Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी रिक्षा स्टँडवर चालकांकडून दादागिरी

अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आश्वासन कल्याण :  कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी रिक्षा स्टँडवर रिक्षाचालकांची मनमानी आणि दादागिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्टँडच्या आजूबाजूला येणारे दुचाकी चालक आणि खासगी वाहनातून येणाऱ्या प्रवाशासबोत स्टँन्डमधील रिक्क्षा चालक गैरवर्तन करतात, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक रात्रीच्या वेळी स्काय वाँक वरून येणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबातील सदस्य त्यांना घेण्यासाठी रिक्क्षा स्टँन्ड परिसरात आपल्या वाहनासह थांबतात. रिक्षाचालक  तेथे वाहने उभी करण्यास नकार देतात. रिक्षा स्टँडला आपली मालमत्ता समजून रिक्षाचालक सामान्य नागरिकांना तेथे वाहनासह थांबण्यास मज्जाव करत असल्याचा आरोप केला जात आहे. शनिवारी रात्री  येथील एका स्थानिक नागरिकाशी रिक्क्षा चालकांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. शरद शिंदे नावाचा व्यक्ती आपल्या मुलीला घेण्यासाठी स्कायवॉकजवळ पोहोचला असता, काही रिक्षाचालकांनी त्यांना तेथे थांबवण्यापासून रोखले आणि वाद सुरू झाला, शिंदे यांनी स्पष्टीकरण देऊनही रिक्षा चालक संतापला आणि त्याने दादागिरी केली असल्याचा प्रकार समोर आला. स्टँडवर प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जाते आणि चौथ्या राईडच्या नावाखाली लोकांना बराच वेळ ताटकळत बसवले जाते असा आरोप स्थानिकांनी केला आहे. एवढेच नाही तर वाहनचालक गणवेशाचे नियमही पाळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शरद शिंदे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे, वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी वाहतूक विभाग आणि आरटीओकडे केली आहे.

दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते लोकार्पण!

मुरबा गणपती भक्तांसाठी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे भक्तीचा आणि सुरक्षेचा संगम साधला : महेंद्रशेठ घरत पनवेल : मोरावे येथील मुरबा गणपती मंदिर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय होता. मात्र या होड्या छोट्या आहेत. गणेश दर्शन घेण्यासाठी प्रवास करताना अबाल-वृद्धांना, माय-लेकींना त्या धोकादायक असल्याचे महेंद्रशेठ घरत यांच्या लक्षात आले होते. मध्यंतरी एक होडी जरा कलंडली होती, साहजिकच भक्तांमध्ये भीती निर्माण झाली होती. महेंद्रशेठ घरत यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुरबा गणपतीचे दर्शन घेताना गणेशभक्तांना सुरक्षित प्रवासासाठी लाईफ जॅकेट आणि पॅसेंजर बोट द्यायची, असे त्यांनी सौभाग्यवती शुभांगीताईंसोबत मुरबा गणपतीचे दर्शन घेताना बोलून दाखवले होते. त्यामुळे गेल्या वर्षी २९ मे २०२५ रोजी पॅसेंजर बोट आणि लाईफ जॅकेट गणेशभक्तांसाठी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताईंनी आपल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दान केले होते. त्यानंतर अनेकदा त्यांनी त्या पॅसेंजर बोटीने प्रवास केला. तेव्हा भक्तांची संख्या वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी (ता.५) वर्षपूर्ती होण्यापूर्वीच संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत दुसरी पॅसेंजर बोट दिली. तिचे लोकार्पण महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोरावे गावातील मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी फक्त गणेशभक्त नाही तर सेवक आहे. त्यामुळेच भक्तांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेऊन दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला. आज तिचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. मी भक्ती आणि सुरक्षेचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे.” महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे. ते दर संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जातातच. तसेच बऱ्याच वेळा ते थेट मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतात. पनवेल तालुक्यातील, उलवे नोडमधील समुद्रकिनारी वसलेले मोरावे गाव. येथील मासेमारी करणाऱ्या तीन-चार तरुणांनी स्वकष्टाने चक्क समुद्रात मुरबा गणपतीचे मंदिर बांधले आहे. राज्य सरकार शिवस्मारक समुद्रात कधी बांधेल माहिती नाही, पण मोरावे गावच्या तरुणांनी भर समुद्रात गणपतीचे मंदिर बांधून मोठेच धाडस केले आहे. महेंद्रशेठ घरत हे दूरदृष्टीचे नेते आहेत. मोरावे गावातील मासेमारी करणारे तरुण स्वयंपूर्ण व्हावेत, त्यांची रोजीरोटी कायम चालली पाहिजे, ते आर्थिकदृष्ट्याही सक्षम व्हावेत, यासाठी त्यांनी आगामी काळात पर्यटनाद्वारे तरुणांना रोजगार कसा मिळेल, याचे व्हिजन डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून महेंद्रशेठ घरत यांनी रविवारी दुसरी पॅसेंजर बोट दिली. गणेशाचे निस्सीम भक्त असलेले महेंद्रशेठ घरत दर संकष्टी चतुर्थीला मुरबा गणपतीच्या दर्शनाला जातात. तेव्हा ते गणपतीचे मनोभावे दर्शन घेतात आणि फ्लेमिंगोंचे थवे पाहण्याचा विलक्षण आनंदही घेतात. राज्यातील कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला हे जमेल असे नाही, मात्र महेंद्रशेठ घरत यांनाच ते जमते. कारण खरा आनंद कशात आहे, याची मोजमापे त्यांनाच माहिती आहेत. महेंद्रशेठ घरत हे नुसते बोलत नाहीत तर करून दाखवतात. त्यांनी दोन पॅसेंजर बोट मुरबा गणपती मंदिराला दान करून आम्हाला उपकृत केले आहे. आम्ही त्यांचे कायमच ऋणी राहू. त्यामुळे आम्ही मुरबा गणपतीचरणी प्रार्थना करतोय, की गणराया, महेंद्रशेठ घरत यांना समाजकारण आणि सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी अखंड ऊर्जा प्राप्त होऊ दे, अशी भावना मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. यावेळी कॉंग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, अॅड. अविनाश ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, श्रीकांत घरत, रमेश घरत, तसेच एम. जी. ग्रुपचे सदस्य आणि हजारो गणेशभक्त उपस्थित होते.

१७ एप्रिलपासुन बोरिवली येथे रंगणार पाचवी अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धा 

मुंबई- मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत  स्कूल ऑफ एनवायरन्मेंट ऍण्ड आर्किटेक्चर( एक्सर…

 केआरपी XI चा समर व्हेकेशन क्रिकेट शिल्डवर झेंडा

 गौड युनियनवर ६ विकेटने मात; मनीष राव ‘मॅन ऑफ द मॅच’ मुंबई : इस्प्लनेड लिबरल्स क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित समर व्हेकेशन क्रिकेट शिल्ड टूर्नामेंटमध्ये केआरपी XI क्रिकेट क्लबने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.…

 आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा

जैन इरिगेशन ब संघाची मुंबई पोलीस ‘अ’ संघावर मात मुंबई :  राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर कंपनी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत जैन इरिगेशन ब संघाने ग्रेटर मुंबई पोलीस एससी अ संघाचा १५ धावांनी पराभव केला. मुंबई पोलीस एससी अ संघाने नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन ब संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी २० षटकांत ८ बाद १४३ धावा केल्या. त्यात विलोहित देसाईने सर्वाधिक (५४ धावा, ४७ चेंडू, ४ चौकार, १ षटकार) योगदान दिले. त्याला अनिरुद्ध नायरची (३९ धावा, ३१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) चांगली साथ लाभली. मुंबई पोलीस संघाकडून योगेश पाटीलने (४/२९) प्रभावी गोलंदाजी केली. ग्रेटर मुंबई पोलीस संघाला प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव १८.४ षटकांत १२८ धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून योगेश पाटील (३५ धावा, २२ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) आणि हर्ष साळुंखेने (२५ धावा, ९ चेंडू, ३ चौकार, २ षटकार) छान फटकेबाजी केली तरी सोहम सबनीस (२.४-०-१३-३) आणि हर्षल वाघमारेच्या (४–०-२४-२) अचूक माऱ्यासमोर अन्य फलंदाजांचा टिकाव लागला नाही. योगेश पाटील याला सामनावीर म्हणून प्रमुख पाहुणे महेंद्र अग्रवाल (ईडी-वित्त) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक; जैन इरिगेशन ब संघ – २० षटकांत ८ बाद १४३(विलोहित देसाई ५४, अनिरुद्ध नायर ३९; योगेश पाटील ४/२९) वि. ग्रेटर मुंबई पोलीस एससी अ संघ – १८.४ षटकांत सर्वबाद १२८ (योगेश पाटील ३५,  हर्ष साळुंखे २५; सोहम सबनीस २.४-०-१३-३, हर्षल वाघमारे (४–०-२४-२). निकाल: जैन इरिगेशन ब संघ १५ धावांनी विजयी. सामनावीर : योगेश पाटील. 00000000

Heading – कानपिल्लेवारच्या नाबाद शतकामुळे मारवाडी सीसीचा मोठा विजय

७६वी सालार जंग निमंत्रित क्रिकेट स्पर्धा २०२६ मुंबई: इस्लाम जिमखाना आयोजित ७६व्या सालार जंग निमंत्रण क्रिकेट स्पर्धेच्या (२०२६) पहिल्या फेरीच्या सामन्यात सोमवारी सलामीवीर प्रग्नेश कानपिल्लेवारच्या (नाबाद १०० धावा, ३६ चेंडू…

केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड

केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड महिला बालकल्याण समितीसाठी सारिका जाधव, शिक्षण मंडळासाठी भाजपाचे अभिजित थरवळ यांची निवड कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव  आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. या उमेदवारांनी 2 एप्रिलला आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केली होती. केडीएमसी मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आज या तिन्ही सभापती पदांसाठी निवडणूक अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशांत – सोनाली विजयी

रोटरी क्लब कॅरम स्पर्धा रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या ६ व्या राज्य मानांकन कॅरम…

महाराष्ट्र खो-खोला नवी दिशा! २०२६-२७ साठी निवड समितीची दमदार घोषणा!

अनुभवी तज्ज्ञांवर निवडीची जबाबदारी पुणे : “उत्कृष्टतेची निवड, विजयाची पायाभरणी!” या ब्रीदवाक्यासह महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने २०२६-२७ हंगामासाठी निवड समिती व राष्ट्रीय संघ प्रशिक्षकांची भव्य घोषणा करत क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह निर्माण केला आहे. राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धांसाठी अनुभवी आणि कसलेल्या तज्ज्ञांवर जबाबदारी सोपवण्यात आल्याने आगामी स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निवड प्रक्रियेचा पाया: अनुभवी हातात सूत्रे! या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांनी पुणे येथे पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत केली. यावेळी कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. विविध वयोगटांतील खेळाडूंची निवड, त्यांचे मार्गदर्शन आणि राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांची उभारणी यासाठी या समित्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्य निवड समिती: पुरुष व महिला गटासाठी दिग्गज सज्ज! पुरुष व महिला गटासाठी निवड समितीत अनुभवी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत सोमनाथ स्वामी (सांगली), तुषार मोरे (मुंबई उपनगर), रविराज परामने (ठाणे) आणि रत्नराणी कोळी (लातूर) यांचा समावेश असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड होणार आहे. कुमार व मुली गट: नवोदित प्रतिभेला संधी! कुमार व मुली गटासाठी निवड समितीत श्रीरंग बनसोडे (सोलापूर), विशाल पाटील (जळगाव), यतीश आक्रे (पालघर) आणि नंदिनी धुमाळ (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमार्फत उदयोन्मुख खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळणार असून, राज्यासाठी नवी प्रतिभा घडवली जाणार आहे. किशोर – किशोरी गट: भविष्यातील स्टार्सची निवड! किशोर व किशोरी गटासाठी अमोल चव्हाण (जालना), पंकज चवंडे (रत्नागिरी), रमेश लव्हाट (अहिल्यानगर) आणि तृप्ती गाडगीळ अग्रवाल (पुणे) यांची निवड समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. या गटातील खेळाडूंमध्ये असलेली ऊर्जा आणि क्षमता योग्य दिशेने विकसित करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भविष्यासाठी भक्कम पायाभरणी: महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर! “योग्य निवड, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत” या त्रिसूत्रीवर आधारित ही निवड प्रक्रिया महाराष्ट्राच्या खो-खो संघांना अधिक सक्षम बनवणार आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचा झेंडा उंचावण्यासाठी ही समिती निर्णायक भूमिका बजावेल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे. एकंदरीत, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने घेतलेला हा निर्णय म्हणजे केवळ निवड नव्हे, तर ‘विजयाच्या नव्या पर्वाची’ दमदार सुरुवात आहे!

 डोंबिवली पश्चिमेतही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय

डोंबिवली पश्चिमेतही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा कल्याण : शहरात पश्चिमेकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली दुय्यम प्रबंधक कार्यालयाची मागणी लवकरच मार्गी लागणार असून त्यासंदर्भात शासन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र शासन पुणे यांनी डोंबिवलीत पश्चिमेलाही ती सुविधा देण्यास हिरवा कंदील दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी त्यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, यासंदर्भात पश्चिमेला स्वतंत्र शिधावाटप केंद्राप्रमाणेच ही सुविधा देखील असावी यासाठी पाठपुरावा केला होता, त्या सुविधेमुळे आपल्या पंच क्रोशीतील नागरिकांची गैरसॊय दूर होणार आहे. पूर्वेकडील यंत्रणेवर पडणारा ताण देखील कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वेला ती सुविधा आहेच, पण आता वाढत्या शहरीकरणामुळे ती सुविधा आता पश्चिमेलाही सुरू होणार आहे. त्यामुळे त्या विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. शासनाच्या महसूल व वन विभागाने १ एप्रिल रोजी त्यासंदर्भात शासन आदेश काढले असून डोंबिवली पश्चिमेला ती सुविधा असेल असेही शासन आदेशात म्हंटले आहे. त्या विभागाच्या कार्यासन अधिकारी प्राची पालव यांनी ते आदेश दिले असल्याचे आदेशावरून स्पष्ट झाले. नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती, त्याबाबत अलीकडे महसूल विभाग आणि शासनाला पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला, त्यानुसार मागणीला यश आले असून लवकरच पश्चिमेलाही दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होईल असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.