Category: मुंबई

Mumbai news

 शासनाचे सुरक्षा रक्षक मंडळ हप्तेखोरीच्या विळख्यात

शासनाचे सुरक्षा रक्षक मंडळ हप्तेखोरीच्या विळख्यात मंडळाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप, रक्षक संतप्त रमेश औताडे मुंबई : नवी मुंबई येथील वाशी परिसरात शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळातील पर्यवेक्षकाला लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर शासनाच्या या सुरक्षा रक्षक मंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १९८१ साली स्थापन झालेल्या या मंडळाला ४६ वर्षाहून अधिक काळ लोटला असताना, आजही या मंडळात कामगार मंत्री व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार, संगनमत आणि हप्तेखोरीच्या आरोपांनी मंडळातील वातावरण गढूळ झाल्याची चर्चा सुरक्षा रक्षक व कामगार विभागात सुरू आहे. काही सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे की, मंडळातील अध्यक्ष, सचिव, निरीक्षक, क्लार्क आणि काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमतामुळे खाजगी सुरक्षा ठेकेदारांकडून नियमित आर्थिक व्यवहार (हप्ते) चालतात. ‘पोस्टिंग, ड्युटी वाटप, हजेरी नोंदणी, कंत्राट नूतनीकरण अशा प्रत्येक टप्प्यावर दबाव टाकला जातो. पैसे दिले तरच काम सुरळीत चालते,’ असा गंभीर आरोप काही रक्षकांनी केला आहे. काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की, सुरक्षा रक्षकांकडून दरमहा कपातीच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते. वेतनवाढ, पीएफ, ईएसआय, सुट्ट्या आणि इतर हक्कांबाबत सातत्याने टोलवाटोलवी केली जाते. ‘मंडळ सरकारचे आहे. पण निर्णय मात्र खाजगी ठेकेदारांच्या फायद्याचे घेतले जातात,’ असा आरोपही करण्यात आला आहे. अध्यक्ष व सचिव बघ्याची भूमिका घेत आहेत. कामगार मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय असा कारभार शक्य नाही, असा दावा काही कामगार संघटनांनी केला आहे. ‘तक्रारी दिल्या जातात; पण त्यावर कारवाई होत नाही. उलट तक्रारदारांनाच त्रास दिला जातो,’ असा आरोप एका संघटनेच्या नेत्याने केला. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार युनियनचे नेते लक्ष्मणराव भोसले यांनी निवेदन देत मंडळाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी, आर्थिक लेखापरीक्षण आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच कायद्याची व शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार मंत्री यांना २० पानाचे सविस्तर एक निवेदन दिले आहे.त्या निवेदनात मी असे म्हटले आहे की, कामगार कायद्याप्रमाणे व शासनाच्या शासन निर्णयात जे म्हटले आहे ते जर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मनावर घेतले तर व त्याची काटेकोर अंमलबजाणी केली तर सुरक्षा रक्षकांना न्याय मिळेल. मात्र कामगार मंत्री यांचे बगल बच्चे खाजगी ठेकेदार यांना नाराज करू शकत नाहीत. म्हणून कामगार मंत्री पण फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.या पार्श्वभूमीवर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कामगार नेते लक्ष्मणराव भोसले यांनी दिला आहे आहे. काही अधिकाऱ्यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. “मंडळाचा कारभार नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने चालतो. काही नाराज घटकांकडून बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. शासन चौकशी करेल, आम्ही सहकार्य करू,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सुरक्षा रक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पण आमचेच हक्क असुरक्षित आहेत,”  शासनाने तातडीने सर्वंकष चौकशी करून, आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता सुनिश्चित करावी आणि रक्षकांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. या सर्व आरोपांमुळे सुरक्षा रक्षक मंडळाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता शासन आणि कामगार मंत्रालयाकडून ठोस पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आझाद मैदानातील उपोषण दरम्यान पोलीस आयुक्तांना निवेदन

आझाद मैदानातील उपोषण दरम्यान पोलीस आयुक्तांना निवेदन रमेश औताडे मुंबई : बहुजन क्रांती सेनेच्या महिला आघाडी  प्रदेशाध्यक्ष लीनाताई अहिर यांनी आझाद मैदानात २१ जानेवारी पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण अद्याप सुरू केले आहे. कथित अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालावी यासाठी त्यांनी  ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन दिले. मागणी मान्य नाही झाली तर आंदोलन तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला आहे. कल्याण शहरातील महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, संबंधित चालक व जागा मालकांविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करावेत आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी लीनाताई अहिर यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात अवैध धंद्यांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारून महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. लीनाताई अहिर यांनी प्रशासनाला ठोस कारवाईसाठी निश्चित कालमर्यादा द्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक नागरिक आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 दहिसर येथील पूर्णप्रज्ञा शाळेत विज्ञान दिन उत्साहात साजरा

दहिसर येथील पूर्णप्रज्ञा शाळेत विज्ञान दिन उत्साहात साजरा अनेक नवनवीन प्रकल्पांचे प्रदर्शन मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दहिसर येथील पूर्णप्रज्ञा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ . चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या रमन परिणामाच्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात विविध प्रकल्प सादर केले. प्रश्नमंजुषा स्पर्धा व मार्गदर्शनपर भाषणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेतील प्राचार्यांपासून सर्व शिक्षक अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

 १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा मराठी विश्वकोशातील उल्लेख अवमानजनक

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा मराठी विश्वकोशातील उल्लेख अवमानजनक तत्काळ दुरुस्ती करण्याची पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मागणी. मुंबई, दि. (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशात १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा उल्लेख उठाव असा केलेला असून यात स्वातंत्र्य योद्धे म्हणून गौरवण्यात आलेले नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रभृतींचा उल्लेख एकेरीत करण्यात आला आहे. या मुद्याकडे लक्ष वेधत या अवमान जनक नोंदी विश्वकोशाच्या पुढील खंडांमध्ये तसेच संकेतस्थळावर दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका राज्य विधिमंडळाच्या पिठासीन अधिकाऱ्यांकडे पत्रकारिता, साहित्य, सांस्कृतिक, आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत काही व्यक्तींनी दाखल केली आहे. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांच्या पुढाकाराने विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर अविनाश पाठक, विनोद देशमुख, श्रुती देशपांडे, महेश आंबोकर, विजय आडे, चारुदत्त कहू, उदय अंधारे, संजय लोखंडे, दीपक देशपांडे, कार्तिक लोखंडे, अरविंद मराठे, मेजर जनरल अच्युत देव, सुरेश विंचुरकर, सुनील किटकरु, नितीन केळकर, ॲड. लखनसिंह कटरे आणि शशिकांत सुरंगळीकर प्रभृतींनी सह्या केल्या असून या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. मराठी विश्वकोशाच्या खंड एक आणि खंड अठरा मध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव असल्याचा उल्लेख केला असून काही लोक याला बंड म्हणतात, तर काहींनी स्वातंत्र्ययुद्ध म्हणून उल्लेख केला आहे, असे नमूद केले असल्याचे या पत्रात म्हटले आहे. १८५७ चे स्वातंत्र्य युद्धच होते, याबाबत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर या विषयावर ग्रंथलेखन देखील केले आहे, याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे या स्वातंत्र्य योद्ध्यांचा उल्लेख  विश्वकोशाच्या खंडांमध्ये एकेरीत केला असून तो अवमानजनक असल्याचेही या याचिकेत म्हटले आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यरक्षणासाठी तटावरून घोडा फेकून देशासाठी आहुती दिली, तर तात्या टोपे हे फासावर चढले. त्यांच्या बलिदानावरच वसंत वरखेडकरांची  सत्तावन्नचा सेनानी ही कादंबरी देखील प्रसिद्ध आहे, हे देखील याचिकेत नमूद केले आहे, आणि या महनीय योद्ध्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख विश्वकोशात करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे ही पत्रे पाठवली असून त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनाही या संदर्भात पत्रे पाठवली आहेत. सर्व पत्रांसोबत विश्वकोशातील संबंधित पृष्ठांच्या झेरॉक्स प्रतीही जोडलेल्या आहेत.

अभिनेते विजय पाटकर यांना धगधगती मुंबईचा जीवनगौरव पुरस्कार

अभिनेते विजय पाटकर यांना धगधगती मुंबईचा जीवनगौरव पुरस्कार मुंबई: ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय पाटकर यांना भीमराव धुळप यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या धगधगती मुंबईतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विवेक पाटकर यांनाही उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी धगधगती मुंबईचे कौतुक केले. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्या प्रत्येकाला सन्मानाचे भाग्य मिळत नाही. परंतु धगधगती मुंबई च्या माध्यमातून संपादक भीमराव धुळप यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे. कुठेतरी अंधारामध्ये असलेल्या वंचित घटकांना प्रकाश झोतात आणण्याचे काम ते गेली सोळा वर्षे करीत आहेत. हेच कार्य अनेकांसाठी प्रेरणादायक आहे, अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी धगधगती मुंबईचे कौतुक केले. साप्ताहिक धगधगती मुंबईच्या सोळाव्या वर्धापनदिना निमित्त आयोजित केलेल्या नवी मुंबई, कोपरखैरणे येथील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृहातील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई महापौर सुजाता पाटील, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, ॲड. स्मिता चिपळूणकर, उद्योजक हनुमंत रांजणे, के. के. शेलार व लोक कलावंत योगेश चिकटगावकर व धगधगती मुंबई संपादक भीमराव धुळप, सरपंच रमेश धनावडे यांच्यासह मान्यवर पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे हितचिंतक मित्र परिवार व कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील घोगाव ता. कराड येथील श्री धुळप यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गेली १६ वर्ष महाराष्ट्रात लेखणी धगधगती ठेवली . भीमराव धुळप व त्यांचे चिरंजीव ओमकार धुळप यांनी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये चांगली टीम तयार केलेली आहे. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने उपेक्षितांची बाजू मांडणार आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. वृत्तपत्रातही स्पर्धा असली तरी आपल्या उत्पन्नातील वाटा समाजासाठी खर्च करणाऱ्या पत्रकारांबद्दल समाज सुद्धा जागृत असल्याचे दिसून आले आहे. अशा शुभेच्छा देऊन अशा कार्यक्रमाला नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक व नवी मुंबई महापौर सुजाता पाटील यांच्यासह मान्यवरांनी आश्वासन देऊन सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा मोठा गौरव होत असतो. परंतु सामान्य माणसांसाठी पुरस्कार देऊन  त्यांना उत्साहित करणे. हे काम खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारी वाढवणारी आहे. सर्व स्तरातील लोकांचा बहुमान ही अद्भुत शक्ती सर्वांच्या पाठीशी कायम राहणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी  ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवन गौरव पुरस्कार व रमेश कदम (समाज रत्न) वसंत जाधव (समाज गौरव)  राजन किणे (दलित मित्र) रमेश धनावडे (आदर्श सरपंच) प्रताप महाडिक (शिक्षण रत्न) संगम प्रतिष्ठान व नरेंद्र छाया कम्प्युटर इन्स्टिट्यूट (उत्कृष्ट संस्था पुरस्कार) नंदकुमार काटकर (सहकार रत्न) डॉक्टर शांताराम कारंडे (साहित्यरत्न) सचिन वरखडे वैद्यरत्न ( वैद्यकीय) अँड .मनीषा चव्हाण (कायदा रत्न) डॉक्टर सुरज पाटील (वैद्यकीय रत्न) विद्यावाचस्पती विजयकुमार स्वामी (अध्यात्मिक) अनुजा दांडगे (उद्योजिका) के.के शेलार (उद्योग रत्न) हनुमंत रांजणे (समाजभूषण) आदी मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

हिंद-दी-चादर’ समागम सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज

हिंद-दी-चादर’ समागम सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज नवी मुंबई : खारघर येथील ओवे मैदानावर शनिवारी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचा मुख्य कार्यक्रम या शनिवार-रविवारी (२८ फेब्रुवारी-१मार्च) पार पडणार…

शिखर बँक घोटाळ्यात साऱ्यांनाच क्लीनचीट

शिखर बँक घोटाळ्यात साऱ्यांनाच क्लीनचीट दिवंगत अजित पवारांसह ७० जण निर्दोष मुंबई: महाराष्ट्रातील राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्ष भाजपाकडून करण्यात आला होता आणि राज्यात आता…

अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं?- राज ठाकरे

अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं?- राज ठाकरे मुंबई : अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं ? असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित…

मराठी भाषा टिकवण्याची शपथ घ्या- नायगावकर

मराठी भाषा टिकवण्याची शपथ घ्या- नायगावकर मुंबई : मराठी भाषेचा अभिमान आणि भाषिक अस्मितेला नवी उभारी देणार्‍या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित कवितोत्सवाला शुक्रवारी उत्साही…

पावसाळ्यापुर्वी नालेसफाई वेळेत करा,

पावसाळ्यापुर्वी नालेसफाई वेळेत करा, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरसेवक सरसावले मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी भांडुप मधील नालेसफाई युध्दपातळीवर करावी. दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा साचल्यामुळे पाणी तुंबणे, रस्ते जलमय होणे,त्यामुळे नागरिकांना…