Category: होम

सरस्वती, प्रबोधन, ॐ साईश्वर आणि अमरहिंदची दमदार कामगिरी अनेक संघांची विजयी आगेकूच

 मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा मुंबई : मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन मुंबई खो-खो संघटनेने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे २७ ते ३० मे कालावधीत आयोजन केले…

मध्य रेल्वेचा निसटता विजय

 १५वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) पुरुष एलिट गटात मध्य रेल्वेने मुंबई पोर्ट अथॉरिटीवर ३-२ असा निसटता विजय मिळवला. वांद्रे येथील…

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा २०२६

हरियाणाचा हर्षल उपांत्य फेरीत मुंबई : अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाच्या हर्षल राणाने दमदार झुंजार खेळ करत कर्नाटकच्या आर्यमन सिंगला चार गेममध्ये पराभूत केले. वांद्रे पश्चिम येथील ऑटर्स क्लबच्या स्क्वॉश कोर्टमध्ये गुरुवारी दोन १५ वर्षीय प्रतिभावान खेळाडूंमध्ये वर्चस्वासाठी तीव्र चुरस पाहायला मिळाली. गेल्या वर्षीचा ज्युनियर राष्ट्रीय विजेता हर्षल पहिला गेम हरला. पण डावपेचात्मक खेळ करत त्याने पुढील तीन गेम जिंकताना ६-११, ११-६, १२-१०, ११-९ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल दोन मानांकित खेळाडूंपैकी, श्रेयांश झा याने प्रदीपसिंग राठोडचा ११-६, १२-१०, ११-३ असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित अगस्त्य राजपूतने अगस्त्य बन्सलवर ११-८, ३-११, ११-९, ११-३ अशी चार गेममध्ये मात केली. निकाल (१३ वर्षांखालील मुली – उपांत्यपूर्व फेरी): १-ईशा शेळके विजयी वि. सीरत घुमन ११-२, ११-5, ११-4; श्रिया माहेश्वरी विजयी वि. रुही लोढा ११-२, ११-२, ११-5; अक्षरा माखिजा विजयी वि. अरणा राव ११-७, ११-३, ११-८; २-आध्या ग्रोव्हर विजयी वि. सानवी तिडके ११-9, १0-१२, ११-9, ११-६. १३ वर्षांखालील मुले: झेन अली विजयी वि. निर्वाण उप्पल १0-१२, ११-८, 9-११, ११-4, ११-३; निर्मान चमरिया विजयी वि. निर्वाण पारिख ११-4, 5-११, ११-9, ११-5; रिदान गुप्ता विजयी वि. कृशिव मित्तल ११-७, ११-5, ११-१; आर्यन एस के. विजयी वि. अरित्रा देबनाथ ११-9, ११-८, ११-७. १५ वर्षांखालील मुली : शनाया रॉय विजयी वि. समीरा गोरसिया ११-६, ११-4, ११-9; नंदिकाश्री कलैवनन विजयी वि. रायशा नाईक ११-१३, ११-८, ११-5, १0-१२, ११-9; २-त्रिशा शहा विजयी वि. एकम घुमन ११-२, ११-5, 5-११, ६-११, ११-२. मुले: रुआन राम तडंकी विजयी वि. आर्यन प्रभू ११-5, ११-६, 4-११, १२-१0; विनय शिंदे विजयी वि. ऋषभ श्याम ११-६, 5-११, ११-9, ८-११, ११-६; फरीद अंद्राबी विजयी वि. प्रभू बाजोरिया ११-9, ११-5, ११-६; अयान धनुका विजयी वि. २-वेदांत अग्रवाल ११-4, ११-६, ३-११, ११-६. १७ वर्षांखालील मुली : वसुंधरा नांगरे विजयी वि. आरवी रैना ११-१, ११-5,११-5; फबिहा नफीस विजयी वि. अहाना सिंग 9-११, ११-६, 9-११, ११-३, ११-८; देवश्री अरोरा विजयी वि. अनुष्का जोहरी ११-८, ११-5, १4-१२; २-आरिका मिश्रा बीटी अमायरा मेहता ११-4, ११-६, ७-११, ११-२; मुले : १-श्रेयांश झा विजयी वि. ११-६, १२-१०, ११-३ प्रदीपसिंग राठोड; हर्षल राणा विजयी वि. आर्यमन सिंग ६-११, ११-६, १२-१0, ११-9; सहर्ष शहारा विजयी वि. इंद्रांशसिंग राकेश बडगुजर ११-5, ११-4, १२-१0; २-अगस्त्य राजपूत विजयी वि. अगस्त्य बन्सल ११-८, ३-११, ११-9, ११-३. 000000000

बाल गोपाळ-आयडियल कॅरम सेंटरला काळाचौकीत उत्तम प्रतिसाद

मुंबई : बाल गोपाळ मित्र मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमाने काळेवाडी-काळाचौकी परिसरात कॅरमप्रेमी स्व. दशरथ चव्हाण स्मृती बाल गोपाळ-आयडियल कॅरम सेंटरचा शुभारंभ शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण,…

चॉकबॉल स्पर्धेचे अंतर्गत राज्यस्तरीय सराव शिबिर संपन्न

कल्याण : महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ दिनांक २८ मे ते ३१ मे २0२६ रोजी मडगाव गोवा येथे होणाऱ्या १६व्या वरिष्ठ गट…

डिजिटल युगातही जिवंत आहे ब्रश आणि रंगांची कला

– रंगमंचावर आजही हाताने तयार होतात पेंटिंग बोर्ड कल्याण : आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक काम संगणक आणि ग्राफिक डिझाइनद्वारे काही क्षणांत पूर्ण होते, तिथेच रंगमंचावर ब्रश आणि रंगांच्या माध्यमातून हाताने पेंटिंग करण्याची जुनी परंपरा आजही टिकून आहे. ही परंपरा चार दशकांहून अधिक काळ जपून ठेवली आहे पेंटर हेमंत यादगिरे यांनी. हेमंत यादगिरे यांच्या मते, ही कला हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असली तरी रंगमंच, गणेशोत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मंडप सजावट व बोर्ड पेंटिंगचे काम आजही हातानेच केले जाते. एकेकाळी त्यांच्या हाताखाली १५ ते २० जण काम करत होते. ते सांगतात की, पूर्वी राजकीय पक्षही पूर्णपणे हाताने केलेल्या पेंटिंगवर अवलंबून होते. नेत्यांची मोठमोठी चित्रे देखील ब्रश (तूलिका) आणि रंगांच्या माध्यमातून तयार केली जात होती. सण-उत्सवांच्या काळात कामाची प्रचंड मागणी असायची. मात्र संगणक युग सुरू झाल्यानंतर आणि फ्लेक्स प्रिंटिंगचा प्रसार झाल्यामुळे या पारंपरिक कलेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हाताने पेंटिंगचे काम मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तरीही कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या नाट्यप्रयोगांचे बोर्ड आजही ब्रश आणि रंगांच्या साहाय्याने हातानेच तयार केले जातात. त्यामुळे ही लुप्त होत चाललेली कला काही प्रमाणात तरी जिवंत राहिली आहे. हेमंत यादगिरे यांचे म्हणणे आहे की, ही कला आपली सांस्कृतिक ओळख आहे आणि ती जपणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच ते आजही या रंगमंचावर तूलिका आणि रंगांच्या कलेला जिवंत ठेवण्याचे कार्य करत आहेत.

माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त स्मारकास वरळी मुंबई येथील अभिवादन

मुंबई : मुंबई-मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त माता रमाई स्मारक वरळी मुंबई येथे बुध्द वंदनासह अभिवादन सभेमधून मानवंदना त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांना  हजारोंच्या संख्येत उपस्थितीत आंबेडकरी…

सावरकरांच्या विचारांवरच देशाची प्रगती

 पनवेलचे महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन पनवेल :“ज्यांनी आपल्याला प्रखर राष्ट्रभक्ती आणि देशाभिमान शिकवला, तसेच जगण्याची शाश्वत अशी जीवनमूल्ये दिली, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवरच आज संपूर्ण देश प्रगती करत आहे.…

– कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

 भाजपाला उशिरा का होईना पण जाग आली – शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे कल्याण : हिंदुनी अशा घंटानाद आंदोलनात सहभागी होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून उशिरा का होईना पण भाजपाला जाग आली असून हिंदूंच्या मतांची निवडणुकीवेळी भिक मागतो हे त्यांना लाजिरवाणे वाटत असेल म्हणून हिंदुत्वासाठी काही तरी केलं पाहिजे यासाठी भाजपासह सर्व घंटानाद आंदोलनात सहभागी होत असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपावर केली. बकरी ईदच्या निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवसेनेच्या वतीने कल्याणच्या दुर्गाडी किल्याजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, महापौर हर्षाली चौधरी, शहर प्रमुख रवी पाटील, उपनेत्या विजया पोटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे आंदोलन त्यांच्यानंतर अद्यापही सुरु आहे. बकरी ईदच्या दिवशी कल्याण येथील मुस्लिम बांधव एकत्रितपणे येऊन दुर्गाडी किल्ल्याच्या  परिसरात नमाज पडतात.  कायदा सुव्यवस्था बिघडु नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून नमाज कार्यक्रम संपेपर्यंत कोणालाही दुर्गाडी देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोडत नाहीत. शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी  या घंटानाद आंदोलनाला सुरवात केली. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.  यावेळी कल्याणच्या लोकमान्य टिळक चौक येथून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केले. मात्र पोलीस प्रशासनाने या दोन्ही गटांना लालचौकी परिसरातच बॅरिकेट्स लावून रोखून धरले. ज्याठिकाणी काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ धक्काबुक्कीही झाली. तर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात होती.  आजही सकाळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वतीने घटानांद आंदोलन केले, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले, व नंतर सोडून दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी बोलतांना सांगितले कि, ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरील देवीचे दर्शन घेण्यासाठी जो अटकाव केला जातो, मज्जाव केला जातो तो चुकीचा आहे. आमच्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नसून हि बंदी सहन केला जाणार नाही. याबाबत उच्चन्यायालयात खटला सुरु असून त्याचा पाठपुरावा करत असून यामध्ये यश मिळेल. आमचा हक्क साबित राहण्यासाठी हे आंदोलन सातत्याने सुरु ठेवलं असल्याचे लांडगे यांनी सांगितले.

शिरोली बुद्रुकच्या ‘डोळ्यांच्या डॉक्टरबाई’ अनुसयाबाई डबडे यांचे निधन

 शतक महोत्सव चार दिवसांवर असतानाच काळाचा घाला; गावावर शोककळा नारायणगाव : आपल्या अंगभूत कौशल्याने अनेकांच्या डोळ्यात गेलेला कचरा कापसाच्या बोळ्याने सहजतेने व विनामोबदला काढून देणाऱ्या आणि त्यामुळे पंचक्रोशीत ‘डोळ्यांच्या डॉक्टरबाई’…