Month: April 2026

 शिवशक्तीसह राजमाता जिजाऊ, धर्मवीरचा झंझावात कायम

 आमदार चषक कबड्डी स्पर्धा   मुंबई बंदर, ठाणे महापालिका उपांत्य फेरीत मुंबई, दि. २१ (क्री.प्र.)- क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्‍या चढाया-पकडींच्या संघर्षात मुंबईच्या मुंबई बंदर, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि आयएसपीएलसह (इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा. लि.)ठाणे महानगर पालिका या संघांनी थरारक विजयासह आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक गटाची उपांत्य फेरी गाठली. महिला गटातही अंगावर शहारे आणणार्‍या रोमहर्षक लढतीनंतर मुंबईच्या शिवशक्ती, पुण्याच्या राजमाता जिजाऊ, पतंगराव कदम संघ आणि नंदुरबारच्या धर्मवीर कबड्डी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. आता पुरुषांच्या व्यावसायिक गटात आयएसपीएलची गाठ ठाणे महानगरपालिकेशी पडेल तर बीपीसीएल मुंबई बंदराशी भिडेल. महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ – पतंगराव कदम, शिवशक्ती- धर्मवीर अशा अटीतटीच्या लढती रंगतील. विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  सुरु असलेल्या कबड्डीच्या झटापटीत तिसर्‍या दिवशी कबड्डीप्रेमींना थरारक सामन्यांची मेजवानी चाखता आला आली. उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी झालेल्या चारही उपांत्य पूर्व लढतीचा पैâसला शेवटच्या मिनीटालाच झाला.  मुंबई बंदरने साइल पाटील, राहुल टाके यांच्या खोलवर चढायांनी मध्यंतराला संत सोपान काका बँकेविरुद्ध २०-१३ अशी आघाडी मिळवून दिली, पण मध्यंतरानंतर संत सोपान काकाच्या दीपक सांगळे आणि धीरज देवरेने वेगवान खेळ करत सामन्यात जान ओतली. शेवटची पाच मिनीटे असताना बरोबरीत असलेला खेळ शेवटी मुंबई बंदरने ३६-३२ असा जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. ठाणे आणि मिरा-भायंदर या महानगर पालिका यांच्यात पहिल्या मिनिटापासून संघर्षाची ठिणगी पडली. त्यामुळे पहिल्या सत्रात १४-१४ असा बरोबरीचा खेळ रंगला. मध्यंतरानंतर दोन्ही संघाच्या चढाईबहाद्दरांनी आघाडी घेण्यासाठी जोरदार खेळ केला, पण स्कोर समान रेषेतच धावत होता. अखेर शेवटच्या क्षणी ठाण्याने मीरा भायंदरला २८-२५ असे मागे टाकत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा दूर केला. पिछाडीनंतर बीपीसीएलची कमाल सौरभ फगारे आणि साईप्रसाद पाटील यांच्या भन्नाट चढायांनी सीजीएसटीला (सेंट्रल गुड्स अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स)बीपीसीएलविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत मध्यंतराला २०-१० अशी अफलातून आघाडी मिळवून दिली होती. बीपीसीएलचे मिलन दहिया, तुषार अदावडे प्रभावी ठरत नव्हते. मात्र मध्यंतरानंतर बीपीसीएल संघात अशी जादू संचारली की त्यांनी पहिल्या दहा मिनीटात आधी पिछाडी भरून सामन्यात पुनरागमन केले. मग सीजीएसटीविरुद्ध एकेका गुणाची कमाई करत आघाडी घेतली. शेवटची पाच मिनीटे शिल्लक असताना बीपीसीएलने ३३-२७ अशी आघाडी कमावली होती. मग बुद्धिचार्तुयाचा वापर करत आपली आघाडी टिकवली आणि सीजीएसटीविरुद्धचा संघर्ष ३५-३० असा जिंकली. आयएसपीएलने  मुंबई पोस्टलचे आव्हान ४६-३४ असे सहज मोडीत काढत अंतिम चार संघात स्थान मिळवले. महिलांमध्ये थरारच थरार महिलांच्या उपांत्यपूर्व फेरींच्या सामन्यात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. पतंगराव कदम आणि स्वराज्य स्पोर्ट्स क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात तुल्यबळ लढत झाली. सानिका खाडे आणि आर्या लवार्डे हिने पतंगराव कदमला आघाडी मिळवून देण्यासाठी आक्रमक खेळ केला. दुसरीकडे याशिका पुजारी आणि प्रतीक्षा तांडेलच्या चढायांनी स्वराज्यासाठी गुणांचा सपाटा लावला. पण मध्यंतराला १६-१६ असा खेळ बरोबरीत थांबला. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आघाडीसाठी जंग जंग पछाडले. पण गुणफलक समान रेषेतच धावत होता. अखेर पतंगराव कदम संघाने ३३-३१ अशी दोन गुणांनी बाजी मारली. धर्मवीर आणि श्रीराम कबड्डी संघ यांच्यातला थरारही ३५-३३ असा संपला. धर्मवीरच्या समृद्धी कोळेकर आणि हर्षदा हुंडारे या २ गुणांच्या निसटत्या विजयात मानकरी ठरल्या. राजमाता जिजाऊ आणि विवेक स्पोर्ट्स यांच्यातही काँटे की टक्कर झाली. राजमाता जिजाऊ २४-१४ अशी आघाडीवर होती. पण उत्तरार्धात विवेकच्या स्वीटी आणि संजना पोळने प्रतिस्पर्ध्यांच्या पोटात गोळा आणणारा खेळ केला. बरोबरीत चाललेला हा थरार विवेकने अवघ्या ३८-४० अशा फरकाने गमावला. राजमाता जिजाऊच्या fिनकीता पडवळ, रेखा सावंत विजयाच्या शिल्पकार ठरल्या. उद्धव ठाकरेंनी कबड्डीपटूंना दिल्या शुभेच्छा कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने विक्रोळीतला कबड्डी जल्लोष पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारावले. उपनगरातील मराठी माणसांनी स्पर्धेच्या निमित्ताने आपला ठसा कायम ठेवल्याचे सांगत सर्वांचे कौतुक केले. तसेच क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी या स्पर्धेची परंपरा यापुढेही कायम ठेवावी, अशा शुभेच्छा देत स्पर्धेत खेळत असलेल्या खेळाडूंनाही भरभरून दाद दिली. याप्रसंगी शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेविका राजोल पाटीलही उपस्थित होत्या.

 ठाण्यात महिला आरक्षण विधेयकावरून भाजपवर काँग्रेसचा हल्लाबोल

भाजपच्या विरोधात काँग्रेस “पोलखोल मोहीम” राबवणार ठाणे (सिद्धेश शिगवण):- सध्या देशभरात महिला आरक्षणाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजत असल्याचं पाहायला मिळतंय. महिला आरक्षण मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस सातत्याने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहे. याच अनुषंगाने आज ठाण्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य आरिफ नसीम खान यांनी  पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टी सरकारवर जोरदार टीका केली. आरिफ नसीम खान यांनी आरोप केला की, महिलांसंदर्भातील विधेयक नामंजूर करण्यात भाजपचाच हात असून “खोटं बोला, रेटून बोला” अशी भूमिका केंद्रातील सरकारची असल्याचे ते म्हणाले. महिलांना आरक्षण देण्याच्या नावाखाली डिलिमिटेशनचा अडसर निर्माण करून भाजपने महिलांचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, महिलांसाठी विशेष अधिवेशन आयोजित करूनही प्रत्यक्षात महिलांचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला. “हे महिला आरक्षण विधेयक नसून कायदा संशोधन विधेयक आहे,” असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, 2023 मध्ये 33 टक्के महिला आरक्षणाला काँग्रेस सहमत होती; मात्र या प्रक्रियेमुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनी याला विरोध केला. “2023 च्या 33 टक्के आरक्षणाला मोदी सरकारने थेट सहमती द्यावी. मात्र आरक्षणाच्या नावाखाली संविधानाची गळचेपी आम्ही सहन करणार नाही,” असेही खान यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे आरोप केला की, कायदा संशोधनाच्या माध्यमातून “चोर दरवाज्याने” संविधानात बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे देशातील समतोल आणि प्रगतिशील विचारसरणी धोक्यात येईल. यावेळी त्यांनी नमूद केले की, 2023 मध्ये सोनिया गांधी यांच्या मागणीमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आला होता, तर राहुल गांधी यांनीही जातीनिहाय जनगणनेसाठी सातत्याने भूमिका मांडली आहे. “महिला आणि मागासवर्गीय समाजांना काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. मात्र या निर्णयाच्या नावाखाली संविधानाची हत्या आम्ही होऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी भाजपवर दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप केला. भाजपवर टीका करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “भाजपमध्ये महिला राज्याध्यक्ष का होत नाहीत?” तसेच, महिला सक्षमीकरणाचा दावा करणाऱ्या पक्षाच्या काही नेत्यांवर महिलांवरील अत्याचाराचे आरोप असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काँग्रेस पक्ष लवकरच भाजपच्या धोरणांविरोधात “पोलखोल मोहीम” राबवणार असल्याची माहितीही आरिफ नसीम खान यांनी दिली. 000000000

 उल्हासनगर महापालिकेतील समिती सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध

आज जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा उल्हासनगर दि 20(सुनिल इंगळे ):- उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती तसेच नऊ विशेष समितींच्या सभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व पदांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. आज या प्रक्रियेला अधिकृत शिक्कामोर्तब मिळाले असून ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी महापालिका सभागृहात सर्व सभापतींची घोषणा जाहीर केली. उल्हासनगर महापालिकेच्या विविध समित्यांसाठी सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज पाच दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक न लागता सर्व पदे बिनविरोध निवड निश्चित झाली होती. स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना नगरसेवक कुलवंत सिंग सोहता याची निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी साई पक्षाच्या दीप्ती दुधानी, नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी भाजपच्या मीना कौर अजित सिंग लबाना, पाणी पुरवठा व जलनिसारण समिती सभापती पदासाठी भाजपच्या दीपा नारायण पंजाबी, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या सविता तोरणे, माध्यमिक व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या साक्षी सुर्वे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती पदासाठी भाजपच्या विपुल मयेकर, क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी भाजपच्या प्रीती विनोद मखिजा, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या मीना दीपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या प्रेरणा अजित मखिजानी यांची निवड घोषित करण्यात आली. सोमवारी झालेल्या अधिकृत घोषणेनंतर संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर,माजी आमदार पप्पू कालानी, महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, गटनेता अरुण आशान,शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया यांच्या मार्फत अभिनंदन करण्यात आले. यावेळी महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या संशोधकांना राष्ट्रीय पेटंट प्राप्त

कल्याण: के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील पीएचडी विद्यार्थी अनिकेत मराठे यांच्या संशोधनाअंतर्गत गोगलगायींच्या प्रजातींचे सहज आकलन व्हावे ह्या उद्देशाने एक उपकरण विकसित केले आहे. ह्या उपकरणासाठी त्यांना राष्ट्रीय पेटंट प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. अनिकेत मराठे हे शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान आणि गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे येथे प्राणिशास्त्र विभागात सहा. प्राध्यापक असून पेंढरकर महाविद्यालयातील डॉ. शरद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी करीत आहेत. कॅ.डॉ. वर्षा नरवडे आणि अर्जुन शाहू यांचेदेखील पेटंट यशस्वीपणे नोंद होण्यासाठी सहकार्य लाभले आहे. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल लवंगारे ह्यांनी डॉ.  महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधनाभिमुख व्हावे ह्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करून संस्थादेखील सर्वतोपरी मदत करेल असेही त्यांनी सांगितले.  याप्रसंगी डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय भोळे हे देखील उपस्थित होते. 0000000000

 भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा

३२ बनावट खाती उघडून ५७ लाखांचा गंडा, सिन्नरमध्ये गुन्हा दाखल! हरिभाऊ लाखे नाशिक : अशोक खरातची वेगवेगळी गैरकृत्ये उघड होत असून त्याच्याविरुध्द सिन्नर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात…

आमच्या हक्काचे पैसे मृत्यूपूर्वी मिळणार का? सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिका प्रशासनाला सवाल 

  मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा उल्हासनगर( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगर महापालिका सेवेतून सन २०१६ ते आजतागायत सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ व महापालिकेच्या…

माथेरानमध्ये वृक्षतोडीचा सुळसुळाट

प्रशासनाचे मौन कायम मुकुंद रांजाणे (माथेरान) माथेरान मध्ये मागील काही वर्षांपासून जुने बंगले खरेदी करून त्याजागी आलिशान हॉटेल्स उभी रहात आहेत. या हॉटेलमध्ये रूम्स बांधताना अडसर ठरणारी झाडे मुळासहित छाटली…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात खासगी व्यक्तीला राहण्यासाठी घर

सबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी करण्याची मागणी कल्याण: कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात शासकीय जमिनीवर नियमांची पायमल्ली करून खासगी व्यक्तीला कायमस्वरूपी राहण्यासाठी घर बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला…

केडीएमसी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथमध्ये सामंजस्य करार

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिपत्याखालील कल्याण पश्चिमेतील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा रुग्णालय, कल्याण पूर्वेतील  शक्तीधाम रुग्णालय यामध्ये रुग्णसेवा देण्याकरिता सामंजस्य करार तत्वावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करण्याच्या…

तारापूर औद्योगिक क्षेत्रात घातक रसायनांची बेकायदेशीर विल्हेवाट

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश मुंबई  : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील  घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकार बद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी  दिले आहेत. विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र ८ डी/१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रायांनी अवैधरित्या व बेकायदेशीरपणे घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकार विल्हेवाट लावण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. औद्योगिक भूखंडाचा करार एमआयडीसीने २०१५ व २०२० मध्येच रद्द केला असतानाही कंपनीकडून बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उच्च रासायनिक घटक (High COD) असलेले सांडपाणी थेट नाल्यात व समुद्रात सोडले जात असल्याचे तक्रार समोर आले असल्याचे समोर आल्याने या प्रकरणात सविस्तर माहिती घेण्याकरिता प्रत्यक्ष पाहणे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.