Category: मुंबई

Mumbai news

केडीएमसी क्षेत्रात फेरीवाला कायदा लागू करण्याची राष्ट्रवादीची मागणी

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सूर असून या कारवाईला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी विरोध केला आहे. फेरीवाला पथ विक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन अधिनियम २०१४ या काय‌द्याचे उल्लंघन करून अन्यायकारक कारवाई सुरू असून केडीएमसी क्षेत्रात फेरीवाला कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चोधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे. १ मे २०१४ रोजी संपूर्ण देशात फेरीवाला अधिनियमन कायदा लागू करण्यात आला पण इतकी वर्ष उलटूनही आत्तापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात या काय‌द्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यापासून महानगरपालिकेने सरसकट कायद्याचे उल्लंघन करून फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्या उपजीविचे साधन काढून घेतले आहे. यामुळे शहरातील भाजी विक्रेते फळे विक्रेते फुल विक्रेत व इतर फेरीवाले यांची उपासमार होत आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर, फ प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर, ग प्रभाग क्षेत्राधिकारी भारत पवार हे पदाचा व शासनाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील १५० मीटर सोडून व्यवसाय करत असलेल्या फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.  कारवाई करताना फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करताना पंचनामा करणे बंधनकारक असताना सुद्धा बेकायदेशीर साहित्य जप्त करून त्याची लूट करून मर्जीतल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत हे साहित्य आठवडा बाजारातल्या काही विक्रेत्यांना अर्ध्या किमतीत देत आहेत. ऑनलाइन भाजी फळे फुले व इत्यादी साहित्य विक्री करणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांना फायदा होण्यासाठी सर्व फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. तसेच एका राजकीय पक्षाच्या पुरस्कृत आठवडा बाजार जागोजागी सुरू केले आहेत, शेतकऱ्यांच्या नावाखाली बाहेरील जिल्ह्यातील फेरीवाले आणून बाजार भरवले जात आहेत यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्र व शेतकरी भाजी फळे व फुले विक्री करणाऱ्या रोजगार बुडत आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या आधी त्यांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे परंतु या संदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यामुळे हजारो कुटुंब उध्वस्त होऊन त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या संदर्भात बैठक घेऊन या समस्येवर मार्ग काढला नाही तर सर्व नोंदणीकृत फेरीवाल्यांसहित आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा भालचंद्र पाटील यांनी दिला आहे. ००००००

 तर आगग्रस्त `शिवशाही’पर्यंत अग्निशमन दल १० मिनिटांत पोचले असते!

 स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी यांचे मत ठाणे : सॅटीस पुलावर एस. टी.च्या शिवशाही बसला आग लागल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या गाडीला पोचण्यासाठी किमान २० ते २५ मिनिटांचा अवधी लागला. मात्र, दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन दलाची गाडी ठेवली असती. तर घटनास्थळी ५ ते १० मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान पोचून शिवशाही बसची आग लवकर आटोक्यात येऊन बस खाक झाली नसती, असे मत भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी व्यक्त केले. ठाणे तहसील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या एकत्रित पुनर्विकासात अग्निशमन केंद्राची जागाही घेण्यात आली. त्यामुळे येथील केंद्र साकेत येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. ठाणे रेल्वे स्टेशन, होलसेल मार्केट, पोलिस आयुक्तालय, सिव्हील हॉस्पीटल अशी महत्त्वाची ठिकाणे असल्याच्या पार्श्वभूमीवर दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन दलाची गाडी ठेवण्याची गरज आहे, याकडे नगरसेविका नम्रता कोळी यांनी महापालिकेचे लक्ष वेधले होते. मात्र, त्याची अग्निशमन दलाकडून दखल घेण्यात आली नव्हती. यापुढील काळात आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोचण्यासाठी अग्निशमन दलाचा एक बंब ठेवण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.

 मराठी सक्ती मागे घेण्यास सांगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांचा इशारा  ठाकरे गटाची आरटीओ कार्यालयावर धडक कल्याण : मराठी सक्ती मागे घ्या या मागणीसाठी ४ मे पासून आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालक मालक व त्यांचे नेते यांच्यावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करा, मराठी न बोलणाऱ्या व मराठीचा अपमान करणाऱ्या रिक्षाचालकांनवर गुन्हे दाखल करा नाहीतर आम्ही रस्त्यावर शिवसैनिक उतरू असा इशारा शिवसेना उबाठाचे उपनेते विजय साळवी यांनी कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन द्वारे दिला आहे. यावेळी शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, शिवसेना गटनेते उमेश बोरगावकर, शहर प्रमुख बाळा परब, नगरसेवक संकेश भोईर, विशाल गारवे, नगरसेविका स्वप्नाली केणे, अपर्णा भोईर, सतिश वायचळ, दशरथ तरे, अनिल डेरे, प्रथमेश पुण्यार्थी आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज कल्याण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्या नंतर शिष्टमंडळाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना निवेदन दिले. रिक्षा चालकांनी मराठी बोलले पाहिजे अपमान करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा, रिक्षा स्टँड संख्या वाढवा, स्कूल बस मध्ये महिला मदतनीस पाहिजे, वर्षातून चार वेळा बस चेकिंग केली पाहिजे, अवैध रिक्षा चालकांवर कारवाई केली पाहिजे, स्टेशन जवळील वाहतूक कोंडी दुर करणे, मीटर प्रमाणे रिक्षा सुरू करणे आदि विषयांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठाचे उपनेते विजय साळवी यांनी सांगितले की आम्ही विविध मागण्यांचे निवेदन परिवहन अधिकारी यांना दिले आहे. मीटरप्रमाणे रिक्षा चालवणे असे आदेश देऊनही रिक्षा चालक आदेशाचे पालन करीत नाही, याला जबाबदार परिवहन विभाग आहे, परंतु हे युनियनला घाबरतात, त्यांच्या दबावाखाली उप प्रादेशिक अधिकारी काम करतात, सहा असनी गाडीला शहरात परवानगी नसतानाही कल्याण शहरात बारा बारा सिट भरतात. मागील आठवड्यात अकरा माणसे अपघात मध्ये मरण पावली, याला जबाबदार परिवहन अधिकारी आहेत. प्रत्येक स्कूल बस मध्ये महिला मदतनीस ठेवणे आवश्यक असून नाहीतर , बदलापूर सारख्या घटना घडतात. रिक्षांच्या संख्या खूप आहे, त्या मानाने रिक्षा स्टँड कमी आहेत, त्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. मीटर प्रमाणे रिक्षा सुरू करणे आदि मागण्यांचे निवेदन दिले असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कायद्याप्रमाणे कारवाई करावी अन्यथा अधिकार्याविरोधात न्यायालयात जावु असा इशारा उपनेते विजय साळवी यांनी दिला. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी प्राप्त झालेल्या निवेदनाप्रमाणे आम्ही सबंधित कारवाई करू असे सांगितले.

श्री राजपूत करणी सेनेचे चिंतन-मंथन शिबीर

रमेश औताडे मुंबई: राजपुत समाजाच्या दुर्लक्षित प्रश्नांवर चर्चा करून ठोस निर्णायक भूमिका घेण्यासाठी श्री राजपूत करनी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराणा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मराठी पत्रकार संघ येथे चिंतन-मंथन शिबीर झाले. महाराज्य प्रदेश अध्यक्ष श्याम सिंह ठाकूर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातील, सर्व विभागातील व सर्व तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील राजपुत समुदायतील सर्वांना, समाजाच्या असंख्य दुर्लक्षित प्रश्नांवर चर्चा तसेच ठोस भूमिका घेण्यासाठी एकत्र येण्याचे विनम्र आवाहन या चिंतन शिबिरातून करण्यात आले. महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनीही आरक्षण व इतर महत्वाच्या विषयावर आपली भूमिका चिंतन शिबिरात मांडली. समाजातील सुशिक्षित बेरोजगार, समाजातील युवांवर वाढते व्यसनाचे संकट, समाजातील व वर्तमान परस्थितीतील आरक्षणाचे राजकारण संपले तरच जाती पातीचे राजकारण संपेल असे महिपालसिंह जी मकराणा यांनी सांगितले. यावेळी श्याम सिंह ठाकूर म्हणाले सरकारने जर आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. ००००००००

महापौरच्या पतीला आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिल्यावरून आयुक्तांच्या दालना बाहेर भाजपा नगरसेवकांचा गोंधळ

सुनिल इंगळे उल्हासनगर: महापौरच्या पतीला पालिका आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिला तर भाजपाच्या नगरसेवकांना दालनाबाहेरच उभे राहण्यास सांगून त्यांना रोखण्यात आल्याने याचा निषेध करत भाजपा नगरसेवकांनी पालिका आयुक्तांच्या कार्याला बाहेर जोरदार घोषणाबाजी करत तिथेच गोंधळ घातल्याची घटना बुधवारी सायंकाळी महापालिकेत घडली. या घटनेमुळे सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये एकच राडा झाला. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपाचे युती टिकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी सायंकाळी महासभा झाल्यावर पालिका आयुक्त यांच्या दालनात शिवसेना गटनेते अरुण आशान आणि शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम हे गेले होते. त्यावेळी भाजपचे गट नेता राजेश वाधारीया यांना देखील पालिका आयुक्ताच्या दालनात बोलण्यात आले होते. पण त्यावेळी कमलेश निकम हे अरुण आशान सोबत आल्याचे पाहून व त्यांना कोणतेही पद नसताना आयुक्तांच्या दालनात जाऊन दिले गेले आणि भाजपच्या नगरसेवकांना सुरक्षारक्षकांकडून बाहेर रोखण्यात आले याचा राग भाजपा नगरसेवकांना आला. या गोष्टीचा राग येऊन त्यांनी या घटनेचा निषेध करत पालिका आयुक्तांच्या दालना बाहेर घोषणाबाजी करत एकच गोंधळ घातला. त्यावेळी पोलिसांना तातडीने त्या ठिकाणी बोलण्यात आले. या घटनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच झोपली. याशिवाय काँग्रेसचा एक नगरसेवक असताना महासभेमध्ये महापौरांनी थेट काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका अंजली साळवे यांची विरोधी पक्ष नेते म्हणून महासभेत घोषणा केल्याने त्यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला जोरदार विरोध केला. या संदर्भात राजेश वधारिया यांनी सांगितले आम्ही सत्तेत असताना शिवसेना आम्हाला विश्वासात न घेता महापौर हे परस्पर निर्णय घेतात. विरोधी पक्ष नेता निवडी प्रकरणी घेतलेला निर्णय हा चुकीचा असून त्या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागू असा इशारा दिला. शिवसेनेने युती धर्म पाळला नाही आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप भाजपने केला. या घटनेबाबत शिवसेना गटनेता अरुण आशान यांनी सांगितले महासभेच्या अगोदर जी ऑडिशन बैठक होते त्या बैठकीमध्ये निर्णय होतात.आणि यामध्ये काय निर्णय घ्यायचे हे बैठकीच्या अगोदर गट नेत्याला कळवले जातात. आजच्या महासभेमध्ये पहिल्यांदा त्यांचे नगरसेवक खाली डम्पिंग ग्राउंड च्या प्रश्नसंदर्भात जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. युतीमध्ये असताना सुद्धा महापौरांना आणि प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न होता. परंतु त्यांना हे समजायला पाहिजे की आपण युतीमध्ये आहोत ज्यावेळेस युतीमध्ये आपण असतो त्यावेळेस त्यांनी युतीचा त्यांना भान नाहीये. प्रत्येक महासभेच्या वेळी त्यांना गोंधळ घालायचा असतो. आणि आज त्यांनी या पद्धतीत गोंधळ घातला. परंतु जे काही निर्णय झाले ते महापौर सर्वांच्या वतीने सगळ्यांना समक्ष घेऊनच ते निर्णय घेतात. परंतु त्यांची भाषा आता बदललेली आहे हे मात्र नक्की. पालिका आयुक्तांकडून गट नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. माझ्यासोबत कमलेश निकम हे देखील पालिका आयुक्तांच्या दालनात आले होते. सोबत येण्यास आयुक्तांची परवानगी घेतली होती बाहेरील जास्ती लोक आत मध्ये घेऊन येऊ नका अशा आयुक्तांनी सांगितले होते. आयुक्तांनी बोललेले शिवाय कोणी आत जाऊ शकत नाही. त्यामुळे दालना बाहेर उभे असलेल्या भाजपच्या काही नगरसेवकांना थांबायला सांगितलं होतं. गट नेता असल्यामुळे स्वाभाविक आहे माझ्या बरोबर जो व्यक्ती आहे तो आत मध्ये आला. त्याच्यामध्ये पद असो की नसो आयुक्तांनी जर कोणाला बोलवलं असेल तर आणि गटनेता बरोबर असेल तर त्यांना आक्षेप घेण्याचा काही प्रश्न येत नाही असे अरुण आशान यांनी सांगितले . याबाबत शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले भारतीय जनता पक्ष सत्तेत राहते, सत्तेचा सहभाग घेते, सत्तेमध्ये भागीदारी घेते. मग महासभेच्या वेळेला खाली बसणं आणि महापौरांच्या विरुद्ध अविश्वास दाखवणे हे कितपत खरं आहे. युती म्हणून युतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे. जर खाली बसून महापौरांच्या विरुद्ध अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा आहे. युतीच्या बाबतीमध्ये वरिष्ठ नेते विचार करतील त्याचा निर्णय घेतील. आमचे नेते सक्षम आहेत आमचे नेते निर्णय घेतील असे सांगितले. सत्तेत असताना देखील भाजप आणि शिवसेना या घटनेवरून उल्हासनगर महानगरपालिकेत आमने-सामने आल्याने त्यांच्यात झालेल्या या राड्यावरून या सत्तेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बोलले जात आहे.

हिवताप टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे

ठाणे: २५ एप्रिल हा दिवस ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जागतिक हिवताप (मलेरिया) दिन म्हणून राबविला जातो. या दिनी महापालिकेच्या फायलेरिया विभागाच्यावतीने महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी हिवताप टाळण्यासाठी प्रत्येक…

 ‘युवाशक्ती जागर मोर्चा’या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित   डोंबिवली, दि. 22 एप्रिल (आरती परब) – भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’या राज्यव्यापी दौऱ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतून दणक्यात शुभारंभ झाला. यामुळे राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्याची व्यापक मोहीम सुरू झाल्याचे उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले. या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे व्यासपीठावरील सर्वात युवा मनाचे आणि ऊर्जावान नेतृत्व असल्याचे नमूद केले. आपल्या मनोगतात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यात्रेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबवण्यात येणारा हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. केंद्र व राज्य सरकारने तरुणाईसाठी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय या यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांपर्यंत पोहोचवले जातील. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले सक्षम आणि प्रभावी युवाशक्तीचे संघटन उभारणे, हेच या यात्रेचे मुख्य ध्येय आहे.” ‘जागर युवाशक्तीचा, सशक्त राष्ट्रनिर्मितीचा’हा संदेश देणारी ही यात्रा राज्यातील युवकांना एकत्र आणत त्यांना विकास, नवकल्पना आणि राष्ट्रहिताच्या विचारांशी जोडण्याचे कार्य करणार आहे. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वात ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून, युवकांमध्ये जागर निर्माण करून त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव करून देईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे, मंत्री नितेश राणे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, भाजपा प्रदेश सरचिटणीस व भाजयुमो प्रदेश प्रभारी सुनील राणे, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासह इतर मान्यवर, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. 0000000000

 मुंबईतील माणुसकी हरवत चालली असल्याची गंभीर घटना

एक पत्रकार रेल्वेत १५ तास बेशुद्ध तरीही कुणाला माहिती नाही मुंबई / रमेश औताडे तब्बल पंधरा तास एक पत्रकार बेशुद्धावस्थेत लोकल ट्रेनच्या डब्ब्यात पडून आहे आणि तरीही रेल्वे प्रशासन किंवा पोलिसांना याची खबरही नाही. असे एक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या रेल्वे पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच यापुढे अशा घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी लोकांचे दोस्त संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे. लोकांचे दोस्त संघटनेचे चे अध्यक्ष रवि भिलाणे यांनी मध्य रेल्वे महा व्यवस्थापक यांचे उपसचिव उमंग दुबे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच रेल्वेच्या सार्वजनिक तक्रार विभागात तक्रार नोंदवली.निवेदन देताना ज्योती बडेकर, संजीता मालणकर, प्रकाश महिपती कांबळे इतर संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पत्रकार संजय नागनाथ शिंदे (वय वर्षे ६०) हे मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये १५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत जवळपास पंधरा तास बेशुद्ध अवस्थेत होते. शिंदे हे नेहमीप्रमाणे १५ एप्रिल २०२६ रोजी धारावी परिसरात वार्तांकन करत होते. ते दुपारी चार वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या सायन ( शीव ) रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडण्यासाठी पोहोचले. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. संजय शिंदे यांच्या मोबाईल ची रिंग वाजत होती. पण कोणीही फोन घेत नव्हते. त्यांची काळजी वाटल्याने त्यांच्या धारावी परिसरातील मित्रांनी संध्याकाळी उशिरा धारावी पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दिली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या पत्नी सुषमा संजय शिंदे आणि मुलगा राहुल संजय शिंदे यांनी ते रहात असलेल्या डोंबिवली येथील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. १६ तारखेला सकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी राहुल संजय शिंदे यास मोबाईल वरून कळविले की संजय शिंदे हे कल्याण रेल्वे स्थानकात आहेत. त्यानुसार कुटुंबियांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील खाजगी क्लिनिक मध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचे आढळून आले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिंदे हे सकाळी सहा साडेसहा च्या दरम्यान टिटवाळा रेल्वे स्थानकात, मुंबईकडे जाण्यासाठी यार्ड मधून आलेल्या लोकल ट्रेन मध्ये आढळून आले होते. इतर प्रवाशांनी कळविल्यावरून पोलिसांनी त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरवून घेतले होते. पोलिसांनी त्यांना कल्याण स्थानकातील खासगी क्लिनिक मध्ये दाखल केल्यानंतर त्यांना दोन सलाईन लावली गेली. त्याचे चार हजार रुपये बिल घेऊन त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मात्र संजय शिंदे यांची प्रकृती अतिशय गंभीर व चिंताजनक झाली होती. ते बेशुद्धच होते. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तिथूनच कल्याण पश्चिम येथील होली क्रॉस रुग्णालयात दाखल केले. तिथे आय सी यू मध्ये दोन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती सुधारली. रुग्णालयाचे साठ हजार रुपये बिल भरून कुटुंबीयांनी त्यांना घरी आणले. अजूनही त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत.त्यांना गाडीतून उतरवताना पोलिसांनी मारहाण केल्याची आणि उर्मटपणे वागवल्याची शिंदे कुटुंबीयांची तक्रार आहे.

छायाचित्र – केतन खेडेकर शिवसेना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे उपाध्यक्ष देवाभाई कदम यांचा वाढदिवस नुकताच महालक्ष्मी येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे, चिटणीस संतोष बामणे, सचिन कदम, उपाध्यक्ष मिलिंद पंडित आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 गंभीरपणे भाजलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात त्वरित उपचार मिळण्यासाठी महापालिकेने पॉलिसी आणावी

 नगरसेवक रफिक शेख यांची  मागणी मुंबई प्रतिनिधी जानेवारीमध्ये माझ्या प्रभागात मालाड येथे एका इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्या स्फोटाचे परिणाम इतके गंभीर होते की दुसऱ्या मळ्यापर्यंत या स्फोटाची झळ पोहोचली होती. या स्फोटामुळे एकूण सात लोक जखमी झाले होते. त्यानंतर त्यातील पाच जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकी घटना अशी झाली की जेव्हा हा स्फोट झाला त्यानंतर या सगळ्या जखमी रुग्णांना त्वरित एका लोकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुविधा मिळाली परंतु त्या रुग्णालयामध्ये बर्न ओढ नसल्याने तेथे त्यांचा इलाज होऊ शकला नाही. त्यांना त्वरित शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथे देखील बर्न वॉर्ड  हा कार्यान्वित नव्हता. त्यामुळे येथील रुग्णांना पुन्हा साधी वैद्यकीय सुविधा पुरवून त्यांना पुन्हा कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या रुग्णालयात देखील बर्न वॉर्ड कार्यान्वीत नसल्याने या रुग्णांना पुन्हा केम रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या रुग्णालयातून चार रुग्णालयात शिफ्ट करण्यामध्ये रुग्णांचा फार मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. यामुळे या रुग्णांना त्वरित उपचार न मिळाल्याने या रुग्णांचा जीव जातो असं माझा गंभीर आरोप आहे. या रुग्णालयातून विचार देण्यासाठी या रुग्णांकडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले. हे फार दुर्दैवी आहे. एकाच कुटुंबातील पाच जण जर जखमी असेल तर ते रुग्णांना डिस्चार्ज देण्यासाठी पैसे कसे देणार. तरी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वार्डामध्ये अशा भाजलेला रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयात एक पॉलिसी आणावी जेणेकरून प्रत्येक रुग्णांना त्वरित आणि लवकर योग्य उपचार मिळेल  अशी मागणी नगरसेवक रफिक शेख यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली.