अधिकारांवर घाला घालण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरु आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असुन या सरकारच्या काळातच हिंदुंना आपल्या आराध्य देवीच्या दर्शनासाठी संघर्ष करावा लागणे ही अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक बाब आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी श्री दुर्गादेवी मंदिर परिसरातील सर्व अनावश्यक निर्बंध तात्काळ हटवावेत. हिंदु भाविकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय देवीचे दर्शन घेण्याची हमी द्यावी. घंटानाद, आरती व इतर धार्मिक परंपरांवर कोणतेही निर्बंध लागू करू नयेत. संबंधित पोलिस व प्रशासकीय यंत्रणेला हिंदु भाविकांच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्याची मागणी विजय साळवी यांनी केली आहे. अन्यथा हिंदु समाजाच्या भावना, श्रध्दा आणि घटनात्मक अधिकारांच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 00000000

कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शानदार उदघाटन

आगरी समाजाच्या विकासाला माझे सर्वप्रथम प्राधान्य : महेंद्रशेठ घरत उलवा : कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वातानुकूलित भव्य सभागृहाचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शनिवारी शानदार उदघाटन करण्यात आले. या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे आदी मान्यवर उपस्थित होते. कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे संपूर्ण अत्याधुनिक नूतनीकरण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी १२ लाख ५० हजार रुपये सढळ हस्ते केलेल्या देणगीतून करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. “महेंद्रशेठ घरत हे आगरी समाजातील आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करणारे अवलिया आणि दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत, याचा कर्जतच्या आगरी समाजाला अभिमान आहे,” असे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मला आगरी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आपला समाज मेहनतीने आणि सन्मानाने जगण्याला अधिक प्राधान्य देतो. कुणापुढे कारण नसताना झुकत नाही. ताठ कण्याचा आपला समाज मला प्रिय आहे. त्यामुळे आगरी समाजाच्या उत्कर्षासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करतो. समाजाच्या मागे मी कायमच खंबीरपणे उभा आहे आणि राहीन. कर्जतचा आगरी समाज संघटित होऊन समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कर्जतच्या आगरी समाजावर माझे विशेष प्रेम आहे. त्यांच्यासाठी माझा मदतीचा हात कायमच राहील. मी जागतिक पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे जगभर फिरतो; परंतु मी माझ्या गावाच्या विकासाबाबत संवेदनशील आहे. आज राज्यात रोल मॉडेल ठरेल, असा माझ्या शेलघर गावाचा सुनियोजित विकास मी करून घेतला आहे. आज तिथे ग्रामस्थांना बोट ठेवायला जागा नाही. मी जिल्हा परिषद सदस्य असताना गावोगावी जलकुंभ बांधून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतविला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर अभ्यास करून अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आणि विकासात्मक कामे करून घेतली. रायगडमध्ये सी. डी. देशमुख यांच्यानंतर मी जगाच्या व्यासपीठावर नावलौकिक मिळवतोय. तिथेही मी त्या त्या देशांच्या कामगार नेत्यांवर वचक ठेवून आहे.” या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे, कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, नितीन धुळे, रेश्माताई जोशी, मंगेश म्हसकर, विपूल पाटील, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. हा समारंभ हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृह नेरळ-बोपेले येथे पार पडला. यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष नागो गवळी, एकनाथ धुळे, सावळाराम जाधव, कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय गवळी, उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, किरीट पाटील, वैभव पाटील, निखिल ढवळे आणि एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जितेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले, तर भरत भगत यांनी प्रास्ताविक केले.

भोंदू खरातच्या साथीदाराच्या खात्यातून १३.५० कोटी जप्त

हरिभाऊ लाखे नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक आणि फसवणूक खंडणी प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करीत त्याच्या साथीदारांकडून तब्बल १३ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात १३.१२ कोटी रुपयांची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिन्यांचा समावेश असून, अशोक खरातच्या बँक खात्यातील २.२५ कोटी रुपयांच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. त्याच्या मालकीची आलिशान मर्सिडीज कारही ईडीने जप्त केल्याने या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी १८ मार्चला अशोक खरातला अटक केली. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. अटकेनंतर अवघ्या पाच दिवसांत या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला. एसआयटीने जवळपास दीड महिना विविध पैलूंवर तपास करत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या. त्यानंतर शिर्डी व नाशिक ग्रामीण पोलिसांनीही फसवणुकीच्या गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास सुरू केला. तपासादरम्यान अवतार पूजा, धार्मिक मार्गदर्शन आणि चमत्काराच्या नावाखाली लोकांकडून ५.६२ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप समोर आला आहे. जगदंबा व समता पतसंस्थांमधील २०० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून खरातच्या निकटवर्तीयांचीही कसून चौकशी सुरू असून, या चौकशीतून नवनवीन आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचे धागेदोरे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभर या तपासाकडे लक्ष लागले आहे.

 बँक एक, खाती अनेक; सर्व खात्यांना वारसदार अशोक खरात

ईडीकडून आता खरातला पाहुणचार हरिभाऊ लाखे नाशिक – भल्याभल्यांची मती गुंग करुन त्यांची आर्थिक फसवणूक आणि शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरातची आता ईडी चौकशी होणार आहे. अशोक खरातचा ताबा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) घेतला असून ईडीचे विशेष पथक त्याला नाशिकहून मुंबईकडे घेऊन गेले. अशोक खरातला पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले असता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कोठडीची मागणी केली होती, ईडी विरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे अशोक खरातने कोर्टात सांगितले. ईडीकडून अनेक बाबी मांडण्यात आल्या. त्यात समता नागरी क्रेडिट सोसायटीमध्ये अशोक खरातने अनेकांच्या नावाने ६३ खाती उघडली, परंतु, त्या सर्व खात्यांना नंबर खरातचा जोडला होता. वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव होते. सर्व खात्यांचा लाभार्थी देखील अशोक खरात होता. कोट्यवधी रुपये बँकांमध्ये रोख स्वरुपात भरण्यात आले. आणि तसेच ते काढलेही गेले. इतक्या खात्यांमध्ये एवढे पैसे कुठून आले आणि ते कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित करुन या पैशांच्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे, हा सर्व तपास करणे बाकी आहे. पैसे भरण्याची कोणतीही (डिपॉझिट स्लिप: पावती न भरता रोखपालाच्या (कॅशियर) मदतीने थेट रोकड खात्यांमध्ये जमा करण्यात आली. एका संस्थेचा तर खरातच अध्यक्ष होता, यादरम्यान ३४ बेनामी एफडी खाती उघडण्यात आली. रोख स्वरुपातच संबंधित खात्यांमधून पैसे काढले गेले. २०१४-२०२४ या कालावधीत हा सर्व उद्योग सुरु होता. एफडीचे पैसे अशोक खरातकडेच पुन्हा आल्याने तोच मुख्य आरोपी आहे, असा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला. खरात याच्या पत्नीच्या खात्यात आणि तिच्या नावाने देखील मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मालमत्ता दाखविण्यात आली आहे. बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी करणे बाकी आहे. आरोपींची चौकशी करणे गरजेचे असल्याचे ईडीने नमूद केले. ६० नावे वापरून बँक खाती उघडल्याचा आरोप आहे. सर्व खातेदारांनी खरातलाच कसे वारसदार केले, असा प्रश्न न्यायालयाने खरातच्या वकिलांना विचारला असता खरातच्या वकिलांनी, हा काही गुन्हा नाही. १० दिवसांच्या कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद केला.. खरातला त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहत खरातने स्वतःची बाजू मांडली. बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांनी मला काही पैसे आल्याचे सांगितले होते. आवारे यांनी पैसे बँकेत ठेवल्यास ९ टक्के व्याज मिळेल, असे सांगितले. याशिवाय मला कोणतीही माहिती नाही. फक्त व्याज चांगले मिळते म्हणून व्याजासाठी हे केले, असे खरातने सांगितले. खरातला २६ मेपर्यंत ईडी कोठडी अशोक खरातला २६ मेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने १० दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने सहा दिवसांची कोठडी दिली. कोठडीत चौकशी दरम्यान खरातकडून ईडीला काही वेगळी माहिती मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत न्यायालय, पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी अशा फेऱ्या मारणाऱ्या अशोक खरातला आता ईडीचाही पाहुणचार करावा लागणार आहे.

सावंतवाडी शहर,आसपासच्या गावांना बसला पाऊस-वादळाचा तडाखा…!

  सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी शहर आणि आसपासच्या गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या  पावसाने लोकांची झोप उडवून दिली. या भागात…

 शेतकऱ्यांवरील गुन्हा मागे घेण्याची मनसेची मागणी

 मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये दिले निवेदन दिवा- मनसे दिवा तर्फे शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी करत मुंब्र्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मनसेचे साबे विभाग…

भारतीय जनता युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी रिकी रत्नाकर

  योगेश चांदेकर पालघरः भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरटिचणीसपदी रिकी रत्नाकर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नंदन वर्तक यांनी ही निवड केली असून त्याबाबतचे…

टेंबा रुग्णालयात प्रताप सरनाईक यांची धाड, १.६५ कोटींच्या एक्स्पायरी औषधांचा घोटाळा उघड

गोरगरिबांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश; संबंधितांवर गुन्हे दाखल होणार मीरा-भाईंदर : प्रताप सरनाईक यांनी भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी (टेंबा) रुग्णालय येथे अचानक पाहणी करत आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. या…

सावंतवाडी शहर, आसपासच्या गावांना बसला पाऊस – वादळाचा तडाखा…!

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी शहर आणि आसपासच्या गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या  पावसाने लोकांची झोप उडवून दिली. या भागात…