Category: होम

“थँक यू” म्हणत ट्रम्पने मानले इराणचे आभार

“थँक यू” म्हणत ट्रम्पने मानले इराणचे आभार नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यांपासून बंद असणारी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा निर्णय इराणने घेताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनेही थँक्यू इराण असे म्हणत त्याला प्रसिसाद…

सरकारी कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर

मुंबई / रमेश औताडे १७ लाख सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, गेल्या १५ महिन्यांच्या सांप्रत शासनाच्या कारभाराला कंटाळले आहेत. गत युती शासनाच्या कालखंडात अनेक प्रलंबित मागण्यांबाबत जी आश्वासने दिली होती त्याचा विसर त्यांना पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र च्या वतीने सरकारी कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समन्वय समिती, महाराष्ट्र  चे निमंत्रक व मध्यवती संघटना, महाराष्ट्र चे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली.  सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १०:२०:३० वर्षानंतरच्या लाभापासून हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वंचित आहेत. निवृत्तीचे वय ६० करा ही मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. देशातील २६ राज्यात निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात आले आहे. मग पुरोगामी महाराष्ट्र भागे का ? रिक्त पदे भरण्याचा वेग अती मंद आहे. सध्या मंजूर पदाच्या ३५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचान्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडतो व पदोन्नतीबाबत अनेक विभागात अवरोध निर्माण केले जात आहेत. यावेळी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. चतुर्थश्रेणी व वाहनचालकांच्या पद भरतीस १०० टक्के बंदी लादण्यात आली आहे. या अव्यवहार्य निर्णयाचा फेरविचार करणे आवश्यक आहे. कर्मचारी-शिक्षकांना एक व्यापक कॅशलेस विमा योजना लागू करणे आवश्यक आहे. केरळ राज्यात ५ लाख रुपयांचा कॅशलेस लाभ देणारी योजना अस्तित्वात आहे. कर्मचाऱ्याच्या आरोग्य संपदेसाठी अशा आरोग्य विमा योजनेची आवश्यकता आहे.

सायकलपट्टूंना केंद्रस्थानी ठेवल्यास भारताला अधिक पदकं

मुंबई / रमेश औताडे सायकलपट्टू केंद्रस्थानी ठेवला तरच सायकल खेळ जागतिक पातळीवर भारताला जास्तीत जास्त मेडल मिळतील असे मत भारतीय सायकल महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी महासंघाचे महासचिव महेंद्र पाल सिंग उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, सायकल महासंघाच्या नवीन जबाबदारीच्या अनुषंगाने मी भारताला जास्तीत जास्त मेडल सायकल खेळात कशी मिळतील याचा आराखडा आखला आहे. १ एप्रिल २०२६ पासून महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. यावेळी बोलताना महेंद्र पाल सिंग म्हणाले, पाटील हे एक अत्यंत यशस्वी धोरणात्मक नेते असून, त्यांना कॉर्पोरेट क्षेत्र, सरकार, शिक्षण, सल्लागार आणि उद्योजकता या क्षेत्रांतील उच्च नेतृत्व पदांवर तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. ते पुणे येथील ‘एलिव्हेट एज कन्सल्टिंग ग्रुप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पुणे येथील स्टार्कन बाईक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (२०१३-२०१९); नवी दिल्ली येथील हिरो सायकल्सचे अध्यक्ष (बिझनेस हेड) (२०१२-२०१३) म्हणून काम केले आहे; तसेच भारत सरकारमध्ये युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासह विविध विभागांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी आणि प्रभारी खाजगी सचिव म्हणून वरिष्ठ पदांवर काम केले आहे. याशिवाय, टाटा, रिलायन्स, आदित्य बिर्ला ग्रुप आणि सिटीबँक यांसारख्या मोठ्या उद्योगसमूहांमध्येही त्यांनी उच्च नेतृत्व पदे भूषवली आहेत. पाटील हे भारतातील सायकलिंगच्या विकासातील एक अग्रणी शक्ती राहिले आहेत. त्यांनी अनेक वर्षे भारतीय सायकलिंग महासंघासोबत (CFI) जवळून काम केले असून, CFI व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन (CAM) यांच्या सहकार्याने पुण्यात सलग पाच वर्षे एमटीबी राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. त्यांनी पनवेल येथे रोड सायकलिंग चॅम्पियनशिप, अनेक राज्यस्तरीय चॅम्पियनशिप आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या सायकलिंग स्पर्धांचेही आयोजन केले आहे, ज्यात हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्था (PCRA) आणि इतर संस्थांच्या भागीदारीत, सायकलिंगला एक शाश्वत आणि आरोग्यदायी वाहतुकीचे साधन म्हणून प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे देशातील व्यावसायिक आणि मनोरंजक सायकलिंग संस्कृतीच्या विस्तारात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. त्यांना भारतातील प्रीमियम सायकल सेगमेंटचे जनक मानले जाते, कारण त्यांनी स्टार्कन बाईक्सला (जायंटच्या भागीदारीत) अपवादात्मक वाढीच्या दरासह प्रीमियम बाईकिंग सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचवले. 00000000 Unti-१0 आरोग्य विभागात वादग्रस्त नियुक्तीवरून मनसे संतप्त रमेश औताडे मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारी  पदाचा प्रभारी कार्यभार डॉ. राजेश म्हात्रे यांना देण्याच्या निर्णयावरून शहरात तीव्र वाद निर्माण झाला असून, या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मनसेच्या वतीने नवी मुंबई शहर अध्यक्ष  गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. मनसे विभाग अध्यक्ष सागर विचारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना हे पत्र सादर करत प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवेदना यामध्ये एका कंत्राटदार संस्थेला ब्लॅकलिस्ट करून काही महिन्यांतच ती कारवाई मागे घेण्याचा संशयास्पद निर्णय, प्रशासनिक पारदर्शकतेचा अभाव, तसेच सत्तेचा मनमानी वापर केल्याचे आरोप समाविष्ट आहेत. या प्रकारातून संभाव्य फसवणूक, विश्वासघात आणि संगनमताची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, एका महिला रुग्णाने माध्यमांवर केलेल्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. संबंधित रुग्णाने उपचारादरम्यान निष्काळजीपणा, चूक लपवण्याचा प्रयत्न, मानसिक छळ आणि अपमानास्पद वर्तन झाल्याचा आरोप केला आहे.  प्रशासनाला सात दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून, व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

खाडीच्या पाण्यात सापडला अर्धवट सडलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह

उल्हासनगर  दि.१७ ( सुनिल इंगळे ) : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीच्या पाण्यात अर्धवट सडलेल्या अवस्थेत एका बेवारस अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना पोलिसांना मिळून आला आहे. त्या इसमाची…

शिवीगाळीच्या व्हिडिओवरून भाजपा-शिवसेना आमने सामने

अरविंद जोशी मिरा -भाईंदर : शिंदे गटातील शिवसेनेच्या एका अधिकाऱ्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर असभ्य टिप्पणी करत आणि त्यांना शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या…

ठाण्याच्या झैद – समृद्धी यांना विजेतेपद  

 ६० वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी आयोजित ६० वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नुकतीच नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिशनच्या सिल्वर ज्युबिली बँक्वेट हॉलमध्ये…

 ओम् वर्तकनगर, अश्वमेघ स्पोर्टस् ,श्रीराम,जय बजरंग चौथ्या फेरीत

 श्री मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे :- श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” ओम् वर्तकनगरने महिला विभागात  चौथी फेरी गाठली.तर  पुरुष गटात  शिवमुद्रा प्रतिष्ठान, श्रीराम विश्वस्त, जय बजरंग-वाशिंद, मिड…

 विक्रोळीत चढाई-पकडीचा संग्राम आजपासून

सुनील राऊत यांच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरस्कारांचा वर्षाव राज्यातील १६ दिग्गज व्यावसायिक संघ  भिडणार मुंबई, दि. १७ (क्री.प्र.)- क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेवर छप्पर फाडके पुरस्कारांचा वर्षाव केला आहे. राज्यातील तगड्या १६ व्यावसायिक पुरुष संघांचा आणि १५ महिला संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धांत सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या बक्षीसांची उधळण केली जाणार आहे. येत्या १८ ते २१ एप्रिलदरम्यान विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हा कबड्डीतील चढाई-पकडींचा थरार रंगणार आहे. एकीकडे आयपीएलची फटकेबाजी सुरु असताना आमदार सुनील राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठानाच्या संयोजनाखाली राज्यातील व्यावसायिक कबड्डी संघांची ताकद दाखवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने  होणार्‍या कबड्डीच्या पकडापकडींच्या संघर्षासाठी आंबडेकर उद्यानातील क्रीडानगरीला ‘कबड्डी पंढरी’ चे रुप दिले आहे. राज्यातील पुरुष आणि महिलांचे अव्वल आणि बलवान संघ स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे कबड्डीप्रेमींना प्रो कबड्डीला साजेशी चढाओढ पाहायला मिळणार आहे. कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या आमदार सुनील राऊत यांनी या स्पर्धेत सहभागी संघ आणि खेळाडूंनाही लखपती करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील सर्वाधिक रोख रकमेची स्पर्धा असलेल्या या कबड्डी थरारात व्यावसायिक स्पर्धेतील विजेत्यांना दोन लाखांचे  पारितोषिक दिले जाणार आहे तर उपविजेता संघ दीड लाखांचा मानकरी ठरेल. उपांत्य फेरी पराभूत संघही पाऊण लाखांचे बक्षीस मिळवतील. महिलांच्या स्पर्धेतील विजेता संघ एक लाखांचा पुरस्कार जिंकेल तर उपविजेता पाऊण लाखाचे इनाम मिळवेल. इथेही उपांत्य परभाूत संघ ३५ हजार रुपयांच्या पुरस्काराचे मानकरी ठरतील. सर्वात विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना मोटर बाईक आणि स्कूटी दिली जाणार असल्यामुळे हे जिंकण्यासाठी खेळाडू पहिल्या लढतीपासूनच आपला जोरदार खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आजवर अनेक कबड्डी स्पर्धांचे दिमाखदार ेआयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार राऊत यांनी व्यावसायिक कबड्डी संघांच्या जोरदार आणि रोमहर्षक खेळाची मेजवानी सादर करण्यासाठी  मुंबई शहरच्या तगड्या ८ संघांसह उपनगर, पुणे, ठाणे, नंदुरबार, रायगड आणि नवी मुंबई या जिल्ह्यातील बलाढ्य संघांनाही मॅटवर उतरवले आहे. त्यामुळे या संघांचा ‘दम’दार खेळ टागोर नगरात उभारलेल्या क्रीडानगरीतील दोन मॅटच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक आणि आमदार सुनील राऊत यांनी दिली. प्रो कबड्डीच्या सुपरस्टार्सचीही चढाई या स्पर्धेचे वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जोरदार चढाया- पकडींनी कबड्डी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडणारे प्रो कबड्डीचे तब्बल ३० सुपरस्टार  विक्रोळी पूर्वेला असलेल्या स्पर्धेत आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील. यात पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार, -संकेत सावंत, अस्लम इनामदार, साहिल राणे, सुशांत साईल, अजिंक्य कापरे सारखे अनेक तूफानी खेळाडू आपला झंझावात दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आमदार चषक कबड्डी स्पर्धेतील संघ व्यावसायिक पुरुष संघ-युवा पलटण, भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे, सीजीएसटी, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोस्टल, युनियन बँक (सर्व मुंबई शहर), लिब्रा अ‍ॅग्रो (उपनगर), ठाणे महानगरपालिका (ठाणे), रुपाली ज्वेलर्स (नंदुरबार), संत सोपानकाका सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार, आयकर (सर्व पुणे), मिडलाइन फाऊंडेशन (रायगड), डीवाय पाटील (नवी मुंबई). स्थानिक महिला संघ – स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, स्वस्तिक क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ, महात्मा गांधी अकादमी (सर्व उपनगर),शिवशक्ती महिला संघ, डॉ, शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, विवेक संघ (सर्व मुंबई), कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी (रायगड), कुलाई क्रीडा मंडळ (पालघर), राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स क्लब , तात्या बालवडकर स्पोर्ट्स क्लब, पतंगराव कदम (सर्व पुणे), अनिकेत स्पोर्ट्स क्लब (रत्नागिरी), शिवाजी उदय स्पोर्ट्स क्लब (सातारा), होतकरु मित्र मंडळ (ठाणे). 0000000000 जान्हवी मोरे स्मृती चषक मुला-मुलींची कॅरम स्पर्धा २९ एप्रिलला ठाणे : डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू स्व. जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षाखालील‌ मुला -मुलींच्या राज्य स्तरीय   कॅरम स्पर्धेचे २९ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शास्त्री हॉल,दत्तनगर,डोंबिवली,पूर्व  येथे होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये १०० असुन २० एप्रिल पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.प्रवेशासाठी दिलीप कर्वे, मो.९१६७७४४०४९.  संजय ठाकुरदेसाई मो.   ९८६७५८५२७१. अथवा पर्णाद जोशी मो.  ८४५०९५४५८४ यांच्याशी संपर्क साधावा.

 राष्ट्रीय पदक विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या आज कौतुक सोहळा

 कुणाल केरकर यांच्या आयर्न पॅराडाईज जिमचा पुढाकार मुंबई- राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा ताकदीचा तडाखा देत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः चीत केले. “मुंबई म्हणजे बॉडीबिल्डिंगचा बालेकिल्ला” ही ओळख सांगताना मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी तब्बल १४ पदकांची दणदणीत कमाई करत देशभरात आपला दबदबा प्रस्थापित केला. या झंझावाती यशाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि नव्या पिढीला प्रेरणेची ठिणगी मिळावी, या उद्देशाने कुणाल केरकर यांच्या संकल्पनेतून आयर्न पॅराडाईज जिमतर्फे शनिवारी १८ एप्रिलला भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या या दमदार यशाची दखल घेत बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड (पश्चिम) येथील आयर्न पॅराडाईज जिममध्ये आयोजित या सोहळ्यात केवळ विजेत्यांचा सन्मानच नव्हे, तर मुंबईच्या शरीरसौष्ठव परंपरेचा दिमाखदार गौरव केला जाणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात भक्कम कामगिरी करणारे कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने हा उपक्रम उभा केला आहे. या उपक्रमाला संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भक्कम सहकार्य लाभले आहे. याच मंचावर राष्ट्रीय पदक विजेत्यांसह आयर्न पॅराडाईजसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही विशेष गौरव केला जाणार आहे. राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते : हरमीत सिंग (किताब विजेता), उमेश गुप्ता (उपविजेता), रेखा शिंदे (महिला शरीरसौष्ठव), राजेश तारवे, संदीप सावळे, निलेश दगडे, विश्वंभर राऊळ (क्लासिक शरीरसौष्ठव)  नीलेश गुरव (मेन्स फिजिक) रौप्य पदक विजेते : गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे (क्लासिक बॉडीबिल्डिंग) कांस्य पदक विजेता निलेश रेमजे विशेष गौरव प्रशांत घोलम (मुंबई श्री, महाराष्ट्र श्री – सुवर्ण), सिद्धांत यादव (रौप्य) आणि क्षितिज साळुंखे (कांस्य).

पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा महापौरांचा इशारा

मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांची सरप्राईज व्हिजिट – कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती कल्याण : पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा इशारा केडीएमसी महापौरांनी दिला असून केडीएमसीच्या मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांनी सरप्राईज व्हिजिट करत कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. कल्याण डोंबिवलीकरांच्या घशाला पडलेली कोरड आता प्रशासकीय पातळीवर गंभीर वळण घेत आहे. शहरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप असतानाच, महापौर हर्षाली चौधरी यांनी थेट ग्राऊंड झिरोवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांनी  ‘अ’ प्रभागातील मोहिली पंप हाऊसवर अचानक भेट देऊन पाहणी केली. कामात होत असलेली दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले असून, पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कडक आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणे किंवा पाणीच न मिळणे अशा तक्रारींचा पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली चौधरी यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मोहिली पंप हाऊसला भेट दिली. महापौरांनी जेव्हा पंप हाऊसमध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील यंत्रणा आणि कामाची संथ गती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी संबंधित अभियंता आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या. मात्र, तांत्रिक कारणांपेक्षा मानवी दिरंगाईमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे दिसून आल्यावर महापौरांनी आक्रमक पवित्रा घेतला.पाहणी दरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली: यावेळी कामचुकारपणा खपवून घेणार नाही: कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबरोबर कोणत्या प्रभागात किती पाणी जाते आणि कुठे कमतरता आहे, याचे चोख नियोजन सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येऊ देऊ नका  अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. ंनागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना प्रशासन ढिम्म राहू शकत नाही. मोहिली पंप हाऊस हे शहराच्या पाणीपुरवठ्याचे हृदय आहे, तिथेच जर कामात दिरंगाई होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. जनतेला पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सागितले. महापौरांच्या या धडक कारवाईमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आता या भेटीनंतर तरी कल्याण-डोंबिवलीतील नळांना पाणी वेळेवर आणि पुरेशा दाबाने येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.